✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अवडंबर (कथा)

भ
भास्कर केन्डे यांनी
Fri, 09/12/2008 - 02:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5787 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

सुरूवात चांगली आहे..

प्राजु
Fri, 09/12/2008 - 02:37 नवीन
भाग मोठा लिहावा ही विनंती. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

प्राजूताई

भास्कर केन्डे
Fri, 09/12/2008 - 02:50 नवीन
मी प्रथमच कथेला (कदाचित अति) लघुरुप देऊन परिणाम साध्य होतो का हे पहायचा प्रयत्न केला आहे. तुमच्या प्रतिसादावरुन तो फसला आहे असे दिसते. बाकी मिपा करांच्या प्रतिक्रिया काय येतात ते बघू. अर्थात पुढच्या कथेची लांबी व ठेवण व्यवस्थित येईल याची काळजी घेईन. आपला, (शिकाऊ) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

भास्करराव,

प्राजु
Sat, 09/13/2008 - 03:16 नवीन
अगदी प्रामाणिक मत असं आहे माझं की, मला हि कथेची प्रस्तावना वाटली.. आणि कथेतील लक्ष्मी आता त्या मालनला तिचे प्रश्न सोडवायला मदत करेल आणि त्याचं म्हणजे तिच्यावर ओढवणार्‍या संकटांचं अवडंबर तुम्ही इथे लिहीणार आहात असाच समज झाला. आणि कथा सुरू कुठे झाली आणि संपली हे नाही समजले. प्रामाणिक मताबद्दल राग नसावा. कथा लक्ष्मीच्या भोवती गुंफलेली असेल तर पूरांत गेलेलं लक्ष्मीचं कुटुंब, घराची वाताहात यांची तीव्रता आणखी दाखवता आली असती. माझा असा समज झाला की, लक्ष्मी आता ज्या दु:खातून गेलेली आहे तीच दु:खे मालन ला भोगावी लागू नयेत म्हणून तीने केलेली धडपड पुढील भागांत असेल. कदचित माझा कथेकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकला असेल. म्हणून मला असे वाटले असावे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे

चिह्नांनी लदल्यामुळे

धनंजय
Fri, 09/12/2008 - 04:51 नवीन
कथानक म्हणून प्रवाह रुद्ध होतो आहे, असे वाटले. (कथानकातले काही तपशील फक्त चिह्नासाठी आहेत, कथेच्या ओघात सामावले नाहीत, असे वाटले.) नवीन साहित्यप्रकार असाच प्रगत करत राहावे. कथानक आणि चिह्ने दोन्ही ओघवती राहिलीत, दोन्ही पातळ्यांवर कथा सहज-परिपूर्ण वाटली तर अधिक मजा आहे. (पैशांनी लालूच दाखवून धर्मांतर झाले, न झाले तरी माझ्या मते काही फरक पडत नाही. [१] पैसे घेऊन धर्म 'बदलणार्‍या'ची आदली धर्मश्रद्धाच सखोल नसते, त्यामुळे त्याचा तो आदला धर्मच नसतो [२] मनापासून समजून-उमजून धर्मांतर केले असेल, तर शिवाय पैसेही घेतले ही बाब केवळ अवांतर आहे, [३] पैसे घेऊन मूळ धर्माविषयीच श्रद्धा ठेवणार्‍या लक्ष्मीचे धर्मांतर मुळी झालेलेच नाही. त्यामुळे तुमचा आशय समजला तरी काही मोठा घात झाला आहे, हा भाव पोचला नाही. मुलाचे धर्मांतर कसे झाले हे सांगता येत नाही - लालसेने, की मुळातच तो त्या वेगळ्या धर्मात वाढला? त्या आईच्या वागण्याचा चांगलाच अर्थ घेणे मला सहज आहे - कुमाता न भविष्यति! यावरून आठवले - लुइझियाना राज्याचे राज्यपाल श्री. जिंदल हे कॅथोलिक आहेत, पण त्यांचे आईवडील हिंदू आहेत. श्री. जिंदल यांचे ख्रिस्तीपण लालसेने झाले की ओघाओघाने - याबद्दल मला माहीत नाही. तुमचे काय मत आहे? [श्री. जिंदल यांच्या स्वतःच्या म्हणण्याचा/मुलाखतींचा दुवा])
  • Log in or register to post comments

पटले पण...

भास्कर केन्डे
Fri, 09/12/2008 - 20:21 नवीन
कथानक म्हणून प्रवाह रुद्ध होतो आहे, असे वाटले. -- स्पष्टोक्तीबद्दल धन्यवाद! मी पण एक त्रयस्थ म्हणून आज पुन्हा कथा वाचली आणी मला सुद्धा हेच जाणवले. १००% मन्य. नवीन साहित्यप्रकार असाच प्रगत करत राहावे. कथानक आणि चिह्ने दोन्ही ओघवती राहिलीत, दोन्ही पातळ्यांवर कथा सहज-परिपूर्ण वाटली तर अधिक मजा आहे. -- पुढील कथेत नक्की प्रयत्न करीन. आपणही असाच लोभ असू द्यावा. आपल्या सारख्यांच्या प्रतिसादाने पुन्हा लिहिण्यास हुरुप येतो. पैसे घेऊन धर्म 'बदलणार्‍या'ची आदली धर्मश्रद्धाच सखोल नसते, त्यामुळे त्याचा तो आदला धर्मच नसतो -- पटले. पण मुळात धर्मांतर करणार्‍यांची सुद्धा ही अपेक्षा नसते. ते मुळात धर्मांतर टप्प्या-टप्प्याने करतात. पहिले - "ग्राऊंड वर्क" करणे जसे की जे काही चांगले काम करत आहोत याची भरपूर प्रसिद्धी देणे. चित्रपट तसेच इतर प्रभावी माध्यमांमध्ये गळ्यात क्रॉस घातलेले हिंदू लोक दाखवने वगैरे (अर्थात हा एक वेगळा चर्चा विषय होऊ शकतो, तुर्तास एवढेच). दुसरे - लक्ष्मी/मालन सारखी धर्मांतरे करुन आणने. हे लोक तसेच कदाचित यांची मुले सुद्धा हिंदू धर्माशी नाळ ठेऊन राहतील परंतू ३-४ पिढ्यात ते पूर्णपणे हिंदू धर्मापासून तुटलेले असतील असे करने. पैसे घेऊन मूळ धर्माविषयीच श्रद्धा ठेवणार्‍या लक्ष्मीचे धर्मांतर मुळी झालेलेच नाही. -- कदाचित तिची पुर्वाश्रमीच्या धर्मावरची श्रद्धा मिशनर्‍यांना सुद्धा चालेल. वर म्हटल्या प्रमाणे त्यांची अपेक्षा भविष्यातल्या पिढ्यांकडून आहे. एकंदरीत, प्रतिसादाबद्दल आभार! आपला, (आभारी) भास्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

कथा आवडली पण

ऋषिकेश
Fri, 09/12/2008 - 10:55 नवीन
कथा आवडली .. खरंतर आशय चांगला पण अधिक नेटकी बांधता येईल असे वाटून गेले. -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

नेटकी

भास्कर केन्डे
Fri, 09/12/2008 - 20:23 नवीन
वरील प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे लघु करण्याच्या नादात बरेच राहून गेले व प्रभाव हरवला. यापुढे आपली निराशा होणार नाही यासाठी प्रयत्न करीन. आपला, (स्नेहाभिलाषि) भास्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

वेगळीच कथा

सहज
Fri, 09/12/2008 - 13:57 नवीन
धर्मप्रचार, फादर रोड्रीग्ज हे शब्द व लेखक यावरुन एक अंदाज आला होताच :-) धनंजय यांच्या प्रतिसादावरुन अजुन स्पष्ट झाले. ललीत लेखनाचा बाज असला तरी गंभीर चर्चा अपेक्षीत आहे का भास्करराव? :-) स्वतंत्र भारतात अश्या किती लक्ष्मी व मालन आहेत त्यांना त्वरीत शोधून "देशी" धर्मप्रचारकांनी त्यांच्या उज्ज्वल आयुष्याचे नवे पर्व सुरु करावे ही सदिच्छा! सरकार व "देशी" धर्माला हे आव्हान झेपले नाही तर हे काम आउट्सोर्स होणार हे नक्की. शेवटी माणुस जगला पाहीजे, माणूस आहे म्हणुन धर्म आहे. माणुसच नसेल तर... बाकी कथा संक्षीप्त, नक्की काय अंगाने आहे, काय सुचवायचे आहे, हे नक्की कळत नसल्याने ना धड आवडली म्हणु शकतोय ना धड नावडली. :-(
  • Log in or register to post comments

ललीत

भास्कर केन्डे
Fri, 09/12/2008 - 20:42 नवीन
धर्मप्रचार, फादर रोड्रीग्ज हे शब्द व लेखक यावरुन एक अंदाज आला होताच - - शाल** समजला बरं का! ललीत लेखनाचा बाज असला तरी गंभीर चर्चा अपेक्षीत आहे का भास्करराव? -- लेखन ललीत प्रकारातच ठेवायचे होते. पण चर्चा कोणत्या दिशेने न्यायची हे आपण मायबाप ठरवणार. विषयाला धरुन राहिली म्हणजे मिळवले. काय म्हणता? स्वतंत्र भारतात अश्या किती लक्ष्मी व मालन आहेत त्यांना त्वरीत शोधून "देशी" धर्मप्रचारकांनी त्यांच्या उज्ज्वल आयुष्याचे नवे पर्व सुरु करावे ही सदिच्छा! --दुर्दैवाने हे शक्या नाही असे वाटते. देशी धर्मप्रचारकांकडे अंगावरील कपडे सुद्धा धड नसतात. विदेशी धर्मप्रचारकांशी त्यांची तुलना कोणत्याच अंगाने होऊ शकत नाही. ना पैसा, ना जागतिक पाठिंबा, ना प्रसारमाध्यमे... काय आहे हो यांच्याकडे? या सगळ्या सोई त्यांच्या मात्र मुठीत आहेत. सरकार व "देशी" धर्माला हे आव्हान झेपले नाही तर हे काम आउट्सोर्स होणार हे नक्की. शेवटी माणुस जगला पाहीजे, माणूस आहे म्हणुन धर्म आहे. --नाही पटत बॉ आपल्याला हे. हे बघा, जर त्यांचा धर्म सेवा करा, प्रेम करा असे सांगतो तर त्यांनी ते खुशाल करावे. आम्हा गरिबांना/पिडीतांना धर्मांतर केल्याशिवाय त्यांच्या गोळ्या-औषधी लागू पडत नाहीत का त्यांच्या तंबूंमध्ये राहिल्यावर महारोग होईल? बाकी कथा संक्षीप्त, नक्की काय अंगाने आहे, काय सुचवायचे आहे, हे नक्की कळत नसल्याने ना धड आवडली म्हणु शकतोय ना धड नावडली. -- आपल्याला तुमचा रोखठोक प्रतिसाद मात्र आवडला बॉ. पुढच्या वेळी याची परतफेड (चांगली कथा देऊन बरं का) करण्याचा प्रयत्न करु. आपला, (प्रयत्नवादी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

परीणामकारक...

प्रभाकर पेठकर
Fri, 09/12/2008 - 14:11 नवीन
कथा चांगली आहे. पण महापूरात घरदार, नवरा वाहून गेल्यावर आलेली अगतिकता अधोरेखित झाली नाही. पोटात मुल वाढविण्यार्‍या लक्ष्मीला तिच्या समाजाने हात दिला नाही? (तसे दिसतेच आहे) ती इतकी अगतिक का झाली? कोणी सुखासुखी धर्मांतर करीत नाही. (असं मला वाटतं) एवढ्या मोठ्या बाईच्या मनात मूळ धर्माची वीण फार घट्ट असते. तरी पण ती धर्मांतरास तयार झाली त्या अर्थी तिच्यावर तसेच काही प्रसंग आले असतील. अंधःकारमय भविष्याच्या भेसूर सावल्यांनी तीला घाबरवले असेल. अशा खूप काही गोष्टी असतील. त्या कथेत यायला पाहिजे होत्या. म्हणजे लक्ष्मीची भूमिका अजून स्पष्ट झाली असती. पण लेखकाचा उद्देश मिशनर्‍यांच्या 'काळ्या' कृत्यांना हायलाईट करण्याचा दिसून येतो. त्यामुळे लक्ष्मीचे पुर्वायुष्य, हिन्दू धर्मावरील श्रद्धा, पण नियतीच्या घाल्याने तिचे मानसिक तुटलेपण आणि असहाय्य लक्ष्मीचे दुसर्‍या धर्माच्या दाराशी (स्वतःच्या तत्त्वांच्या विरुद्ध) जाणे ह्या सर्व स्थित्यंतरांकडे दुर्लक्ष झाले आहे. कथा लहान ठेवण्याची इच्छा समजली तरी परीणामकारकतेला बाधा आणण्याइतकी लहान ठेवली आहे. असो. पुढील लेखनास शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

परिणामकारकते बद्दल एक प्रश्न

भास्कर केन्डे
Fri, 09/12/2008 - 20:55 नवीन
नमस्कार पंत, नेहमी प्रमाणे आपला प्रतिसाद म्हणजे आम्हाला आवडत्या गुरुजींच्या सल्ल्यासारखा वाटला. पण महापूरात घरदार, नवरा वाहून गेल्यावर आलेली अगतिकता अधोरेखित झाली नाही. --हो, मान्य. येथे परिणामकारकतेत खूपच कमतरता राहून गेली आहे. कथा लहान ठेवण्याची इच्छा समजली तरी परीणामकारकतेला बाधा आणण्याइतकी लहान ठेवली आहे. --१००% मान्य. वरील प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे पुढील कथेत आवश्यकते येवढे शब्द टंकन्याचा आळस करणार नाही :) पुढील लेखनास शुभेच्छा! -- आभार! एक प्रश्न - समजा कथा संक्षिप्त न करता व्यवस्थित लांबीची लिहिली असती जेणेकरुन आपण म्हटल्या प्रमाणे "लक्ष्मीची भूमिका अजून स्पष्ट झाली असती" तर पुढील शेवट कितपत परिणामकारक ठरला असता असे आपल्याला वाटते?... --आज रात्री अशाच एका नवीन पर्वाची सुरुवात करण्यासाठी फादर तयार झाले. --हा "मेसेज" सद्य शेवटामध्ये वाचकांना कळण्याजोगा अधोरेखित झाला आहे का? वरील दोन शब्द टाकून कथेचा प्रकार बदलण्याची शक्यता वाटली म्हणून टाकले नाहीत. आपले मत जाणून घ्यायला उत्सुक. आपला, (चाहता) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

उद्देश...

प्रभाकर पेठकर
Sat, 09/13/2008 - 11:48 नवीन
श्री. भास्करराव, कथानकात लक्ष्मी आणि लक्ष्मी सारख्या अनंत असहाय्य अबलांचे 'शारिरीक शोषण' अधोरेखित झालेले नाही असे मला वाटते. त्याच बरोबर असाही प्रश्न मनात उद्भवतो की प्रत्येक धर्मांतरीत स्त्रीला 'ह्या' दिव्यातून जावे लागतेच का? कथेच्या परिणामकारकतेसाठी कथानकाच्या विस्ताराची जेवढी गरज आहे त्याहून जास्त तपशीलाची गरज आहे. लेखकाचा उद्देश 'फादर' चे हिंस्त्र रूप दाखविणे आहे, धर्मांतराचे अक्राळ-विक्राळ रूप दाखविणे आहे की हिन्दू धर्मातील अशा धर्मांतराबद्दलची उदासिनता दाखवून देणे आहे (की तिन्ही आहे) ह्यावर विचार करून त्या अनुषंगाने कथा सादर व्हायला हवी असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे

वाट पाहतोय...

सर्वसाक्षी
Fri, 09/12/2008 - 22:31 नवीन
भास्करराव, कथा थोडी विस्ताराने लिहिली असतीत तर बरे झाले असते. संक्षिप्ततेमुळे तिला 'स्फुट' असे स्वरुप आले आहे. माझ्या मते लक्ष्मीचे धर्मांतर हे कथानकात उशीरा आले आहे असे वाटते. शिवाय आपल्या शैलित धर्मांतरापूर्वीची लक्ष्मिच्या मनाची उलघाल व निर्णय काही निकषाने वा नाईलाजाने झाला हे जाणुन घ्यायला आवडेल. हे मानवतेचे दूत फक्त धर्मांतरीतांनाच का बरे उद्धरतात? लक्ष्मिची एखादी सखी जीने धर्म सोडायला नकार दिला तिचे काय झाले हेही जाणुन घ्यायची उत्सुकता आहे. लवकर लिहिते व्हा, वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा