भारतीय अन्नसुरक्षा...
अन्नसुरक्षा कायद्याच्या निमित्ताने मिपावर आणि सर्वच मिडियाभर घमासान चर्चा झाली.
त्यासंबद्धात,
तज्ञांनी "नविन राजकारणी कुरण बनविणारा कायदा काढण्यापेक्षा आहे त्या शिधापत्रिका कायद्याव्दारे गरिबांना स्वस्त अन्नपुरवठा करण्याची प्रणाली "स्वच्छ" पद्धतीने आचरणात आणल्यास अपेक्षित असणारे बरेच चांगले हेतू साधले जातील" असा सल्ला दिला होता.
तर काहिंनी "गरिबाच्या तोंडी घास जातोय याचे त्या कायद्याच्या विरोघकांना दु:ख आहे" असा गळा काढला होता,
हे सर्व आठवत असेलच.
त्या पार्श्वभूमीवर आजच्या टाईम्स मध्ये आलेली बोलकी बातमी बरेच काही सत्य परत उघड करत आहे...
Govt spends Rs 3.65 to deliver Re 1-worth food; 57% of subsidized food doesn't reach beneficiaries {सरकार १ रू किंमतीचे अन्न वितरीत करण्यासाठी रू ३.६५ खर्च करते; सबसिडीच्या अन्नापैकी ५७% अन्न त्यांच्या खर्या लाभाधिकार्यांपर्यंत (गरीबांपर्यंत) पोचत नाही}
गरीबांच्या तोंडातला घास कोण काढून घेत आहे??? आणि तो कोणाच्या तोंडी जातो आहे???
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आक्षेप नक्की कशावर?
तोच एक मुद्दा धाग्यात नाही
अपुरी आकडेवारी
मला वाटते...
थोSssssssडा....
सॉरी, पण
१० रुपयाचा नारळ १२रु झाला मग
बाकीचं सगळ सोडलं तरी,
सबसिडीच्या अन्नापैकी ५७% अन्न त्यांच्या खर्या लाभाधिकार्यांपर्यंत (गरीबांपर्यंत) पोचत नाही.इकडे लक्ष गेलं नाही का? किंबहुना "का लक्षं गेल नाही?" याचं उत्तर ऐकायला आवडेल. :(आँ
आँं...
साठवणूक, वितरण यातील
दुवा पहा
दुव्याबद्दल धन्यवाद पण तो लेख
त्या बातमीचा मथळा सरकारनेच
...असे कामवाली बाई सांगत असे.तुम्ही लिहिलेल्या गोष्टी ह्या खुले गुपित (ओपन सीक्रेट) या प्रकारात मोडतात. पण "सोईस्कर अंधत्वा"मुळे त्या काही वेळेस "दिसेनाश्या होतात" ;) म्हणूनच जे कामवाल्या बाईला माहीत आहे ते...ठीके
आँ...
आता पूर्वीची आकडेवारी माहित नसल्यामुळे ५७% ही अधोगती की सुधारणा हे ठरवणे शक्य नाही. ठीके. ५७% हीच मोठे संख्या आहे हे मान्य. त्यावर काही उपाय शोधताही येईल.निदान महत्वाचा मूळ मुद्दा ध्यानात आल्याबद्दल धन्यवाद ! "वोक्के", "ठीके" आणि "त्यावर उपाय शोधताही येईल" असा सहजपणे हा मुद्द झटकून टाकण्याऐवजी "एवढ्या महत्वाच्या बाबीत अजून उपाय का शोधला गेला नाही?" असा प्रश्न विचारला जात नाही यातच भारताचे दुर्दैव लपलेले आहे. "गरिबांच्या पोटात पडणार्या घासाच्या काळजी आहे" असे जे म्हणतात त्यांना या ५७% गळतीचे महत्व इतके कमी का वाटते??? सर्वसाधारणपणे अश्या वेळेला माझा मनात असा प्रश्न असतो की: "जर उद्या अश्या माणसाच्या खाजगी उत्पन्नाच्या ५७% भागावर दुसर्या कोणी डल्ला मारला आणि हाती ४७% दिले, तर हीच प्रतिक्रिया असेल काय?"परंतु तेवढ्यासाठी ज्या ४३% ना लाभ होत आहे, त्यांनादेखिल वंचित करायचे काय?__/\__ हे काय नविन? हा कोणाला वंचीत करायचा मुद्दा कुठून आला ???????????????? पीडीएस बंद करा असे कोणीही म्हणत नाही, त्यातील भ्रष्टाचार थांबवा असेच तज्ञ म्हणत आहेत. साधारणपणे प्रचंड गळक्या टाकीत अजून जास्त पाणी टाकून अधिक पाणी फुकट जाते, तेव्हा ती गळती बंद करण्याकडे लक्ष द्या हे तज्ञांचे मत "रॉकेट सायन्स" नसल्याचे नमूद करावेसे वाटते ! किंबहुना गळती थांबवली तर आहे त्या प्रणालीनेही ४३% टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना फायदा मिळेल हेही "रॉकेट सायन्स" नाही... कारण मूळ पीडीएस सुद्धा ४७% करता नाही तर १००% करताच निर्माण केली गेली आहे.मला वाटते इ ए यांनी सार्वजनिक
+११११
+१००
मग आता 15 पैसे तरी पोचतात का?
ह्म्म
पुस्प्गुच आनी शुबेच्चा !!!
फारच घाई आहे आपल्याला निष्कर्ष काढायचा!
कदीकदी लोकान्ला न सुदर्नारा
हा घ्या पुस्प्गुच आनी शुबेच्चा
महत्वाचा विषय