अंतिमत: पाकिस्तान मधल्या निवडणूक निकालांचे सूप वाजले आणि नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज ही पार्टी छोट्या पक्षांसामावेत आघाडी करून १३७ हा बहुमताचा जादुई आकडा गाठणार असे दिसतेय. पण लाख टके का सवाल है कि -नवाज शरीफ किती दिवस टिकणार ?
मुशरर्फ प्रणीत लष्कर (मिलित्रि)त्यांना जास्त दिवस टिकू देईल असे वाटत नाही.
आणि भारताबरोबर त्यांनी (खरोखरच) शांतता, सलोखा प्रस्थापित करायचा प्रयत्न केला तर त्यांची गच्छन्ति निश्चित आहे. अर्थात ते पण लवकरात लवकर मुशरर्फला लटकवायचा पूर्ण प्रयत्न करतील. ISI चे पंख छाटणेदेखील तितकेच आवश्यक आहे. ISI आणि लष्कर -ए - तोयबा यांची अभद्र युती भारतासाठी डोकेदुखी ठरते आहेच. अर्थात आतंकवाद प्रामाणिकपणे कमी करण्याचे प्रामाणिक प्रयत्न कोणत्याही पाकिस्तानी राज्याकर्त्याकडून होतील असे वाटत नाही तरीही पाकिस्तान आणि भारतालाही एकंदरीत शांतता हवी असेल तर पाकमध्ये लोकशाही बळकट करण्यावाचून पर्याय नाही. आणि जरा स्वत:च्या तुंबड्या भरण्याबरोबर जनतेचा विकास वैगेरे पण बघा म्हणा म्हणजे जिहाद च्या नावाखाली तरुणांची माथी भडकणार नाहीत.
वाचने
10563
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
वैधानिक मार्गाने होणारी संथ
वा !!
In reply to वैधानिक मार्गाने होणारी संथ by निनाद मुक्काम …