“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचे प्रकाशन
गझलसंग्रह : माझी गझल निराळी
पृष्ठे : ८८
किंमत : ७०/-
कवी : गंगाधर मुटे "अभय"
प्रकाशक : राज जैन
शब्दांजली प्रकाशन,
नर्हे गाव, पुणे


“माझी गझल निराळी” या गझलसंग्रहाचे प्रकाशन दि. १० नोव्हेंबर २०१३ रोजी दुपारी २.०० वाजता चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंडवर शेतकरी संघटनेच्या खुल्या अधिवेशनात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांच्या शुभहस्ते आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग, स्वभापचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अॅड. वामनराव चटप, पी.टी.आयचे माजी अध्यक्ष मा. वेदप्रताप वैदीक, माजी खासदार भूपेंद्रसिंग मान, माजी आमदार सौ. सरोजताई काशीकर, महिला आघाडीच्या प्रांताध्यक्षा सौ. शैलाताई देशपांडे, युवा आघाडीचे अध्यक्ष संजय कोले, अनिल धनवट, माजी मंत्री रमेश गजबे, अॅड दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत विमोचन करण्यात आले.
“माझी गझल निराळी” या गझलसंग्रहाला जेष्ठ संगीतकार गझलगंधर्व सुधाकर कदम यांची प्रस्तावना लाभली असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझलगायक गझलनवाज भिमराव पांचाळे, प्रदीप निफ़ाडकर, स्वामी निश्चलानंद, किमंतू ओंबळे, प्रमोद देव यांचे अभिप्राय लाभले आहे. पुणे येथील शब्दांजली प्रकाशनने हा गझलसंग्रह प्रकाशित केला असून www.pustakjatra.com या संकेतस्थळावर ऑनलाईन विक्रीस उपलब्ध करण्यात आलेला आहे.
पृष्ठे : ८८
किंमत : ७०/-
कवी : गंगाधर मुटे "अभय"
प्रकाशक : राज जैन
शब्दांजली प्रकाशन,
नर्हे गाव, पुणे
-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------

याद्या
13836
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुटे साहेब अभिनंदन तरी कसे
धन्यवाद
In reply to मुटे साहेब अभिनंदन तरी कसे by जयनीत
अभिनंदन आणि शुभेच्छा !
छान
डॉ. अभय बंग यांचा अभिप्राय
वाह
अभिनंदन आणि शुभेच्छा !!
अभिनंदन.
आदरणीय डॉ. मधुकर वाकोडे यांचा अभिप्राय.
अभयराव खूप खूप शुभेच्छा.
नक्की
In reply to अभयराव खूप खूप शुभेच्छा. by अभ्या..
डॉ.विकासजी आणि भारतीजी आमटे यांचा अभिप्राय.
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन!
सोनेरी आणि अविस्मरणीय दिवस
तुषार देसले यांचा अभिप्राय
(No subject)
श्री प्रमोद गुळवेलकर यांचा अभिप्राय.
तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण घेणारा गझलसंग्रह
तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण घेणारा
गझलसंग्रह : "माझी गझल निराळी"
आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवाचं चिंतन त्यांनी आपल्या गझलेत ओतलं तेव्हा वाचकाला त्यातील यथार्थता पटते. हेच मुटेंच्या यशस्वी गझलेचं गमक आहे.
उदा.
"गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी
केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने"
ज्यांच्या गझलांना सुधाकर कदमांची (पुणे) प्रस्तावना, भीमराव पांचाळेंचे पाठबळ, प्रदीप निफ़ाडकर, प्रमोद देव(मुंबई), स्वामी निश्चलानंद(अरुणाचल प्रदेश) यांच्या कौतुकाची छाप मिळावी त्या गझलांवर माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तीने तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण घेणाऱ्या ह्या गझलावर चार शब्द लिहिणे ही केवळ औपचारिकताच.
"दिसतात अभय येथे चकवे सभोवताली
रस्ताच जीवनाचा सुचणे कठिण झाले"
स्वलेखनाने स्वानंदा सोबत परमार्थही साधावा बघा हा शेर
"आनंद भोगताना परमार्थही साध्य व्हावा
असलेच कार्य कर तू दोहे मला म्हणाले"
कर्म और भाग्यका किताब है जिंदगी, पाप और पुण्य का हिसाब है, जिंदगी जेव्हा कर्म करताना भाग्य फळाला येते तेव्हा आपसूकच नशीब फळते.
"प्राक्तन फिदाच झाले यत्नास साधतांना
मोती पुढ्यात आले वाळूस गाळतांना"
भारतातील सद्य परिस्थितीचे वर्णन खालील शेरामध्ये बघा. सर्वांना नोकरी हवी मग शेती कुणी करायची असा काहीसा आशय.
निघून गेलेत शहाणे सर्व साहेब बनायला
मूर्ख आम्ही येथे उरलो, मोफत अन्न पिकवायला
धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी
तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी
श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे
झोपले असेल शेत जागवायला हवे
"कोणीतरी यांची आता पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले की गरिबी हटली पाहिजे"
"लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे बत्तीस तारखेला"
"सोकावलेल्या अंधाराला इशारा आज कळला पाहिजे
वादळ येऊ दे कितीही पण दीप आज जळला पाहिजे"
"चला वापरा एकदा आणि फेका हवी ती खरीदी नव्याने करा
इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ हृदय भासते मेड इन चायना"
पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर?
सन्मान मोल आहे कर अभय चाकरी"
जास्तीत जास्त शरीर उघडे टाकून कमीतकमी वस्त्र वापरण्याच्या ’फॅशन’वर आसूड ओढताना मुटे म्हणतात
"ललना पाहून कपडे शरमले
मते पाहताच नेते नरमले"
भ्रष्टाचारावरही श्री मुटे आसूड ओढून लिहितात की, ही व्यवस्थाच किडली आहे
"टाळूवरील लोणी खाण्यास गुंतला जो
सत्कारपात्र तोची मशहूर थोर झाला"
"सरकारी खजिन्यावर मारून घ्यावा हात
चिरीमिरी दिली तरी मिटून जाईन वाद"
- तुळशीराम बोबडे
अकोला
---------------------------------------------------------------------------------------------------------------
"माझी गझल निराळी" प्रस्तावना - श्री सुधाकर कदम
असा एखादा शेर आपल्याला वाचायला मिळतो.
गंगाधर मुटे यांना कवितेच्या, गझलच्या रुपाने जगण्याचे संचित गवसले आहे. म्हणूनच तर ते म्हणतात...
खूप काही चांगले लिहिण्याची क्षमता असणा-या गंगाधर मुटे यांना पुढील गझल लेखनासाठी शुभेच्छा...
जागतिक दृष्टिदान दिन सुधाकर कदम
सोमवार, १० जून २०१३ जेष्ठ गझलगायक, संगीतकार
पुणे
परिघाबाहेरची गझल - श्री किमंतु ओंबळे
"माझी गझल निराळी" या गंगाधर मुटे साहेबांच्या गझल संग्रहास मन:पूर्वक शुभेच्छा!
किमंतु ओंबळे
संपादक
दिनांक: ५ मे २०१३ आनंदऋतू ई-मॅगझिन
ठाणे
परीक्षकांचीच परीक्षा घेणारा गझलसंग्रह - श्री. श्याम पवार
श्री. गंगाधर मुटे,
सप्रेम नमस्कार
अलीकडेच प्रकाशित झालेली तुमची 'वांगे अमर रहे' व 'माझी गझल निराळी' ही दोनही पुस्तके वाचली. वाचकाला अस्वस्थ करण्याचे व विचार करायला भाग पाडण्याचे काम या लिखाणातून निश्चितपणे झाले आहे. कृषिप्रधान भारतातील, शेतात घाम गाळणार्या शेतकरी समाजाचे दुर्दैवी भयाण वास्तव परिणामकारक शब्दांत या लिखाणात व्यक्त झाले आहे.
'वांगे अमर रहे' या लेखसंग्रहातील प्रत्येक लेखात तुम्ही मांडलेली व्यथा भारताच्या अर्थव्यवहारातील व्यंगांवर नेमकेपणाने बोट ठेवणारी आहेच आणि त्याचबरोबर 'शेतकर्याचा आसूड' ओढण्याची ताकदही त्यातून समर्थपणे प्रगट झाली आहे.
सन १९८० नंतरच्या दोन दशकांत महाराष्ट्रात शेतकरी संघटनेचे वादळ उठले. भूतकाळाचे अचूक विश्लेषण आणि भविष्यकाळाचा नेमका वेध घेणारे शरद जोशी यांचे नेतृत्व संघटनेला लाभले. संघटनेच्या भरतीचा हा काळ. या भरतीच्या लाटा छातीवर झेलण्यासाठी असंख्य तरूण यात उतरले. शतकानुशतके घाव झेलून वेदना मुकी झालेल्या व सदान् कदा मनं मारली जाऊन मुर्दाड झालेल्यांना नवी ऊर्मी, नवी प्रेरणा या विचाराने निश्चितपणे मिळाली. लाखोंच्या संख्येने शेतकरी भाऊबहिणी रस्त्यावर उतरले. शेतकर्याच्या व कष्टकर्याच्या स्वातंत्र्याची प्रेरणा घेतलेल्या आणि घरदार सोडून काम करण्यासाठी तयार झालेल्या तरूण संघटनापाईकंची फौज उभी राहिली. पारतंत्र्यानंतर प्रथमच शेतकरी भावांच्या बरोबरीने मायभगिनी तुरुंगात जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. धास्तावलेल्या स्वकीयांच्या सरकारातील आमच्याच राज्यकर्त्या पोरांनी आपल्या भावांच्या छातीत गोळ्या घालून त्यांचे बळी घेतले, मायभगिनींना लाठ्याकाठ्यांनी सोलून काढले. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांतही शेतकरी संघटनेच्या प्रभावाखाली शेतकर्यांची एकजूट झाली. राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांना संघटनेच्या अर्थशास्त्रीय विचारांची दखल घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र संघटनेच्या मागण्यांची पूर्तता अजूनही पूर्णत्वाने झालेली नाही. त्यामुळे चळवळीचे सामर्थ्य टिकविणे आणि वाढविणे आवश्यक असल्याचा तुम्ही मांडलेला आशावाद योग्यच आहे.
संघटनेचा विचार जितका मूलगामी आणि परिवर्तनवादी तितका तो समाजाच्या विविध थरांतून व विविधांगांतून खोलवर रुजतो. शेतकरी संघटनेला असे भाग्य लाभले. संघटनेच्या विचारांचा व आंदोलनांचा प्रभाव साहित्यक्षेत्रातही झालेला आहे. विशेष करून ग्रामीण साहित्यिक नव्याने लिहू लागले. एक नवीन साहित्यधारा तयार झाली. सकस आणि परिवर्तवादी साहित्यलेखकांची दमदार पिढी संघटनेच्या विचाराने प्रभावित होऊन लिहू लागली, बोलू लागली. आज ही यादी लक्षात घेण्याइतपत मोठी झाली आहे. संघटनेच्या या मंतरलेल्या कालखंडात काम केलेल्यांची पिढी आता वृद्धत्वाकडे झुकली आहे. अनेकजण परलोक(!)वासी झाले आहेत. परंतु, हा वारसा समर्थपणे पुढे सुरू राहील याचा भरवसा तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे पाहून 'अभय' देणारा वाटतो.
'घामाची कत्तल जेथे, होते सांजसकाळी
'युगानुयुगे ते बोलले, ऐकत आलो आम्ही
ही तुमच्या गझलेमधली भूमिका केशवसुतांच्या 'तुतारी'ची आठवण जागविणारी आहे यात शंका नाही.
सभोवतालचे भयाण वास्तव आणि उद्ध्वस्त ग्रामव्यवस्था यांचे चित्रण वेगवेगळ्या गझलांमध्ये टोकदार शब्दांत व्यक्त झाले आहे.
'बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
'शिवारात काळ्या, नि उत्क्रांतलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
'टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे
'दिसतात अभय येथे चकवे सभोवताली
'विज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली
अश्या प्रकारच्या ओळींतून हे वास्तव स्वरूपात व्यक्त झाले आहे. जीवन जगण्यातील हतबलता आणि त्यामुळे होणारी आत्महत्या याची व्यथा
'असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
अश्या ओळींतून व्यक्त झाली आहे. तरीसुद्धा या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याची जिद्द ठाम आहे.
'राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
'आता अभय जगावे अश्रु न पांघरावे
या ओळींमधून तुमची संकटावर मात करण्याची लढावू वृत्ती व्यक्त झाली आहे.
'घराणे उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो आम्ही?
'आम्हास नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही अभय पदांचे
'जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
'लोंढेच घोषणांचे, दिल्लीवरून आले
'भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे
या प्रकारच्या अनेक गझलांमधून या विकृतीचे चित्र मांडले गेले आहे ते निश्चितच विषण्ण करणारे तर आहेच आणि त्याच बरोबर विचार करायला लावणारे आहे. या सगळ्या विसंगतीत तुमची मातीशी असलेली अतूट नाळ
'अभय एक युक्ती तुला सांगतो मी करावे खरे प्रेम मातीवरी या
या शब्दांमधून व्यक्त झाली आहे, ती खरोखरी भावणारी वाटली यात काही शंका नाही.
गझल या काव्यप्रकाराची हाताळणी तुम्ही अगदी अलीकडे सुरू केली तथापि त्यात जे लिखाण केले त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना दाद देणे भाग आहे. मात्र त्याच वेळी तंत्राच्या मार्गाने जाताना अंतःकरणातल्या ऊर्मी व्यक्त करताना काही राहून तर जात नाही ना याचा विचार होण्याची आवश्यकता व्यक्त करावीशी वाटते.
'वांगे अमर रहे' या लेखसंग्रहातील शेवटचा 'असा आहे आमचा शेतकरी' हा लेख सर्वांनाच अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. आणि 'शेतकरी समाजासाठी कार्य करणे हे तुलनेने अधिक कठीण काम असले तरी ऐतिहासिक आणि महान कार्य आहे याची खूणगाठ मनाशी पक्की बांधून घेणे गरजेचे आहे' असा व्यक्त केलेला आशावाद बरेच काही सांगून जाणारा आहे. एकूणच सर्व लेखसंग्रह अभ्यासनीय झाला आहे.
पुस्तके वाचण्याची संधी जाणीवपूर्वक करून दिली याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.
गझलविश्वाची परिभाषा बदलणारा गझलसंग्रह - श्री राज पठाण
गझलविश्वाची परिभाषा बदलणारा
शेतकर्याला अभय देणारी निराळी गझल
अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे
तेच तेच रोग आणि त्याच त्याच औषधी
एकदा तरी निदान नीट व्हायला हवे
शेतकरी व त्यांचे प्रश्न याची जाण गझलकाराला आहे. प्रश्नाचे अचूक निदान कवीस आहे. हे प्रश्न का? कशामुळे व कोणी निर्माण केले याचेही भान आहे. या प्रश्नाची उत्तरेही त्याला माहीत आहेत. पण ते सोडवणे मात्र त्याच्या हातात नाही. फक्त संघर्ष करणे, लढणे आहे. या अफाट देशाचे राज्य दिल्लीच्या तख्तावरून चालते व तेथील वास्तवातील विसंगती कवीकडून दाखवली जाते.
लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला
याचा दुष्परिणाम शेतकर्याच्या आत्महत्येत होत आहे कारण राज्यकर्ते भेकड आहेत. ते स्वतः भेकड आहेत ते जनतेला काय अभय देणार? त्यामुळे मृत्यू सोकावलाय कारण त्याला शेतकर्याच्या रक्ताची चटक लागली आहे. निसर्गही शेतकर्याला साथ देत नाही कारण पाऊसही वेळेवर येत नाही. त्यामुळे कवी व्यथा मांडतो
भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला
उद्ध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला
शिवाय शेतकर्याला फक्त कोरडा उपदेशच केला जातो. आत्महत्या करणे चूक आहे, असे सांगितले जाते ते कवीलाही मान्य आहे. पण त्याचा प्रश्न आहे की,
असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी
शेतकर्याच्या दु:खाची भाषा सत्तेस कळेल असे ज्ञान कुणी दाखवत नाही कारण सत्तेमुळे नेते चळून गेले आहेत, ते धनवंतांना कुरवाळतात तर श्रमिकाला छळतात. अधिकारीही लाचखोरीला निर्ढावलेले आहेत त्यांमुळे ते
अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी
कुणाच्याच बापास ना घाबरे तो
तर नेतेही मुजोर झालेत कारण
नसतेच जे मिळाले केव्हाच सातजन्मी
ते सर्व प्राप्त होता नेता मुजोर झाला
उलट सत्तेचा वापर जनतेवर अन्याय करण्यासाठीच करतात. शेती करून मालक होणे त्यामुळेच मूर्खता ठरत आहे. तर लाचखोरी करता येणार्या नोकरीला सन्मान मिळत आहे.
शेती करून मालक होणेच मूर्खता
सन्मान मोल आहे कर ’अभय’ चाकरी
असे त्यामुळेच स्वतःला बजावतो आहे. या नेत्यांना स्वार्थ मात्र कळतो. एरव्ही बेमुर्वत वागणारे नेते निवडणुकीच्या वेळी मात्र नरम होतात ते अगदी मोजक्या शब्दात व्यक्त करताना कवी म्हणतो
मते पाहताच
नेते नरमले
वास्तविक पैसा जनतेचा असतो पण नेते मात्र ते कसाही उधळतात.. नेते असे वागत असले तरी, सामान्य माणूस मात्र कष्टाने मिळणार्या संपत्तीसच खरे धन मानतो.
अभय ते खरे जे मिळाले श्रमाने
सरकारी योजनांचे पैसे मिळवायचे तर चिरीमिरी द्यावी लागते तरच वाद होत नाही. नेते जनतेत परस्परात भांडणे लावतात. अशांचा जयजयकार करू नये असे आग्रहाने कवी सांगतो.
छाया नरोत्तमाची, अभयास उब देते
त्यांचा उदो कशाला? जे कलह माजवीती
शेतीच्या दुर्दशेचे वास्तव कवी मांडतो ते असे
कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे
बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फुगून गेला
मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे
समाजाच्या वाटेला सत्तेचा अल्पसाही वारा मिळत नाही कारण येथे घराणेशाहीच जोपासली गेली आहे. लबाडांच्या वंशात जन्म मिळणार्यांनाच तेथे वाव आहे.
अम्हांस नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही "अभय" पदांचे
लबाडवंशात जन्म ज्यांचा, तमाम त्यांचा पुढार आहे
तर कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? या गझलेत कवी म्हणतो
"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे
कवीला प्रश्न पडतो
का लोळतात पायी सिंहासने तयांच्या?
अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?
सामान्यांच्या प्रश्नाबाबत पूर्वी पक्षांच्या चळवळी व्हायच्या त्या आता कमी झाल्या आहेत. म्हणून कवीला वाटते की
वादंग वा दुरावा पंक्तीत उरला नाही
डावी उपाशी नव्हती, उजवी जेवली होती
कारण सगळ्यांनीच आता कुठे ना कुठे काही काळ तरी सत्ता उपभोगल्या आहेत.
घामचोरीची तक्रार दाखल केली तेव्हा
विरोधक प्रसन्न नव्हते, सत्ता कोपली होती
शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळताना
एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता
शेतकर्यांच्या प्रश्नाची फारशी गांभीर्याने चर्चा होत नाही. आकांताची दखल घेतली जात नाही पण नको त्या प्रश्नांची मात्र चर्चा होते,
आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते
शेतकर्याने आंदोलन केले तर त्यांना लाठीमार, गोळीबाराला सामोरे जावे लागते
लाठी उगारताना, बंदूक रोखताना
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?
असा रोकठोक प्रश्न शासनकर्त्यांस विचारतात अन शेतकर्याला आपल्या बचावासाठी क्रांतीचा नवा उग्र मार्ग अवलंबावा लागेल असेही ठासून सांगतात. कवी म्हणतात
सत्याग्रहास आता रक्तात माखवावे
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता
या क्रांतीला शब्दांच्या माध्यमाची जोड हवी. रशियातील क्रांतीच्या वातावरण निर्मितीला मॅक्झिमा गॉर्कीच्या “आई” या कादंबरीची मदत झाली होती. म्हणूनच कवी आत्मविश्वासाने म्हणतात
घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी
गझल माझी बंड आणि अन्यायाला दंडही
शेतकर्यांच्या मुक्तिसाठी आयुधांची थाळी
कवी केवळ संघर्ष करणारा नाही तर त्याला विधायकतेच्या निर्मितीचा ध्यासही आहे.
चेतनेला पेरून देते अभयतेची खते
संघर्षाला पिकवताना प्रतिभा बनते माळी
मानवी जीवनात प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी युद्धाचा मार्ग अवलंबावा लागतो. पण मानवी जीवन केवळ संघर्षासाठी नाही. त्याला सुख, शांती व समाधानाची नैसर्गिक आस असते. त्यामुळेच कवी मार्मिक शब्दांतून ते व्यक्त करतो.
घमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
शासनकर्त्यांना स्वतःच्या सावलीचीही भिती वाटते. त्यामुळे त्यांना शस्त्राच्या क्रांतीची भीती वाटतेच वाटते. पण शब्दाच्या शस्त्राचीही वाटते. हा कवी नारायण सुर्वे प्रमाणेच संत तुकाराम महाराजांचाही मागोवा घेत चालणारा आहे. त्यामुळेच तो शब्दांना शस्त्राइतके सामर्थ्यवान मानतो. तुकोबाराय म्हणतात,
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू
कवीही शब्दाला शस्त्र बनवतो पण शासनकर्त्याला त्याची भिती वाटते. त्यामुळे
मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे"
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे
कारण आजवरच्या लेखकांनी कधीही ही नोंद केली नाही की,
पुस्तकाने कोणत्याही नोंद नाही घेतली की
कष्ट आणिक भाग्य-लक्ष्मी हाच रेशो व्यस्त आहे
शासनकर्ते समाजावर सवलतीचा वर्षाव करून त्याला कामापासून दूर करत आहे. तर काहींना साहेब बनण्यात भूषण वाटते. कष्ट करणारा शेतकरी मात्र मूर्ख ठरत आहे.
सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल
कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला
निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला
पण हे फार काळ चालणार नाही कारण जनतेला आता कळू लागले आहे, म्हणून कवी निर्धाराने-निश्चयाने म्हणतो,
श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा
एवढेच नव्हे बळीराजाला पाताळात घालणार्या वामनाची सत्ता उलथून टाकण्याची ईर्ष्या मनात आहे
मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू
त्या बटू वामनाची सत्ता, "अभय" पालटली पाहिजे
पद्मावती अपार्टमेंट
पद्मनगर, लातूर
==============================================================
"वांगी" "निराळी" Online उपलब्ध
माझी "वांगे अमर रहे" व "माझी गझल निराळी" ही पुस्तके पुस्तकजत्रा सोबतच आता BookGanga आणि amazon वर Online विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत
* * * *
www.bookganga.com/eBooks/Books?AID=5216407646190881869
* * * *
www.amazon.in/Mazi-Gazal-Nirali-Gangadhar-Mute/dp/B00J9C8OYO
* * * *
http://www.pustakjatra.com/default/mazi-gazal-nirali-gangadhar-mute/p-2502150-73765967186-cat.html#variant_id=2502150-73765967186
* * * *
BookGanga, amazon आणि शब्दांजली यांना लाखलाख धन्यवाद!
* * * *
"प्रहार" मध्ये "माझी गझल निराळी"
अभिनंदन!
"काव्यदीप" मध्ये "माझी गझल निराळी"
दिव्यमराठी वृत्त
समकालीन गझलेत वेगळेपण दाखविणारी गझल
नश्शा बढ़ता है शराबे जो शराबो में मिले
आपला गझलकार स्नेही
अनंत नांदुरकर "खलिश"
------------------------------------------------------------------------------------------------------------
"माझी गझल निराळी" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा
निवेदिता राज
शब्दांजली प्रकाशन, पुणे
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
’माझी गझल निराळी’ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार
* * * *
दिनांक : १६-०९-२०१४
अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३
’माझी गझल निराळी’ गझलसंग्रहाला यंदाचा
स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार जाहीर
माझी गझल निराळी येथे वाचा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अनंत नांदुरकर "खलिश"
"माझी गझल निराळी" हे अगदी तंतोतंत पटावे असेच शीर्षक आहे. खरोखर आपली गझल निराळी आहे. तिच्यात संवेदने सोबतच सामूहिक वेदना आहेत आणि त्यांचे स्वरूप पराकोटीचे प्रामाणिक आणि कळकळीचे आहे.
सूर्य, चंद्र, चांदण्या, बहरलेली फुले, उमलता पारिजात, नदी, तलाव, रंगीत शहर इत्यादी बहुप्रसवं विषय ती सर्वश्रुत पद्धतीने न मांडता खरेखुरे ८० टक्के लोकांचे दैन्यघटीत जीवन अभिव्यक्त करते. हाडाचा शेतकरी ( दोन्हीही अर्थाने ) जेव्हा एक कवीही असतो तेव्हाच तो फुलांचं दुःख शब्दातून सांडू शकतो. कळ्यांची काळजी अर्थातुं वाहू शकतो.
गझलेला कुठलाही आशय-विषय अमान्य नाही. नसावाही...... निर्मिती अवस्थेत कुठलीही गोष्ट (कलासुद्धा) अपरिपक्व आणि संस्कारप्रतिक्षच असते--सातत्यपूर्ण प्रयोगशीलता व अभ्यासू संस्कार पुढे स्थिरमान्यता आणते. मला वाटतं गझल हे मुळातl काव्य आहे, पण ते तंत्रबद्ध असल्यानेच ती विधा आहे. तंत्रमागणीच्या निकषावर पूर्ण उतरली आणि आशयाची संपुर्क्तता--प्रासादिकता--गरजेनुरूप चमकृती या व इतर सर्व आंतरिक मागण्यासह जर ती अभिव्यक्त होत असेल तर तिला गझल मानायला हरकत नसावीच. विषयाचे तर बंधन नाहीतच. अगदी अरब-इराण-फारसी -रेख्ता-उर्दू-असा प्रवास करताना गझलेचा हा आशय, विषय आणि अभिव्यक्तीबदलाचा प्रवास सतत चालूच राहिला, पुढेही राहीलच. शेवटी सृजनशीलता आणि साहित्य विषयक सर्जनाला परिमाणlचा परिणाम लागू होत नसतो. "अजं जनाना गुफ़्तन" या स्त्रीयांशी बोलणे, या अर्थाचाही पुढे स्त्रियांविषयी बोलणे हा बदल झालाच. आता त्या एकल्या प्रेमाची जागा जागतिक प्रेमव्याप्तीत बदलली. अहमद फ़राज़ म्हणतात,
नश्शा बढ़ता है शराबे जो शराबो में मिले
आशावादी; स्फूर्तिकाव्य गैर नाहीच; मात्र वास्तव - निराशा याकडे डोळेझाक करणे कसे शक्य आहे? इत्यादी बाबत विचार करिता आपली गझल, आपले काव्य, आपले लेख निराळे आहेतच. तुमच्यातला सोशल कवी अलाहिदा म्हणायला तयार नाही आणि कार्यकर्ता तर डोळेझाक का करावी? हा प्रश्न नेहमीच स्व:ताला विचारताना दिसतो. डोळेझाक करूच नये हे उत्तर तो कवीला देऊन तसं करण्यास बाध्यच करीत असावा.
शेती; शेती समस्या; त्यावर काय व्हावं त्यासाठी चिंतन प्रपंच या करिता जळणारा आणि लेखनी जाळणारा कवी कदाचित तुमच्या शेतकरी चळवळीचे फलित असावा. रूढार्थाने आणि काव्यार्थाने वेगळी वाट जोखणारा हा कवी; गझलकार निष्ठुर शासन, शासकीय धोरण आणि यंत्रणेसोबतच कृषिप्रधान देशातच होणारी शेतकऱ्याची कुचंबणा ( अमानवीय मुस्कटदाबी) इत्यादीवर धाडसी भाष्य करतो.
"कांदा मुळा भाजी.... " म्हणणारी सश्रद्ध संत कविता तत्कालीन समृद्धी बयाण करते तर तुमची धाडसी गझल शासकीय अनिच्छेने आलेली बकाली कथन करते. अश्या अर्थाने ती परंपरा नाते विशद करीत जाते. मानवी मनाची सूक्ष्मातिसूक्ष्म मनोचिकित्सा न करिता मानवी समूहाच्या दुःखाची सूक्ष्म चिकित्सा तिला अधिक जरूरीची वाटते हे समकालीन काव्याहून तिचे (गझलेचे) वेगळेपण होय.
आपला गझलकार स्नेही
अनंत नांदुरकर "खलिश"
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रायगड किल्ले
प्रहार