मिपा संपादकीय - आनन्दाचे ओझे की ओझ्याचा आनन्द ?
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
आनन्दाचे ओझे की ओझ्याचा आनन्द ?
आपण काय ओझ्याचे बैल.कामाचे ,जबाबदा-यांचे, विचारांचे ओझे वहात असतो. ब-याचदा उत्तम मिळकत असली तरी कामाचे ओझेच इतके असते की त्याखाली आपण पिचुन जातोय की काय असे वाटते. अंगावरचे ओझे झिडकारुन टाकता येते. मानसीक ओझे झिडकरता येतेच असे नाही. चिडचिड होते. कामाच्या ताणाचे रुपांतर ऎसीडीटी/ रक्त दाब या व्याधींमध्ये होते.
ओझे केवळ कामाचेच असते असे नाही. तसेच हे मानसीक ओझे केवळ मोठ्या माणसानाच/त्यातही कामकरणारांनाच असते अशी आपली समजूत असते.
आपले संस्कार शिक्षण समाज नातेवाईक इतिहास धर्म पालकांच्या मित्रांच्या शिक्षकांचा अपेक्षा या सगळ्याचे आपण ओझे वहात असतो. आणि त्या ओझ्याखाली आपली प्रगती सुद्धा मार खात असतो.
वाक्य वाचुन दचकायला होईल पण जरा विचार करुयात एखाद्या शहरात एक रस्ता रुंद करायचा आहे. मोठा रस्त्यामुळे मालवहातुक वगैरे कितीतरी सुरळीत होते
पण तो करण्यात किती अडचणी येतात? लोकानी जागा कोर्टाच्या खुशीखातार रीकाम्या करुन दिल्या तरीसुद्धा त्यात मध्येच एखादे देऊळ येते. खरे तरे ते देऊळ थोडे इकडे तिकडे हलवल्यामुळे काहीच फ़रक पडणार नसतो पण देऊळ हलवणे या विषयावरुन मोठा खल होतो, त्याचे राजकीय भांडवल होते मूळ प्रश्न बाजूला रहातो आणि उगाच बंद हरताळ जातीय तेढ वगैरे वाढीस लागतात.रस्ता होता तेवढाच रहातो.आणि दोन्ही बाजूने रुंद पण ठरावीक ठिकाणे चिंचोळा असलेला रस्ता हमेशा ट्रॆफ़ीक जाम चे उदाहरण बनतो. असेच एखादे ट्रॆफ़ीक जाम आपल्या विचारांमध्ये सुद्धा तयार होते. त्याचा त्रास होत रहातो.
एक साधी गोष्ट घेउया बारावीत एखाद्या मुलाने ईजीनीयरींग किंवा मेडीकल पेक्षा थोडा निराळा विचार केला.जास्त मार्क असून सुद्धा तो बीएससी करुया म्हंटला. तरी ब-याच पालकांना ते सहन होत नाही. आपल्याकडे मूलभूत संशोधन फ़ार कमी होते याचे कारण कदाचित आपल्या समाजाच्या या विचरसरणीत आहे.
दहावीत उत्तम मार्क्स मिळवलेल्या मुलाने आर्ट्स चे शिक्षण घेणे त्याला शक्य होत नाही. कारण पालक विचार करतात की आर्ट्स घेउन काय होणार त्यापेक्षा इंजीनीयरींग केले तर नोकरी लगेच मिळुन जाईल.
"पढोगे लिखोगे ;बनोगे नवाब...हसोगे खेलोगे; बनोगे खराब" या पठडीत वाढलेल्या बहुतेकांची हीच रड असते. खेळात उत्तम गती असणारे कित्येकजण या दहावी बारावीच्या चक्रात अडकून खेळ सोडुन देतात. गाणे/ चित्रकला शिकणारे दोन तीन वर्ष (आणि बहुतेक कायमची) साधना बंद करतात. स्वत:ची कला हरवुन बसतात.
जे काय डॊक्टर इंजीनीयर व्हायचे ते होतात आणि नोकरी वगैरे करु लागतात. चांगल्या पगाराच्या मोहात नोक-या बदलात. मूळ स्वभावाला रुचणार नाहीत अशी कामे करतात.
काही वर्षानन्तर थोडे आर्थीक स्थैर्य आल्यानन्तर काहीतरी चुकले आहे अशी मनात टोचणी वाटू लागते. कारण नसताना डीप्रेशन येणे उदास वाटणे असे होऊ लागते. कोणी उत्तम गाणारा पाहिल्यावर अरे आपणही चांगले गात होतो पण आता फ़क्त कानसेन म्हणून उरलोय याची खंत वाटायला लागते. मनातल्या मनात म्हणतही असतो पण गाणे सोडले नसते तर...हा विचार ट्रॆफ़ीकजाम करायला लागतो
हल्ली थोडे वातावरण बदललेय तेही मोठ्या शहरात. पण अजूनही छोट्या शहरात मुलगा क्रिकेट खेळतो हे आजही पालक अभिमानाने सांगु शकत नाहीत. क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळाची ही गत. कबड्डी खोखो वगैरेबद्दल विचारायलाच नको.
एशीयाड ऒलिम्पीक एशीयन गेम्स सारखा एखादी खेळाची जत्रा होते आपण त्यात इतर देशांच्या क्रीडापटूना मेडल्स मिळवताना बघतो आणि टाळ्या वाजवतो . त्यानन्तर भारत खेळात मागे का? अशी पत्रे लिहुन वर्तमानपत्रात छापुन आणतो. तावातावाने एकमेकांत वाद घालतो.आपणा आपली सामाजीक विचारसरणी बदलायला तयार नसतो. खरेतर भारतात इतर काही देशांपेक्षा खूप चांगल्या सुवीधा उपलब्ध आहेत. पण दहावी बारावी चा बागुलबुवा पालकांच्याच नव्हे तर शाळाकॊलेजातही केला जातोच आणि ऐन जोषातली वर्षे वाया घालवली जातात.
प्रत्येक व्यक्तीच्या मनाची काही जडणघडण असते त्यानुसार ती वागत असते. तो त्या व्यक्तीचा स्वभाव असतो. त्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध वर्तन झाले की मग डीप्रेशन येते मानसीक ताण येतात. त्यामुळे आपण कामातला आनन्द हरवुन बसतो.
ओशो रजनीशांच्या मतानुसार माणसांच्या स्वभावाचे चातुर्वर्णा सारखेच चार प्रकार आहेत. त्याला त्यानी क्षत्रिय ब्राम्हण वैश्य शूद्र असे म्हंटले आहे यात उच्च नीच असे काहीही नाही.हे चारही स्वभाव प्रत्येकात कमी जास्त प्रमाणात प्रभावी असतात
प्रत्येक व्यक्तीचा एक मुख्य प्रभाव स्वभाव असतो आणि इतर स्वभाव गौण असतात.
ब्राम्हण स्वभाव नव्या द्न्यानाबद्दल आवड दर्शवतो उदा शिक्षक प्राध्यापक
क्षत्रीय स्वभाव हा नेतृत्व / पुढाकार घेणे दर्शवतो उदा प्राचार्य /नेते/
वैश्य स्वभाव हा अर्थ/पैसा मिळवणे समारंभात चमकण्याची आवड असणे हे दर्शवतो उदा अभिनेते,
शूद्र स्वभाव हा सेवा करण्याची आवड दर्शवतो. उदा डोक्टर , इंजीनीयर, मेकॆनीक,
माणसाचा स्वभाव हा या सर्व स्वभाव ( प्रवृत्ती) नी बनलेलाअसतो यातेक प्रभावी आणि इतर कमीअधीक प्रमाणात गौण असतात.
आपण जर आपला स्वभाव ओळखुन त्यानुसार व्यवसाय निवडला तर यश मिळण्याची शक्यता जास्त असते कारण आपण आपल्या प्रवृत्तीनुसार वागत असतो.
थोडे अधीक स्पष्ट करुन सांगतो.काही यशस्वी व्यक्तींची उदाहाणे घेउयात
उदा : मदर तेरेसा : प्रभावी स्वभाव शूद्र गौण स्वभाव क्षत्रीय
मदर तेरेसाना लोकांची सेवा करण्यात आनन्द मिळायचा. त्याच बरोबर त्याने ब-याच सामाजीक संस्था स्थापन केल्या.
महात्मा गांधी : प्रभावी स्वभाव क्षत्रीय गौण स्वभाव शूद्र
गांधीजी भारताचे प्रभावी आणि फ़ार डॊमिनेटिंग नेते होते त्यानी बॆ जीना सारख्या नेत्यालाही गौण केले . गौण शूद्र स्वभावामुळे त्यांची सेवाभावा कडे ओढ होती
अमिताभ बच्चन : मूळ स्वभाव वैश्य गौण स्वभाव ब्राम्हण
चित्रपटात चमकला, पैसा मिळवण्याच्या संधी शोधल्या.गौण स्वभावही क्षत्रीय नसल्यामुळे स्वंत:च्या संस्थामधील कर्मचा-यानाही कन्ट्रोल करु शकला नाही
डॊ. लागु. प्रभावी स्वभाव वैश्य गौण स्वभाव क्षत्रीय
नसलेल्या शूद्र स्वभावामुळे रुग्ण सेवेपेक्षा डोक्टरकीची प्रॆक्टीस सोडुन नाटक सिनेमात रमतात.
आपण आपले थोडेसे अवलोकन केले आपला स्वभाव ओळखला आणि त्यानुसार व्ययसाय निवडला तर कामात आनन्द मिळतो. कामात आनन्द मिळत असेल तर यश फ़ारसे दूर नसते.
वपु काळे नेहमीच त्यांच्या कथांमधुन शहरातील मध्यम वर्गाचे वर्णन करतात. त्यांच्या एका कथेत ते लिहितात की इथले लोकांचा सगळा आनन्द " लोक काय म्हणतील" या ते शब्दांच्या रा़क्षसाने खाऊन टाकलाय.
आपण आपल्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध काम केले तर मनाला ते नेहमीच ओझे वाटत असते.या उलट स्वभावानुसार निवडलेले काम आनन्द देते.
पण आपल्या प्रत्येकाला स्वभावानुसार काम मिळेलच असे नाही. पण कामातही हळुहळु स्वभावानुसार मिळेल असेच काम आपण शोधायचा प्रयत्न करत असतो.
एक झेन कथा आहे
काही झेन फ़कीर एक डोंगर चढत होते. चढण तशी ब-यपैकी कठीण होती. चढताना दमही बराच लागत होता. त्या सगळ्यांसोबत एक लहान मुलगी तीच्या धाकट्या पाठंगुळी घेउन ती चढण चढत होती. ती बिचारी धापा टाकत होती. कोणीतरी तिला म्हंतले की तुला एवढा दम लागतोय . कष्ट होत आहेत तर तू तुझ्या पाठीवरचे ओझे कमी का करत नाहीस.
ती मुलगी म्हणाली ओझे? कसले ओझे आहे माझ्या पाठीवर? ते ओझे नाहिय्ये. तो तर माझा लाडका भाउ आहे. . मला तो फ़ार आवडतो म्हणुन तर त्याला माझ्या सोबत घेऊन आले आहे.
आवडत्या कामाचे ओझे कधीच वाटत नाही.
एखादे काम आपण मारुन मुटकुन करत असतो. मनातुन कुढत असतो स्वत:ला शंभर शिव्या घालत असतो. त्यामुळे होते काय तर आपण ते काम पाट्या टाकल्यासारखे करतो. त्या कामातुन कधी सुटका होईल असे वाटत असते.आपण त्यातुन पळ काढायचे बहाणे शोधत असतो.काहे जण त्यांच्या कामात व्यवयसात आर्थिक दृष्ट्या यशस्वी होतातही. पण मनातुन ते असंतुष्ट असतात. ही असंतुष्टता मग कामाचा ताण बनुन येते.तर त्यामुळे काही सायकोसोमॆटीक आजार होतात. सतत पाठदुखी वारंवार मान आखडणे इत्यादी प्राथमिक गोष्टी एकसारख्या अनुभवास येतात. केवळ खूप पैसे मिळाले म्हणजे माणुस आनन्दी होतोच असे नव्हे.पण दुर्दैवाने अजूनही समाजात माणसाचे यश त्याने मिळवलेले पैसे याच परिमाणाने मोजले जाते.
एखाद्या शि़क्षकाला विद्यार्थ्याना शिकवायला मनापासुन आवडते त्याला आपण दिलेल्या शिक्षणाचा उपयोग करुन आपले विद्यार्थी यशस्वी झालेले पहायला मनापासुन आवडते.
ज्या क्षेत्रात तुमची आवड असते त्या तुम्ही यशस्वी होताच.
उदा: तेंडुलकर सारखा मध्यम वर्गीय घरातला मुलगा क्रिकेट ही त्याची आवड तो त्याने व्यवयसाय म्हणुन स्वीकारला. तो आनन्दी आहे यशस्वी आहे.क्रिकेट पायी आपण आपले शिक्षण नीट घेऊ शकलो नाही याचे त्याला काही वाटतही नसेल.
एखादा तरुण ज्याचा प्रभावी स्वभाव शूद्र असतो तो उत्तम गॆरेज चालवु शकतो. उत्तम डॊक्टर बनु शकतो. तर दुसर तसेच शिक्षण घेतलेला रीसर्चमध्ये रममाण होतो. लोकांच्या वागण्याचे रहस्य मूळ स्वभावात दडलेले असते.
क्षत्रीय स्वभावाच्या व्यक्तीस नेतृत्व करावयास आवडते. त्याला कोणी त्याच्यावर हुकुम गाजवलेला आवडत नाही.दोन क्षत्रीय स्व्भावांच्या व्यक्तींचे कधीच एकमेकांशी पटत नाही. भांडणे होतात. जो प्रबळ ठरतो तो नेतृत्व करतो दुसरा त्याचे हुकुम जबरदस्तीने, मनातल्या मनात चरफ़डत मानत असतो. वेळ आणि संधी येताच तो त्यातुन मुक्त व्हायचा विचार करत असतो.
दोन प्रभावी स्वभाव शूद्र असलेल्या व्यक्तींमध्ये ज्याचा क्षत्रीय स्वभाव त्यातल्यात्यात प्रबळ असेल तो डॊमिनेट करतो आणि दुसरा त्याचे हुकुम आनन्दाने मानतो. त्या दोघात कोणीच असे डॊमिनेटिंग नसेल तर दोघानाही एकमेकांचा राग येतो. नक्की कशाचा राग येतो ते कळत नाही. अशा व्यक्ती नेहमी अन्य क्षत्रीय प्रभावी स्वभाव शोधत असतात. हुकुम मानणे दुस-याना आनन्दी करणे यात त्याना खूप रस असतो.हुकुम करणारे कोणी नसेल तर या लोकाना आपले जीवन व्यर्थ आहे असे वाटु लागते. या विचारांचे त्याना टेन्शन येते.
प्रभावी स्वभाव वैश्य असणारे लोक नेहमी लोकाभिमुख असतात. त्याना चार लोकांत मिरवायला आवडते. नवनव्या संधींच्या शोध्त असतात. प्रसिद्धी मिळाली नाही तर ते अस्वस्थ होतात.
समाजात / कार्यालयात आपल्या आसपास बरेच लोक वावरत असतात त्यांचे प्रभावी स्वभाव ओळखुन त्याना साजेल तसे काम आपण त्याना दिले तर ते खूप आनन्दाने करतात. आवडते काम मिळाल्याने त्यांची कामातली गती वाढते. कोणताही प्रोजेक्ट उत्तम रीतीने पार पाडला जातो.
आणि अर्थात "आपण काय ओझ्याचे बैल" असे बोलणारे लोक कमी होतात.
आपला प्रभावी स्वभाव ओळखला आणि त्याला साजेसे काम निवडले किंवा आपल्या कामाला त्या स्वभावानुसार बदलुन घेतले तर कामाचे तणाव/ व्यक्तींमधील अनावश्यक ताण कमी होतील. मनातले ट्रॆफ़ीक जॆम कमी होतील मन निरोगी राहील .सायकोसोंमॆटीक आजार कमी होतील. ओझ्याचा आनन्द होईल
सर्वे भद्राणे पश्ष्यन्तु.
सर्वे भवन्तु सुखीन:.
सर्वे सन्तु निरामय.
मा क:ष्चीत दु:खम आप्नुयात.
पाहुणा संपादक : विजूभाऊ.
वर्गीकरण
उत्तम अग्रलेख!
'स्व' ला ओळखा
ट्रॅफिक जाम
In reply to ट्रॅफिक जाम by एकलव्य
मला वाटते
धन्यवाद विजुभौ
लेख आवडला.
In reply to लेख आवडला. by मुक्तसुनीत
असेच वाटते
वझ दु:खाच
व्यवसाय आनंददायी असावा
In reply to व्यवसाय आनंददायी असावा by धनंजय
++१
लेखाचा
In reply to लेखाचा by यशोधरा
छान लिहिले आहे.
लेख आवडला
उत्तम पण विस्कळीत
मस्त लेख
चांगला विषय
In reply to चांगला विषय by ऋषिकेश
असेच
In reply to असेच by चित्रा
चातुर्वर्ण्य
समुपदेशक
विजूभाऊ,
छान आहे
उत्तम संपादकीय ...
छान आहे..
छान
In reply to छान by लिखाळ
हेच म्हणते..
छान!
In reply to छान! by स्वाती दिनेश
हेच म्हणतो
सहमत
बाकी "
विजुभाऊ