Skip to main content

आय पील

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 01/10/2008 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्र सुरु झाली. जिकडे बघतो तिकडे गरबा. अगदी खांद्याला खांदा लावुन. निरनिराळी मंड्ळे कुरघोडी करण्याकरिता वेगवेगळ्या शकली काढतात. स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, आणखी काय काय . शिगेला पोचलेला आनंदोत्सव. गरब्यात भाग घेणार्यांचे चेहेरे बघितल्यावर एक्स्साइट्मेंट म्हणतात ती नेमके काय हे कळ्ते. प्रेक्षकांचा पण तुटवडा नाही. काका मंड्ळी बघोजी राव होताना " गेले ते दिवस" चे उसासे सोडतात. परत एखादी सुबक ठेंगणी हेरुन खयालोंकी दुनिया मधे फिरुन येतात. मला मात्र गरब्यात कधीही सहभागी होता आले नाही. तसे खास काही ही कारण नाही. संपर्क वाढतो अशी माहिती मिळाल्यावर गेलो होतो एकदा. पण काही जमले नाही. आणि आपल्याला जमत नाही त्या मेथड वर वेळ आणि पैसा का फुकट घालवा म्हणुन नाद सोडुन दिला. आणि अडकलो तर ची भीती. स्वकर्तुत्वावर भरोसा ठेवलेला बरा. ७० -८० ह्या दशकात मात्र नवरात्रोत्सव संपल्यावर डिसेंबर मध्ये आमच्या हॉस्पिटल मध्ये काम मरेस्तोवर वाढायचे. दिवसाला सुमारे १५० गर्भपात. (इतर वेळी सुमारे ८५ची सरासरी.) ह्यात सुमारे ६० कुमारिका. बहुधा आपण कुमारी का? हा प्रश्न त्याना त्रास देत असावा. गर्बा आणि गर्भा खेळ एकच वेळी खेळायची सोय नवरात्रेत असते..फक्त वेगवेगळ्या ठिकाणी. मग पालक यायचे डोळ्यात पाणी काढत. दुसरा कलाकार कॉलरला धरुन आणत. १.माझ्या मुलीचा पाय घसरला. २. माझ्या मुलीचे पाय वाकडा पडले. ३. चूकीची वाट धरली. ४. बसत नाही. ५. आंघोळ बंद झाली. आमच्या हॉस्पिटल मध्ये एक डॉक्टरला ( कर्नाटकी) मराठी चे जुजबी ज्ञान. त्याचे वांदे व्हायचे. सांकेतिक भाषा (क्रिप्टीक) कळायचीच नाही बिचार्याला. जरा सुद्धा अतिशयोक्ती न करता मी बाजुच्या टेबलवर बसुन श्रवण केलेला, एक पालक आणि त्याचा संवाद खालील प्रमाणे. १.......= कुठे लागले. २.......= आपण एक्स रे काढु. फ्रॅक्चर आहे का ते कळेल. ३.......= नीट पत्ता घ्यावा. ४.......= पाय दुखले की बसेल ५.......= पाण्याचे त्रास आहेत का तुमच्या कडे शेवटी मी मदतीला धावलो. आणि प्रकरण संपविले. डायरेक्ट प्रेग्नंट है ऐसा क्युं नय बोलताय असे मला ऐकावे लागले ते वेगळे. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. पालक मंड्ळी एकदम मुद्द्यावार येतात. हल्ली पालकांना मधे न घालता कारभार मोकळा करता येतो की. स्मार्ट रेस आहे ना? खंडाळ्याची ट्रिप काढायची युक्ती करतात. आय पिल नंतर तर सगळे एकदम सोपे झाले आहे. चेमिस्ट कडे जायचे. एक गोळी ७२ तासाच्या आंत घ्यायची. हाय काय नाय काय. सर्व जण सुखी. पालक पण आपली मुले त्यातली नाही म्हणायला मोकळे. " आम्हाला आमच्या मुलांनी तसल्या त्रासात टाकले नाही हॉ" आमचे संस्कार पाळले."" नविन नविन शोध- नविन सुविधा.विज्ञानाचे अनेक उपयोग. एका शाळेतुन खाली उतरत असताना ९ वी मध्यी असलेल्या मुलांमधला संवाद १ला: तेरेको मालुम पडा क्या? २रा: क्या रे? १ला: रोन्सेन लोहान के साथ शादी कर रहेला है. ( ढ लोकांसाठी- ह्या दोन हॉलिवूड अभिनेत्री आहेत.) २रा: क्या बात करता है १ला: हा रे टाईम्स मे आया था.(प्लेबॉय बघायची गरज नाही. बॉम्बे टाईम्स इमरजन्सी गरज भागवतो) २रा: आय पील का खर्चा बच गया. मि. पा. सदस्य बरोबर होते. त्यांचा चेहेरा पांढरा पडला. ता.क.: कंपन्यांनी आय पील चा स्टॉक भरपुर ठेवला आहे. गुजरातेत काही ट्रक जास्त पाठ्वलेले आहेत. चेमिस्ट कडे आय पील गिर्र्हाईकायिका मध्ये ४१% स्रिया असतात. वय २० -२५ . १७% मुली वय १५ ते २०. बाकी सगळे पुरुष. इथे पण मापात पाप. विश्वामित्र कुठले. आपल्या वेळी ही शिश्टीम नव्हती ह्याचे दु:ख होत नाही - जाम भिती वाटायची गर्भपाताची. स्त्री देहाचे नंतर कॉम्प्लिकेशन ने होणारे हाल बघवत नसत.

वाचने 49139
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

http://vipravani.wordpress.com/ आयुष्यातील ३० वर्षे जाळली ह्या क्षेत्रात. पण शिकल्या सवरल्या लोकांच्या मनोव्रुत्तीत ह्या विषयात फारसा फरक नाही. ह्यांची आपली १९४७ भारत देश स्वतंत्र झाला टाईप विधाने चालू असतात. आपण विषय खोलात जाउन लिहील्याबद्दल मनापसुन धन्यवाद.

खरेतर आपला समाज कुठल्यातरी खोट्या कल्पनांपायी बोलायला घाबरतो. काल परवाच काही जपानी सहकार्‍यांसोबत लग्न, लैंगिक संबंध याबाबत चर्चा झाली. इथे शक्यतो प्रेमविवाह होतात आणि लग्नाआधी जोडीदाराबरोबर लैंगिक संबंध असतातच असतात. किंबहुना असे सबंध ठेवायला जोडीदाराने नकार दिला तर त्यात काहितरी कमतरता, आजार आहे असे समजले जाते. इथे टीव्ही मालिकांमधुन सेफ सेक्सची माहिती दिली जाते. कदाचित विषयांतर झाले असावे. पालकांनी मुलांना याची माहिती नेमकी कशी द्यावी यावर कोणी प्रकाश टाकु शकेल काय? संवादाला सुरुवात कशी कोठुन आणि कधी करावी. (खरेतर एखाद्या चांगल्या लेखमालेच्या प्रतिक्षेत) - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

संस्कार, नितीमत्ता, जीवनमुल्य वगैरे वगैरे शब्द कानावर पडले की हल्ली नाकं मुरडली जातात. निसर्ग १२-१३ वर्षापासून मुलीला माता बनण्याचे अधिकार देतो. कायदा १८व्या वर्षापासून हा अधिकार प्रदान करतो. तरी शिक्षण, करियर, स्वातंत्र्य उपभोगणे इ. इ. कारणांसाठी मुलींची लग्ने २५ वर्षे आणि त्या पुढे होतात. लग्ना आधी इतरांशी शरीरसंबंध (गर्भनिरोधके वापरून) ठेवलेला जीवनसाथी किती मुला-मुलींना चालतो? एखाद्या मुलीशी लग्न ठरल्यावर एखादा मित्र म्हणाला, 'आयला, फटाका आहे पोरगी. आम्ही दोघांनी कित्येकदा अमु़क अमु़क हॉटेलात रात्र-रात्र मजा केली आहे. बिनधास्त लग्न कर. मजा मारशील लेका.' असे म्हंटले किंवा एखाद्या मुलीची मैत्रीण म्हणाली, 'अग सॉलीड रोमँटीक आहे तो पोरगा. मी आणि तो अमुक अमु़क हॉटेलात कित्येक रात्री जागलो आहोत. अग झोपूच देत नाही. काय धमाल करतो म्हणून सांगू...' तर किती मुले मुली ठरवलेले लग्न पार पाडतील? ९९% मुले-मुली ताबडतोब लग्न मोडतील. तरीपण ह्या ९९% मुलामुलींसमोर वरील (संस्कार, नितीमत्ता, जीवनमुल्य) शब्द उच्चारले तरी तेही नाकेच मुरडतील. लग्नापूर्वी शरीरसंबंध (अगदि जिच्याशी/ज्याच्याशी लग्न ठरलेले आहे ती व्यक्तीशीही...) नितीमत्तेत बसत नाहीत. ही नितिमत्ता कोणी ठरवली? त्यांना काय अधिकार? ह्या प्रश्नांचे ढोबळ मानाने उत्तर असे देता येईल की 'समाजाने'. (कोणी एकाने नाही). समाज आरोग्यपूर्ण आणि एकसंघ राहावा ह्या उद्देशाने असे अलिखित नियम केले गेले. लग्नापुर्वीच्या शरीर संबंधांमधून जर संतती जन्मास आली आणि त्याची जबाबदारी पित्याने नाकारली तर अनौरस संतती वाढत जाईल आणि अशा संततीची भावनिक वाढ नीट आणि योग्य दिशेने न झाल्याने, जन्मतःच आपल्याला नाकारलेले आहे ह्या चिडीतून ती संतती समाजाचे नियम झुगारून स्वतःच्या नियमांनी कशीही वागू लागेल आणि समाजाच्या आरोग्याचे संतुलन बिघडेल. हे सर्व होऊ नये म्हणून सामाजिक आणि व्यक्तिगत नितिमत्ता महत्त्वाची आहे. पुर्वीच्या काळी साधने नव्हती (एवढी प्रचलीत आणि सहज उपलब्ध नव्हती) तेंव्हा कायदे जरा जास्त कडक होते. ती त्या काळची गरज होती. आज तसे नाही आय्. पील. आहे , निरोध आहे.तेंव्हा आता तशी नितीमत्ता बाळगण्याचे कारण काय? आता संतती रोखता येऊ शकते. करून सवरून नामा निराळे राहता येते. तरी पण सुखी संसारातील एकनिष्ठता आणि विश्वास ह्याला तडा जाणार्‍या गोष्टीने लग्न संस्था कमकुवत होऊ शकते. आणि पुन्हा वैयक्तीक तसेच सामाजिक नुकसानच होते. अनेकांशी शरीर संबंध आल्यावर जर संसारात मन रमले नाही तर पुरूषाला किंवा स्त्रीला लग्ना नंतरही, लग्न बंधनात राहूनही, इतरांशी शरीरसंबंध ठेवण्याचे आकर्षण वाटू शकते. आणि शेवटी लग्न म्हणजे काय तर, 'कायदेशीररित्या स्त्री पुरूष शरीर संबंध' अशी एक उथळ व्याख्या तयार होईल. असे होणे कोणाच्या हिताचे आहे? मुलांना जर जाणवले की आपले बाबा दुसर्‍या स्त्री बरोबर झोपतात किंवा आईचे दुसर्‍या कोणा पुरुषाशी शरीर संबंध आहेत तर त्याचे भावविश्व उध्वस्त होइलच कि नाही? मुसलमान धर्मातही 'चार विवाहांना संमती आहे' 'चार अनैतिक संबंधांना नाही'. अनैतिक शरीर संबंध हा समाजातील आजचा बदल नाहीए. पुरातन काळापासून चालत आलेला आहे. पुरूष प्रधान समाजात 'अंगवस्त्र' ही उच्चभ्रू समाजाची मिरासदारी होती. वेश्या व्यवसाय हा विश्वातला सर्वात जुना व्यवसाय आहे. पण 'अंगवस्त्र' बाळगणार्‍या कुटुंबप्रमुखाच्या कुटुंबातील इतर घटकांची मानसिक कुचंबणाच व्हायची. घरच्या लक्ष्मीला कधीच मनःस्वास्थ लाभायचे नाहि. पण कुटुंबप्रमुखाचा घरात 'पोलीसी कायदा' असायचा. 'ह्या विषयावर कोणी काही चकार शब्द काढायचा नाही' अशी सक्त ताकिद असायची. वेश्या व्यवसायालाही, ज्यांची लग्ने होत नाहीत, व्हायची आहेत, झालेली आहेत पण काही कारणाने घरात सुख नाही अशा पुरूषांनी इतर निरपराध स्त्रीयांवर बलात्कार करून नये म्हणून सरकारने परवानगी दिलेली आहे असे म्हणतात. तरी पण तेही आपल्याकडे नितीमत्तेत बसत नाही. वेश्या गमनी पुरुषाकडे चांगल्या नजरेने बधितले जात नाही. शारीरीक गरज कितीही तीव्र आणि नैसर्गिक असली तरी त्यावर ताबा ठेवता येतच नाही असे नाही. हे आपण स्वानुभवावरून आणि आजूबाजूच्या अनेक ओळखिच्या उदाहरणांमधून पाहू शकतो. एखाद्याने अन्याय झाला म्हणून संतापाच्या भरात समोरच्याचा खून केला तर आपली सहानुभूती त्याला मिळू शकते पण तरीही तो गुन्हेगारच ठरतो. समाज रक्षाणासाठी केलेल्या कायद्या बाहेर तो वागलेला असतो. आपल्या भावनांवर, त्या कितीही नैसर्गिक असल्यातरी, ताबा ठेवण्यास तो असमर्थ ठरलेला असतो. आपली कितीही सहानुभूती त्याला मिळाली तरी पण ' त्याने असे वागायला नको होते' असाच सर्व हितचिंतकांचा सूर असतो. त्यात काही गैर आहे का? शिक्षणाच्या, ज्ञानाच्या प्रसाराने, व्यक्तिस्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पनांमुळे, घरातल्यांच्या संस्काराच्या अभावाने, नितिमत्ता, जिवनमुल्ये आदी विषयांवर घरात होणार्‍या संवादाच्या अभावाने, बळावलेल्या आत्मकेंद्रीत वृत्तीमुळे, वाढत्या बंडखोरीमुळे, शरीर सुखाची चटक, चोरून शरीरसुख मिळविण्यातील थरार आदी घटकांमुळे विवाहपुर्व शरीर संबंधांचे प्रमाण हल्ली जास्त वाढलेले आहे असे दिसते. श्री. विनायक प्रभू ह्यांना त्यांच्या वैद्यकिय अनुभवातून हे प्रकर्षाने जाणवले आणि हे चित्र भयावह आहे असे वाटले. नविन पालकांनी, ज्यांची मुले अजून लहान आहेत त्यांनी, ह्या विषयावर सखोल विचार करून आई-वडीलांनी आपापसात चर्चाकरून आपल्या मुलांवर कसे संस्कार करावेत हे त्याना ठरविता यावे. त्यांना वास्तवाचे भान करून द्यावे म्हणून हा लेखनप्रपंच मांडला आहे असे मला वाटते. एका चांगल्या गहन विषयाला चर्चेसाठी मांडल्या बद्दल श्री विनायक प्रभू ह्यांचे आभार आणि अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

सहमत, >>लग्ना आधी इतरांशी शरीरसंबंध (गर्भनिरोधके वापरून) ठेवलेला जीवनसाथी किती मुला-मुलींना चालतो? ज्यांना गरब्यातील संबध म्हणजे काहीच वाटत नाही, त्यांनी उत्तर द्यावे. शिक्षणाच्या, ज्ञानाच्या प्रसाराने, व्यक्तिस्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पनांमुळे, घरातल्यांच्या संस्काराच्या अभावाने, नितिमत्ता, जिवनमुल्ये आदी विषयांवर घरात होणार्‍या संवादाच्या अभावाने, बळावलेल्या आत्मकेंद्रीत वृत्तीमुळे, वाढत्या बंडखोरीमुळे, शरीर सुखाची चटक, चोरून शरीरसुख मिळविण्यातील थरार आदी घटकांमुळे विवाहपुर्व शरीर संबंधांचे प्रमाण हल्ली जास्त वाढलेले आहे असे दिसते. पुर्णपणे सहमत, व्यक्तिस्वातंत्र्याचा उपयोग काही तरी चांगले, समाज उपयोगी कार्य करण्यासाठी करा, ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)

In reply to by सखाराम_गटणे™

>>लग्ना आधी इतरांशी शरीरसंबंध (गर्भनिरोधके वापरून) ठेवलेला जीवनसाथी किती मुला-मुलींना चालतो? ज्यांना गरब्यातील संबध म्हणजे काहीच वाटत नाही, त्यांनी उत्तर द्यावे. आपल्याला काय चालते आणि काय नाही हा इथे प्रश्नच नाहिये असे मला वाटते..... आता यापुढे आपल्याला असेच चॉईस मिळणार आहेत (आपण जर अगदी घनघोर खेड्यात जाउन विवाह केले नाहीत तर!!) वर निर्देशित केलेल्या कोणत्याही कारणाने असोत, विवाहपूर्व संबंध अस्तित्वात असणार हि शक्यता आता नाकारता येत नाही. आता हल्लीच्या मुला-मुलींपुढे प्रश्न हा आहे की आपल्याविषयी काळजी करणार्‍या, आपल्यावर आजतरी प्रेम करणार्‍या व्यक्तिशी लग्न करणार की तिच्या पूर्वेतिहासात जाऊन तिला होकार/नकार देणार.... सखारामजी, नव्या पिढिचे पाईक या नात्याने तुमच्या प्रतिसादाची वाट पहात आहोत..... २० वर्षांपूर्वीच लग्न करून सगळे करून भागलेला, डांबिसकाका :)

In reply to by पिवळा डांबिस

आता हल्लीच्या मुला-मुलींपुढे प्रश्न हा आहे की आपल्याविषयी काळजी करणार्‍या, आपल्यावर आजतरी प्रेम करणार्‍या व्यक्तिशी लग्न करणार की तिच्या पूर्वेतिहासात जाऊन तिला होकार/नकार देणार.... मी खरे उत्तर देतो, उगाच तोंडदेखले नको. दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. पुर्वे इतिहास पण तितकाच म्हत्वाचा आहे. इतिहास हा माणसाच्या भविष्याचा आरसा असतो. (प्र. वाळींबे), प्रेम हे महत्वाचे आहेच आणि त्या बरोबर चारीत्र ही महत्वाचे आहे. जर मी बाहेर गुण उधळत असेन तर मुलीने गुण उधळले असतील तर तीला बोलण्याचा मला हक्क नाही. हे मी मानतो. लग्नापुर्वी संबंध ही गोष्ट दुर्लक्ष करण्याजोगी नाही, हे ही तितकेच खरे. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)

In reply to by सखाराम_गटणे™

दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. पुर्वे इतिहास पण तितकाच म्हत्वाचा आहे. इतिहास हा माणसाच्या भविष्याचा आरसा असतो. (प्र. वाळींबे), प्रेम हे महत्वाचे आहेच आणि त्या बरोबर चारीत्र ही महत्वाचे आहे. जर मी बाहेर गुण उधळत असेन तर मुलीने गुण उधळले असतील तर तीला बोलण्याचा मला हक्क नाही. हे मी मानतो. लग्नापुर्वी संबंध ही गोष्ट दुर्लक्ष करण्याजोगी नाही, हे ही तितकेच खरे. तुझ्या उत्तरावरून मला असे समजते की तुला म्हणायचे आहे की ही केस्-बाय-केस आणि तारतम्याने विचार करायची गोष्ट आहे. १००% सहमत! गुड जॉब!! आयुष्य हे कधी ब्लॅक एन्ड व्हाईट नसतं, त्यात ग्रे रंगाच्या अनेक शेडस असतात. अभिनिवेशाला बळी पडूनकोणतीही एकच बाजू कवटाळून न बसता प्रत्येक बाबीचा सर्वांगिण विचार करून मत बनवणे हेच शहाणपणाचं असतं रे! :) अति सर्वत्र वर्जावे, हट्टनिग्रही न पडावे, प्रसंग पाहोनी वर्तावे, विवेकी पुरुषे -समर्थ रामदास

In reply to by पिवळा डांबिस

मत समजावुन घेतल्याबद्दल आभारी आहे. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)

In reply to by पिवळा डांबिस

वर निर्देशित केलेल्या कोणत्याही कारणाने असोत, विवाहपूर्व संबंध अस्तित्वात असणार हि शक्यता आता नाकारता येत नाही. इतकेच काय विवाहपश्चात बाह्य संबंध ही सुद्धा आता सामान्य गोष्ट बनत जाणार आहेच. तुम्ही फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवु शकता.

In reply to by प्रभाकर पेठकर

काकाश्रींशी १००% सहमत... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर काकांशी १००% सहमत. ज्या लोकांनी असल्या प्रकाराला (व्यभिचाराला) एक प्रकारे मान्यता दिली आहे त्यांना एक प्रश्न : पुर्वी ज्या बायकांनी यवनांच्या अत्याचारापासुन आपल्या शील रक्षणासाठी प्राण दिले त्या बायकांची तुमच्या लेखी काय किमत आहे? अवांतर : जर कोणी म्हणेल की त्या बायका (ज्यात कुमारीका ही होत्या) मुर्ख होत्या तर आपले तोंड गप आणि कोणी म्हणेल की त्या बरोबर होत्या तर मग अश्या मुल्यांच आपण समर्थन कसे करु शकतो?

In reply to by वाटाड्या...

मुकुलराव, मला असं वाटतंय की तुम्ही दोन वेगवेगळ्या गोष्टींमधे गल्लत करताय. यवनांच्या अत्याचारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी प्राण देणार्‍या बायका आणि स्वखुशीने शरीर संबंध ठेवणार्‍या यांत बराच फरक आहे. पहिल्या प्रकारात अत्याचार होते आणि दुसर्‍यात राजीखुशी, या मुलींच्या मनाविरुद्ध (बर्‍याचदा) गोष्टी घडत नाहीत. या मुलींवर उद्या कोणी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याही पेटून उठतीलच ना?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी फक्त नीतीमत्तेची गोष्ट करत होतो. नीतीमत्ता एकच..'त्या' गोष्टी फक्त लग्न झालेल्या जोडीदाराबरोबरच कराव्यात ही नीतीमत्ता...व्यक्तिस्वातंत्र्य मिळाले म्हणुन शेण खाण्याच्या प्रवृत्ती बद्दल इथे कोणाच्या तरी प्रतिसादात मी काहीशी सहमती बघत आहे अथवा अश्या गोष्टींना सहमती मिळत आहे ज्या लग्नाशिवाय करायला प्रोत्साहन देते...

In reply to by वाटाड्या...

मुकुल, मला वाटते की तुला असे म्हणायचे आहे. ज्या स्त्रीया आपला संबध नवर्‍याशिवाय दुसर्‍या कोणाशी येउ नये म्हणुन प्राणत्याग करतात आणि आज कालच्या स्त्रीयांना ह्या नवर्‍याशिवाय दुसर्‍या कोणीशी संबध म्हणजे काहीच वाटत नाही. आणि त्या गोष्टी व्यक्तिस्वातंत्र्य च्या नावाखाली चालतात. म्हणजे पुर्वीच्या जोहार करण्यार्‍या स्त्रीया मुर्खे होत्या काय? नीतीमत्त्ता ही चुकीची भ्रामक कल्पना आहे काय? ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)

In reply to by वाटाड्या...

व्यक्तिस्वातंत्र्य मिळाले म्हणुन शेण खाण्याच्या प्रवृत्ती बद्दल इथे कोणाच्या तरी प्रतिसादात मी काहीशी सहमती बघत आहे अथवा अश्या गोष्टींना सहमती मिळत आहे ज्या लग्नाशिवाय करायला प्रोत्साहन देते... लग्न न करता आयुष्यभर एकत्र रहाणारी, खर्‍या अर्थाने सहजीवन जगणारीही जोडपी असतीलच ना? त्यांच्यावर असं बोलण्यामुळे अन्याय होतो असं मला वाटतं. एका कागदावर सही केली किंवा गळ्यात दोरा बांधला की झालं का सगळं? मी स्वतः या गोष्टीचा गेले अनेक महिने विचार करत आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की एका कागदावर सही केल्यामुळे मला काहीही फरक पडला नाही. बॉयफ्रेंडचा नवरा झाला आणि गर्लफ्रेंडची बायको; पण आमची एकमेकांबद्दल असलेली मतं, आमच्या एकमेकांबद्दलच्या भावना, आमची कमिटमेंट फक्त त्या सह्या आणि कागदामुळे बदलल्या नाहीत. मान्य आहे की अशी उदाहरणं सामान्यतः दिसत नाहीत, पण मला तुमचं विधान सरसकट वाटलं म्हणून फक्त! बाकी चालू द्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

अतिशय सुंदर प्रतिसाद (नेहेमीप्रमाणे).. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

खर तर गरबा हे एक निमित्तमात्र आहे. गणपती उत्सवात हे घडत नाही का? घडते आणि ते मी पाहिले आहे. त्यामुळे शरिरसुखासाठी आसुसलेल्या जोडप्याना कोणताही सण चालतो.बाकी तीन तीन दिवस चालणारया लग्नात देखिल तुम्हाला हेच बघायला मिळेल.उत्सव किंवा समारंभ आला कि उत्साह येणार. आणि त्यातुन उन्माद येणार. "बाई" ही उपभोग्य वस्तु ठरविली गेल्यानन्तर संस्कृती उरतेच कोठे. असहमत....इथे जे काही घडते ते दोन्ही बाजुला आपण काय करणार आहोत, हे माहित असताना होत असते. किंबहुना मुलीच पुढाकार घेतात.कधीतरी गरबा किंवा गणपती मध्ये रात्री बाहेर पडा ,लक्षात येइल. आजकाल मुलीचे ऑर्कुट प्रोफाइल बघा,त्याना इम्रान हशबी आवडतो.चॉईस बदलत आहे राव. आपण आपल्या संस्कृती चा टेंभा मिरवायची काही गरज पण नाही. मुळात शरिरसबंध हे अतिशय वाईट असतात हे मुलामुलीच्या मनात लहान पणा पासुन बिंबवले जाते. हीच गोष्ट त्याच्यातील उत्सुकता वाढवण्यास कारणीभुत ठरते. त्यातुन हे चोरटे सबंध निर्माण होतात.हिच जर माहिती त्याना योग्य वयात मिळाली तर शरिरसबंधाचे फायदे तोटे लक्षात येतील.आदिवासीच्या पाड्या मध्ये तरुण मुलामुलींना राहण्याची वेगळी व्यवस्था असते.वयात आल्यावर त्याना आपसुक च सगळ्या गोष्टीची माहिती मिळते.परंतु आपण आपल्याला पंरपरा ,रुढी ह्याच्या बंधनात जखडुन ठेवले आहे.लग्नासाठी कुमारिका मुलगी हवी. बाकि मुलाने कोठेही शेण खाल्ले तरी चालते. ह्यातुन आता बाहेर पडले पाहिजे.आपण आपल्या विचारसरणी त बदलत्या काळाप्रमाणे बद्दल घडवले पाहिजे. ह्याचा अर्थ मुक्तस्वैराचार करावा असा नाही. बाकी कंडोम व आयपील चा वापर वाढला हि चांगली गोष्ट आहे का नाही हे अजुन उमगले नाही. वेताळ

In reply to by वेताळ

गणपती उत्सवात हे घडत नाही का? शक्यतो गणपती उत्सवात असे घडत नसावे. कारण माझ्या माहीतीनुसार गणपती उत्सवात बुधवरात जाणार्‍या लोकांची संख्या जास्त असते त्यामुळे निरोधाचा खप वाढत असेल पण गर्भनिरोधक गोळ्यांचा खप देखील वाढतो का? जाणकारानी प्रकाश टाकावा. पुण्याचे पेशवे

http://vipravani.wordpress.com/ वापर वाढला आहे हे नक्की. आजही कंडोम नीट कसा वापरावा ह्याचे शास्त्र फक्त ३५% पुरुषांना माहित असते. आय पीलने गर्भपात होतो हा समज रूढ आहे. खरे तर आय पील ने गर्भ धारणा ट्ळते.

In reply to by विनायक प्रभू

आजही कंडोम नीट कसा वापरावा ह्याचे शास्त्र फक्त ३५% पुरुषांना माहित असते. कर्म आमचं! दुसरं काय!!! तुमच्यापुढे खूप काम बाकी आहे, विनायकरावजी!! या सगळ्या ६५% अडाण्यांना शहाणं करायचं!!!!:)

In reply to by पिवळा डांबिस

>>आजही कंडोम नीट कसा वापरावा ह्याचे शास्त्र फक्त ३५% पुरुषांना माहित असते. सहमत, आम्हाला ११ वीलाच हे शिकवले होते. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)

In reply to by सखाराम_गटणे™

गटणे साहेब, आपली शाळा / आपले कॉलेज कुठले? ;) बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ऐकावं ते नवलंच .. ११वीला गर्भनिरोधक साधनांचं प्रशिक्षण ? प्रॅक्टीकल पण होतं काय रे बाबा ? गटण्या असले बाँब टाकून आम्हाला पेचात नको टाकत जाउस लेका.... बिपीनभौ .. जरा पत्ता काढा हो गटणेच्या ११वीच्या शाळेचा ... ज्या ६५% लोकांना अजुन कंडोम कसे वापरावेत हे माहित नाही .. त्यांना उपयोग होइल :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

In reply to by टारझन

तेही कॉलेजातूनच पण तसे काही प्रशिक्षण किंवा शिक्षण वगैरे दिले नव्हते कोणी. ज्ञानाच्या देवाणघेवाणीतूनच समजले होते. :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आम्हाला प्रात्याक्षिक दाखवले होते, अगदी मस्त, हवेचा बुडबुडा अडकुन काय त्रास होतो हे पण सागिंतले. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)

नितिमत्ता, संस्कार हे सर्व धाब्यावर बसवुन या किड्यांचे चाललेले चाळे बघुन, माणुस हा इतर जनावरांच्या पेक्षाही खालच्या दर्जाचा झाला आहे याची खात्री पटते.

In reply to by विनायक प्रभू

हीहॉहॉहॉ.... साक्षात क्रिप्टिक ला क्रिप्टिक टाकला!!!! जियो मीसंदिप... बिपिन.

विप्र, उत्तम लेख... जरा उशीराच वाचला... सगळा समजला... :) प्रतिक्रियाही भारीच आहेत... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

नितिमत्ता, संस्कार हे सर्व धाब्यावर बसवुन या किड्यांचे चाललेले चाळे बघुन, माणुस हा इतर जनावरांच्या पेक्षाही खालच्या दर्जाचा झाला आहे याची खात्री पटते. नेमके तुला काय म्हणायचे आहे? नितीमत्ता संस्काराचा मक्ता तुच एकट्याने घेतला आहेस कि काय? जे काही घडते आहे त्यावर इथे चर्चा चालली आहे. वाईट वाटुन घेण्याइतपत काहिच नाही. वेताळ

वेताळबुवा.. फारच वर्मी लागलेले दिसते.. माफी असावी. नेमके तुला काय म्हणायचे आहे? नितीमत्ता संस्काराचा मक्ता तुच एकट्याने घेतला आहेस कि काय? मुळीच नाही. मि या संस्कारांचे पालन करण्याचा प्रयत्न करतो आहे. करण्यासाठी माणुस काहीही करु शकतो, पण अविचाराने केले तर माणसात आणि जनावरात फरक तो काय? मनुष्येतर प्राणी हे आपल्या कामवासनेवर नियंत्रण ठेवु शकत नाही, पण मनुष्यप्राणी ते ठेवु शकतो , आणि ते त्याने ठेवणे हाच एक संस्काराचा नितिमत्तेचा एक भाग झाला. विशिष्ठ वयात आल्यानंतर, कामवासना जागृत होणे हि एक नैसर्गिक भाग आहे , पण ति नियंत्रणात ठेवणे, हे माणुस जातीला जमु शकते.आणि त्याने ते करावे असे माझे प्रामाणिक मत आहे. प्रकाशित झालेल्या एका प्रतिक्रिये मध्ये या गचाळ वागण्याचे परिणाम पण दिले आहेत. ते वाचावे हि विनंती.