Skip to main content

सच्याचे शंभर.........

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 16/03/2012 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
आशिया चषकातंर्गत बांग्लादेशविरुद्ध सामन्यात सचिन तेंडुलकर ९७ धावांवर खेळतोय. सचिन महाशतक पूर्ण करेल, असे वाटते. १०० झाले तर धागा ठेवतो. नै तर... सचिन तेंडुलकरने आज वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट प्रेमींना महाशतकाची भेट दिली. अनेकांचा लाडका सच्या महाशतक कधी करतो इथपासून तर सच्यानं आता रिटायर व्हायला हवं अशी कुजबुज करणार्‍यांना आपल्या लौकिकाला (?) साजेशी खेळी करत गेल्या काही दिवसापासून फॉर्ममधे नसलेल्या सच्यानं आज जगभरातल्या क्रिकेट रसिकांना आज महाशतकी खेळी करुन एक आनंदाची मेजवानी दिली. सच्याचे मनःपूर्वक अभिनंदन. :) सच्याच्या महाशतकाची यादी [दुवा म.टा] आणि सच्याची क्रिकेट कारकिर्द [दुवा क्रि. इन्फो]
Sachin-Tendulkar
[छा. जालावरुन साभार]

वाचने 27338
प्रतिक्रिया 161

प्रतिक्रिया

In reply to by श्रीरंग

२८९ ही त्या मानाने चांगली धावसंख्या असूनही तुम्ही असं म्हणताय?
ज्या खेळपट्टीवर इतर सर्व फलंदाजांनी फटकेबाजी केली, तिथेच फक्त शतक पूर्ण करण्याच्या उद्देशाने अती सावध व संथ खेळणार्या सचिनला पाहून वाईट वाटलं.
सेहवागसारखे वाट्टेल तशी बॅट फिरवून ४० पर्यंत धावा काढून बाद झाला असता तर "हॅ, यंदाही हुकलंच शतक. रिटायर हो म्हणाव" अश्या कॉमेंट्स लोकांनी केल्याच असत्या. नर्व्हस नायन्टीजचे प्रेशर आधीच अनुभवले असल्याने त्या धावपट्ट्यात संथ खेळला तर तुम्ही म्हणणार की वैयक्तिक विक्रमांना प्राधान्य दिले. मग नक्की सचिनने काय करायला हवे होते? जरा सांगता काय??

In reply to by अन्या दातार

+++++++++११११११११११११११११११११ टू अन्या... हेच म्हणणार होतो... कालच त्याची आयबिएन..लोकमत वर दाखवलेली मुलाखत या सर्व टिकाकारांना चोख उत्तर देणारी आहे... तेंडल्याची काही हृदयस्पर्शी वाक्य>>>>> @खुप लोकांना या गेमबद्दलचे काहि कळत नसताना,बोललेली मत पाहुन वाइट वाटतं... @माझं नव्व्याण्णवावं शतक होइपर्यंत शंभराव्याची चिंता कुणालाच नव्हती...पण ९९वं झाल्यावर जो तो...जिथे तिथे १०० कधी होणार अशी विचारणा करु लागला,ज्याचं माझ्यावर एक प्रकारचं नाहक प्रेशर आलं... मी फक्त भारतासाठीच खेळतो..(रेकॉर्ड्स होत जाणं..हा अनुषंगिक परिणाम..!) @(लोक काहिही म्हणोत)...मी देव नाही...मी सचिन तेंडुलकर आहे... कथित जिज्ञासुंनी अख्खी मुलाखत पहावी..अजुन २/३वेळातरी पुनःप्रक्षेपित होइल.. :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

आपलं काय मत आहे ते सांगा की, उगाच सच्या यवं बोलला आणि त्यवं बोलला. क्रिकेट न कळणार्‍यांचे मथळ्यांचे मथळे वाचतोय (आदरणीय श्री अण्णा हजारेंच्या मताबद्दल बोलायचं आहे. पण आत्ता नाही. ) सच्याची फलंदाजी कशी आहे. सगळेच सच्या माझा जवळचा कसा आहे, सच्या एक शेजारी म्हणून कसा आहे, सच्या आमचा गल्लीतला म्हणून कसा आहे, सच्या कसा साधा आहे. च्यायला, नुसती गर्दी झाली प्रतिक्रियांची. -दिलीप बिरुटे

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>मी फक्त भारतासाठीच खेळतो..(रेकॉर्ड्स होत जाणं..हा अनुषंगिक परिणाम..!) मग मोजकीच षटकं आणी खूप विकेट्स बाकी असताना पॉवरप्ले मधे अत्यंत सावध खेळून अनेक चेंडू निर्धाव का बरं घालवले असावेत त्याने?

In reply to by अन्या दातार

मी चाळिशीत फटकेबाजीचे प्रयत्न करून विकेट फेकण्याबद्दल म्हणत नाहिये. पण ८५ नंतर त्यानी जो रटाळपणा केला, त्याचा विपरीत परिणाम झालाच. गोलंदाजांनी पण माती खाल्ली हे कबूल आहेच. पण सचिनचा संथ खेळ पण पराभवास कारणीभूत ठरला. वनडे खेळणे स्वेच्छेनी थांबवले असूनही कसोटीत धावा होत नाहियेत म्हटल्यावर वनडे मधे प्रवेश करणे, त्यातही न जमल्यामुळे बांगलादेशविरुद्ध अतीसावध खेळणे, हे सर्व सचिनने शतकाच्या घेतलेल्या दडपणाचे द्योतक आहे. असो. शेवटी तोही "माणूस"च. त्यालाही "मोह" व्हायचाच.

In reply to by श्रीरंग

कालचा सामन्यात भारतीय संघाला धावसंखेचा डोंगर रचता आला नाही, त्याला संथ भारतीय फलंदाजी जवाबदार आहेच. बाकी, विक्रमादित्याची फलंदाजी लौकिकाला साजेशी नव्हती यात काही वाद नाही. काल ज्यांनी ज्यांनी सच्याची ब्याटींग पाहिली असेल त्यांनी जर काळजीपूर्वक धांवांचा रनरेट पाहिला तर शतकाच्या जवळ जाणा-या शेवटच्या पंचवीस धावांना लागणारा वेळ पाहिला तर सच्यालाही आता विश्वविक्रमासाठी लागणा-या शंभर धावा झाल्याच पाहिजे असे कालच्या खेळीवरुन तरी वाटत होते. खेळपट्टीवर चेंडु थांबून येत होता असे म्हटल्यामुळे १४७ चेंडुत झालेल्या ११४ धावांचं मोलही खूपच आहे, असे, नाविलाजाने म्हणावे लागते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जर शतक झाल नसत तर "बांगलादेशा विरुद्दही आता शतक काढता येत नाही होय, आता केनियाला बोलवा" अस म्हणायला सोकॉल्ड स्वघोशीत क्रिकेट जाणकार मागे हटके नसते. म्हणुन कदाचित त्यांच्या भल्यासाठीच तो हळु खेळला असणार यात तिळमात्र शंका नाही. ;)

In reply to by गणपा

बांगलादेशा विरुद्दही आता शतक काढता येत नाही होय, आता केनियाला बोलवा" अस म्हणायला सोकॉल्ड स्वघोशीत क्रिकेट जाणकार मागे हटके नसते. स्वघोषित क्रिकेट जाणकार तर नक्कीच असे म्हणाले असते, यात काही वाद नाही. कशाला ताकाला जाऊन भांडं लपवायचं. :) कालची विक्रमादित्याची फलंदाजी संघासाठीच होती असे ठासून सांगणा-यांची संख्या प्रचंड आहे. पण, कालची संथ फलंदाजी विक्रमासाठीच होती असेही काही म्हणणारे आहेतच. मतमतांतरे असणारच. व्हिवियन रिचर्डचे मत सचिनला खूप पटलंय. 'सचिनला वाटतंय तो पर्यंत खेळू द्या' अनेक भावनाकुळ क्रिकेटप्रेमींचाही कंठ अशा उद्गारांनी तर खूपच दाटून येत असेल. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'सचिनला वाटतंय तो पर्यंत खेळू द्या'
अलबत.. तुम्हा-माझ्यासारख्या सामान्य लोकांपेक्षा, त्याच या खेळातल ज्ञान निश्चितच जास्त आहे. मग त्याने कुठे थांबाव आणि कुठे नाही ते आपल्या वा त्या सोकॉलड क्रिकेट जाणकारांपेक्षा (कांबळी, साबा करीम, अंकोला ) त्याला जास्त चांगल कळत असेल नाही का? मला तर कधी कधी कपील आणि सौरवच ही नवल वाटत. स्वतःची इतक चांगली उदाहरणं समोर असताना फुकाचे वकिली सल्ले देत असतात. =))

In reply to by गणपा

क्रिकेट जगणारे आणि क्रिकेट तज्ञांच्या मताला तुमच्या आमच्या सारख्यांच्या मतापेक्षा अधिक किंमत आहे, यात काही वाद नाही. सचिन व्हि. रिचर्ड्सच्या मताचा त्याचमुळे आदर करतोय. ( असे सांगत सुटला) क्रिकेट जगणारे क्रिकेट पाहतात. क्रिकेटचे तज्ञ क्रिकेट पाहतात. क्रिकेट समालोचक क्रिकेट पाहतात आणि पोहचवतात त्याचबरोबर तुमच्या माझ्यासारखे हौशी लोकही क्रिकेट पाहतात. प्रत्येकाची आपली एक सच्याच्या खेळाकडे पाहण्याची दृष्टी आहे. आणि त्या आधारावर कोणी बोलत असेल तर फार महत्त्वाचे नसेलही परंतु प्रत्येकानं या निमित्तानं आपल एक मत व्यक्त केलं आहे, करताहेत. सचिनला झाल्या शतकामुळे आपल्या भाषेत मणामणाचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय त्याचा अर्थ असाही आहे की, सच्यालाही लोकभावना आणि काही तज्ञांची मतं कळताहेत. लोकांच्या प्रचंड अपेक्षा त्याच्याकडून असतात हेही त्याला ठाऊक आहे. आता या लोकभावना आणि तज्ञांची काय काय मत आहेत आणि त्याचे अर्थही काय आहेत हेही त्याला उत्तम कळतं. म्हणून तर त्याच्या भविष्यकाळाच्या खेळासाठी तो व्हि. रिचर्ड्सच्या मताचा दाखला देतो आणि माझ्यातला क्रिकेटचा फॉर्म अजूनही उत्तम आहे. आत्ता तर मी कुठे चांगला खेळतोय प्रत्येक वेळी लक असेलच असे नाही म्हणतो म्हणजे त्याच्या खेळातली भूक अजूनही खूप आहे ''मला अजून खेळवा'' असेच त्याला या महाशतकानिमित्तानं म्हणायचं आहे. आपण कितीही म्हटलं त्यानं खेळलं पाहिजे आणि कितीही म्हटलं की आता त्याने नव्यांना जागा करुन दिली पाहिजे. तसंही, आपल्या मताला कोणतीच किंमत नाही. आपल्या हातात फक्त पाहणे आणि सोसणेच आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण कितीही म्हटलं त्यानं खेळलं पाहिजे आणि कितीही म्हटलं की आता त्याने नव्यांना जागा करुन दिली पाहिजे. तसंही, आपल्या मताला कोणतीच किंमत नाही. आपल्या हातात फक्त पाहणे आणि सोसणेच आहे.
हांगाश्श्शी. आता कस एकदम प्वाइंटाच्या मुद्द्यावर आलात सर. ज्यांना पहायचय त्यांना पाहुद्या. ज्यांना ते सोसणे वाटते त्यांनी आपले डोळे कान बंद करुन घावे. काय म्हंता?

In reply to by गणपा

पाहणं आणि सोसणं हे सापेक्ष आहे. असो, आम्ही मात्र आपल्या सर्वांच्या वतीनं सच्याला मानाचा फेटा घातला आहे. आणि छायाचित्र आंतजालावरुन साभार असंही कोपर्‍यात लिहिलं आहे. थोडक्यात आपलं मत असं दिसतं- '' सचिन फक्त विक्रमासाठी खेळतो ' या टीकाकारांच्या टीप्पणीवर सचिन म्हणाला की, काही लोक असे आहेत ज्यांचा मी मान राखतो आणि काहींची भीड बाळगत नाही. ज्यांची मी भीड बाळगत नाही, त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. त्यांना जे बोलायचे ते बोलत राहू दे. माझे काम देशासाठी खेळणे आणि जिंकून देणे आहे.'' याला म्हणायचं पाहणं. :) आणि ''माझ्यासाठी नाही, तर देशासाठी खेळणे हे माझे लक्ष असून ते जोपर्यंत पूर्ण होते आहे तोपर्यंत मी खेळत राहीन'' याला म्हणायचं सोसणं. :) पळा आता...........!!! (बातमी सौजन्य मटा) -दिलीप बिरुटे

In reply to by गणपा

मला आठवतय, जर मी चुकत नसेल ती अहमदाबाद च्या मोटेरा वरची श्रीलंके विरुध्द ची टेस्ट होती व 434 व्या विकेट ची कपिल ला प्रतिक्शा होती व लंकेची एकच विकेट बाकी असतांना कुंबळे बिचारा दिड दोन हात बाहेर बॅालींग करत होता :-) न जानो चुकुन विकेट मिळालि तर, नंतर न्युझीलंड विरुध्द वगळल्या नंतर त्याने निव्रुत्ती स्विकारली,......त्याने सचिन ला निव्रुत्ती बद्दल काहि सांगावे? ये बात कुछ हजम नही हुवा पांजी

In reply to by जोशी 'ले'

खरंय. असाच प्रकार सचिनने देखील केला हे बघून आश्चर्य वाटलं. १०-१२ षटकं शिल्लक असताना अती सावध खेळून त्यानी संघाचा घात केला.

In reply to by श्रीरंग

पुढल्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणुन श्रीरंगरावांचे नाव सुचवू इच्छितो. :) दाखवा सगळ्या माजोरड्या म्हातार्‍यांना बाहेरचा रस्ता हो तुम्ही श्रीरंगराव. आपला फुल्ल सपोर्ट आहे तुम्हाला.

सचिन चे अभिनंदन ! [ शेवटी सचिनची (शतकांची) शंभरी भरली म्हणायची तर :) ] अवांतरः क्रिकेटच्या देवाचं अवतार कार्य आता संपलं असं म्हणता येईल का? क्रिकेटचा देव आता पुढील अवतारांना कार्य करण्यास संधि देईल का ? की परशूरामासारखं इतर अवतारांच्या मध्ये लुडबुड करणार?

In reply to by समंजस

क्रिकेटच्या देवाचा अवतार एवढ्यात संपणार नाही. सचिन म्हणतो की, निवृत्तीचा विचार करायला लावणारे स्वार्थी वृत्तीचे आहेत. (कोण स्वार्थी आहे, हे मला अजिबात कळलं नाही) काही कळलं का तुम्हाला ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाहि ब्वॉ. आपल्याला माहित नाही ते कोण आहेत आणि तसेही सचिन खुपच समंजस असल्यामुळे तो कोणाचंही नाव घेणार नाही :) त्यामुळे हे रहस्यच राहणार बहूतेक :) निवृत्ती केव्हा घ्यावी हे ठरवण्याचा अधिकार त्याला आहेच. फक्त एक भिती ही आहे की त्याचा रवि शास्त्रि होउ नये :) अवांतरः [ थोरा/मोठयांनी सांगितलंय की थोडक्यात जी गोडी असते ती जास्तीत नाही :) ]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निदान मी पेपरमधे वाचलेले आहे ते "खेळाच्या शिखरावर असताना निवृत्त होणे हे स्वार्थी आहे" असे म्हंटला आहे. ते चुकीचे नाही. हे द्रविडला उद्देशूनही नसावे. ते दोघेही अशा पद्धतीने एकमेकांना टोमणे मारायच्या पेक्षा बर्‍याच वरच्या लेव्हलचे आहेत. द्रविडने इंग्लंड दौर्‍याआधीच ठरवले होते की इंग्लंड दौर्‍यानंतर निवृत्त व्हायचे. पण तेथे त्याचा 'टच' परत आल्याने ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाण्याचे ठरवले. तेथे पुन्हा अपयशी ठरल्यावर आता अजून ताणण्यात अर्थ नाही असे त्याला वाटले असेल.

In reply to by यकु

मिपाचं एकवेळ ठिक आहे हो, सचिन सोडून इतरही धागे वगैरे येताहेत. सचिनच्या खेळाचा चाहता असूनही मिडियात, आणि एकूणच जनमानसात " महाशतक" हा एक एकच ज्वलंत राष्ट्रैय प्रश्न वगैरे जो बनला होता आणि जो मास हिसटेरिया झालाय त्याचे आश्चर्य वाटते.

In reply to by मन१

मन१ बरोबर सहमत. प्रा डॉ , तुमचा आयकर भरायला सचिन येणार आहे का? ;-)

In reply to by कुंदन

प्रा डॉ , तुमचा आयकर भरायला सचिन येणार आहे का? माझा आयकर मलाच भरावा लागणार आहे. पण, सचिननं ज्या फलंदाजीने ब्रह्मानंदी टाळी लागण्याचा जो आनंद दिला त्याची तुलना कोणत्या कराशी कधीच होणार नाही. ष्ट्रेट ड्राइव्ह मारल्यानंतर आपल्या चेह-यावर आनंदाची जी लहेर उमटायची ती शब्दात पकडता येणार नाही. सचिननं पॅडलस्वीप मारायचा पवित्रा घेतल्यावर अनेकदा मला धडकी भरली भरली आहे. काय करायचां हा जीवघेणा स्वीप, या पेक्षा कितीतरी फटके तुझ्या भात्यात आहे, असे मनोमन बोलून मी कितीतरी वेळा त्याच्याशी मनातल्या मनात संवाद साधला आहे. माझ्या जगण्यातल्या अनेक भल्या-बुर्‍या प्रसंगातून मला या फलंदाजीनं खूप निरपेक्ष आनंद दिला आहे. सच्याचं ग्राऊंडवर दिसणं हाही आनंदाचा क्षण असायचा. असतो. हा आता त्याचा परफॉर्मन्स पूर्वी सारखा नसला तरी 'लाईक' वर आम्ही रसिक क्लीक करतोच. असो... केवळ डॉलर आणि त्याच्या आजूबाजूलाच पाहणार्‍या आणि यंत्राप्रमाणे जगणा-या लोकांना आमच्या भाऊक लोकांच्या भावना काय समजायच्या. ;) -दिलीप बिरुटे

सचिनच शतक झालं की काहींजणांचा अपेंडिक्सचा त्रास बळावतो.... आणि तो सामना हरल्या शिवाय त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नाही. मग त्यासाठी बिचार्‍या देवांना पाण्यात बसुन रहावे लागते. :) तेव्हा तमाम सचिन द्वेष्ट्यांना सुदृढ आरोग्याच्या मनापासुन शुभेच्छा. आणि या नेक कामासाठी भारतीय संघाचे मनःपुर्वक आभार. :)

In reply to by गणपा

>>>>> सचिन द्वेष्ट्यांना सुदृढ आरोग्याच्या मनापासुन शुभेच्छा. सचिन द्वेष्टे वगैरे कोणी नाही, नसेलही. सचिनबद्दल जगभरातल्या क्रिकेट रसिकांच्या कौतुकाच्या बातम्या वाचल्यानंतर कोणाही भारतियांची छाती अभिमानाने भरुन येईल असा हा प्रसंग आहे. कोणा क्रिकेट रसिकांचं काहीही मतं असलं तरी सचिन द्वेष्टे कोणी असेल असे वाटत नाही. त्यामुळे 'अपेंडिक्सचा त्रास' 'सचिन द्वेष्टे' हे प्रतिसादातील शब्द काही पटले नाहीत. -दिलीप बिरुटे

सचिनच्या मुलाखतीत कुठेतरी वाचले की हॉटेलात आणी रूम सर्विस सगळे एकच विचारत होते की शतक कधी होणार हे वाचून मला आमचे जुने दिवस आठवले. आगाऊ पणा व भोसक पणा हे नखशिखांत आमच्या अंगात भरले असतात. मधमवर्गीय जीव नवीन नवीन ह्या पंचतारांकित दुनियेत खुळ्यागत वागतात. एकदा लक्ष्मी मित्तल ह्यांना तुम्ही देशाचे नाव मोठे केले मला तुमचा अभिमान वाटतो असे आमच्यापैकी एका दीड शहाण्याने मित्तल ह्यांना हॉटेलच्या भर लॉबी मध्ये म्हटले होते. आणि त्यांचा सारा कर्मचारी वर्ग क्षणभर पाहतच राहिले. नशीब त्यांच्या नोकरीवर गंडातर नाही आले. आज मला स्पायडर मेन सिनेमातील एक वाक्य प्रकर्षाने आठवले. "With great power comes great responsibility." This is my gift, my curse. Who am I सचिन

१०० बे शतक काय हो तो करणारच होता. त्याने नाही करायचे तर अजुन कोणी करायचे बाकी देवाचे काय अभिनंदन करायचे म्हणा.

आणि धाग्याची शंभरी होण्यासाठी बिरुटे सरांना शुभेच्छा!

कपिलदेव यानी सचिनने निव्रुत्त व्हावे असा सल्ला नुकताच दिला होता. कपिल यान्चिच एक प्रसिद्ध जाहिरात आहे- कपिलदा जवाब नही. त्याचे उत्तर सचिनने दिले आहे-- कपिलदा जवाब है !

सचिनने शतक केले म्हणून त्याचे अभिनंदन. मला क्रिकेटबद्दल फारसे काही माहीत नाही, म्हणून लेखात दिलेला दुवा बघितला आणि शोधताना रेकॉर्डचे स्थळ दिसले. त्यावरून मला पडलेले काही प्रश्न. कसोटी सामन्यात व वन-डे सामन्यात सर्वाधिक धावा म्हणून सचिन सर्वप्रथम स्थानावर आहे. तसेच सर्वाधिक शतके म्हणून सुध्दा सचिन पहिला आहे आणि त्याची कारकीर्द १९८९ पासून सुरू झाली असे दिसते. रिकी पोंटिंग व कालीस यांची ४१ व ४२ कसोटी शतके झाली आहेत आणि ते १९९५ पासून खेळत आहेत. मग ते सचिन इतके सरस नाहीत का? किंवा सचिनपेक्षा अजून ५-६ वर्षे खेळले तर त्याचे रेकॉर्ड ते मोडू शकणार नाहीत का? इतर अनेक कॅटेगरी मध्ये सचिन पहिल्या ३ खेळाडूंमध्ये नाही. उदा. एका इनिंगमध्ये सर्वाधिक धावा, सामन्यात सर्वाधिक धावा, सिरीजमध्ये सर्वाधिक धावा, एका षटकात सर्वाधिक धावा, एका दिवसात सर्वाधिक धावा, सर्वाधिक धावा सरासरी वगैरे. असे असताना सचिन म्हणजे क्रिकेटचा देव वगैरे इतका उदो उदो का होतो? त्याचे इतर काही विक्रम आहेत का जे तुटण्याची शक्यता नगण्य आहे? (ब्रायन लाराने केलेला ३७५ धावांचा विक्रम मोडला गेला, तर त्याने ४०० धावांचा विक्रम केला जो मोडणे कठीण आहे, असे मला वाटते. सचिनचे असे काही विक्रम आहेत का? ) मी विकिपिडीया बघीतला पण अशी काही माहिती मिळाली नाही. बहुतेक इतर विक्रम म्हणजे सर्वाधिक धावा/शतके यांचे sub-records आहेत असे वाटले. मी प्रामणिकपणे शंका विचारली आहे. सचिन काय फालतू खेळाडू आहे किंवा इतर किती भारी खेळाडू आहेत, असे म्हणण्याचा अजिबात प्रयत्न नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.

माझ्या आंतरजालावरील वावराला अनेक वर्ष झाली. किरकोळ लेखनाला किरकोळ प्रतिसादही तसे येतच असायचे. पण अशात मी जिथे गेलो तिथे माझे मित्र म्हणायचे शंभरी गाठणारा धागा कधी काढणार ? परंतु मी जे काही पाच पंचवीस प्रतिसाद मिळवणारे धागे यापूर्वी काढले त्याबद्दल कोणी कधी कौतुकानं बोलले नाही. प्रत्येकाला अशा शंभर प्रतिसादांचा मोह होता. आज यानिमित्तानं माझ्यावरील मणामणाचं दडपण कमी झालंय. माझ्याबद्दल कोण काय बोलतं त्याचा मी विचार करीत नाही. एका आंतरजालीय व्यक्तिमत्त्वानं म्हटलं होत़ं की, नेटाचं कनेक्शन एकदा डिसकनेक्ट झालं की आभासी जगतातून बाहेर पडायचं अशा विचारांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. असो, यापुढेही मिपासाठी मी अधिकाधिक मरमर करायचा प्रयत्न करीन. ;) असो, सच्याच्या कौतुकाच्या निमित्तानं सहभागी होऊन आपापली मतं टाकत धाग्याला शंभर प्रतिसादाच्या पुढे नेणार्‍या सर्व मिपाकरांचे आभार.......!!! :) -दिलीप बिरुटे

सगळ्या सचिन द्वेष्ट्यांसाठी नवीन प्वाईंट.. "आता तो १०० फिफ्टीज च्या मागे लागला आहे." म्हणून बहुदा ५२ / ५५ अशा रन काढतो आहे.. होवून जावूद्या यावरही काथ्याकूट... ;-)

In reply to by मोदक

फक्त एवढंच? नाही हो... एक दिवसीय सामन्यातील शतकांचे अर्धशतक, अर्धशतकांचे शतक, टी-२० तील एकेक अर्धशतक आणि शतक, कसोटीतील बळींचे अर्धशतक... किती तरी बाकी आहे. लेट हिम प्ले... :)

ह्या महाशतकानंतर दिलेल्या मुलाखतीत सचिन बराच सडेतोड बोलला.. त्यातला एक मुद्दा मला खरंच आवडला. सचिन म्हणाला, "तुम्ही चांगलं खेळत असतांनाच तुम्ही निवृत्त व्हावं, असं बरेचजण सांगतात. मला वाटतं, की देशासाठी चांगलं खेळत असतांना आणि खेळू शकत असतांना वैयक्तिक स्वार्था-समाधानासाठी निवृत्त होणं मला पटत नाही. आणि तसंही, मी कसा खेळू शकतो हे मला इतरांपेक्षा जास्त चांगल्याने कळतं.." तेव्हा सल्ले बंद व्हावेत, असं वाटतं.. मी स्वतः अख्ख्या आयुष्यात १० धवाही काढल्या नाहीत, उगाच कशाला सचिनला अक्कल शिकवावी मग, नाही का? ;-)

अश्विनसारखे गोलंदाजही सहज शतक करून जातात आणि सचिनसारखे महान खेळाडू कसेबसे १० धावा काढत बसतात तेव्हा निवृत्तीची योग्य वेळ केव्हाच टळून गेली आहे असे वाटते. आता उरलाय तो फक्त सोपस्कार.

In reply to by प्रचेतस

आता एकच म्याच सहन करायचा आहे आपल्याला सच्या.आणि सच्या पुराण कायमचं इतिहासात जमा होईल. आता काळ विराट, रोहित,यांचा सुरु होईल. बाप रे, काय काय सहन करावं लागतंय सच्याच्या निमित्तानं. काय ते लाड. सच्याच्या त्यागाने मुंबईला म्याच काय ? पॅव्हिलियनला सचिन रमेश तेंडुलकर नाव काय ? आणि अजून काय काय ! देवा ही टेष्ट लवकर जिंकून लवकर मुंबईची म्याच सुरु होऊन पाच पन्नास रन सच्याचे होऊ दे, वाटल्यास शेवटच्या म्याचला शतक होऊ दे... आणि आम्हा रसिकांना शांतपणे झोप घेऊ दे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किती ते कटाऔट्स, प्रत्येक तिकिटावर सच्याची छबी. भगवंता. सोडव रे आता.

In reply to by प्रचेतस

बिशनसिंग बेदीने विचारले ना, ही काय सचिन बेनिफिट सीरिज आहे का म्हणून!

In reply to by प्रचेतस

सहमत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजय जडेजासारखा महान (फिक्सर) खेळाडु समोरच्या संघाचा कप्तान होता तेव्हाच सचिनच्या अखेरच्या रणजीचा शेवट नाट्यमय होणार असे वाटत होते आणि तसा तो झालादेखिल..

In reply to by यशोधरा

आम्ही कसले फुसके तो तुमचा सच्या फुसका निघाला. काल आम्ही अंघोळ पांघोळ करुन सत्यसाईबाची प्रार्थना करुन आज सच्याचे शंभर होऊ दे म्हणून प्रार्थना केली पण तो सच्या फुसका निघाला दहा धावावर बाद झाला आत तो बादच नव्हता अशी वकिली सुरु झाली. क्रिकेटमधे काही फलंदाज असे बाद होतात पण चोवीस वर्ष खेळुनही ज्याच्या प्याडवर बॉल जातो याचा अर्थ त्याची बॉलवरची नजर कमी झाली, हे मान्य केलं पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सत्यसाईबाची प्रार्थना करुन आज सच्याचे शंभर होऊ दे म्हणून प्रार्थना केली >> तुमची प्रार्थना मनापासून नव्हती राव! नै तर असं व्हईलच कसं! =))

In reply to by यशोधरा

सच्यानं प्रार्थना मनापासून केली नै असं म्हणा. सच्याचा ब्याटीपेक्षा सत्यसाईबाबावर जास्त विश्वास आहे, असे मी म्हणनार नाही. सच्याचे गुरु सत्यसाईबाबा म्हणुन आम्ही रसिकांनी प्रार्थनेचा ट्राय मारुन पाहिला होता. आता सत्यसाईबाबाला आमची पार्थना नै पोहचली त्याला आम्ही करायचं. -दिलीप बिरुटे

In reply to by यशोधरा

च्यायला, गेला तुमच्या कटकटीने आमचार रोहीत शर्मा...१७७ व्वा. क्या ब्याटींग है. ऑफसाईडला बॉल चालला होता. पण दिला त्याला पायचित पण आम्ही अजिबात पंचाच्या नावानं रडणार नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

a

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सच्याला कारण नसताना शिव्या घालताय ती तुमची पापं भोवली त्या शर्माला. आता तरी सुधरा! :D

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सचिनला शिव्या घालुन झाल्या असतील तर एक विचारु का ? तुम्ही शेवट्ची बॅट कधी हातात घेतली होती ? का कधीच नाही ?

In reply to by बाबा पाटील

२०११ ला शेवटची फलंदाजी केली. पुढे नोकरी मुळे माझा नियमित सराव सुटला. & पाच पंचवीस प्रत्येक सामन्यागणिक धावा आणि ओफ़्स्पिनर गोलंदाज म्हणून गोलंदाजी आणि माझ्या तालुक्यात उत्तम क्रिकेटचा पंच असे नावही मिळवले आहे. आता आपण किती क्रिकेट खेळला ते सांगा ? दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोडक्यात तुमची चुकामुक झाली प्रा.डॉ... त्यांनी २०१२ ला सुरुब्वात केली दिसतेय.. :)