✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तंत्र विद्येची ओळख

र
रमेश भिडे यांनी
Sun, 02/17/2013 - 19:04  ·  लेख
लेख
अति-प्राचीन भारतीय वैदिक परंपरेत चार वेद आणि सहा दर्शने आहेत . परंतु पुराण-काळात म्हणजे इ.स.पूर्व १००० पासून भारतीय अध्यात्माला बदनाम करणारा वामाचारी पंथ अस्तित्वात आला . मूळ तंत्र विद्या ही कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्कार /सिद्धी-साधना या उद्दिष्टा साठी होती .परंतु काही स्वार्थी /लबाड आणि आसुरी प्रवृत्तीच्या लोकांनी वामाचारी तंत्र-मंत्र विद्या चा प्रचार-प्रसार केला . भगवद्गीतेत “दैवासुर-संपद्विभाग-योगात” श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे “देवांना भजणारे देवतांकडून आशीर्वाद मिळवून कामे पूर्ण करून घेतात ,भूत-पिशाच्च /असुरांना भजणारे भूतांकडून कामे करून घेतात ,आणि मला भजणारे भक्त अंतिम परम-सत्याची उपासना करून माझ्यातच समाविष्ट होतात”. विश्वात सप्त-पाताल आणि सप्त स्वर्ग आहेत ,अशी समजूत आहे .यापैकी सप्त-स्वर्गात देवता /ऋषी-मुनी /पुण्यात्मे राहतात .तर सप्त पाताळात भूत-पिशाच्चे /असुर आणि राक्षस असतात . वामाचारी तंत्र विद्येत मुख्यता:विश्वातील आसुरी शक्ती चे सहाय्य घेवून आपली विविध कामे करून घेणे असं प्रकार आढळतो . विविध तांत्रिक-मांत्रिक आणि अघोरी बाबा हे स्मशानात साधना करून अश्या दुष्ट शक्तींना वश करून घेतात आणि मग त्या शक्तींना बळी देवून त्याबदल्यात आपली कामे करून घेतात . तंत्र विद्येत इंद्रजाल नावाची विद्या आहे ,या विद्येद्वारा अनेक प्रकारे शत्रूला त्रास देणे किंवा सुंदर स्त्री ला मोहात पडून वश करणे / पुण्य चोरणे इत्यादी कामे केली जातात . १ स्तंभन – २ मारण – ३ आकर्षण- ४ विद्वेषण- ५ उच्चाटन – ६ मोहन [वशीकरण]- आद्य शंकराचार्य ,चाणक्य आदी थोर समाज-सुधारक आणि संत मंडळीनीही या वामाचारी तांत्रिक परंपरेची वेळोवेळी निंदा केलेली असून वामाचारी तांत्रिक आणि त्यांच्या गिऱ्हाईका ना गुन्हा सिद्ध झाल्यास देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ही दिल्याचे उल्लेख आहेत.गुरुचरित्र या ग्रंथात जारण--मारण हे अति-निंद्य कृत्य असून ते करणारा नीच चांडाळ योनीत जन्म पावतो असं उल्लेख आहे . या सर्व काळ्या तंत्र विद्येच्या मुलाशी "सायको-काय्नेसीस"नावाचे शास्त्र आहे . मानवी मन आणि त्याच्या शक्ती /मर्यादा या अनंत आहेत .शास्त्रज्ञांच्या मतानुसार मानवी मेंदूच्या एकूण शक्तींपैकी आपण फक्त १० % शक्ती वापरत असतो .इतर शक्तींचा वापर अज्ञान /विस्मृती आणि भ्रांती यामुळे करता येत नाही .जर विशिष्ट साधना /उपासना किंवा विज्ञान-निष्ठ brainwave entrainment सारखे उपाय केल्यास मेंदूच्या या सुप्त शक्ती जागृत करता येतात .तसे केल्यास मेंदू अधिक तल्लख आणि अंतर्मन अधिक शक्तिशाली बनते .परंतु या शक्तिशाली मनाचा वापर चांगल्या कारणासाठी करायचा कि वाईट? हे शेवटी आपल्या हातात असते . तर सायको कायनेसीस या शास्त्रात अंतर्मनाच्या अद्भूत शक्तींचा वापर करून भौतिक जगतातील काही वस्तूंवर ताबा मिळवणे शक्य होते. तसेच दुसऱ्याच्या मनावर प्रभाव टाकणे , मृतात्म्याचा माध्यम म्हणून वापर करून काही गोष्टी घडवणे हे शक्य होते. प्राचार्य अद्वयानंद गळतगे आणि डॉक्टर प.वि.वर्तक यांच्या पुस्तकांमध्ये सदर विषयांची चर्चा आहे .तसेच "मृत्यूनंतरचे जीवन "नामक एका पुस्तकात ही अश्या अनेक गोष्टींचा उल्लेख आहे . मनुष्य स्वभाव क्लिष्ट आहे. बरेचदा बऱ्याच गोष्टी ज्याला सामाजिक मान्यता नसते, ते करण्याचा कल काही लोकांचा असतो. The silence of the lambs हा सिनेमा बघावा. Dr. Hannibal Lector ची व्यक्तिरेखा खूप उद्बोधक आहे. क्राईम कशाला म्हणावा आणि कशाला म्हणू नये हे वेगवेगळ्या काळात नियम आणि मान्यता वेगळ्या होत्या.. तंत्रात ५ मकारांना मान्यता आहे. १. मांस २. मुद्रा ३. मदिरा ४. मैथुन ५. मत्स्य तसे पहिले तर या वासना किंवा इच्छा प्रत्येकालाच असतात. प्रत्येकाला चमचमीत मांसाहार करावासा वाटू शकतो, दारू प्यावीशी वाटते, मैथुन तर सगळ्यांना आवडतेच, तीच गोष्ट मुद्रा (पैसा) ची. तंत्रात माणसाच्या या आदिम ओढीचा वापर योग साधण्यासाठी करण्याचा प्रघात आहे. जर जमले तर खूप छान प्रकार आहे. पण बहुतेकदा यातच गुंतून जाणे अधिक बघितले जाते. म्हणून हा मार्ग बहुतेक लोकांना रुचत नाही.. संभोग (मैथुन) हि क्रिया खूप एकाग्रतेने करावी लागते हे प्रत्येक अनुभवी माणसाला ठाऊक असेल. जर एकाग्रता ढळली तर त्रास होतो. जर हि एकाग्रता वापरून विषय बदलता आला (जोडीदाराऐवजी ईश्वर, किंवा इतर कुठला विषय) तर या क्रियेत देखील खूप उत्कृष्ट ध्यान साधता येते. पतंजली सांगतात कि एकाच विषयावर चित्त एकाग्र करणे म्हणजे ध्यान आणि त्या विषयाशी एकरूप होणे म्हणजे समाधी. जर संभोग करताकरता हे करण्याची कला जमली तर हे शक्य आहे. पण संभोगात दोन जीव असतात आणि दोघेही एकाच मानसिक प्लेन वर राहतीलच याची ग्यारंटी देता येत नाही. जर ती क्रिया आवडू लागली तर मग हे ध्यान राहत नाही. तीच गोष्ट दारू आणि इतर मादक द्रव्य (अफू, गांजा इत्यादी) यांचे आहे. हे घेऊन ध्यान करायचा प्रयत्न करणारे असतातच. जर कुणी इथे गांजा घेतला असेल तर सांगा, अनुभव काय होता. अर्थात सगळे गांजेकस योगी असतात असे नाही. पण अगदी विरला एखादा योगी असतो जो कधीकधी हे द्रव्य घेऊन ध्यान करतो. पंडित भीमसेन जोशी, असे म्हणतात, कि व्हिस्कीचा एक पेग मारून मैफिलीमध्ये गायला बसत. इथे तो पेग म्हणजे मनातले inhibitions घालवायला वापरण्यात येणारे टूल आहे. तीच गोष्ट गांजा, आणि संभोगाची. येनकेनप्रकारेण मनाची संपूर्ण एकाग्रता साधायची असेल तर काही लोक काही सपोर्ट वापरतात. हे सपोर्ट योग्य प्रकारे कसे वापरायचे आणि इप्सित समाधी कशी साधायची, या कलेला तंत्र म्हणतात. ऑड म्हणजे मारामारी, हिंसा, असे काही करणे ज्याने मती "सुन्न" होऊन जाईल (जसे मेलेले मनुष्य खाणे, हत्या करणे इत्यादी) या गोष्टीदेखील बऱ्याच लोकांना शांती देणाऱ्या असतात. कित्येक सैनिकांना "जीव घेणे" आवडू लागते. याचा अर्थ हा नाही कि सगळेच सैनिक असे असतात आणि याचा हा देखील अर्थ नाही कि ते सगळे सैनिक ज्यांना जीव घेण्याची प्रक्रिया आवडते आहे, ते दैनंदिन आयुष्यात लोकांना मारत सुटतात. पण कधीकधी काही लोकांचे मानसिक संतुलन ढळते आणि ते सिरीयल किलर वगैरे होतात. एका सिरीयल किलर ला तीच मानसिक शांती मिळते याचा अर्थ हां आहे कि पण त्याचे संतुलन बिघडले आहे आणि तो आता इतरांसाठी धोका झाला आहे. अघोरी तांत्रिकांचे तेच असते. इथे किती जणांनी मारामारी केली आहे? किती जणांनी बकरे अथवा कोंबडी कापली आहे? किती जणांनी मेलेल्या कोंबडीचे अथवा बकऱ्याचे मांस कापले आहे आणि धुतले आहे, रक्तात हात माखवले आहेत? किती जणांनी हातात तडफडणारा मासा पकडला आहे? बहुतेक लोकांना जे हि कामे रोज करतात पहिल्या अनुभवानंतर संवेदना बोथट होते नि त्या बद्दल काहीही वाटत नाही. पण काही लोकांना पहिल्या अनुभवाची संवेदना तितकीच, किंबहुना अधिक प्रकर्षाने राहते. हि प्रोसेस ते आधी एन्जॉय करतात आणि नंतर एन्जॉय करणे बंद होऊन यानंतर शांती अनुभवू लागतात. हे लोक प्रमाणाने समाजात कमी असतात म्हणून समाज सुरळीत चालतो. या लोकांना वाळीत न टाकता यांना त्यांची ओढ "त्यातल्यात्यात" कमी हानिकारक प्रकारे पूर्ण करून समाजाला धोका उत्पन्न होऊ नये हा विचार आपल्या प्राचीन ऋषींनी केला आणि अघोरी प्रकार सुरु झाला. यातले बरेच लोक "ठग" बनत, गुप्तहेर बनत, सुपारी घेऊन किलर बनत आणि हत्या करीत. त्यामुळे राजकीय व्यवस्थेला देखील असली कामे करणारे लोक हवे असत (आणि आजही आहेत). अधिक यांचे मठ दुर्गम जंगलात स्थापन करून यांचा समाजाच्या दैनंदिन व्यवहारात काही त्रास होणार नाही याची काळजी देखील घेतली जाई. अधिक एकदा समाधी अनुभवता येऊ लागली कि बरेच लोक हि सपोर्ट सिस्टीम वापरायचे सोडून देतात. एकदा कृष्ण दिसला तर कोण वेडा कामिनीकांचनच्या मागे लागेल? तेव्हा हि लोक हे मार्ग वापरणे सोडून द्यायचे. इतर संतुलन ढळलेले लोक राजाकडून अथवा समाजाकडून मारले जात. आणि ज्यांनी वेळेत सगळे धरले आणि वेळेत सास्गले सोडले आणि धरताना अगर सोडताना संतुलन ढळू दिले नाहीत, ते योगी म्हणवतात. नवनाथांची यांची चरित्रे एकदा वाचावीत. जाग मच्छिंदर गोरख आया, या हाकेतली ओढ काय आहे ती लक्षात येईल.. तंत्रमार्गाबाबत एक गोष्ट लक्षात घ्यायची असते कि हे एक "तंत्र" आहे. एक टेक्निक आहे. योग हे देखील एक तंत्र आहे. तंत्र मार्ग सांख्य आणि योग यांपासून खूप प्रभावित आहे. ज्या विषयावर ध्यान करतोय त्याशी एकरूप होणे म्हणजे समाधी आणि त्या ओघात "मीपण" विसरून तो विषय होऊन जाणे म्हणजे योग. योग शब्दाचा अर्थ "मिलन" आहे, एकरूपता आहे. जर ड्रायविंग करीत आहात, तर त्या क्रियेशी इतके एकरूप व्हायचे कि कालांतराने चालक आणि वाहन यांच्यातील द्वैत नाहीसे होऊन दोघेही एकरूप होणे, हा झाला "सारथ्ययोग". तीच गोष्ट प्रेमाची, कर्माची, भक्तीची. हे एकरूप होता आले, स्वत्व विसरता आले कि विषयात कौशल्य प्राप्त होते, म्हणून गीतेत कृष्ण म्हणतो 'योगः कर्मसु कौशलं".. हा योग साधणे हेच तंत्राचे देखील साध्य आहे. कुणाला सिद्धी हवी कि मुक्ती हवी, जो जे वांछील तो ते लाहो. त्यामुळे जर कुणी हि टेक्निक चुकीच्या साध्यासाठी वापरली तर दोष टेक्निक चा नाही, तर वापरणाऱ्याचा. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, टेंबेस्वामी, इतर नवनाथ, चांगदेव, इतर खूप असे योगी जे प्रसिद्ध नाहीत, त्यांनी हीच टेक्नीक मोक्षासाठी वापरली जाणतेपणी. कित्येक संत देखील अजाणतेपणी हीच टेक्निक वापरत. माती मळणारा गोरा कुंभार इतका तल्लीन होऊन गेला कि पायाखाली मुलगा तुडवला गेला याकडे लक्ष नाही. तो राहिलाच नव्हता मुळे, माती, तो, आणि सर्व जग विठोबा झाले होते. हा क्षण म्हणजेच योग. आणि या क्षणापर्यंत गोराकुंभार ज्या टेक्निक ने पोहोचले, ती टेक्निक म्हणजेच योग आणि तंत्र. हे त्यांना माहिती होते कि नाही माहिती नाही. पण प्रोसेस हीच ती.. त्यामुळे उगाच शिव्या घालू नये. आधी अनुभव घ्यावा. आणि उचित साध्य मिळवायला जर स्वभाव अनुरूप असेल आणि रुची असेल तर तंत्र अंगीकारावे. ते सगळे लोक ज्यांनी उत्कटतेचा एक क्षण देखील जीवनात अनुभवला आहे ज्यात ते त्यांचे स्वत्व विसरले आहेत, त्या सगळ्या लोकांनी तो क्षण जाणते अगर अजाणतेपणी योगाचे तंत्र (योगाची टेक्निक) वापरून अनुभवला असतो. इतर बहुतेकांच्या सबंध आयुष्यात तो एक उत्कट क्षण कधीच येत नाही. • तर मंडळी आपण तंत्र विद्येचा आढावा घेत आहोत,बर्याच जिज्ञासू लोकांनी अधिक मोठे लेख लिहिण्या विषयी सांगितल आहे ,परंतु कार्य-बाहुल्या मुळे ते शक्य होत नाही...नंतर सर्व भाग एकत्र प्रकाशित करेन... तर या तंत्रा मध्ये एकटोप्लाझ्म नावाच्या द्रव्याची विशेष महती आहे . एकटोप्लाझ्म नावाचे द्रव्य मानवी शरीरा सभोवती लपेटलेले असते .ज्याला ऑरा असे म्हणतात .हे द्रव्य अतिशय विरळ असून ते वायुरूप असते . या द्रव्यला जीव-द्रव्य असेही म्हणतात . निरोगी व्यक्तीचा ऑरा चांगला सशक्त/ शुभ्र असतो ,तर एखादा किंवा अनेक शारीरिक/मानसिक रोग झालेल्या व्यक्तीचा ऑरा हा निर्बल व काळपट/पिंगट असतो जगात अनेक ठिकाणी अनाकलनीय रोगांचे निदान करण्यासाठी / आध्यात्मिक रोगांचे निदान करण्यासाठी ऑरा रीडिंग चा आधार घेतला जातो . तर पूर्वोल्लेखीत वामाचारी दुष्ट तान्त्रीकाना या एकटोप्लाझ्म मध्ये फार रस असतो . दुसऱ्या व्यक्तीचे एकटोप्लाझ्म पळवणे /त्यासाठी ऑरा वर हल्ला करणे यासाठी ते नानाविध उपाय योजत असतात . हे सर्व प्रकार जाणीवेच्या निराळ्या पातळीवर घडतात ज्याला astral world असे नाव आहे. भारतीय आध्यात्म-शास्त्रात त्याला भुवर्लोक असे म्हणतात . अमेरिका-स्थित डॉक्टर ब्रूस गोल्डबर्ग या शास्त्रज्ञाने लिहिलेल्या self-defense from psychic attacks या पुस्तकात या प्रकार बाबत सविस्तर चर्चा केलेली आहे . तर हे शाक्त तांत्रिक रात्रीच्या वेळी व विशेषत: पहाटे सूक्ष्म-देहाने संचार करून लोकांचे व मृतात्म्यांचे एकटोप्लाझ्म पळवतात .त्यासाठी आपले भूवर्लोकीय पातळी वरील गुंड-मवाली त्यांनी पाळलेले असतात .यालाच astral group किंवा underworld असे म्हणतात .व या गुंडाना energy vampires अशी संज्ञा आहे . हे मवाली जिवंत व मृत अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तीचे एकटोप्लाझ्म पळवतात , त्यासाठी ते स्मशानात जावून तेथील मृतात्म्यांना वश करून त्यांचे जीव-द्रव्य पळवतात तंत्र आणि अध्यात्म यातील मोठा फरक म्हणजे नीतीमत्ता .खऱ्या आध्यात्मिक सद्गुरुंकडे नीतीमत्ता ,माणुसकी,,दया-क्षमा -शांती आढळते ,पण या दम्भाचारी तांत्रिक गुरूंच्या ठायी नीतीमत्ता आणि इतर सद्गुण औषधालाही सापडणार नाहीत . खरे सद्गुरू शिष्याच्या अहंकाराचा विलय करून त्यास ईश्वर-चरणी स्थिर करतात ,तर हे दांभिक गुरु शिष्याच्या/गिऱ्हाईकाच्या अस्मितेवरच हल्ला करून त्याचे व्यक्तिमत्त्व नासवून टाकतात .त्याला एक बाहुला बनवतात ,जो कथित गुरूच्या लहरीवर अवलंबून राहील ,त्यासाठी वशीकरण आणि तत्सम साधनांचा वापर केला जातो. साधक हा अहंकार आणि काम-क्रोध-लोभ-मद-मोह-मत्सर या विकारांपासून मुक्त असावा अशी आध्यात्माची पहिली गरज आणि पात्रता असते ,परंतु तंत्रात द्वेष,मत्सर,दंभ आणि अहंकार यांनी लडबडलेले गुरु आणि शिष्य ठायी-ठायी आढळतात .तंत्राचे सगळे विधी करण्या मागचे उद्देश दुसऱ्याचे वाईट करणे /लुबाडणे किंवा स्त्रीमोह असेच असतात . खरा सद्गुरू हा लोकेषणा,वित्तेषणा आणि पुत्रेषणा अशा तीन मोहापासून निर्मुक्त असतो ,म्हणजे त्याला कीर्ती/प्रसिद्धी यांची हाव नसते,,तसेच त्याला पैशाचा मोह नसतो आणि आपल्या पोराबालांचे कसे होई,,? असा स्वार्थ नसतो.असे साईबाबा म्हणत .साईबाबा नी खरा गुरु ओळखण्यासाठी ह्या तीन चाचण्या सांगितल्या आहेत .त्यात आपण कोणत्याही गुरूला पारखून घ्यावे. स्वार्थ,अहंकार,दंभ,दुराग्रह,हट्ट,दुराभिमान यात गळ्यापर्यंत बुडालेल्या अशा तान्त्रीकाना गुरु म्हणणे म्हणजे भारतीय अध्यात्माचा अपमान आहे .हे नीच आसुरी प्रवृत्तीचे गुंड आपल्या झोटिंग-शाहीने निष्पाप कोवळ्या जीवना नाडत असतात ,यास्तव सावधान !!!!!!!!!!!!!!!! सदरहू लेख आमचे एक स्नेही जे छोटा भीम या टोपण-नावाने लेखन करतात ,त्यांनी गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेला आहे. त्यांच्या रीतसर पूर्व-परवानगीने हा लेख इथे देत आहे. धन्यवाद. -रमेश भिडे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
63114 वाचन

💬 प्रतिसाद (94)

प्रतिक्रिया

जरा सविस्तर लिहा की...

धन्या
Sat, 02/23/2013 - 01:46 नवीन
खुपच त्रोटक प्रतिसाद आहे तुमचा.त्यामुळे खुप प्रश्न पडलेत. पंच मकार साधना ही ब्रम्हदेवाने सनकादीकाना सांगितल्यावर सनकादिकानी काय केले?
कारण मूळातच वैराग्यामुळे देहबुद्धीचा नाश झालेला असल्याने सृष्टी पुढे चालावी म्हणून ब्रम्हदेवाने केलेली ही योजनाच होय.
कुणाच्या देहबुद्धीचा नाश झाला होता? एकंदरीत तेव्हाच्या सार्‍या मानवजातीचा का? हे चार युगांपैकी कोणत्या युगात घडले? पाच मकार साधनेने नेमके काय झाले? "वाट चुकलेला माणूस" पुन्हा मार्गावर आला का?
आणि म्हणूनच ती आताच्या काळात त्याज्य आहे.
ते कसे काय? जर वैराग्यामुळे नाश झालेल्या देहबुद्धीची जाणिव होण्यासाठी ब्रम्हदेवाने पाच मकार साधना सांगितली तर मग त्यात सातत्य राहण्यासाठी या साधनेची गरज उरली नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

फक्त शेवटचा पॅराग्राफ पुरेसा

कवितानागेश
Fri, 02/22/2013 - 01:23 नवीन
फक्त शेवटचा पॅराग्राफ पुरेसा होता की. खरा सद्गुरू हा लोकेषणा,वित्तेषणा आणि पुत्रेषणा अशा तीन मोहापासून निर्मुक्त असतो ,म्हणजे त्याला कीर्ती/प्रसिद्धी यांची हाव नसते,,तसेच त्याला पैशाचा मोह नसतो आणि आपल्या पोराबालांचे कसे होई,,? असा स्वार्थ नसतो.असे साईबाबा म्हणत .साईबाबा नी खरा गुरु ओळखण्यासाठी ह्या तीन चाचण्या सांगितल्या आहेत .त्यात आपण कोणत्याही गुरूला पारखून घ्यावे. स्वार्थ,अहंकार,दंभ,दुराग्रह,हट्ट,दुराभिमान यात गळ्यापर्यंत बुडालेल्या अशा तान्त्रीकाना गुरु म्हणणे म्हणजे भारतीय अध्यात्माचा अपमान आहे .हे नीच आसुरी प्रवृत्तीचे गुंड आपल्या झोटिंग-शाहीने निष्पाप कोवळ्या जीवना नाडत असतात ,यास्तव सावधान !!
  • Log in or register to post comments

http://en.wikipedia.org/wiki

आशु जोग
Sat, 02/23/2013 - 01:26 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Planchette हे खरे आहे का आणि automatic writing, म्हणजे काय
  • Log in or register to post comments

http://en.wikipedia.org/wiki

धन्या
Sat, 02/23/2013 - 01:38 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Planchette हे खरे आहे का
तुम्ही करुन बघा की. झालं की इथे धागा टाका. :)
automatic writing, म्हणजे काय
फारच उत्सुकता असेल तर द लॉज ऑफ स्पिरीट वर्ल्ड हे पुस्तक वाचा. हे पुस्तक मराठीत "जीवात्म जगताचे कायदे" या नावाने मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

अरे वा !

उडन खटोला
Sun, 01/26/2014 - 19:11 नवीन
फारच माहितीप्रद लेख अन अतिशय उद्बोधक चर्चा !
  • Log in or register to post comments

आई शप्पत असल्या विषयावरचा लेख

म्हैस
Tue, 01/28/2014 - 16:23 नवीन
आई शप्पत असल्या विषयावरचा लेख मी प वर मी प वर ? खरा तर मला पण खूप लेख लिहायचेत . पण मी प वर नाही टाकावेसे वाटत. :-(
  • Log in or register to post comments

लेखाची सुरुवात तंत्र

म्हैस
Tue, 01/28/2014 - 16:48 नवीन
लेखाची सुरुवात तंत्र विद्येच्या माहितीने झाली. मग पुढे वेगळ्याच दिशेला भरकटला.
  • Log in or register to post comments

ह्म्म्म..रोचक लेखन.

मदनबाण
गुरुवार, 02/06/2014 - 04:26 नवीन
ह्म्म्म..रोचक लेखन. जर विशिष्ट साधना /उपासना किंवा विज्ञान-निष्ठ brainwave entrainment सारखे उपाय केल्यास मेंदूच्या या सुप्त शक्ती जागृत करता येतात .तसे केल्यास मेंदू अधिक तल्लख आणि अंतर्मन अधिक शक्तिशाली बनते . brainwave चा वापर करुन चांगल्या प्रकारचे मेडिटेशन नक्कीच करता येते,यातल्या Binaural beats,Monaural beats आणि Isochronic tones चा मी स्वतः अनेकवेळा वापर केला आहे.याचे Alpha,Beta,Theta,Delta,आणि Gamma असे प्रकार मी ऐकले आहेत.तिबेटियन सिंगींग बाउल किंवा हिमालयन सिंगींग बाउल याने सुद्धा उत्तम मेडिटेशन करता येते.यात सुद्धा डीप टोन सिंगींग बाउल्सचा अनुभव अप्रतिम आहे.माझ्या माहितीनुसार याचे अमेरिकेत अगदी सर्टीफाइड कोर्सेस देखील आहेत्,आणि लोक पैसे देउन मन शांतीसाठी हे सेशन अटेंड करतात. तीच गोष्ट दारू आणि इतर मादक द्रव्य (अफू, गांजा इत्यादी) यांचे आहे. हे घेऊन ध्यान करायचा प्रयत्न करणारे असतातच. जर कुणी इथे गांजा घेतला असेल तर सांगा, अनुभव काय होता. दारु चे माहित नाही पण गांजाचा हा उपयोग माहित आहे,भांगेने देखील हाच परिणाम साधता येउ शकतो.मी याला एक प्रकारचा शॉर्टकट म्हणीन ज्याने तुम्हाला पटकन ध्यान एकाग्र करण्यास कमालीची मदत होते.अर्थात हे असे करणारे कमी आणि त्याचा व्यसन म्हणुन वापर करणारे अधिक. कुंभमेळा सुरु होण्याच्या आधी बरेच साधु कित्येक महिने आधी ज्या ठिकाणी कुंभ आहे त्या ठिकाणच्या आसपास या मादक पदार्थांची शेती करतात्,यात सुद्धा खरे योगी वेगळे,आणि नावाचे योगी वेगळे. अधिक एकदा समाधी अनुभवता येऊ लागली कि बरेच लोक हि सपोर्ट सिस्टीम वापरायचे सोडून देतात. सहमत आहे. बाकी ऑरा विषयी ठावुक होते,अनेक चित्रांमधे {देवतांच्या}विशेषतः डो़क्याच्या भोवताली हा ऑरा दाखवला जातो. उदा. खाली दिलेल्या बुद्धाच्या चित्रात त्यांच्या डोक्याभोवताली. Image removed. बाकी ही ऑरा {Aura} ची पळवा-पळवी मात्र पहिल्यांदाच वाचली !
  • Log in or register to post comments

जिज्ञासूंसाठी सर्वकाही

रमेश भिडे
Wed, 09/02/2015 - 08:06 नवीन
http://sivasakti.net/
  • Log in or register to post comments

सर्वप्रथम जुन्या धागा वर

प्रसाद गोडबोले
Wed, 09/02/2015 - 12:40 नवीन
सर्वप्रथम जुन्या धागा वर काढल्या बद्दल आभार ! ह्गी लिन्क ऑफीसात ओपन होत नाही , इथेच त्या साईट वरील काही काही माहीती द्या ना गडे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

विद्येद्वारा अनेक प्रकारे

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/02/2015 - 09:08 नवीन
विद्येद्वारा अनेक प्रकारे शत्रूला त्रास देणे किंवा सुंदर स्त्री ला मोहात पडून वश करणे / पुण्य चोरणे इत्यादी कामे केली जातात . ब्लॅकहैट हैकिंग सारखा प्रकार दिसतोय हां!!!
  • Log in or register to post comments

तंत्र विद्येची ओळख कुठेय ओ

तुडतुडी
गुरुवार, 09/03/2015 - 17:16 नवीन
तंत्र विद्येची ओळख कुठेय ओ ह्याच्यात . बाकीचाच फाफटपसारा लिहिलाय
एका सिरीयल किलर ला तीच मानसिक शांती मिळते याचा अर्थ हां आहे कि पण त्याचे संतुलन बिघडले आहे आणि तो आता इतरांसाठी धोका झाला आहे. अघोरी तांत्रिकांचे तेच असते.
चूक . सगळ्यांना एका तराजूत तोलल्यासारख लिहिलंय. अघोर तांत्रिक आणि स्वार्थी तांत्रिक ह्यांच्यात खूप फरक आहे . अघोर तांत्रिक शुद्ध , लखलखीत असतो . 'अघोर तंत्र' हि फार वेगळीच शाखा आहे तंत्राची . खराखुरा अघोरी तांत्रिक कधीही मांस खात नाही कि घाणेरड्या गोष्टी करत नाही . मुद्दामच तो त्या गोष्टी करतो असं जगाला दाखवत असतो . दुर्गम भागात किवा घाणेरड्या जागेत , घाणेरडा वेष घेवून राहतो . कारण त्याला ईश्वराशिवाय आसपास कोणाचही अस्तित्व नको असतं .
ज्यांनी विडीयो पाहीला त्यांच्या मनातील तंत्र शाक्त अघोर संप्रदायाविशयीची क्युरीयॉसीटी संपली असेल तर कृतीचे सार्थक झाले असे वाटेल.
तंत्र शाक्त अघोर संप्रदायाचा अभ्यास नसताना त्या बद्दल गैरसमज पसरवू नयेत .
अशाप्रकारच्या विषयांवर लिहिलेले लेख मिपावर वारंवार का येतात? अशा लेखांना प्रतिबंध करण्यासाठी काही करता येणार नाही का?
तुम्हाला वाचायची कोणी सक्ती केलीये का ? ह्या प्रकारचे लेख येत नाहीत म्हणूनच खूप गैरसमज आहेत
असलं काही खरच असतं तर टिचभर इंग्रज या देशाव्र १५० वर्षे टिकु शकले असते काय ? शेकडो वर्षांची मोगलाइ नांदली असती काय ?
तुम्हाला लेख समजलाच नाहीये हे दाखवून दिलंत. तंत्र विद्या म्हणजे काहीतरी चुकीची , घाणेरडी विद्या असाच सूर दिसतोय सगळ्या प्रतिसादांचा . फार थोडे अपवाद सोडून . आद्य शंकराचार्यांनी शाक्त तंत्राचा (दूरू )उपयोग करणाऱ्यांना यमसद्नाला धाडल्यानंतर ते आदिशक्ती च्या दर्शनाला गेले . पण त्यांना असं जाणवलं कि त्यांची सगळी शक्ती नष्ट होत आहे . ते अत्यंत क्षीण आणि अशक्त झाले . अगदी एक पाऊल सुधा पुढे टाकायची किवा डोळे उघडून बघण्याची सुधा शक्ती त्यांच्यात राहिली नाही . त्यांनी देवीची करुणा भाकली . आणि तिच्या दर्शनासाठी तिची आळवणी केली . तेव्हा देवी प्रकट होवून म्हणाली , "तू तंत्राचा दुरुपयोग करणाऱ्या दुष्टांचं हनन करताना खर्या सात्विक , तंत्रीकांचं सुधा हनन केलंस. का तर ते शाक्त पंथीय आहेत म्हणून ? त्यामुळे मी तुझ्यावर रागावले आहे आणि तुझ्यातला शक्तीचा अंश काढून घेतला आहे ". शंकराचार्यांना आपली चूक उमगली . त्यांनी तिची माफी मागून तिला प्रसन्न करण्यासाठी तिची स्तुती केली . मग त्यांना त्यांची शक्ती परत मिळाली .
  • Log in or register to post comments

+१

द-बाहुबली
गुरुवार, 09/03/2015 - 17:26 नवीन
तुडतुडी-G तुम्ही मिपावर बर्‍याच लोकांचे गैर्समज फार सुरेख अन मुद्देसुद दुर करत आहात. किंबहुना मला तर आपल्यामधे काही दैवी शक्तीचा अंश असावा अशीही शंका येउ लागली आहे. आपण नक्किच महान साधक असणार. _/\_ लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

क्या बात है, मिपावर बाहुबलीही

बॅटमॅन
गुरुवार, 09/03/2015 - 17:35 नवीन
क्या बात है, मिपावर बाहुबलीही आला तर! कट्टप्पाही अगोदरपासून आहेच, आता भल्लाळदेवा, सिवगामी आणि कालकेय वगैरे आयड्यांची वाट पाहणे आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

अरे बॉमकेस बाबुंचे स्थित्यंतर

द-बाहुबली
गुरुवार, 09/03/2015 - 17:37 नवीन
अरे बॉमकेस बाबुंचे स्थित्यंतर झालयं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओ द-बाहुबली ,मी महान साधक

तुडतुडी
Fri, 09/04/2015 - 14:31 नवीन
ओ द-बाहुबली ,मी महान साधक वगेरे नाहीये . पण बनण्याचं स्वप्न नक्कीच आहे . साधना चालू अहे. गेल्या ६ वर्षांपासून साधना , देव , अध्यात्म , धर्म ह्या विषयांचा अभ्यास चालू आहे . भरपूर पुस्तकांचं वाचन झालं आहे . बर्याच लोकांना भेटणं झालं आहे . काही साधना मी स्वतः केल्या आहेत आणि अनुभव हि घेतले आहेत . पुढेही हा उद्योग चालू राहील. तंत्रविद्येचा theoratical अभ्यास आहे . practical साठी अजून कोणी समर्थ गुरु नाही मिळाला
  • Log in or register to post comments

तुडतुडी, आपलं बर्याच लोकांना

द-बाहुबली
Fri, 09/04/2015 - 15:24 नवीन
तुडतुडी, आपलं बर्याच लोकांना भेटणं झालं आहे . काही साधना आपण स्वतः केल्या आहेत आणि अनुभव हि घेतले आहेत . याबद्दल जरुर वाचायला आवडेल. अवश्य लिहा ( हे अनुभव प्रकट करायचे नसतात असे मात्र म्हणू नका प्लिज)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

अगागा!

पैसा
Fri, 09/04/2015 - 21:56 नवीन
ते अघोरी विद्येचे प्रयोग आमच्या मिपावर करू नका प्लीज!
  • Log in or register to post comments

पुढील भागाच्या प्रतिक्षेत ...

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 06/02/2016 - 16:40 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत ...
  • Log in or register to post comments

अरे कर्मा....... :(

अनंत छंदी
गुरुवार, 06/02/2016 - 17:07 नवीन
अहो भिडेजी ते तुमचे मित्र छोटा भिम की कोण ते अगदी नावाप्रमाणेच बालबोध लिहितात हो. आद्य शंकराचार्यांनी म्हणे तांत्रिक विद्येची निंदा केली...... शंकराचार्य : तांत्रिक साधना भाग १ व २, प्रकाशक चौखंभा, वाराणसी वाचा म्हणजे शंकराचार्यांनी तांत्रिक साधनेची निंदा केली किंवा कसे हे कळेल. गौडपादाचार्य हे शंकराचार्यांचे शिष्य तंत्रमार्गाचा अवलंब करायचे. तंत्र आजही आपल्या धर्मोपासनेत आहे.
  • Log in or register to post comments

भिडेजी, या तंत्र विद्येचा

सतिश गावडे
गुरुवार, 06/02/2016 - 20:35 नवीन
भिडेजी, या तंत्र विद्येचा प्रयोग मिपा संपादकांवर करुन आयडी उडवला जाणार नाही याची काही तजवीज करता येईल का? काही लोक दरवेळी काहीतरी नविन आयडी घेऊन येतात आणि काड्या करतात. संमं असे आयडी उडवते. तुमच्या या तंत्र विद्येचा त्यांना उपयोग होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments

किंवा सामूहिक यज्ञ वगैरे असे

अभ्या..
गुरुवार, 06/02/2016 - 21:20 नवीन
किंवा सामूहिक यज्ञ वगैरे असे काही. एकदाच कंडका पाडून टाकू तिज्यायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुमचं निरीक्षण चुकलं आहे.

रमेश भिडे
Fri, 06/03/2016 - 08:42 नवीन
तुमचं निरीक्षण चुकलं आहे. अभ्यास वाढवा. तंत्र विद्येबाबत नंतर बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

निरीक्षण बरोबर आहे. :)

सतिश गावडे
Fri, 06/03/2016 - 09:10 नवीन
निरीक्षण बरोबर आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

अनेकांना मी लिहिलंय ते पटणार

संन्यस्त खड्ग
गुरुवार, 07/01/2021 - 04:55 नवीन
अनेकांना मी लिहिलंय ते पटणार नाही पण जे माहीत आहे ते सांगतो आहे। मुलींना पटवून दुरुपयोग करण्यासाठी अनेक जण Black magic चा सर्रास उपयोग करत आहेत। आणि आपण तसलं काही नसतं हो म्हणून आधुनिक बनायला बघतोय। समोर result दिसतअसताना। हे शंभर टक्के खरे आहे पण आपल्या हिंदू समाजातील अति विद्वानांना हे मान्य नसते. नित्य उपासनेचे बळ नसणाऱ्या कुटुंबातील मुली या प्रकाराला बळी पडतात. विश्वास बसत नसला तरी खरंय हे_!!! मी जेव्हा लव्हजिहाद सारख्या प्रकरणात समुपदेशक म्हणुन जाते, तेव्हा असे प्रकार पाहायला मिळतात_!! मुलींवर अंमल असतोचं असतो_!! आई वडिलांना, पुढारलेल्या लोकांना खोटं वाटतं, पण डोळ्यानी पाहिलं की, पोरीचं काय झालं असतं या विचाराने पायाखालची जमीन सरकते_!! अवघड परिस्थिती आहे_!!! लोकांना समजावुनही पटत नाही, अशावेळी शांत राहुन जे होईल ते बघणे, इतकंच आपण करु शकतो_!! ह्या प्रकाराला दही वाटी प्रयोग म्हणतात, आणि हे शांती दूत आपली वासना विझवण्यासाठी करतात। जी चांगली मुलगी असते आणि दिसते आणि उच्च जातीची असेल तर बघायलाच नको. हे सर्व प्रकार शाळा, कॉलेजेस, सर्व प्रकारचे कोचिंग आणि ट्युशन वलासेस येथे चालतात. सुरवातीला ओळख नंतर घसीत वाढवायची आणि त्यानंतर मुद्दामून शाकाहारी सतत घरून डबा आणायचा आणि त्यात दही असतेच असते आणि तो डबा आपल्या सावजाला शेयर करायला लावायचा,फक्त एका आठवडयात मुलगी वश आणि मग ओयो रुम्स नंतर निकाह आणि धर्म बदल. हे मी गेली 40 वर्षे बघत आहे आणि सगळयांना सांगत आहे , आपल्या मुलांची संगत कोणाशी आहे ते बघा, त्यांची वागणूक बदली आहे तर कानाडोळा करू नका, कोणाचे सारखे फोन येतात ते चेक करा नाहीतर एकदम चार पाच जावाई स्वीकारण्याची तयारी ठेवा. मित्रानो मी हे अगदी जवळून पाहिले आहे आणि बरेच शांतिदूत माझे शाळेपासून मित्र आहेत, पण काय करणार? सत्य कटू आह. आपल्या मुलींना आणि मुलांना सुध्दा सांभाळा सर्वात महत्वाचे ह्या लोकांचे देव लवकर वश होतात आणि आपल्या देवांचे ह्या प्रयोगा समोर काही चालत नाही हा अनुभव आहे आणि हे लोक पाप पुण्य असे काही मानत नाहीत। बस मला फार काही माहीत नाही, मी एक साधारण आणि अति सामान्य गरीब हिंदू भारतीय आहे। धन्यवाद।
  • Log in or register to post comments

महालोल !

कॉमी
गुरुवार, 07/01/2021 - 07:45 नवीन
१. पावरबाज दही. च्यामारी कालेजात आमच्यावर प्रयोग झालेत का काय ? भरपूर दही वाट्या खाल्ल्या आहेत. आता आमच्यावर दही वाटी प्रयोग कोणी का करतील प्रश्न वेगळा. २. चार पाच टोकन शांतिदूत मित्र सेफ्टी म्हणून असावेतच. नाहीतर द्वेष्टे म्हणतील लोकं. पण तुम्हाला चार पाच मित्र आहेत ना, मग माफ, काही पण बोलणे खपवले जाईल. ३. देव पण पावरबाज ? आता कसं व्हायचं मग ?! ४. हे लोक पाप पुण्य काही मानत नाहीत - काय सांगता ! कोण आहेत "हे" शांतिदूत कन्फ्युज झालो या वाक्यामुळे. कोण आहेत शांतिदूत स्पष्टपणे सांगा जरा. ५.
मित्रानो मी हे अगदी जवळून पाहिले आहे
असं ! दह्याची वाटी उडवली कि नाही मग, कि खाऊ दिलं तसेच ? जवळ होता म्हणून विचारलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संन्यस्त खड्ग

सर्वात महत्वाचे ह्या लोकांचे

गॉडजिला
गुरुवार, 07/01/2021 - 18:13 नवीन
सर्वात महत्वाचे ह्या लोकांचे देव लवकर वश होतात आणि आपल्या देवांचे ह्या प्रयोगा समोर काही चालत नाही हा अनुभव आहे
आता आपले देवच फेल जात असतील तर विषयच मिटला... पण हो परधर्मातील स्त्रीचा सां,दाम,दंड भेद करून भोगासाठी वापर ही अहिंदू मानसिकता राखणारे अनेक लोक प्रत्यक्षात पाहिले असल्याने ही मानसिक प्रवृत्ती सखोल अस्तित्वात आहे हे भीषण वास्तव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संन्यस्त खड्ग

हिरोईनवर चालेल का ते ब्लॅक

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/01/2021 - 21:58 नवीन
हिरोईनवर चालेल का ते ब्लॅक मॅजिक??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संन्यस्त खड्ग

हे शांती दूत आपली वासना

मदनबाण
गुरुवार, 07/01/2021 - 08:24 नवीन
हे शांती दूत आपली वासना विझवण्यासाठी करतात। तंत्र विद्येचे माहित नाही, पण अजुन एका सोप्या पद्धतीने अशांती दूत हिंदू मुलींना सहज जाळ्यात अडकवतात. ज्या परिसरात हिंदू आणि मुस्लिम वस्ती जवळ जवळ असते तिथे अनेक मोबाइल चार्जिंगची दुकाने असतात. हिंदू मुली / स्त्रिया जेव्हा अश्या दुकानांमध्ये मोबाइल रिचार्ज करायला जातत तेव्हा त्यांचे मोबाइल नंबर तिथेच ठेवलेल्या वहीत नोंदवुन ठेवले जातात... मग हळुहळु हिंदू नावांनी त्यांच्याशी फोन वरुन संपर्क साधला जातो. आता तर व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर अ‍ॅप्लिकेशन्स आहेत. आधी मैत्री मग मैत्रीतुन सलगी वाढवली जाते, मग सेल्फी प्रकारातुन फोटोंची देवाण घेवाण...असे करत करत मग प्रत्यक्ष भेट [ पाठवलेल्या फोटोतुन ब्लॅकमेलिंग करुन देखील बोलवले जाते ] मग अश्या मुलींना खोलीत नेले जाते आणि सरळ बलात्कार केला जातो. जो ओळखीचा मुलगा [सावज टिपण्याची कामगिरी ज्याला दिली असते ] तो तर बलात्कार करतोच पण त्याच बरोबर इतर तरुणही लाईनीत खोलीच्या बाहेर वाट बघत थांबलेले असतात. एकाने बलात्कार केला की आळी-पाळीने बाकीचे देखील त्याच मुलीवर बलात्कार करुन त्यांची क्रूर वासना शमवतात. याचे मोबाइल किवा इतर कॅमेरा वापरुन चित्रिकरण करतात आणि ती मुलगी मग कायमची यांची भोगण्याची लोंढी होउन जाते, याच मुलीला भरास पाडुन मग तिच्या जवळच्या मैत्रिणी- इतर घरातील स्त्रिया देखील अश्याच आळी-पाळीने भोगल्या जातात. [ यात इतर प्रकार केला जातो तो मी इथे उघडपणे लिहु शकत नसलो तरी सांगतो की अश्या चित्रफिती ऑनलाईन वितरीत केल्या जातात ज्यात हिंदू मुलीचा चेहरा [ टिकली लावलेली, गळ्यात मंगळसुत्र असलेली दाखवतात आणि तिचा भोग घेणारा अशांतीदूत त्याची वेगळ्या पद्धतीने ओळख स्पष्ट करतो. हा मानसिक अत्याचाराचा उपयोग करण्यासाठी आहे, ज्यात अशांतीदूत पहा तुमच्या मुली कशा भोगुन काढतो हे बिंबवायचे असते ] स्पष्ट दाखवला जातो. तेव्हा हिंदू स्त्रियांनो आणि मुलींनो सावधान ! आपला नंबर कुठेही देताना सतर्कता ठेवावी आणि अनोळखी अगदी हिंदू नावाच्या मुलाशीही अनोळखी नंबर वरुन येणार्‍या कॉल्सवर बोलणे टाळावेच आणि कुठलीही व्यक्तिगत गोष्ट अश्या नंबर्सवर शेअर करु नये.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Anjali Anjali Video Song | Duet Tamil Movie | Prabhu | Meenakshi | Ramesh Aravind | AR Rahman
  • Log in or register to post comments

देव अपयशी होऊ नयेत यासाठी ....

गामा पैलवान
गुरुवार, 07/01/2021 - 18:53 नवीन
गॉडझिला,
आता आपले देवच फेल जात असतील तर विषयच मिटला...
म्हणूनंच आपण साधना करून देवांना बळ पुरवायचं असतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

तुम्ही कोणत्या देवाला पावर दिली

गॉडजिला
गुरुवार, 07/01/2021 - 18:58 नवीन
हे जरा विस्तारून सांगता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

उदा . : अतृप्त पितर

गामा पैलवान
Fri, 07/02/2021 - 01:56 नवीन
गॉडझिला, एक उदाहरण देतो. साधना असली की पितर अतृप्त रहात नाहीत. पितर तृप्त असतील तर जातक काळ्या जादूच्या तडाख्यात सापडायची शक्यता उणावते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

तुम्ही कोणत्या देवाला पावर दिली

गॉडजिला
Fri, 07/02/2021 - 15:59 नवीन
सांगता का जरा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

पितर, गणपती, इत्यादि

गामा पैलवान
Fri, 07/02/2021 - 19:20 नवीन
गॉडझिला, पितरांना दिली. त्यांनी पुढे पाठवली असू शकते. दरवर्षी गणपतीस देतो. गणपतीबाप्पा मोरया असा जयघोष करून. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

गणपती स्वतःच्या पावरसाठी

टवाळ कार्टा
Fri, 07/02/2021 - 20:47 नवीन
गणपती स्वतःच्या पावरसाठी आपल्यावर अवलंबून आहे हे ऐकून मौज वाटली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

:)

गॉडजिला
Fri, 07/02/2021 - 22:05 नवीन
बौध्दीक पावर गणपतिने काढुन घेतल्यामुळे वाटत असावे की ते गणपतिला पावर देतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चुकताहात तुम्ही

गामा पैलवान
Sat, 07/03/2021 - 02:22 नवीन
टवाळ कार्टा, पावरसाठी गणपती माझ्यावर अवलंबून नाही. पावरसाठी मी गणपतीवर अवलंबून आहे. नैवेद्यासाठी देव भक्तावर अवलंबून नसतो. उलट नैवेद्यासाठी भक्त देवावर अवलंबून असतो. तसंच पावरचं समजा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पण तुम्हीच म्हणाला की देवाला

कॉमी
Sat, 07/03/2021 - 18:11 नवीन
पण तुम्हीच म्हणाला की देवाला बळ पुरवायचं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

सर्व प्रकारची मत

Rajesh188
गुरुवार, 07/01/2021 - 22:08 नवीन
सर्व प्रकारची मत,सर्व प्रकारच्या विषयावरील लेख ,सर्व. प्रतिक्रिया कोणाला आवडत नाहीत ,पटत नाहीत म्हणून चुकीच्या नाहीत. जर कमेंट,लेख,ह्या मध्ये एकध्या समाज घटका विषयी,व्यक्ती विषयी तिरस्कार नसेल तर .फक्त काही लोकांना आवडत नाही ,पटत नाही . म्हणून प्रशासन( मीपा ) नी हस्तक्षेप करू नये.
  • Log in or register to post comments

@गामा पैलवान

गॉडजिला
Fri, 07/02/2021 - 16:07 नवीन
आ.न., -गा.पै.
गामा फार नम्र होते म्हणुन आपण नेहमी आ. न. असे प्रतिसादात लिहता हे फार छान वाटते पण तुम्ही जे प्रतिसाद लिहता तसले विचार गामाजिंनी कधिच मिपावर लिहले नसते मांडले नसते त्याबाबत तुम्ही त्यांच्यावर अन्याय करत आहात असे वाटत नाही का ?
  • Log in or register to post comments

कुणितरी धर्म वेगळे असले तरी

नावातकायआहे
Fri, 07/02/2021 - 20:58 नवीन
कुणितरी धर्म वेगळे असले तरी देव एकच आहे असे काहितरी चुकिचे विधान केल्याचे स्मरते. आता देवा देवात पण पॉवर वाटली जाते. मग लोकसंख्यांच्या आधारे , येशू, मोहम्मद, तटस्थ, न मानणारे मग हिंदू!! तटस्थ, न मानणारे यांचे काय होते?
  • Log in or register to post comments

पण पण पण

शा वि कु
Fri, 07/02/2021 - 21:36 नवीन
अद्वैत तत्वज्ञानानुसार सगळंच एक आहे अशी समजूत आहे अशी माझी समजूत आहे. अशी पावर वाटली जात असेल तर ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू तिघांची पावर एका देवाला मिळणार आणि तो किती पावरफुल होणार. (येशू आणि मोहम्मद देव नाहीत ना ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

तटस्थ, देव न मानणारे यांच्या

नावातकायआहे
Fri, 07/02/2021 - 22:18 नवीन
तटस्थ, देव न मानणारे यांच्या पॉवरचे काय होते? का ते " आमाला पावर नाय " मानतात?? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

देव न मानणारे

शा वि कु
Fri, 07/02/2021 - 23:13 नवीन
त्यांची पावर तेच स्वतः वापरत असावेत बहुतेक. गामांना माहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा