काळाच्या घावाने
फरफटत जावे,
धडपडून उठावे
मन म्हणते आहे !!
ती सोनेरी क्षणे
जीवास ओलावे,
डोळ्यात गुंतावे
मन म्हणते आहे !!
जे राहिले चित्र कोरे
काही रंग भरावे,
कुंचल्यास उचलावे
मन म्हणते आहे !!
तुला शौक सुगंधाचा
विश्व गांधाळूनी यावे,
चंदनासावे झिजावे
मन म्हणते आहे !!
भ्रमराचे ओठ अन
कळीने खुलावे,
गीत होऊन जगावे
मन म्हणते आहे !!
रात्रीस धास्तावले ते
तुझ्या नजरेचे काजवे,
पहाट बनून जावे
मन म्हणते आहे !!
श्री. साजीद यासीन पठाण
दह्यारी जिल्हा - सांगली (महाराष्ट्र)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1874
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख
सुरेख
तु एकटाच दोनदा स्वागत करणार
In reply to सुरेख by अभ्या..
@ मग आम्ही काय करणार ?
In reply to तु एकटाच दोनदा स्वागत करणार by आनन्दिता
****
छान!
सुंदर..!
आशय गर्भ कविता.
जीवनात ही घडी अशीच राहू दे
धन्यवाद !