आपण वयाच्या पंचाहत्तरीत देखील उत्साहाने लिहीत असता व आपल्या अनुभवाचा फायदा नव्या पिढीला करून देत असता. प्रत्येकवेळी सकारात्मकच प्रतिसाद येत असतील असे नाही पण आपण लिहीणे सोडले नाहीत. आपले आभार.
आपण आपल्यासारखेच असले म्हणजे किती ताण कमी होतात हे माहीत होतेच पण पुन्हा वाचून बरे वाटले.
रेवती
रेवतीजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
" आपण वयाच्या पंचाहत्तरीत देखील उत्साहाने लिहीत असता "
हे आपलं म्हणणं वाचून आनंद होतो.खरं सांगायचं झालं तर,वय वाढत जाणं हे कुणाचाही कंन्ट्रोल मधे नसतं पण मन मात्र बदलत्या जमान्याच्या लहरीवर (इथं मी "लहर" दोन अर्थाने म्हणत आहे एक "एकाच वेव्हलेन्थवर " म्हणून आणि दुसरं जमान्याच्या "मुड" वर म्हणून) ठेवणं हे मात्र ज्याच्या त्याच्या कंन्ट्रोल मधे नक्कीच असतं.
मिसळपावावर वीस बावीस पासून पन्नास पंचावन्न वयाचे वाचक अनेक आहेत.माझ्या सारखं एखादंच "केवड्याचं फूल" पंचाहत्तर वयाचं अपवादाने दिसेल.
पण ह्या सर्वांबरोबर हातात हात घालून चालायचं असेल तर मला त्यांच्या सारखं "मनाने " रहाणं जरूरीचं आहे नव्हे काय?.आणि असं रहाणं मला खूप आवडतं.
आपण अभ्यासू वृत्तीने केलेल्य़ा ह्या आकलना बद्दल -comprehension- बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
श्रीकृष्णराव,
प्रकटन, विचारमंथन आवडले!
तात्पर्य काय तर ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या सारखं असावं.
हे मात्र अगदी खरं! :)
आपला,
(मी माझ्याचसारखा!) तात्या.
थोडक्यात काय तर माणसाने 'सहज' असावे. वर म्हटल्या प्रमाणे अनेक प्रसंगी माणसाला दुःख होणे स्वाभाविक असते...अश्या प्रसंगी मी दुःखी नाही किंवा मला दुःख होउच शकत नाहि असा विचार करणे अथवा वागणे म्हणजे स्वत:ला भ्रमात ठेवण्यासारखे आहे....ह्यात मनाची व्दिधा अवस्था होते...समोर तर दु:ख्/प्राप्य परिस्थिती आ वासुन उभी आहे आणि मालक म्हणतात असे काहि नाहि...नेमके काय करावे बुवा?
त्यापेक्षा समोर आलेल्या परिस्थितीचा स्वीकार केला तर मनाची तयारी होते...त्यातुन बाहेर येण्यासाठी प्रयन्त करणे सोपे जाते...बाहेर पडणे शक्य नसेल तर सहन करण्याची शक्ति मिळु शकते...
मिपाकर काय म्हणता?
(परिस्थितीचा स्वीकार करायचा प्रयत्न करणारा) पांथस्थ...
(तळटिपः स्विकार करणे म्हणजे शरण जाणे नव्हे हे इथे स्पष्ट करु इच्छितो...)
छान लिहिलेत आबा!
तुम्ही म्हणता ते खरंय. प्रत्येकाची विचारपद्धती वेगवेगळी असते. त्यामुळे जे एखादा सहज करेल ते दुसर्यास सहजपणे जमेलच असे नाही.
ज्याने त्याने स्वत:सारखे असावे याचे आणखी विश्लेषण करायचे झाले तर -
माझ्यामते जेव्हा आपल्याला मनापासून एखादी भूमिका पटते तेव्हाच तिची अंमलबजावणी शक्य होते. आता हे पटवून घेण्याचे काम प्रत्येकजण स्वत:च्या मनाच्या लवचिकतेनुसार करत असतो, स्वत:शिवाय दुसरा कुणीही त्याला पटवून देवू शकत नाही. प्रत्येकाच्या मनाची जडण-घडण कशी त्यावर त्याची-त्याची लवचिकता अवलंबून असते. ज्याला लवकर पटते तो ती भूमिका लवकर आत्मसात करण्याचा प्रयत्न करू शकतो. येथे जबरदस्ती झाली, विचार थोपवणे झाले की मनाचा गोंधळ उडतो अन् व्यक्ती ते आत्मसात करू शकत नाही. त्यातूनच पुढे न्यूनगंड, नैराश्य अशा अवस्था येतात.
म्हणून तुम्ही म्हणता ते योग्यच "ज्याने त्याने स्वत:सारखे असावे". :)
(समजून घेणारा) मुमुक्षू
सहज वागावे.. ओढून ताणून मन आनंदी किंवा दु:खी ठेवण्याच्या प्रयत्नात आपण आपले जगणेच गमावून बसतो.संदेश छान दिला आहे काका.
लेखन आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
उद्वेगजी,
जमदाडे,प्राजु,मुमुक्षु यांच्या प्रतिक्रिये बद्दल मी त्यांचे आभार मानले या बद्दल आपण माझे आभार पुनरपी का मानता.
खरंच मी आभार मानतो याचा आपल्याला "उद्वेग" येतो का? आणि तसं असेल तर तो का?
थोडं कुतुहल वाटतं म्हणून विचारतो एव्हडंच
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
सामंतकाका,
आपल्या आकलना बद्दल आभार
आभार.
श्रीकृष्ण
आभार
आभार.
माणसाने 'सहज' असावे
खरंय
अभार
आभार.
आवडले......
आभार
आभार.
हम्म..
आभार
आभार.
कुतुहल