दाय विल बी डन!
जिझस
_____________________________
जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मनाच्या चकव्यातनं बाहेर पडायचा सर्वोत्तम मार्ग आहे. जे आहे ते स्वीकारलं की मनाला तक्रारीला जागाच उरत नाही. स्वीकृतीला मन राजी होत नाही. ती तुमची हार आहे असा बिनतोड युक्तिवाद करून ते उपलब्ध उपभोगू देत नाही.
लगाम मनाकडे असल्यानं आपण आहे ते नाकारतो (किंवा अत्यंत नाईलाजानं स्वीकारतो). त्यामुळे जे प्रत्यक्षात आहे ते व्यर्थ होतं आणि मनात आहे ते उपलब्धच नाही तर उपभोगणार कसं?
स्वच्छंद होणं म्हणजे समोर आहे ते बेशर्त मान्य करून आयदर त्याच्याशी डील करणं किंवा मग डायरेक्ट उपभोगायला लागणं.
________________________________________
बिफोर वी गो,
दुसर्या लेखात मी एक साधी गोष्ट सांगितली होती : 'बेशर्त स्वीकृती' हा मनाकडून सर्व सूत्र स्वत:कडे घेण्याचा सर्वात सोपा उपाय आहे.
याचं साधं कारण असं की मन तक्रारखोर आहे. त्याला जे मिळालंय ते नकोय आणि जे सध्या समोर नाही ते हवंय. लोकांना वाटतं स्वीकृती हार आहे, त्यानं महत्त्वाकांक्षेला शह बसेल. पण वस्तुस्थिती नेमकी विपरित आहे. जे आहे त्याचा स्वीकार आपल्याला वर्तमानात आणतो, समोर आहे त्याच्याशी आपण डील करतो आणि असलेल्याशी समर्थपणे डील करता आलं की आपला कॉन्फिडन्स वाढून प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होतात. मग बहुतेकदा आहे तेच उत्तम वाटतं आणि ते सर्वोत्तम करण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा मग आहे ते योग्यपद्धतीनं डील करून काही तरी नवं शोधतो.
आहे ते नाकारणं, त्याच्याशी वैर घेणं, आपल्याला द्विधा करतं. जे करतोय त्याच्याकडे दुर्लक्ष होतं कारण जे करायचंय ते मनात चालू असतं. मनातल्या गोष्टीशी डील करता येत नाही कारण ती प्रत्यक्षात नसते आणि समोर आहे त्यात आपल्याला रस नसतो कारण मन ते बदलायला सांगत असतं!
______________________________________
ओशोंनी मनाचा हा पैलू अत्यंत अनोख्या शब्दात मांडला आहे "मन का स्वभाव ही कुछ ऐसा है, उसे जो मिल गया वह व्यर्थ हो गया!" (आष्टावक्र महागीता)
अस्विकार हा मनाचा महत्तम पैलू आहे, मग सांप्रत गोष्ट काम असो की नातं. नवविवाहितांना माझं म्हणणं चटकन लक्षात येईल. शोधताना प्रत्येकानं बेस्ट पार्टनर चूज केलेला असतो (अर्थात, प्राप्त परिस्थितीत यथासांग विचार करून). पण काही दिवसात चॉइस चुकलाय असं वाटायला लागतं (मजा म्हणजे दोघांनाही!). आता नव्या पर्यायाचा शोध सुरू होतो (त्यात सुद्धा कोण आधी शोधतोय याची शर्यत!). मग वर लिहिलंय ती परिस्थिती उद्भवते "मनातल्या गोष्टीशी डील करता येत नाही कारण ती प्रत्यक्षात नसते आणि प्रत्यक्षात असलेल्यात आपल्याला रस नसतो कारण मन त्याच्याशी राजी नसतं!"
सगळ्या प्रकारात एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की लगाम मनाकडे आहे!
आपल्याला वाटतं पहिली निवड केली तेव्हा निर्णय आपला होता पण तसं असतं तर आपण आपल्याकडनं नातं सावरलं असतं. तिला काहीही वाटू दे, आपण तिला समजावून घेतलं असतं आणि समजावून सांगितलं असतं की सेपरेशन कशाला? आपण आपल्याकडून सर्व प्रयत्न केले असते. आपल्या सुखात तिचं सुख आहे आणि तिच्या सुखात आपलं आहे याची जाण ठेवून वागलो असतो. पण निर्णय मनाचा होता आणि मनाला रंग बदलायला किती वेळ लागतोय? जरा मनाविरुद्ध झालं की संपलं! नवा पर्याय शोधायला तयार. आणि मजा म्हणजे मनंच दुसरा पर्याय निवडणार आहे!
मन निर्णय तो काय घेणार? काय आहे त्याच्याकडे निर्णय घ्यायला? फक्त स्मृती (त्या देखील बहुतेक नकोशा वाटणार्या)! आणि त्यातून काय साधायचा प्रयत्न करेल ते? तर त्या स्मृती पुसून टाकू शकेल अशी कुणी तरी फॅंटास्टिक व्यक्ती! बरं समजा मिळाली अशी कोणी तर किती वेळ लागेल हा भ्रम निस्तरायला? फक्त तिनं मनाच्या कल्पनेपेक्षा जरासं वेगळं वागणं, दॅट्स ऑल! मग पुन्हा बदलाबदली सुरू!
थोडक्यात जोपर्यंत अस्विकार आहे तोपर्यंत लगाम मनाकडे आहे. 'दाय विल बी डन' म्हणजे आहे त्याची बेशर्त स्वीकृती. हा स्वीकार तुम्ही समजून उमजून केलेला आहे, नाईलाजानं नाही. ज्या क्षणी तुम्ही आहे ते स्वीकारता, त्या क्षणी लगाम तुमच्या हातात येतो. भ्रमराला रुणूझुण करायला संधीच राहत नाही.
______________________________
तुम्हाला वाटेल मी माझ्यामनाचे श्लोक लिहितोय, पण तुमचे प्रतिसाद मनाची नेमकी हीच अवस्था दाखवतात :
>केवळ अन केवळ ओब्लिगेशनच कामातलि मजा कमि करतं जात, म्हणूनच आवडत्या कंपनित लागलेल्या जॉबचा पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही.
= प्रत्येक दिवस नवा आहे पण मन स्मृतीतनं सक्रिय होतं आणि आपण त्याच्याशी अलाईन होतो. त्यात आपल्याला लहानपणापासून शिकवण आहे ‘नव्याचे नऊ दिवस’. मग आपल्याला वाटतं "पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही."
>ठिक आहे मग या प्रक्रियेचा सारांश काय ? तो हाच की ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं.
= आता ही मनाची शर्त पूर्ण करणं असंभव आहे कारण तुमच्या मर्जीवर कंपनी कशी चालणार? (आणि वैवाहिक नातं असेल तर विलफुल एंटर-एग्झिट अजूनच अवघड!). पण एक साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. प्रसंगाकडे स्मृतीतनं पाहिल्यामुळे त्यातलं नवेपण हरवतंय. प्रत्येक एंट्री फ्रेशच आहे आणि इग्झिटची गरज वाटतेय कारण आहे त्यात रस नाहीये!
>म्हणजे काय तर आपण एखाद्या कामात निपुण होत गेलो पण पुरेस चॅलेंज वाढत गेलं नाही तरी कामाचा कंटाळा येतो. ह्या उलट निपुणता निर्माण झालि नाही पण चॅलेंज वाढत गेलं तर कामाचे फ्रस्ट्रेशन येत. तेव्हां हि गोश्ट काम करताना फार व्यवस्थित सांभाळावी लागते. अन्यथा बट्याभोळ होतो.
= आहे त्यात रस नसेल तर कसे होणार तुम्ही निपुण? आणि आहे ते काम कौशल्यानं केल्यावर चॅलिंज निर्माण होतो. ते वन डे सारखं आहे, तुम्ही आल्याआल्या बाउंड्री किंवा सिक्स ठोकू शकत नाही आणि एकदा सेटल झाल्यावर आहे तोच गेम तुम्हाला नवे चॅलेंजिस देतो.
फ्रस्ट्रेशनच खरं कारण नैपुण्य नाही आणि नैपुण्य नाही कारण आहे त्याकडे दुर्लक्ष, अशा चक्रात व्यक्ती सापडते. मग मन सांगता कंटाळा आला, घ्या आता नवा जॉब (वैवाहिक नात्यात तर आणखीच मजा, बदला पार्टनर! (किंवा बघा पर्यायी व्यवस्था!)
__________________________________
मन शब्दांशी कसा खेळ करतं हे पाहण्यासारखं आहे :
माझा मुद्दा साधा आहे :
बेशर्त स्वीकारात भ्रम कुठे आहे? प्राप्त परिस्थिती स्वीकारण्याचा निर्णय तुम्ही घेतला, पुन्हा त्यावर वैचारिक उहापोह नाही असं मनाला बजावलं. आपण कामाला लागलो, विषय संपला!
>शब्द...शब्द..शब्द...शब्द..इथे कांहीच समजत नाही, कांहीच सिद्ध होत नाही.
= त्या प्रतिसादात शब्दांचीमाळ विंडोबाहेर गेलीये! स्वीकारा किंवा स्वीकारू नका निर्णय तुमचा आहे. सगळं लेखन साध्या मराठीत आहे, त्यात न समजण्यासारखं काय आहे?
उत्तम संदर्भ मन किती चुकीच्या पद्धतीनं देतं याचं उदाहरण :
>गुरुदेव म्हणाले:
हू आर यू?
यू आर आय इन द यू इन द आय इन द यू? ( संदर्भ : असा मी असामी )
= प्रश्न 'हू आर यू'? नाहीये. 'आर यू गोइंग टू अॅक्सेप्ट ऑर नॉट' असा आहे!
याहीपेक्षा कहर पुढे आहे:
>काय ते ठरलं का शेवटी?
स्वेच्छेनी हव्वं तस्सं जगायचं की 'सब स्वीकार है' म्हणून मुकाट्यानी जगायचं?
= मन सांगतंय स्वीकार म्हणजे हार आहे ('सब स्वीकार है' म्हणून मुकाट्यानी जगायचं?).
स्वीकार स्वेच्छा आहे, जे आहे ते लक्षपूर्वक आणि जवाबदारीनं निभावणं आहे. मनाला वाटतं स्वच्छंद म्हणजे बेदरकारी! (स्वेच्छेनी हव्वं तस्सं जगायचं )
>की आधी स्वेच्छेनी जगायचं आणि लोकांनी फटके दिले की मग मुकाट्यानी सगळं स्विकारुन जगायचं?
= हा (प्रतिसादकाच्या) मनाचा पूर्वानुभव आहे!
पूर्ण स्वीकार तुम्हाला समर्थ करतो. 'स्वीकारू की नको' अशी मनाची द्विधा स्थितीच तुम्हाला कमजोर करते आणि मग परिस्थिती वरचढ होते.
>की आधी सगळं स्विकारुन जगायचं आणि वैताग आला की स्वेच्छेनी जगायचे?
= त्याच द्विधा स्थितीचा पुनर्प्रत्यय!
>की स्वेच्छेनी जगतोय असं दाखवायचं आणि खरं तर सगळं स्विकारुनच जगायचं?
= मन पुन्हा तेच सांगतंय स्वीकार ही हार आहे!
>की सगळं स्विकारुन मुकाट्यानी जगतोय असं दाखवत हळूच स्वेच्छा पुढे सरकवत रहायची?
= परिस्थितीनं पुरती वाट लावली की 'आत एक आणि बाहेर एक' अशी अवस्था कशी होते त्याचं यथार्थ वर्णन!
>त्यापेक्षा सोप्पे म्हणजे स्वतः स्वेच्छेनी जगायचं आणि आजूबाजूच्या लोकांना सांगायचं आहे त्याचा स्वीकार करुन जगा! कसे?
= इग्झॅक्टली हेच तर मनाला वाटतंय! म्हणून तर स्वीकृती स्वत:ला करायचीये हे लक्षात येत नाहीये.
>काय ते ठरलं की मला कळवा बरं का सगळ्या चर्चापटूंनी.
= काय कळवणार ते? कुठे बेशर्त स्वीकार केलाय त्यांनी? त्यांचाही लगाम मनाकडेच तर आहे.
माझ्या लेखनाचा उपयोग करून घ्यायचा असेल तर असले व्यर्थ प्रतिसाद आणि त्याहीपेक्षा व्यर्थ म्हणजे इतर पोस्टवर माझ्या प्रतिसादांवर भंपक उपप्रतिसाद देऊन पर्सनल टार्गेटींग (याविषयी प्रशासनचं धोरण काय आहे कल्पना नाही), यातनं काही होणार नाही.
एखाद्या प्रसन्न सकाळी उठता क्षणी निर्णय घ्या 'दाय विल बी डन! आणि मग त्या मूडमध्ये फक्त एक दिवस जगून बघा. तुमच्या जीवनाचा सारा रंग बदलेल. त्या अनुभवातनं मग प्रतिसाद द्या. तुम्हाला कळेल लेखन म्हणजे नुसते शब्द नव्हते त्यात अर्थ होता. यू विल एन्जॉय.
__________________________
बिफोर आय क्लोज,
'दाय विल बी डन!' याचा अर्थ (जिझसला जरी) आकाशातला कुणी तरी परिस्थिती निर्माण करतो आणि आपण त्याला हो म्हणतो असा (त्या वेळी) वाटत असला तरी असा कुणी आकाशस्थ मानण्याची गरज नाही. कारण मग मन पुन्हा 'तो कोण?' 'एकदा त्याची मर्जी स्वीकारल्यावर तो माझी काळजी घेणार का?' असले प्रश्न निर्माण करेल.
तर तसा कुणीही नाही. आपण परिस्थितीचा उहापोह करत नाही, फक्त तिचा बेशर्त स्वीकार करतो.
काही भक्तिपंथी म्हणतील 'अरे ये सब केमीकल लोचे है भाई...आमचे संत फार सोपा सिद्धांत सांगतात : ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. '
तर तसा अनंतही कुणी नाही आणि समाधान ही स्वीकृतीची परिणिती आहे, ते येतंच आणि कायम राहतं, असू द्यावं लागत नाही.
वाचने
42463
प्रतिक्रिया
225
मिसळपाव
प्रतिक्रिया
आ भ्रमर, मुझे चाव का?
In reply to रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा by मोदक
हे सगळे प्रतिसाद वाचून
बोधीवृक्ष, बुध्द, बुध्दू आणि म्या पामर...
वा वा..
In reply to बोधीवृक्ष, बुध्द, बुध्दू आणि म्या पामर... by धमाल मुलगा
आमच्या सारखे मित्र असल्याने
In reply to वा वा.. by चिगो
क्या बात..!! क्या बात...!!
In reply to बोधीवृक्ष, बुध्द, बुध्दू आणि म्या पामर... by धमाल मुलगा
व्वा! साला जंदगीच बदलून गेली.
काल बर्याच दिवसांनी थोडा
खिक्क...!
In reply to काल बर्याच दिवसांनी थोडा by धन्या
धनाजीराव...
In reply to काल बर्याच दिवसांनी थोडा by धन्या
खिल्ली उडविणे....????
In reply to धनाजीराव... by अर्धवटराव
अत्यंत समर्पक आणि समतोल
In reply to धनाजीराव... by अर्धवटराव
द मोस्ट अनेक्सपेक्टेड!
मोस्ट एक्सपेक्टेड!
In reply to द मोस्ट अनेक्सपेक्टेड! by संजय क्षीरसागर
"तुमची चित्तव्रुत्ती उद्विग्न
In reply to मोस्ट एक्सपेक्टेड! by पिलीयन रायडर
"तुमची चित्तव्रुत्ती उद्विग्न आहे.."
सहमत!आणि ती हिंसकही होत आहे..
In reply to "तुमची चित्तव्रुत्ती उद्विग्न by मोदक
+१
In reply to मोस्ट एक्सपेक्टेड! by पिलीयन रायडर
मतभेद असणे किंवा एखाद्याची मत
इट्स ह्युमन टेन्डेन्सी
In reply to मतभेद असणे किंवा एखाद्याची मत by पिंपातला उंदीर
लोक तोळ धाडी प्रमाणे धागा
In reply to मतभेद असणे किंवा एखाद्याची मत by पिंपातला उंदीर
लोक तोळ धाडी प्रमाणे धागा
In reply to लोक तोळ धाडी प्रमाणे धागा by पिलीयन रायडर
कोणत्याही नव्या विचारसरणीला तीन प्रकारे नाकारता येतं
याचा अर्थ `मीच सर्वश्रेष्ठ'
In reply to कोणत्याही नव्या विचारसरणीला तीन प्रकारे नाकारता येतं by संजय क्षीरसागर
आता तुम्हाला केलेला विरोध हा
In reply to याचा अर्थ `मीच सर्वश्रेष्ठ' by पिलीयन रायडर
तुम्ही अहंकारी आहात हा मुद्दा तुमच्या "भाषेमुळे" आलेला आहे!
In reply to याचा अर्थ `मीच सर्वश्रेष्ठ' by पिलीयन रायडर
संक्षी...
In reply to तुम्ही अहंकारी आहात हा मुद्दा तुमच्या "भाषेमुळे" आलेला आहे! by संजय क्षीरसागर
तुम्ही स्वतःला काय समजता हा तुमचा प्रश्न आहे
In reply to संक्षी... by पिलीयन रायडर
असु द्या हो.
In reply to याचा अर्थ `मीच सर्वश्रेष्ठ' by पिलीयन रायडर
+१
In reply to असु द्या हो. by अर्धवटराव
तिथे अरांनी मला प्रश्न विचारलेत आणि मी शेवटपर्यंत उत्तरं दिलीयेत
In reply to असु द्या हो. by अर्धवटराव
उत्तम नमुना.
In reply to तिथे अरांनी मला प्रश्न विचारलेत आणि मी शेवटपर्यंत उत्तरं दिलीयेत by संजय क्षीरसागर
तिथला तुमचा धन्यवाद पाहा
In reply to उत्तम नमुना. by अर्धवटराव
आणखी एक नमुना.
In reply to तिथला तुमचा धन्यवाद पाहा by संजय क्षीरसागर
अर्धवट राव, आधी म्याला
In reply to उत्तम नमुना. by अर्धवटराव
@सगळ्यात शेवटचा पाय कुठला
In reply to अर्धवट राव, आधी म्याला by कवितानागेश
गुरुराज..
In reply to कोणत्याही नव्या विचारसरणीला तीन प्रकारे नाकारता येतं by संजय क्षीरसागर
कुणी निंदा कुणी वंदा, शेवटचा
काथ्याकुट
संक्षी,
तात्विक पातळीवर विचार ठीक वाटला पण ...
In reply to संक्षी, by बाळ सप्रे
:)
In reply to तात्विक पातळीवर विचार ठीक वाटला पण ... by संजय क्षीरसागर
मुळात बेशर्त हा शब्द
In reply to :) by अग्निकोल्हा
करेक्षन आवश्यक : त्यांच्या
In reply to :) by अग्निकोल्हा
:) :)
In reply to करेक्षन आवश्यक : त्यांच्या by गवि
संजय सर हे " सर जडेजा" सारखंच
In reply to :) :) by अग्निकोल्हा
सर जडेजांचा अपमाण???
In reply to संजय सर हे " सर जडेजा" सारखंच by शिल्पा ब
च्यायला
In reply to करेक्षन आवश्यक : त्यांच्या by गवि
गडी??
In reply to च्यायला by रामपुरी
हॅ हॅ हॅ हॅ
In reply to गडी?? by प्रभाकर पेठकर
गंमत.
In reply to हॅ हॅ हॅ हॅ by रामपुरी
करेक्षन आवश्यक : त्यांच्या
In reply to :) by अग्निकोल्हा
ऑ?
In reply to करेक्षन आवश्यक : त्यांच्या by गवि
गवि, अनुभूतिच्या वेरिफिकेशनचा प्रश्नच नाही
In reply to करेक्षन आवश्यक : त्यांच्या by गवि
उदाहरण योग्य वाटत नाही.
In reply to तात्विक पातळीवर विचार ठीक वाटला पण ... by संजय क्षीरसागर
पण मूळ कारण जे सगळ्यांना वाट्तय ते कोण स्वीकारणार.. ?
In reply to उदाहरण योग्य वाटत नाही. by बाळ सप्रे
अहंकार ?
In reply to पण मूळ कारण जे सगळ्यांना वाट्तय ते कोण स्वीकारणार.. ? by संजय क्षीरसागर
गिरा तो भी टांग
In reply to पण मूळ कारण जे सगळ्यांना वाट्तय ते कोण स्वीकारणार.. ? by संजय क्षीरसागर
गिरा तो भी टांग उपर
In reply to गिरा तो भी टांग by पुण्याचे वटवाघूळ
योग्य उदाहरण देण्याला बगल
In reply to पण मूळ कारण जे सगळ्यांना वाट्तय ते कोण स्वीकारणार.. ? by संजय क्षीरसागर
मुळात बेशर्त हा शब्द
स्वत:लाच काय ते ब्रह्मज्ञान
ते पिवळ्या रंगात हायलाईट
In reply to स्वत:लाच काय ते ब्रह्मज्ञान by शिल्पा ब
आम्ही सामान्य माणसं..चुका
In reply to ते पिवळ्या रंगात हायलाईट by लंबूटांग
मन वगैरे कळेल का नाही देव
"भरपूर प्रतिसाद मिळवण्याची
In reply to मन वगैरे कळेल का नाही देव by वीणा३
वि ऑल बिन देर...
In reply to मन वगैरे कळेल का नाही देव by वीणा३
अगदी अगदी.
In reply to वि ऑल बिन देर... by अग्निकोल्हा
तो पिच्चर
In reply to अगदी अगदी. by बॅटमॅन
आह राईट, धन्यवाद!
In reply to तो पिच्चर by जे.जे.
पेटू नका रे पोरांनो!
In reply to वि ऑल बिन देर... by अग्निकोल्हा