सरंजामशाही संपली आहे का?
महाराष्ट्र पुरोगामी आहे असं म्हणायची पद्धत आहे. शाहु-फ़ुले-आंबेडकर प्रभुतींची नावे घेतली, शिवरायांचा जयजयकार केला की आपोआपच पुरोगामी विचारसरणीचे पाईक होता येते. अशा ह्या महाराष्ट्रात भूमाफ़िया निर्माण व्हायला लागले तेव्हा वाटायचं की महाराष्ट्राची अवस्था वाईट होत चाललेली आहे. पण हा प्रकार खुप जुना असल्याचं आजच एका धक्कादायक बातमीमुळे कळालं.
शिवरायांचे १३वे वंशज उदयनराजे भोसले ह्यांचे जवळपास ११ हजार ४७० एकर शेतजमिनीवर भोगवटादार म्हणुन सातबाराच्या उताऱ्यात नाव आहे आणि जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा कुळ म्हणुन उल्लेख आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांना जमीनीचे व्यवहार करतांना त्रास होतो. व्यवहारासाठी उदयन राजेंचे NOC लागते. राजेंचे कार्यकर्ते ते मिळवुन देण्यासाठी कमिशन घेतात. ह्याविरुद्ध श्रमजीवी रयत संघटना अनेक वर्षांपासुन लढा देतेय, पण सरकार मौन बाळगुन आहे. मुळात ह्या गोष्टींसाठी जनतेला आंदोलन करावं लागणं हेच शिवरांयाच्या घराण्याला शोभनीय नाही. शिवाजी महाराज खुद्द असते, तर त्यांनी काय केले असते हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. पण आजच्या घडीला आपण समाजवादी लोकशाही पद्धती स्विकारलेली असल्याने एखाद्या व्यक्तीकडे इतक्या लोकांना वेठीला धरायची शक्ती कशी काय असु शकते ह्याचं आश्चर्य वाटते.
एकीकडे समाजवादाला नावं ठेऊन भांडवलशाहीकडे वाट करत असलेल्या आपल्या देशात नोकरशहा, भांडवलदार, राज्यकर्ते, माफ़िया ही चांडाळ-चौकडी मोकाट सुटलेली दिसते. हा नवसरंजामवर्ग उदयास आलेलाच आहे, पण जुना सरंजाम वर्ग तरी कुठे संपलाय? जुने सरंजाम राजकारणातुन कधीही ह्द्दपार झाले नाहीत, पण त्याचे कारण म्हणजे आपण समाजवादी धोरणं नीटशी राबवलीच नाही हेच आहे. समाजवादाच्या नावाखाली कायदे तर अनेक केले, पण त्यांचा उपयोग लोकांना त्रास द्यायला आणि संरजामी वर्गाचं उपद्रवमुल्य कायम ठेवण्यासाठीच झाला.
आपण जाती-धर्म-भाषा-प्रांत ह्या सगळ्या विषयांवरुन तावातावाने वाद घालतो, चर्चा करतो. त्यावरुनच आपले राजकिय मत बनते. पण आपण मनातुन सरंजामशाही स्विकारलेलीच आहे. आपण त्याबद्दल अजिबात बोलत नाही. अब्दुल कलाम रांगेत उभे राहतात तर आपल्याला आश्चर्य वाटते. पण ते असंच असायला नको का? मनमोहन सिंगांच्या सेक्युरिटीमुळे ट्रॅफ़िक अडवुन ठेवली जाते, त्यामुळे दवाखान्याला जात असणारे रुग्ण दगावतात तरी आपल्याला फ़ारसे काही वाटत नाही. आपल्या प्रत्येकाच्या मनात असाच सरंजाम बनायची सुप्त इच्छा असते. संधी मिळत नाही एव्हढेच.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
११ हजार ४७० एकर?
लेखातील
ऐकीव माहीतीवरुन
क्रुपया महाराष्ट्र टाईम्स
सरंजामशाही!!!!
संस्थानं गेली, अन मतदारसंघ आले! फरक फार काही नाही.
राजे बघून घेतील आणि त्यांची
अतिशय एकतर्फी आणि अज्ञानानी
त्या बावळट आमदाराने
शांत शांत मालोजीराजे..
अहो मालक त्यांनी बातमी चा
बोंबला !
जमिनी हडपल्या हे कुठे लिहिलंय
ज्या राजघराण्यांना विशेष
सरंजाम वर्गाचं कार्य अर्थात
मुद्द्याच बोला !
इतिहासाच्या अभ्यासाची प्रचंड
जमीनीची खरेदी विक्री करुन
जमिनीचा मालकी हक्क ही
इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मदत
सहमत
वर सहमत मालोजी राजाना आहे
मीच आहे तो. ब्राह्मण-मराठा
मीच आहे तो. ब्राह्मण-मराठा
अहो साहेब
http://www.goregaoninfo.com
http://www.ibnlokmat.tv
खीक !
ओह.. अच्छा..’माझ्या आजवरच्या
दोन्ही पार्ट्या शांत व्हा
छ्या !
माझ्या शैलीत उत्तर दिलं तर
नाह नाह !
स्वत:चे लिखाण वाचत जा, मत
प्लीज
> ऐकीव माहीतीवरुन निष्कर्ष
राग
एक होते शिवाजी महाराज.
दुसरीकडे त्यांचे वंशज ज्यांनी
मालोजीराव,
अरे वा आमच्या निष्ठेवर जळणारे
प्रसाद गोडबोले,
कै च्या कै
माफ करा पण लोकशाहीत सगळे एक
कायम मुजरा घालावा
बहुसंख्य लोक एखादी गोष्ट चुक
>>> दारू घेऊन प्रेस
इनो घ्या बर वाटेल !
+११११११११११११११११११११११११११११
ओके