म्हणून नथुराम उजवा ठरतो.....
गेले २-३ दिवस, २३ वर्षापासून रखडलेल्या राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या कारवाईवरून वेगवेगळया घडामोडी घडत आहेत. दया याचिकेची वेळीच दखल न घेतल्याने आपोआपच दोषींची फाशी रद्द होवून शिक्षेचे जन्ठेपेमध्ये रुपांतर झाले. इकडे लगेच तामिळनाडू सरकारने तमिळ अस्मिता दाखवत दोषींना सोडण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानाची हत्या करून देखील फक्त भाषेची अस्मिता म्हणून त्या ‘दहशतवादा’चे समर्थन होते हे खरेच शोचनीय आहे. देशाला अग्रक्रमी(Nation First) ठेवून निर्णय घेणारा राजकीय पक्ष अथवा सरकारी धोरणे सध्या अभावाने पाहायला मिळतात. सगळीकडे फक्त मतपेटीचा विचार आणि त्यातच ह्या दुर्दैवी निर्णयाने अजून एक भर टाकली.
गांधी घराण्यातील हत्येचा विषय निघाल्यावर आपसूकच इंदिरा गांधी आणि बापू यांच्या हत्येची आठवण झाली नाही तरच नवल. (आपण जरी विसरायाचा प्रयत्न केला तरी प्रसारमाध्यमे आणि खुद्द कॉंग्रेसचे उपाध्यक्ष श्री. राहुल गांधी ह्याची आठवण करून देत राहतील.)
आज कोणतीही प्रसारमाध्यमे राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना दहशतवादी संबोधण्यास धजावत नाही. परंतू बापुंचा मारेकरी(नथुराम) आता ‘पहिला दहशतवादी’ म्हणून संबोधला जातो.
खरे तर वेगळ्या खलिस्तानसाठी प्रयत्न करणारे जर्नेलसिंग यांच्या हत्येचा सूड किंवा श्रीलंकेत होत असणाऱ्या तामिळींच्या अत्याचाराचा सूड म्हणून भारतातील पंतप्रधानाना जबाबदार धरणारे लोक जे भाषा आणि धर्म यांचा संकुचित विचार करत होते व भारतापासून वेगळे होण्याची मागणी करत होते ते खरे दहशतवादी होत.
उलटपक्षी अखंड आणि धर्मनिरपेक्ष भारत (जिथे सर्व धर्मांना सारखी वागणूक असेल आणि कोणत्याही विशिष्ट धर्माचे लांगुलचालन करणारी धोरणे नसतील.) याच्यासाठी कायम आग्रही राहणारा व यांच्याआड येणाऱ्या गोष्टींना बाजूला करण्यासाठी त्यावेळेस जे करता आले ते करणारा नथुराम मात्र दहशतवादी. ज्याला देशाचे नियम व कायदे मोडून काहीही करायचे नव्हते म्हणूनच स्व:ताहून शरण आला व हसत हसत फाशीला सामोरे गेला. कोणताही दया अर्ज न देता.
वरील सगळ्या गोष्टी लक्षात घेता एवढेच वाटते की देशाची अखंडता डोळ्यासमोर ठेवून कायद्याने चुकीचे ठरवलेले पाऊल उचलूनदेखील त्यावर ठाम राहणारा नथुराम कायम या सगळ्यात उजवा ठरतो.
टीप: इथे कोणाच्याही चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायचा हेतू नसून तिन्ही गांधी जे कायमच देशाचा केंद्रबिंदू ठरले आहेत यांच्या हत्या वर मारेकरी यांचे शक्य तेवढे तटस्थपणे समीक्षण करण्याचा प्रयत्न आहे.
प्रतिक्रिया
टीप
हिच तर गम्मंत आहे...
आपण काय करू शकतो????
ह्म्म्म..
म्हणुन नथुराम वेगळा ठरतो असे
निश्चित..
आपल्याला समर्थन करण्याचे
नथुराम गोडसे अमर रहे
कसे ठरवणार?
भाऊ लादेन व गांधी तुलना होवु शकेल काय?
लादेन हा काही विचारांची लढाई
अमेरिकाविरोधी विचार...
थोडासा फरक आहे.
अनुमोदन. नथुराम गोडसे अमर रहे
माझे प्रत्यक्ष संबंध नसलेले धागे
सहमत
>>> दाभोलकरांच्या मारेकरी व
+१ मला या प्रकरणात काही
दाभोलकर हत्या
तरीही फरक येतोच.
अगदी हेच...
साहेब...
व्हॉट अॅन इमॅजिनेशन
आमचे बारामतीकर साहेब म्हणतात तसं...
जसे मॉरीआर्टीला दाखवण्यासाठी
नथुराम गोडसेंची वैचारिक बैठक.
अभ्यासाला सलाम
हा ५५ कोटी आणि खून यांच्या
एक बाजू म्हणते की गांधी
गांधीजी आणि ५५ कोटीचे तुणतुणे
बहुधा तेव्हा ही चर्चा पण झाली
याच विषयावर मी इथे चर्चा सुरू
प्रतिसाद एक से एक. शेवट
दणदणीत अनुमोदन
दाभोलकर
नथुरामचे स्टेटमेंट वाचा.
घाटपांडे, अहो आधी दाभोककरांचे मारेकरी सापडू देत तरी.
दाभोलकरांचा पुळका ज्याला
+१ सहमत
सदा हरीत विषय !
या विषयाची मिपावर वाटच बघत होतो.
नथुराम YZ होता
यावर सविस्तर लेखन व्हावे...
किती वर्षे?
मग
सहमत आहे, पण कसाबपर्यंत ते
काश्मिर
काय सांगता
काय ?
गांधी आणि लिंकन
Pagination