Skip to main content

सत्तेवर कोण यायला हवे

लेखक सचीन यांनी शनिवार, 30/11/2013 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे. पण कॉंग्रेसचा का? इतर पक्ष का नको असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. देशाला लोकशाहीची ओळख झाली.हि अनमोल लोकशाही जपण्याचे महत्वाचे काम कॉंग्रेसने केले. अफाट लोकसंख्या,हजारो जाती, अनेक भाषा, विविध धर्म ह्या साऱ्या घटकांचा समतोल सावरत कॉंग्रेसने देशाचा डोलारा सावरला. त्याच बरोबर देशाला विकासाच्या वाटेवर आणले. कॉंग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. १८८५ साली स्थापन झालेल्या कॉंग्रेसने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल ह्यासारखे अनेक खंदे स्वातंत्र्य सेनानी देशाला दिले. त्यांच्या आणि अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या अनमोल सहकार्याने देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर महात्माजींनी कॉंग्रेस पक्ष विसर्जित करा असा सल्ला दिला होता. पण देशाला स्वातंत्र्य पर्यंत आणल्यावर असे निर्नायकी अवस्थेत सोडणे चुकीचे होते. कॉंग्रेस जणांनी महात्माजींचा हा सल्ला झुगारला. खुद्द महात्माजींचा सल्ला झुगारून आपल्यात पक्षांतर्गत लोकशाही आहे हे कॉंग्रेस ने सिद्ध केले. १९४८ साली महात्माजींचा निर्घुण खून करण्यात आला त्यानंतर स्वतंत्र भारतात लोकशाहीची ज्योत तेवत ठेवली ती कॉंग्रेसने आज भारतात एकही असे गाव नाही जेथे कॉंग्रेस पक्ष नाही . देशातील सर्वसामान्य, धर्मनिरपेक्ष,गोरगरीब, दलित मागासवर्गीय ह्यांना हा पक्ष आपला वाटतो. आणि कॉंग्रेस च्या नेत्यांनीही ह्या लोकांचा विश्वास तुटू दिला नाही. देश आज जो विकासपथावर आहे त्याचे मुख्य कारण कॉंग्रेसने सत्ता जनतेसाठी राबवली. जाती धर्माच्या नावावर कधीही राजकारण केले नाही. सर्वसामान्य माणूस हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला मग तो कुठल्याही जाती धर्माचा का असेना. आता जी २०१४ ची निवडणूक होत आहे त्यात कॉंग्रेस च सत्तेवर येईल ह्यात शंका नाही मात्र दुर्दैर्वाने कॉंग्रेस सत्तेवर आली नाही तर देशाकडे नेतृत्व करण्यासाठी कुठले पर्याय आहेत जे आपल्या नेतृत्वाने देशाला सावरू शकतील. माझ्या मते कॉंग्रेस चे सरकार आले नाही तर तीन नेते असे आहेत ज्यांच्याकडे देशाचे नेतृत्व आले तरी देशाचा विकास करण्याची आणि देशातील सर्वसामान्यांना बरोबर घेवून जाण्याची त्यांची क्षमता आहे. त्यातील पहिले नाव आहे शरद पवार साहेबांचे.शरद पवार ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात जाणता राजा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राचा आतापर्यंतचा सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रगतीपथावर वाटचाल केली. भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला आणि धडाडीने काम करण्याची क्षमता असलेला नेता. अल्पसंख्यांक, स्त्रिया, शेतकरी ह्यांच्या समस्येची जाण असणारा आणि ते सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारा नेता म्हणजे शरद पवार. शरद पवार जर प्रधानमंत्री झाले तर ते भरीव कामगिरी करू शकतात ती क्षमता त्यांच्यात आहे. दुसरा नेता म्हणजे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्य मंत्री मायावतीजी. त्यांनी उत्तर प्रदेशात जो सोशल इंजीनियरिंगचा प्रयोग करून सत्ता खेचून आणली होती ते आश्चर्यजनक होते. केडर बेस पार्टी म्हणून ब स पा कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.तसेच देशातील दलित व अल्पसंख्याकामध्ये मायावतीजी ह्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. शतकानु शतके सामाजिक विषमतेखाली पिचणाऱ्या समाजाला देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्तेवर आणून दाखवणे हे मायावतींचे ऐतिहासिक कर्तुत्व आहे. जर उत्तर प्रदेशात त्यांचा पक्ष ४० जागा पर्यंत मजल मारू शकला तर त्या सत्ता स्थापन करण्यात महत्वाची भूमिका अदा करू शकतात. तिसरा नेता म्हणजे मुलायम सिंग यादव. जयप्रकाश नारायण सारख्या कर्तुत्ववान नेत्याचा मुशीत तयार झालेला कर्तुत्ववान नेता. नाव मुलायम असले तरी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्यात वाकबगार. ज्यावेळी लोकपाल बिल आणून घटनेचे उल्लंघन करण्याचे प्रयत्न चालू होते तेव्हा मुलायम सिंग आणि लालूप्रसाद यादव हे ह्या बिलाच्या विरोधात ठामपणे उभे राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश विकास करत आहे. मात्र दुर्दैवाने ह्यांच्या पैकी कोणीही सत्तेवर आले नाही तर मात्र देश निर्नायकी अवस्थेपर्यंत पोहोचण्याची स्तिथी आहे भारताचा दुसरा पाकिस्तान होईल अशी साधार भीती वाटते. आज आपण मोकळ्या वातावरणात राहत आहोत. लोकशाहीचे फायदे उपभोगत आहोत. पण नंतर मात्र पाक, अफगाणिस्थान इथे जशे फतवे निघतात तसे फतव्याचे राजकारण होण्याची शक्यता आहे. आधुनिक लोकशाहीत मंगळावर स्वारी करणारा आपला देश पुराणकाळात जाण्याची शक्यता वाटते

वाचने 17728
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

टिपर्‍या! दांडिया!! गरबा!!!

सन्मानाने मानाचे पागोटे देऊन त्यांना सुखरूप पाकिस्तानला जाऊन दिले होते. >>>>> गुरुजी मेजवानीचे जावून द्या पागोट्याचे कंत्राट तरी तुमच्याकडे होते का?

In reply to by सचीन

काय मुद्दाम करताय का उपजतच काहीतरी कमी आहे? कंत्राटं, कंत्राटातला भ्रष्टाचार इ. काँग्रेसवाल्यांची कामं. आमचा असल्या कामांशी व काँग्रेसशी दुरूनही संबंध नाही.

In reply to by सचीन

>>> गुरुजी मेजवानीचे जावून द्या पागोट्याचे कंत्राट तरी तुमच्याकडे होते का? मुख्य म्हणजे कधी पागोटं घालणे, कधी फर कॅप, कधी गांधी टोपी, कधी फेल्ट हॅट तर कधी टापशी गुंडाळणे (आणि त्याखाली भ्रष्टाचार लपविणे) ही काँग्रेससारख्या निधर्मी पक्षाची कामं. आमचा याच्याशी संबंध नाही.

नाही गुप्तहेरा सारखी सारी माहिती देताय .मेजवानीला काय काय पदार्थ होते ते सांग्रसंगीत सांगताय, पागोटे दिले ते सांगताय म्हणून आपली एक शंका दुसरे काही नाही. तुम्ही गुरुजी आम्ही ढ पोर. तुमच्यापुढे आम्ही म्हणजे वाडग्या समोर वाटी......

>>> तुम्ही गुरुजी आम्ही ढ पोर. तुमच्यापुढे आम्ही म्हणजे वाडग्या समोर वाटी...... एवढं मात्र खरं बोललात.

पंतप्रधान - सुशील कुमार शिंदे. ( जातीय अडचण नाही ) कायदा मंत्री- सचिन सावंत माहिती व प्रसिद्धी- कुमार केतकर हुसेन दलवाई- कोणतं खातं द्यावं बरं ? नबाब मलिक- हुसेन दलवाईंचे राज्यमंत्री जितेन्द्र आव्हाड- जातीय सलोखा मंत्री नारायण राणे- रसायन उदयोग.

की निवडणुका कश्या जिंकाव्यात याचे गणित कॉंग्रेसला चांगलेच अवगत आहे.

In reply to by सचिन कुलकर्णी

जनता बुद्धू नाहीये कॉंग्रेसने विकास केला नसता तर त्यांना जनतेने कधीच घरी बसवले असते. जसे अवघ्या ५ वर्षात भाजपला बसवले.

या धाग्यावर कोणतीही सकारात्मक चर्चा न झाल्याने धागा वाचनमात्र करत आहोत.