एखादा रविवार मोठा सुलक्षणी निपजतो. कधी नव्हे ती मुंबईत बर्यापैकी थंडी पडलेली असते. रजई घेता यावी म्हणुन ती पंखा लावुन थोडी वाढवलेली असते. सूर्य कसलही विघ्न न येता निवांत उगवतो. सकाळी सकाळी मोबाईल बोंबलत नाही. तात्पर्य म्हणजे गुलाबी थंडीत आठ वाजेपर्यंत लोळायची चैन होते. उठल्यावर मनसोक्त चहा होतो. पेपर चाळुन होतात. बायको हटकत नाही. पहिला चहा, दुसरा चहा, नाश्ता पुन्हा चहा असे करता करता अकरा वाजतात. अजुन अंघोळीचे फर्मान निघालेले नसते. सोसायटीची मिटिंग नसते. कुठे लग्न समारंभ नसतो. बघता बघता कोचावर रेलण्यात तिनेक तास जातात. मग जरा मी पाय मोकळे करायला हलतो.
समोर टेबलावर लक्ष जाते ते चिरुन धुतलेल्या व निथळायला चाळणीवर ठेवलेल्या मोहक भाज्यांकडे. सध्या भाज्यांचा हंगाम आहे. अश्या ताज्या, रसरशीत भाज्या एरवी दुर्मिळच.
पसरलेल्या भाज्या पाहताच आजचा बेत लक्षात येतो. भोगीला केल्या जाणार्या भाजीची ही नवी आवृत्ती. मी मनोमन खुष होतो. ही भाजी आहे म्हणजे गरमा गरम फुलके आणि मग खिचडी - कढी असणारच. ही भाजी काहीशी उंध्युच्या जातीतली पण तेलात चपचपलेली नाही. आता कधी एकदा जेवणार असे होते. नाईलाजाने अंघोळ करावी लागते. अंघोळ करुन बाहेर येताच मस्त खमंग वास दरवळत असतो. एकही हाक मारायला न लागता मी गपचुप पानावर बसतो आणि बायको गालातल्या गालात हसते. भरपेट जेवण झाल्यावर लगेच झोपणार कसा?
मी संगणक प्रज्वलित करतो. भाजी व्हायच्या आधी त्या भाजांचे आणि नंतर तयार झालेल्या भाजीचे टिपलेले फोटु मी अपलोड करतो. मी बायकोकडुन भाजीची पाककृती घेतो आणि मिपावर टंकायला बसतो. स्वार्थाबरोबर परमार्थ. माझे जेवण जिरेल आणि कुणाला पाककृती आवडली तर भाज्या झकास आहेत तोपर्यंत करुन हाणता येईल.
भाज्या - गाजर, रताळी, हिरवे वाटाणे, वालाचे सोललेलेल दाणे, पापडीच्या शेंगांचे दोरे कापलेले मोठे तुकडे, चौकोनी फोडी केलेली बारीक काटेरी वांगी, भुईमुगाच्या शेंगामधले कोवळे दाणे. हे सर्व साहित्य आपल्याला आवड्त असेल त्या प्रमाणात एकुण दोन वाट्या.
मसाला - १ मोठा चमचा खवलेला नारळ, ३ तिखट हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, आल्याच्या दोन चकत्या. हे सर्व साहित्य चवीनुसार मीठ घालुन बारीक वाटुन घ्यावे.
फोडणी साठी तेल, चिमूट्भर ओवा आणि चिमुटभर हिंग.
कृती
जाड बुडाचे भांडे गॅसवर ठेवुन त्यात ४ ते ५ चमचे तेल घ्यावे. तेल तापल्यावर ओवा व हिंग घालावा. चिरलेल्या भाज्या धुवुन व निथळुन फोडणीत घालाव्या. मिश्रण आसडुन/ किंवा ढवळुन घ्यावे. मग थोडे पाणी घालुन व झाकण ठेवुन भाजी मंदाग्नीवर शिजवुन घ्यावी. भाज्या शिजल्यावर त्यात वाटंण व चवीनुसार मीठ घालावे आणि २-३ मिनिटे ठेवावी. भाजी तयार झाल्यावर गरम गरम फुलके किंवा भाकरी बरोबर वाढावी.
ही भाजी मातीच्या भांड्यात अधिक चविष्ट होते.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
9807
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
थोडा और जायका
अप्रतिम!
फोटो छान आहेत!!
अरे व्वा...
जीभ आणि डॉळे दोन्ही सुखावणारा
वाह वा !
मस्तच!
ओय होय!
वाहव्वा!
+++ १
In reply to वाहव्वा! by सोत्रि
+२
In reply to +++ १ by सस्नेह
पाकृ आवडली.. आता मातीचे भांडे
व्वा! मस्त प्रकार!!!
धन्यवाद
डझनाचा भाव काय?
In reply to धन्यवाद by सर्वसाक्षी
पण कुकर आणि मातीचा तवा म्हणजे
In reply to डझनाचा भाव काय? by प्रभाकर पेठकर
पण कुकर आणि मातीचा तवा म्हणजे आमच्या घरी अर्धा-अर्धा डझन तरी घ्यावे लागतील. सौं.चा हात भारी गळका आहे.वहिनींचा मिपावर वावर नसावा ;) (हघ्याहेवेसान)वाचायलाही मजा आली.
मस्त..
भोगी आवडेश !!
मस्तच.....
ओ हॅलो
In reply to मस्तच..... by शिद
गणपा ह्यांच्या खालील धाग्यात याची सविस्तर चर्चा झाली आहे...
In reply to ओ हॅलो by बॅटमॅन
वा! धन्यवाद शिद साहेब.
In reply to गणपा ह्यांच्या खालील धाग्यात याची सविस्तर चर्चा झाली आहे... by शिद
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
वा.. खुपच छान. पाकॄ आवडली.
खेंगाट
आवडेश
सुरेख!!! "क्षुधा-साधना" खूप
व, छान!
खलास !
झक्कास
छान लेख आहे.फोटो पण सुंदरच .
वावा..
ओ.. मी १५६७ व्यांदा आलेय हो
दिसतायत ना!
In reply to ओ.. मी १५६७ व्यांदा आलेय हो by पिलीयन रायडर
पाकृ आणी लेख