कर्मविपाक - एक प्रयत्न
सध्या मिपावर पुनर्जन्म, कर्मविपाक वगैरे वर बराच काथ्याकूट चालू आहे. म्हटल आपण पण एक जिलबी पाडावी. जमलीय का नाही ते सांगायला मोठे आहेतच...
पुनर्जन्म, कर्मविपाक वगैरे माणसाला पहिल्यापसून भुरळ पाडणारे विषय आहेत. असंख्य लोकांनी त्यावर बरेच काही लिहून ठेवले आहे, त्यावर मी अणखीन लिहिणे म्हणजे..
उपनिषदांत एका शब्दात सांगितले आहे - तत्त्वमसि|
ते समजायला कठीण जाऊ लागले म्हणून श्रीक्रुष्णांनी गीता संगितली.
तेही कठीण जाऊ लागले म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली.
आता तेही कठीण जाऊ लागले म्हणून आता ज्ञानेश्वरीवर प्रवचने होतात :)
असो. कर्मविपाक म्हणजे मला असे वाटते की - समता राखण्याच्या दृष्टीने प्रकृतीने केलेले नियम.. आपण निसर्गात पाहिले तर हे सर्वत्र पहायला मिळते. जेव्हा एक पर्वत उभा राहतो तेव्हा एक खड्डा पण पडतो. दुष्काळ पडतो तेव्हा अतिवृष्टी देखील कुठेतरी होतच असते. देवाण-घेवाण देखील जीवनाच्या सर्व स्तरांमध्ये चालूच असते. आपण काही उदाहरणे पाहू.
जीवो जीवस्य जीवनम् .. पक्षी किडे खातात, मोठे पक्षी लहान पक्ष्यांना खातात, आणि ही सा़खळी अखंड चालूच असते. याचाच वेगळ्या शब्दांत सांगयाचे झाले तर - "तुम्ही जे देता, तेच तुम्हाला मिळते", किंवा "पेराल तेच उगवेल" यातून देखील थोड्या फार फरकाने हेच सांगितले आहे.
सर्वात प्रथम हे विश्व निर्माण झाले तेव्हा सम स्थितीतच होते. आणि मला हे अशक्य वाटत नाही. सर्व जग जर एकाच मूलतत्वांपासून बनले आहे तर मग ते जन्म झाल तेव्हा सम असण्याची शक्यता आहेच.त्यामध्ये गती कशी आली हा एक प्रश्न आहे खरा, आणि विज्ञानाने ते कळेल का, आणि कधी कळेल तेही माहीत नाही.
असे म्हणतात पूर्वी कर्मविपाक नव्हता, कारण सर्वांनाच आपल्या स्वरूपाची जाणीव होती.मला असे वाटते की याचाच अर्थ असा होतो की सर्वजण आपल्या नैसर्गिक(ईश्वरी) प्रेरणेप्रमाणे वागत होते. आपण एक उदाहरण घेऊ.
आपल्या शरीरात कोट्यावधी पेशी असतात. आता त्या पेशींना त्यांचे अस्तित्व नाही का? तर आहे. त्या पेशींना हे माहीत नसते की आपण एका मोठ्या शरीराचा भाग आहोत. त्या बिचार्या आपल्या नैसर्गिक प्रेरणेप्रमाणे वागत असतात. परिणाम म्हणून शरीर चालत असते. मला असे वाटते की आपण देखील अशीच एक पेशी आहोत. एका विराट पुरुषाची. हजारो पेशी प्रतिक्षणी मरत असतात, तेव्हढ्याच परत जन्म घेत असतात. आपलेही असेच नाही का?
परंतु हे मग एव्हढ्यावर थांबत नाही. हा न्याय लावयचा झाला तर मग जे पिण्डी ते ब्रह्माण्डी आणि जे ब्रह्माण्डी ते पिण्डी नाही का? एक छोटासा डी एन ए जर संपूर्ण माणसाची कुंडली ठरवत असेल तर मग ही जाणीव अणखीनच वाढते.
मध्यंतरी निरंजन घाटे यांचे एक पुस्तक (बहुधा असंभव) वाचले होते. त्यात त्यांनी पुनर्जन्म, समाधी म्रुत्युसमीपतेचे अनुभव यांवर चालू असलेल्या संशोधनाचा परामर्ष घेतला आहे. त्यातले काही अनुभव मेंदूमधील रासायनिक क्रियांमुळे होतात असे सिद्ध झाले आहे, पण काही अजून गूढच आहेत. (खरतर मि इथे अशी विनंती करेन की कोणितरी त्या पुस्तकावर परीक्षण लिहावे.)
-------
मूळ मुद्दा कर्मविपाक जरा बाजूला गेला. कर्मविपाकाचे असे म्हणणे आहे, की तुमचे अस्तित्वच मुळी काहीतरी कर्म असलयामुळे आहे. कर्मविपाकाचे असेदेखील म्हणणे आहे की कर्म केल्याखेरीज जगणे अशक्य आहे. एका गोष्टीला स्पर्ष मला करावा लागेल- कर्मविपाकावर घेतला जाणारा पहिला अक्षेप सर्वात पहिले कर्म कसे निर्माण झाले? एक उदाहरण घेऊया. रशियामध्ये सारेजण समान आहेत म्हणून क्रांती झाली, म्हणजे सारे़जण समान झाले.म्हणजेच सुरुवात झाली - शून्यापासून. नंतर असमानता आलीच की.
तर कर्मविपाक अस म्हणतो की तुम्ही जे कर्म कराल, त्यामुळे विश्वात जी असमानता निर्माण होईल ती समान केल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही. आता हा हिशोब कसा सम्पवायचा याबद्दल मि इथे लिहत नाही.. त्यावर तज्ञांचीच मते घ्यावीत. परंतु कर्मविपाक असेही म्हणतो की तुम्ही कर्मात लिप्त नसाल तर ही कर्मे तुम्हाला बाधत नाहीत. आता याचा अर्थ काय? मला असे वाटते की जर तुम्हाला जाणीव असेल की जे काही कर्म माझ्या हातून घडत आहे ते मी माझ्या भावनेसाठी करत नाहीये, तर हे त्या विराट पुरूषाच्या श्वासाचा भाग आहे, तर मग तुम्हाला ते कर्म बाधू शकत नाही.
असो.. पहिलीच वेळ आहे. सांभाळून घ्या.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
त्यामध्ये गती कशी आली हा एक
अत्यंत तार्किक लेखन. पटले.
गीतेचे सार
ह्म्म...
कर्मविपाक आणि ज्योतिष
कर्माचा सिद्धांत
कर्मविपाक असेही म्हणतो की
कर्म विपाक
आपण व्यक्ती आहोत या गैरसमजाचा परिपाक म्हणजे कर्मविपाक
तुम्ही नेहमी अकर्ता आहात