Skip to main content

पत्रिका एक बघणे....

लेखक ज्ञानव यांनी गुरुवार, 28/11/2013 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
खालील विषयावर तज्ञांकडून माहिती हवी आहे. जर जन्मवेळ, ठिकाण, जन्म तारीख दिली तर पत्रिका मांडून भविष्य कथन करता येते (हा ढोबळ भाग आहे खोलात शिरून वाद विवाद अपेक्षित नाही) म्हणजे विद्या, संतती, धन-संपत्ती, गंडांतर येईल नाही येईल वगैरे वगैरे. पण जर मृत्यू समय, मृत्यू तारीख, मृत्यू ठिकाण दिले तर त्या माणसाचा पुनर्जन्म होईल का?, केव्हा होइल?, कि होणारच नाही वगैरे सांगता येते का ? तसेच, दि : १/११/१९६७ वेळ: : ९.४५ सायंकाळी स्थळ : mumbai वरील माहिती वरून मृत्यूची दिनांक, वेळ, स्थळ, प्रकार (नैसर्गिक, अपघात, आत्महत्या वगैरे )कुणी सांगू शकेल का? इथे तज्ञांनी सकारण, सोदाहरण आणि मला पामराला समजेल अशा अतांत्रिक पद्धतीने मार्गदर्शन करावे हि विनंती.

वाचने 50665
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

दि : १/११/१९६७ वेळ: : ९.४५ सायंकाळी स्थळ : mumbai
ही कसली वेळ आहे हो? नै, म्हणजे मला त्यातलं कै कळतं अशातला भाग नै, पण माहितगार सांगू शकतील.

ती जन्म वेळ आहे. कारण त्याखाली मृत्यू संदर्भात फलादेश विचारला आहे.

In reply to by ज्ञानव

एखाद्या माणसाची मरण्याची वेळ आणि ठिकाण सांगितलं, अगदी पत्रिका दिली, फक्त नाव लपवलं तर ज्योतिषी लोक मृत्यूचे कारण आणि वय सांगू शकतील का?

In reply to by पैसा

मलाही त्यातले फारसे काही कळते असे नाही. पण कुतूहल म्हणूनच हा धागा विणण्याचा प्रयत्न केला आहे. ज्योतिषी सांगतीलच काही बाही.

In reply to by पैसा

पैसा ताई पत्रिका ही जन्मवेळचा नकाशा असल्याने वय सांगता येईल पण मृत्यूचे कारण सांगता येणे अवघड आहे. . आम्ही याविषयी प्रयोग केले आहेत. एका गृहस्थाच्या मुलाने तरुणवयात अमेरिकेत आत्महत्या केली. आम्ही त्याची प्रथितयश ज्योतिषाने बनविलेली कुंडली एका ठाण्याच्या ज्योतिषाला त्याच्या मागणीवरुन पाठविली. त्यासोबत जन्मवेळ, जन्मस्थळ व जन्मतारीख ही पाठविली. आम्ही सगळी माहिती खरी दिली व फक्त मृत्यू हा कसा व १९८० ते १९९० या काळात कुठल्या वर्षी झाला असेल एवढेच विचारले. त्याला ज्योतिषाने तयार केलेली कुंडली पाठविली. ती कुंडलीसुद्धा चुकीची निघाली. त्याने ती स्वत: तपासून नवीन बनविली व त्यावरुन एक वर्ष दिले ते मृत्यू वर्षाच्या जवळपाससुद्धा नव्हते. सदर आवाहन हे धनुर्धारी मे २००० चा अंक या ज्योतिषांच्या व्यासपीठावरच मांडले गेले होते. ( उधृत ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद)

In reply to by प्रकाश घाटपांडे

वाटलंच होतं. तुम्ही प्रत्यक्षात पुरावा दाखवल्यामुळे अगदी "हा सूर्य आणि हा जयद्रथ" समोर आहे. धागाकर्त्याने तुमचे इथले लेख वाचले तरी त्यांना बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळून जातील! धन्यवाद!

म्रुत्यु ची वेळ आणी कारण त्रोटक पणे सांगता येते . पण ठाम पणे कुणी सांगत नाही . एखाद्या व्यक्तीला त्याची अंतीम वेळ आणी कारण सांगणे ज्योतीषशास्त्रात बसत नाही असे वाचलय .

ज्ञानव; गंमत म्हणुन सुद्धा या फंदात पडू नका. अज्ञातात आनंद माना. अशा प्रश्नांमुळे स्वतःचे व कुटुंबाचे मनस्वास्थ बिघडलेली केस आम्ही अनुभवली आहे

सल्ल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण इथे विश्वास / अविश्वास हा मुद्दा नसून जे कुणी ह्या विषयातले तज्ञ आहेत त्यांनी सांगावे कि जन्म कुंडली पाहून जसे मृत्यूचे भाकीत करता येते तसे मृत्यू कुंडली मांडून पुनर्जन्माबद्दल कुणी सांगू शकते का ? ज्योतिष हे थोतांड आहे कि नाही ह्या हि फंदात मला पडायचे नाही कारण कुणाचे मत परिवर्तन करण्याइतकी कुवत माझ्यात नाही. पण जे कुणी ह्या विषयातले जाणकार आहेत त्यांनी माझ्या वरील मुद्द्यांबाबत विवेचन करावे एवढेच मला वाटते. ज्यांना ज्योतिष थोतांड आहे असे वाटते आणि थोतांड नाही असे वाटते त्यांच्याशी माझे काहीच वाद विवाद नाहीत. ज्याला त्याला मत स्वातंत्र्य नक्कीच आहे. पण गंभीरपणे मुद्दा लक्षात घेऊन वरील मुख्य धाग्याबाबतीत कुणीतरी आपली मते मांडावीत.

नेमके काय विचारायचे आहे, आणि ते जाणून घेण्यामागे हेतु काय आहे? हे समजले तर एक चांगले ज्योतिषी आहेत, त्यांना विचारून बघता येईल. ....पुनर्जम असतो, असे इथे गृहित धरलेले आहे, तसे समजा नसलेच, तर?

In reply to by चित्रगुप्त

गर्भित हेतू असे काही नाही. जसे जन्म कुंडली वरून मृत्यू काढतात तसे मृत्यू कुंडली वरून पुनर्जन्म केव्हा होईल? इतके साधे....हेतू असा काही नाही केवळ उत्सुकता शमवणे. पुनर्जन्म असतो असे एकदा का गृहीतच धरले आहे तर तसे नसलेच तर ह्याबाबत कसा विचार करणार...जे वर मांडलाय त्यावर तुमचे ज्योतिषी काय सांगतात ते लिहा जमल्यास इतकेच म्हणू शकतो.

In reply to by ज्ञानव

पण ज्योतिष्विद्या हे सांगु शकतात का? कारण त्याविषयी तरी ज्योतिष विद्येला मर्यादा आहेत असे ऐकुन आहे.

In reply to by अग्निकोल्हा

माझ्या वाचनानुसार्,ज्योतिष विद्येला मर्यादा आहेत्,पण उच्च अध्यात्मिक पातळी असलेल्या व्यक्तिना याविषयीची कल्पना असते,त्यामुळे त्याना पशुपक्षी यान्च्या भाषेचे ज्ञान असते,त्यामुळे फक्त पोपट्च काय ईतर प्राण्यावरुन सुद्धा भविष्य सान्गता येते असे ऐकुन आहे.

In reply to by अनिरुद्ध प

कारण पोपट बोलत नाही तो फक्त कार्ड उचलून देतो ज्यावर मनुक्षाला समजेल आशा भाषेत उत्तर लिहलेले असते.

In reply to by अग्निकोल्हा

बोलत नाहीत? मी स्वता बोलणारे पोपट बघीतले आहेत्,जे शिकवलेली वाक्य बोलतात.

In reply to by अग्निकोल्हा

अगोदरच 'नाही' असे उत्तर दिले आहे.(आणि ज्यान्ची अध्यात्मिक पातळी उन्च असते ते माझ्यामते रस्त्यावर पोपट घेवुन लोकांचे भविष्य सान्गत बसत नाहीत.)

छान !! आता काही नवीन धागे येवु द्यात १ ) लोणी एक पावाला लावणे २ ) कळफलक एक बडविणे ३ ) नाष्टा एक करणे ४ ) बॅन्डविड्थ फुकाची वापरणे ५ ) नाडी एक आवळणे . . . . सो ऑन !! ब्रंम्हवंदीय मित्रावर्यांना जास्तीची कामे न लावणारा समटाईम्स अनिसवाला वाश्या

In reply to by सुहास..

५ ) नाडी एक आवळणे
आवळणे ?? छ्या: भलतीच निराशा केली राव तुम्ही .... जरा कल्पनाशक्तीला आवळा ... वचने किं दरिद्रता ? बोलताना कशाला कल्पनादारिद्र दाखवायचे ;)

माझ्या अभ्यासानुसार ,
दि : १/११/१९६७ वेळ: : ९.४५ सायंकाळी स्थळ : mumbai
सदर व्यक्ती ऑलरेडी डेड आहे .... किंव्वा जिवंत असेल तर लवकरच मृत्यु योग आहे ...ॐ फट् स्वाहा: :D

श्री प्रकाशजी , आपल्या सारखा एखादा अभ्यासू ज्योतिषी जो ठाण्यात राहतो (आपल्या ओळखीचा) अचूक होरा असलेला नाव व पत्ता देता का? आपण कुठे राहता ठाण्यात का ?हात दाखवून अवलक्षण करीन म्हणतोय…

In reply to by अव्यक्त

माझ्या परिचयाचे कुणी नाही. पण ठाणे डोंबिवली ही ज्योतिषांसाठी सुपीक भूमी आहे. मी पुण्यात राह्तो

मृत्यू केव्हा झाला आणि कसा झाला हे ढोबळ्मानने सांगता येइल…ग्रह स्तिथी काही वेळा निश्चित्पणे सांगू शकते ….उदा. अपघाती(आग, पाण्यात बुडून वगेरे), शांतपणे…कुंडली पाहणे हे डेटा अनालिसिस सारखे आहे ….फ़ार वर्षांनी आणि अनुभवांनी नीट सांगता येते….धोण्डोपन्त (मुंबई) किंवा श्रीराम भट(पुणे) यांना विचारा.

Planet's Position at Birth Time Planet Sign Degree Lord Nakshatra Pad Lord S. Lord Position Asc Gemini 11 30 42 Mer Ardra 2 Rah Sat Sun Libra 15 09 12 Ven Swati 3 Rah Ket Deb Mon Libra 07 06 10 Ven Swati 1 Rah Rah Com Mar Sagittarius 13 41 16 Jup P.Asadha 1 Ven Ven Mer(R) Libra 15 04 07 Ven Swati 3 Rah Ket Com Jup Leo 08 37 17 Sun Magha 3 Ket Jup Ven Leo 28 47 30 Sun U.Phalguni 1 Sun Mar Sat(R) Pisces 13 27 20 Jup U.Bhadrapada 4 Sat Rah Rah(R) Aries 04 32 51 Mar Ashwini 2 Ket Mon Ket(R) Libra 04 32 51 Ven Chitra 4 Mar Ven Ura Virgo 04 02 31 Mer U.Phalguni 3 Sun Sat Nep Scorpio 00 06 36 Mar Vishakha 4 Jup Mon Plu Leo 28 40 01 Sun U.Phalguni 1 Sun Mar

ज्ञानव , १)मृत्युचे कारण पोटाचे आजार अथवा उंचावरून पडणे . २)कुंडली मोक्ष दाखवत नाही . ३)जातकाची स्वत:चीच इच्छा बाकी आहे काही परोपकार करण्याची .

In reply to by कंजूस

वरील माहिती वरून मृत्यूची दिनांक, वेळ, स्थळ, प्रकार (नैसर्गिक, अपघात, आत्महत्या वगैरे )कुणी सांगू शकेल का? मी ह्यात जास्त इंटरेस्टेड आहे. तसेच पुनर्जन्माचे आणि मृत्यू कुंडलीचे काही नाते आहे का ? म्हणजे जर जन्म कुंडली पाहून मृत्यू सांगतात तर मृत्यू कुंडली पाहून पुनर्जन्म (केव्हा, कुठे )असे काही सांगता येते का? जर येते तर कसे ? काय तर्क आहेत त्यामागे ?

वरील माहिती वरून मृत्यूची दिनांक, वेळ, स्थळ, प्रकार (नैसर्गिक, अपघात, आत्महत्या वगैरे )कुणी सांगू शकेल का? मी ह्यात जास्त इंटरेस्टेड आहे. तसेच पुनर्जन्माचे आणि मृत्यू कुंडलीचे काही नाते आहे का ? म्हणजे जर जन्म कुंडली पाहून मृत्यू सांगतात तर मृत्यू कुंडली पाहून पुनर्जन्म (केव्हा, कुठे )असे काही सांगता येते का? जर येते तर कसे ? काय तर्क आहेत त्यामागे ?

In reply to by ज्ञानव

हा प्रकार मी प्रथमच ऐकत आहे. जन्मकुंडलि माहीत आहे. त्यावरून पुन्हा पुनर्जन्म कुंडली मांडने सारखे कोम्प्लिकेषन फक्त नाडी ग्रन्थच सोडवतात. ओक साहेबांना बोलवा

पुनर्जनमाचे भाकिताबद्दल काय आधार आहे त्याची कल्पना नाही . शिवाय याचा पडताळा कसा घेणार ? खरोखरच याचाच अमूक ठिकाणी जन्म झाला हे कसे ठरणार ?

In reply to by कंजूस

मागील जन्मीचे संचित सांगणारे मी पहिले आहेत त्यामुळे पुनर्जन्म ते मानतात प्रश्न असा आहे कि मृत्यूची वेळ कळल्यावर पुनर्जन्म किती वर्षाने होईल हे कुणी सांगू शकते का? मुळ धाग्यात दिलेल्या जन्म वेळेनुसार मृत्यू कधी कुठे कसा होईल हे तुम्ही सांगू शकता का ? असे मी म्हंटले आहे. परंतु दुर्दैवाने कुणीही मूळ प्रश्न काय हेच पाहत नाही आहे.

मृत्यू झाला असायची शक्यता दाट आहे. तुला राशीची साडेसाती चालू आहे. अपघाताची शक्यता सर्वात जास्त. फेब. १३ ते सप्टे. १३ च्या मध्ये अपघात झाला का ? आणि गुडघ्याला मार लागला असायची शक्यता आहे. बायको मीन राशीची आहे का? लग्न, शिक्षण आणी मुले यात अडथळे होते का? या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास कुंडली बरोबर आहे हे सिद्ध होईल आणि नीट सांगता येईल.

In reply to by पुतळाचैतन्याचा

@ पुतालाचैतान्या जी १) बायको किंवा नवरा मीन नाही. २) अपघात झालेला नाही. ३)लग्न शिक्षण मुले सामान्य काहीही प्रोब्लेम नाही @सर्वांसाठी कृपया धागा नीट वाचवा हि विनंती आहे.

In reply to by ज्ञानव

तुमचे लोकेशन दहिसर , मुंबई असे गृहित धरुन आणि धाग्याची जन्मवेळ 28/11/2013 - 10:12 धरुन कुंडली मांडली असता हा धागा बरेचसे लोक फाट्यावर मारतील व आपल्या धाग्यात विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळणार नाही असे स्पष्ट दिसत आहे :D

जन्म पत्रिकेवरून अचूक मृत्यू तारीख आणि कारण कोणी सांगितल्याचे माझ्या आयुष्यात मी पाहिलेले नाही. खुद्द ज्याचा मृत्यू होतो त्याला मृत्यूपूर्वी कांही काळ तशी भावना (आपला मृत्यू समिप आल्याची) निर्माण होण्याची शक्यताही असू शकते आणि तशा कथा ही ऐकलेल्या आहेत. कांही अंशी अशा गोष्टीचा जवळून अनुभवही घेतला आहे. पण म्हणतात नं, ' आप मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.' त्यामुळे मला स्वतःला तसा अनुभव आला (आणि हातात वेळ असेल ...) तर मी नक्कीच मिपावर तसा तपशिल डकवून नंतरच प्राण सोडेन. मला वाटतं माझ्या कुटुंबियांप्रती असणारी माझी सर्व कर्तव्य पार पडल्यावर मी केंव्हाही मरायला तयार असेन. मृत्यूची वेळ कशाला जाणून घ्यायची. कांही कारणाने मृत्यू समिप आहे अशी परिस्थिती निर्माण झाली (जसे, कॅन्सर, एडस वगैरे) तर कुटुंबियांप्रती आपली कर्तव्यपूर्तीसाठी हाती असणारा वेळ जाणणे एव्हढेच त्याला महत्व आहे. अन्यथा, मृत्यू कधी आहे हे शोधून काढण्याच्या भानगडीत पडू नये. माझ्या एका मित्राच्या आजाराचे कॅन्सर असे निदान झाले. त्याचा पहिला प्रश्न डॉक्टरांना होता, 'डॉक्टर, माझ्या हाती किती वेळ आहे?, पाच वर्षे?' डॉक्टर म्हणाले,' नक्कीच जास्त वेळ आहे, काळजी करू नका.' त्यावर 'किती काळ हाती आहे हे का जाणून घ्यायचे आहे (जसे, कुटुंबाची काळजी. एकुलता एक मुलगा लहान होता) हे डॉक्टरांना सांगून पुन्हा विचारणा केली असता विचार करून डॉक्टर म्हणाले, 'कॅन्सरच्या वाढण्याचा आत्तापर्यंतचा अल्प वेग पाहता, अजून १५ वर्षे आहेत असे मी म्हणू शकतो. पण मी ब्रह्मदेव नाही. कमी जास्तही असू शकेल.' असो. त्या नंतर त्या मित्राने आयुष्यात प्लॅन केलेल्या गोष्टी तातडीने पूर्ण करायला घेतल्या. मस्कत सोडून कॅनडात स्थायिक झाला. मुलाचे शिक्षण पूर्ण होवून मुलाला कॅनडात नोकरी लागली. त्याचे (जरा लवकरच) लग्न लावून दिले, नातवालाही खेळवले. शेवटी जेंव्हा ६ महिने राहिले. तेंव्हा त्याने स्वतःच्या दहनविधीची वगैरे सोय कॅनडातील एका संस्थेत करुन, सर्व मित्रांना, परिचितांना 'शेवटचा' ईमेल पाठवून कळत/नकळत झालेल्या चुकांबद्दल माफी मागून, शेवटचा श्वास घेतला. पुनर्जन्माबद्दल म्हणता येईल की 'आप मरे तो दुनिया डुब गयी।' तेंव्हा चिंता कशाकरिता? समजा, पुनर्जन्म आहे, अमूक एक दिवशी आहे हे समजले तरी त्या व्यक्तीला मागचा जन्म आठवणार आहे का? मग त्या व्यक्तीच्या पुनर्जन्माबद्दलचे आपले एकतर्फी द्यान काय कामाचे? उत्तरे मिळाली तरी त्याच्या सत्यतेची हमी कोण देणार (त्या ज्योतिषाव्यतिरिक्त)? ह्या माहितीचा माझ्या आजच्या आयुष्यात (वर लिहीलेला मर्यादित उपयोग सोडून) उपयोग काय? केवळ कुतुहलापोटी त्यावर विचार-चर्चा करण्यात वेळ घालविण्यापेक्षा आहे त्याच आयुष्याचे सोने करण्यासाठी काय करता येईल ह्यावर विचार आणि कृती करण्यासाठी वेळेचा वापर करणे जास्त सयुक्तिक होईल असे वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

वा क्या बात है! अगदी उत्तम प्रतिसाद! एक प्रश्न विचारावासा वाटतो. तुमच्या मित्राचे व्यक्तिमत्व सश्रद्धतेकडे झुकणारे होते कि अश्रद्धते कडे? साधारण पणे कल कळतो. ...अतिरेकी अश्रद्ध अश्रद्ध......०........>>सश्रद्ध>>अतिरेकी सश्रद्ध>>...

In reply to by प्रकाश घाटपांडे

तुमच्या मित्राचे व्यक्तिमत्व सश्रद्धतेकडे झुकणारे होते कि अश्रद्धते कडे? साधारण पणे कल कळतो.
प्रश्न नीट कळला नाही. आपल्या अगदी जवळच्या मित्राची अशी ईमेल आली की तो सश्रद्ध आहे की अश्रद्ध ह्यावर विचार करता येतच नाही. डोळे पाण्याने आणि मन त्याच्या सोबत व्यतित केलेल्या क्षणांच्या आठवणीत बुडून जाते. मेंदूची कवाडे बंद होतात. एक बधिरावस्था येते. असो. कोणालाही असा अनुभव येऊ नये, एवढीच इच्छा. तसेही, मृत्यू समिप आल्यावर सश्रद्ध आणि अश्रद्ध शब्दांना किती महत्व उरते?

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रश्नाचा उद्देश असा की तुमच्या विचारांचा भावनांचा तुमच्या निर्णयप्रक्रियेवर परिणाम होत असतो. एखाद्या कठीण प्रसंगात तो जे वागतो त्याचा त्याच्या व्यक्तिमत्वाशी संबंध असतो. एखाद्या प्रसंगा मुळे/ परिस्थितीमुळे त्याच्या व्यक्तिमत्वात बदल होउ शकतो. श्रद्धा ही शॉक अबसॉर्बर सारखी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर काम करते. माणूस बदलत असतो. एक उत्सुकता म्हणुन मी विचारले.
तसेही, मृत्यू समिप आल्यावर सश्रद्ध आणि अश्रद्ध शब्दांना किती महत्व उरते?
खर आहे व मान्यही आहे. पण एक गोष्ट आठवली. बी प्रेमानंद अखेर च्या दिवसात जेव्हा मृत्युशय्येवर होते त्यावेळी काही लोकांना ते अस्तिक झाल्याचे वाटले. ही अफवा असल्याचे रॅशनॅलिस्ट लोकांनी नंतर सांगितले. त्यांच्याकडून आपण अजूनही देवावर विश्वास ठेवत्॑ नसल्याचे लिहून घेतले.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विचारांचा, भावनांचा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या भौतिक यशापयशाचा परिणाम तुमच्या निर्णय प्रक्रियेवर पडत असतो...कदाचित असे असेल हे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

... महाराष्ट्रातील पुरोगाम्यांचे प्रेरक, बी प्रेमानंदांची अशी अवस्था व्हावी...? ...जी विचाधारा आयुष्यभर उराशी बाळगली, त्याच्या विपरीत अंतिम समयी प्रत्ययाला आले? शेवटच्या क्षणी एखाद्याची मृत्युपत्रावर बळजबरीने स्वाक्षरी करवतात वा मिळवतात तशी अनुयायांच्या प्रेमाखातर त्यांच्यावर वेळ यावी ! हे अतीच झाले. ... अशी बळजोरा-जोरी करावी लागली म्हणून त्यांचे मतपरिवर्तन झाले असावे, हे इतरांचे म्हणणे खरे वाटू लागते. हा परिणाम तर उलटा झाला. आता पकाकाका तुम्हीच म्हणता म्हणून ... तुम्ही म्हणतात ते खोटे असेल असे म्हणायची इथे वावरणाऱ्या पुरोगाम्यांची कोणाची टाप नाही... तरीही हार्ड कोअर रॅशनॅलिस्ट असे झालेच नाही, असूच शकत नाही असे दावे करून आपल्याला बदनाम न करोत म्हणजे मिळवली.

In reply to by शशिकांत ओक

विविध प्रकरणांमुळे शरपंजरी, घायाळ पडलेल्या महाराष्ट्र शासनाला ते सत्तेवरून जाण्याआधी जादूटोणा बिलावर सही करायला भाग पाडणारे प्रयत्न पाहून मराठी जनतेला तसे वाटले तर नवल नाही..

In reply to by प्रभाकर पेठकर

तसा प्रश्न सोपा आहे पेठकर काका. साधारणपणे अश्रद्ध लोकांची अशी श्रद्धा असते की अश्रद्ध लोक मानसिकरीत्या कणखर असतात कारण ते त्यांच्या अडचणींचे निवारण होण्यासाठी देवावर अवलंबुन नसतात तर स्वतःच्या अडचणी स्वतःच सोडवतात. या केसमध्ये तुमचा मित्र अश्रद्ध असेल तर या अनुमानाला पुष्टी मिळेल कारण तो मित्र खुपच धीरोदात्तपणे मृत्युला सामोरा गेला.

In reply to by मृत्युन्जय

आपल्या अगदी जवळच्या मित्राची अशी ईमेल आली की तो सश्रद्ध आहे की अश्रद्ध ह्यावर विचार करता येतच नाही. डोळे पाण्याने आणि मन त्याच्या सोबत व्यतित केलेल्या क्षणांच्या आठवणीत बुडून जाते. मेंदूची कवाडे बंद होतात. एक बधिरावस्था येते.
माझ्या प्रतिसादातील वरील विधाने ह्याच मुद्द्यावर प्रकाश टाकणारी आहेत. थोडक्यात तो अश्रद्ध की सश्रद्ध हा विचारच माझ्या मनाला कधी शिवला नाही.
साधारणपणे अश्रद्ध लोकांची अशी श्रद्धा असते की अश्रद्ध लोक मानसिकरीत्या कणखर असतात कारण ते त्यांच्या अडचणींचे निवारण होण्यासाठी देवावर अवलंबुन नसतात तर स्वतःच्या अडचणी स्वतःच सोडवतात.
मानसिकरित्या कणखर असतात असा अश्रद्धांचा समज असतो वगैरे तुम्ही म्हणताय तसे असेलही, मी नाकारात नाही. पण मला वाटतं अश्रद्ध व्यक्ती नुसत्या श्रद्धेपोटी एखादी गोष्ट मान्य करण्याऐवजी तर्काच्या कसोटीवर उतरणार्‍या गोष्टींना जास्त मानतात. शिवाय सश्रद्ध आणि अश्रद्ध ह्या दोन टोकांच्या अवस्थांमध्ये मनाचे अनेक रंग असतात. जसं माझं स्वतःचं आहे. मी पूर्ण सश्रद्धही नाही आणि पूर्ण अश्रद्धही नाही. ईश्र्वरावर श्रद्धा असावी. ती मनोबळ वाढविणारी असते. पण एखाद्या समस्येत ईश्वर सर्वकांही ठिक करेल असे म्हणून हातावर हात ठेवून बसणे मला पटत नाही पराकोटीचे प्रयत्न करीत राहणे मला योग्य वाटते. 'प्रयत्नांती परमेश्वर' ह्याचा अर्थ पराकोटीचे प्रयत्न करीत राहा आणि शेवटी परमेश्वर यश देईलच हा विश्वास बाळगा, हा आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यावर मिपावर आधीच बरेच चर्वितचरण झालेले आहे तेंव्हा इथेच आटोपतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

मला वाटतं माझ्या कुटुंबियांप्रती असणारी माझी सर्व कर्तव्य पार पडल्यावर मी केंव्हाही मरायला तयार असेन
माथा प्रंपंचाचे ओझे | घेवुन म्हणे माझे माझे | बुडताही न सोडे फुजे | अभिमाने || कैची माता कैचा पिता | कैची बहीण कैचा भ्राता | कैची मित्र पुत्र वनिता | कळत्रादिक || हे तो सारी मायेची | अवघी सोयरीक सुखाची | हे तुझे सुख दु:खाची| सांगाती नव्हेती | येच क्षणी मरोनि जासी | तरी रघुनाथी अंतरलासी | माझे माझे ,म्हणतोसी | म्हणोनिया || . . . . . येवं इतुका वेढा लावली | ते मायाचि खेळे येकली | ते मायेनेच वारली | पाहिजे माया || असो. अवांतरा बद्दल क्षमस्व . पुनःस्मरण करुन दिल्याबद्दल धन्यवाद :)

In reply to by प्रसाद गोडबोले

हे 'आत' पक्कं हवं दादा! दाखवण्यासाठीची ही गोष्ट नव्हे. समोरच्या माणसात रघुनाथ नाही का काय? समोर माणूस असला की माणसातल्या रघुनाथाला नि समोर माणूस नसला की आपल्यातल्या आत्मारामाला भजा. काम होतंय. :) अवांतराबद्दल मी सुद्धा क्षमस्व .

In reply to by प्रसाद गोडबोले

माथा प्रंपंचाचे ओझे | घेवुन म्हणे माझे माझे | बुडताही न सोडे फुजे | अभिमाने || कैची माता कैचा पिता | कैची बहीण कैचा भ्राता | कैची मित्र पुत्र वनिता | कळत्रादिक || हे तो सारी मायेची | अवघी सोयरीक सुखाची | हे तुझे सुख दु:खाची| सांगाती नव्हेती | येच क्षणी मरोनि जासी | तरी रघुनाथी अंतरलासी | माझे माझे ,म्हणतोसी | म्हणोनिया || . . . . . येवं इतुका वेढा लावली | ते मायाचि खेळे येकली | ते मायेनेच वारली | पाहिजे माया ||
मी सर्वसामान्य माणूस असल्याकारणाने 'मोह-माये'पासून अलिप्त नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मी सर्वसामान्य माणूस असल्याकारणाने 'मोह-माये'पासून अलिप्त नाही
यावर श्री पेठकर काकांना लिहावी अशी माझी समज नाही पण मला जे समजले ते मांडायचा प्रयन करतो. मोह - माये पासून अलिप्त व्हावे हे अपेक्षित नाहीच . त्याचा विवेकाने उपभोग घ्यायलाच हवा. धन्यो गॄहस्थाश्रम असेच म्हटले आहे. मोह- मायेत ( शारिरिक उपभोग या अर्थाने आणि संसारात गुंतणे असे.. ) वाईट काहीच नाही. लग्न करणे , वंश वाढवणे , संगोपन करणे यात चुकीचे काहीच नाही . फक्त त्यात अडकून पडणे आणि तेच सर्वस्व मानणे यात गडबड आहे. "जो त्रिविध तापे पोळला| तोच परमार्थांचा अधिकारी भला" असे समार्थांनी म्हटले आहे. ( त्रिविध ताप - अध्यात्मिक , अधिभौतिक आणि अधिदैविक- जगातील सारी दु: खे यात सामावली आहेत ) असे त्रिविध तापाने पोळणे संसारात पडल्यानेच होते ,नि: संगाला कशाला ताप होईल ? असा तापाने पोळून निवलेला च परमार्थाचा अधिकारी आहे. प्रशन असा आहे की माणसे पोळून निघतात पण निवतात का ? " निवणे" हा समर्थांचा आणखी एक शब्द- मनाच्या श्लोकात अनेकवेळा आला आहे. ---निवाला मनी लेंश नाही तमाचा ...||५०|| --- विदेहीपणे सर्व काया निवाली ...||२०१|| --- निवला हरु ते मुखी नाम घेता...||९४|| --सदा प्रेमळु भक्तिभावे निवाला||१०६|| असं "निवणं" जेव्हा होते तेव्हा कशाचेच काही वाटत नाही.. पण निवायलां नकार दिला आणि ।त्त धरुन बसलो की प्रश्न निर्माण होतात ! वरच्याच समासातील एक ओवी अशी आहे...( प्यारे यांचा प्रतिसाद) तुवां भोगिल्या पुनराव्रुत्ती | ऐसे मायबापे किती || स्त्री- पुत्र कन्यादिक| लक्षानुलक्ष || कर्मयोगे एके मिळाली| त्या तू आपली मानिली | कैसे रे पढतमूर्ख ! हे पहिल्यांदा वाचले तेव्हा अंतर्बाह्य हादरलो होतो !! कशाचा मोह अन कसली माया ?

In reply to by विटेकर

ह्याबाबत ओव्या आणखी आहेत त्या म्हणजे: प्रपंच मुळी नासका| विवेके करावा नेटका| नेटका करिता फिका| होत जातो|| आधी प्रपंच करावा नेटका| मग घ्यावे परमार्थ विवेका| येथे आळस करु नका| विवेकी हो|| अजून देखील आहेत. बघून सांगतो.

In reply to by विटेकर

मुळात ही प्रतिसाद चर्चा माझ्या ह्या वाक्यापासून सुरु झाली. >>मला वाटतं माझ्या कुटुंबियांप्रती असणारी माझी सर्व कर्तव्य पार पडल्यावर मी केंव्हाही मरायला तयार असेन. कर्तव्यांनाही मर्यादा आहेच. ती अमर्याद नाहीत. तेंव्हा त्यालाही पूर्णविराम आहेच. >>> फक्त त्यात अडकून पडणे आणि तेच सर्वस्व मानणे यात गडबड आहे. कर्तव्ये मर्यादीत आहेत आणि त्याला पूर्णविराम आहे म्हंटल्यावर त्यापासून स्वतःची सोडवणूक करणे मलाही अपेक्षित आहेच. फक्त ही कर्तव्ये पार पाडताना अध्यात्म्याच्या जास्त मागे लागून वैराग्य येऊ नये असे मला वाटते. अडकून पडणे, तेच सर्वस्व मानणे आणि मुलभूत कर्तव्ये पार पाडल्यावर स्वतःला मनाने ह्या संसारातुन मुक्त करणे ह्या तिन वेगवेगळ्या अवस्था आहेत. आपण कळत-नकळत कुठली स्विकाराता ह्यावर वरील विवेचन लागू व्हावे. मी सर्वज्ञ नाही, जे कांही ज्ञान इतरांकडून मिळेल ते मला हवेच असते पण जड अध्यात्मापासून मी दूर राहणेच पसंद करतो. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

फक्त ही कर्तव्ये पार पाडताना अध्यात्म्याच्या जास्त मागे लागून वैराग्य येऊ नये असे मला वाटते.
उलट कर्तव्ये पार पाडत असतानाच अध्यात्म हवे वैराग्य हवे ... ॐ ईशा वास्यमिदँ सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्। तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्यस्विद्धनम्॥१॥ कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः। एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे॥२॥

In reply to by प्रसाद गोडबोले

असच म्हणेन ! निर्लेप जगता आले तर त्यासारखी मजा नाही. ( लोक असे जगू शकतात , आजूबाजूला नजर टाकली तर सहज लक्षात येईल, फक्त तो निर्लेपपणा अगतिकतेतून यायला नको , स्वयं स्वीकृतीतून हवा.)त्याऐवजी दु: खे कुरवाळण्याचे व्यसन आपण लाऊन घेतो.दु:ख नको म्हणताना , दु:खालाच कवेत घेतो. पेठकर काका , तुम्हाला विओध करायचा म्हनून नव्हे पण अध्यात्म जड वगैरे काही नसतं , सोप्पच तर असते. चतुर लोकांनी स्वार्थासाठी त्याचा बागूलबुवा केला आहे. मतिमंद ते साधना योग्य होती !

In reply to by प्रसाद गोडबोले

उलट कर्तव्ये पार पाडत असतानाच अध्यात्म हवे वैराग्य हवे ...
पटलं नाही. संसारात असताना येणारे वैराग्य जीवनसाथीवर अन्यायकारक असते. संसाराची आणि वैराग्याची प्रत्येकाची व्याख्या प्रकृतीनुरूप बदलत जाते. संसारात असताना सर्व गोष्टींचा समरसून आस्वाद घ्यावा. वानप्रस्थाश्रमात संसारात राहून मोहमायेतून मन काढून घ्यावे आणि संन्यासाश्रमात (जो संसारात राहून, इतर कुटुंबियांसमवेत) आजकालच्या जगात मला अवघड वाटतो आहे, सर्वसंग परित्यागाची अपेक्षा आहे. असो. त्यामुळे संसारात सर्व गोष्टींचा समरसून आस्वाद घेताना वैराग्य ह्या दोन टोकाच्या अवस्था संभवत नाहीत. हे, अर्थात, माझे मत आहे, आपले वेगळे असू शकते.

In reply to by प्रभाकर पेठकर

संसार स्वप्रयत्नानं आटोपता घ्यावा लागतो. तो तसा घेतला नाही तर माणूस संपला तरी संसार संपत नाही. २५ पर्यंत ब्रह्मचारी, ५०-५५ पर्यंत गृहस्थ, ५५- ७० वानप्रस्थ असं अपेक्षित आहे. तसं प्लॅन करणं आवश्यक आहे. आसक्ती/ भोगाची अथवा विरक्ती/ त्यागाची भावना ही आतमध्ये असावी लागते. दाखवण्यासाठी नाही. अगदी हिमालयात गेलात तरी खाणं, पिणं, झोपणं, नैसर्गिक विधी असतातच. प्राण्याचं भय असणारच, हल्ली सरकारचा परवाना देखील लागतो म्हणे काही ठि काणी. त्यामुळं बाहेर कुठं न जाता आहे तिथेच मनातल्या मनात कंपार्ट्मेंटस करावेत. एखादी गोष्ट जमत नाही म्हणून न करणे हा आणखी वेगळा विषय आहे. तिकडे नको शिरायला. पण संसार उत्तम सुरु आहे म्हणून सातत्यानं त्याचाच विचार करणं, अनावश्यक ढवळाढवळ करणं हा विषय कधीतरी बंद व्हायला हवा. कर्तव्ये करत असताना अपत्या विषयीची 'अनाठायी' काळजी निरुपयोगी असते. ह्याउप्पर ती आपल्या संभाव्य दुर्लक्षाला, स्वतःची पत कमी करण्याला कारणीभूत ठरणारी असते. इथे वैराग्य कामी येतं. थोडं स्वीच ऑफ स्वीच ऑन करता यायला हवं. समोर पती/पत्नी असताना तिच्यावर रसरसून प्रेम करणं ही गीतेमधली विभूती आहे. 'धर्माSविरुद्धो कामोSहं' (धर्माविरु द्ध नसलेला काम मी आहे. म्हणजे पतीपत्नी मधले संबंध. ) मुळात वैराग्याच्या कल्पना चुकीच्या आहेत. सचिन तेंडुलकर खूप विरागी माणूस आहे असं म्हटलं तर चालेल का? जीवनात करता येण्यासारख्या अनेक चैनीच्या गोष्टी न करता त्या वेळेत सराव करणं हे वैराग्यच आहे. तसं वैराग्य ध्येयपूर्तीसाठी आवश्यक आहे. मुलाविषयीचा अनाठायी विचार न करता आपलं काम करणं हे वैराग्यच आहे. ते तितपत योग्य नि आवश्यक आहे. असो. विषय भरकटतोय. थांबतो. मतं वेगळी असणार आहेत्च.

In reply to by प्रभाकर पेठकर

कर्तव्ये पार पाडताना अध्यात्म जमेल का? उदा: मुलगा शाळेत जाणार आहे. त्यासाठी सकाळपासून तयारी करुन डबा दिला. त्याच्या वयोगटानुसार त्याला तयारी करुन दिली. हे कर्तव्य. इथे ते संपतं. मुलगा शाळेत जाताना गरज नसताना त्याला शाळेपर्यंत सोडणं, त्याच्या इतर मित्रांच्या आईवडलां बद्दल गॉसिप कर, बाईच्या साड्या बघ हे न करता मुलगा शाळेत गेला आहे हे पाहून आपण आपल्या उद्योगाला लागून आपलं काम व्यवस्थित करणं हे अध्यात्माचंच अंग आहे. ह्यानं मन मोकळं राहतं. मुलगा शाळेत नीट पोचला असेल का? एखाद्याबरोबर मारामारीच करत असेल का? मग येताजाता आणखी काही होईल का? हे जे आत सुरु अस्तं ते टाळणं जमावं. व्याप सुरु राहून उपद्व्याप थांबले के बरंचसं काम भागतं. (अशानं मिपा बंद पडेल म्हणा ;) ) अध्यात्म म्हणजे फार वेगळं काही नाही.

एका प्रश्नाला आलेले प्रतिसाद म्हणजे कालीडोस्कॉपिक व्ह्यूज सारखे वाटतात. भविष्य ज्योतिष आणि त्या अनुषंगाने येणारे आस्तिक नास्तिक प्रतिसाद मी बर्याच वेळेला एन्जोय करतो. कारण ज्यांचा विश्वास आहे ते कसे बरोबर आहे ते सांगतात उदाहरणार्थ १)विश्वास नसणारी माणसे म्हणतात : पत्रिका पाहून माणूस जिवंत आहे कि मेलेला हे तुम्ही सांगू शकता का ? विश्वास असणारी माणसे म्हणतात : नुसता एक्सरे पाहून पेशंट जिवंत आहे कि नाही ते डॉक्टर सांगू शकतात का? पण इथे घाटपांडे साहेबांचे म्हणणे मला पटते कारण जोपर्यंत एखाद्या माणसाला ह्या जगातल्या त्याच्या सुक्ष्मेतेची आणि त्याहूनही एकटेपणाची तीव्र जाणीव(ज्योतिषी म्हणतील आहो म्हणजे शनी आलाच इथे, माझ्यासारखा माणूस म्हणेल नाही हो हि कर्म आहेत त्याची.....इथून नवीन वाद सुरु होतो) एखादी परिस्थिती करून देत नाही जी फक्त स्मशानातच होते (पण दुर्दैवाने तिथेही लोक लग्नाला भेटल्यावर जश्या गप्पा मारतात तसे गप्पा मारत उभे असतात. तो तिथे जाळण्याच्या तयारीत असतो.) तोपर्यंत वाद घालणे उत्तम. पण माणूस हॉस्पिटलमध्ये मेला कि डॉक्टर चुकले असे म्हंटले जाते संपूर्ण मेडिकल नाही.मग ज्योतिष किंवा भाकीत चुकले असे म्हंटले जाते ज्योतिषी नाही असे का असे प्रश्न मला पडतात. माझी जात कुळी घाटपांडे साहेबांच्या चिकित्सा मंडळाची आहे. मी खूप चिकित्सक आहे. पण त्यासाठी मी बर्याच ज्योतिषांना भेटतो प्रश्न विचारतो. त्यावरून त्या माणसाबद्दल कळते कि किती खोलात आहेत महाशय कारण तर्क मांडतांना ते गडबडतात असा माझा अनुभव आहे. विज्ञानाला पर्याय नाही हे माझे ठाम मत आहे. खास घाटपांडे साहेबांसाठी इथे एक किस्सा देतो. कोकणात कसाल म्हणून एक गाव आहे तिथे परुळेकर नावाचे महाराज आहेत(कदाचित तुम्ही भेटलाही असाल आता पर्यंत) ते पत्रिका, हात काहीच पाहत नाहीत कारण ते जन्मांध आहेत. मी २-३ वेळा त्यांना भेटलो आहे. माझ्याबरोबर असलेल्या माणसांच्या आयुष्यातल्या घटना त्या माणसांने तंतोतंत सांगितल्या त्यांनी बरेच काही माझ्याबाबतीत जे माझ्या स्वभावामुळे मी कुणाशीही शेअर करत नाही असे प्रसंग सांगितले. उदाहरणार्थ माझी धाकटी बहिण तिच्या वयाच्या ३-४ महिन्यात गेली (त्यांनी कुणी लहान मुल दगावलंय का तुमच्या घरात असे विचारले नाही धाकटी बहिण असा उल्लेख केला) हि गोष्ट खुद्द माझ्या बरोबर असलेल्या बायकोलाहि तेव्हाच कळली.....हे प्रसंग माझ्या आयुष्यात दोन -तीन वेळा आले. इथे माझ्यासारखा पामर हतबल होतो कि हे ह्यंना कसे कळले ? ह्याचे मागील विज्ञान काय ते मला शोधता येत नाही. मी वर उल्लेख केला आहे तरी पुन्हा पुन्हा लिहीन कि माझा ज्योतिष किंवा ज्योतिषी किंवा ज्योतिष मानणारे आणि ना मानणारे ह्यांच्या बद्दल काहीच वाद नाही ज्याला त्याला आपले मत आहे. प्रतिसाद देताना सर्व वाचून समजून प्रतिसाद यायला हवे होते पण सर्व सभासद ज्योतिष थोतांड आहे हेच म्हणत राहिले बाकी कुतूहल हे विकासाचे मूळ आहे तो भौतिक विकास असेल किंवा वैचारिक आणि कर्तव्य ती कुणाला चुकली आहेत? असो वरील पत्रिकेची वेळ खुद्द माझीच आहे. मी अजून "जिवंत" आहे. मी अजिबात तापट नाही उलट शांत आणि मनात दाबून ठेवणारा आहे. (लग्नी मिथुन आणि लग्नेश बुध सप्तमात म्हणजे वायू तत्वाच्या तुळेला ह्याचा परिणाम माझ्या बुद्धीवर जास्त आहे. त्यात बुधाच्या व्ययात हर्शल आणि हर्षलाच्या व्ययात शुक्र - गुरु.....मान्यवरांना उमजेलच मला काय म्हणायचे आहे ते.) कुठलाही अपघात आजपर्यंत मला किंवा माझ्यामुळे झाला नाही. मृत्यू मी बरेच जवळून पहिले आहेत त्यातही वडलांचा मृत्यू माझ्या मनाला प्रचंड वेदना देऊन गेला आजही ती वेदना तितकीच तीव्र आहे. आणि जन्म ते मृत्यू ह्या प्रवासात मृत्यूचे प्रचंड कुतूहल आहे.(का? ह्याचा एक वेगळा धागा होऊ शकेल) एखादे थोतांड आहे किंवा नाही हे सांगताना तत्वज्ञानाचा आधार घेतला जातो त्यापेक्षा विज्ञानाचाच दाखला किंवा आधार द्यावा असे वाटते. असो आपण सर्वांनी जे काही प्रतिसाद दिलेत त्याबद्दल धन्यवाद.