अर्धांग
नोकरीने शोषलेले,
प्रवासाने शिणलेले
ते आमचे अर्धांग,
न्याहाळत असतो मी,
पैलतीरावरुन !
अधुन मधुन ओळख दाखवतं,
सटीसहामाशी,
कधी वाट्याला येतं
चिपाड बनून!
तेंव्हा डोळ्यांखालच्या काजळीत
शोधू लागतो मी काजळमाया
आणि शुष्क ओठांतली
उरली सुरली थरथर
प्रयत्न करुन!
मग जाणवतात
यंत्रवत प्रतिसाद,थंड गात्रे
एक उरकून टाकण्याची भावना
बहुतकरुन!
वास्तव
तिमा!
संक्षी
आयला, मग तळटीप द्यायची ना
हॅहॅ
सुर्व्यांच्या कवितेची आठवण
कोणती कविता?
जनरल बाज संक्षी. तरी एक दोन
वाह
छान जमलं..
वाचनीय आणि अर्थपूर्ण.
वास्तव आहे, पण सध्या काळाची
हं!
हम्म
पैलतीर
टोकदार वास्तवाची धारदार जाणीव