जेथे जातो तेथे तु माझा सांगाती
मुक्तक - प्रकटन लेखनप्रकार मुद्दामच निवडला या लेखासाठी. कारण जे काहि टंकलय ते दिसायला जरी धार्मीक वगैरे असलं तरी ते आहे "टंकाव्या चार ओळी अधुन मधुन" याच उद्देशाने.
सध्या क्लिंटन राव देवाच्या रिटायर्मेण्ट सारख्या अत्यंत ज्वलंत आणि जागतीक सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन अत्यंत संवेदनशील अशा उद्योगात पार गुंतुन गेलेत. देवांचा खजीनदार कुबेर अगदी ब्लँक चेक घेऊन क्लींटनरावांच्या दारी आला व "आमची नोकरी वाचवा हो" अशी आर्त विनवणी करु लागला. काय करणार बिचारा... मिपावरचे शांडील्यादी मुनीवर्य बिचर्या देवांच्या पोटावर पाय द्यायला निघलेत म्हटल्यावर देवांना काहि एक्शन घेणं भाग होतं :) तिथे अशी ज्ञानगंगा वाहताना दिसतेय, तेंव्हा आम्हि देखील आमचे हात धुवुन घ्यावे असा अनावर मोहं झाला... आणि टंकल्या चार ओळी.
विषय अर्थात जगातला सर्वात त्रस्त प्राणी, ज्याला बरेच लोक देव म्हणतात, त्याच्याबद्दल आहे.
क्लींटनचा मूळ मुद्दा असा कि 'देव' या 'कल्पनेचा' 'बीग ब्रदर इस वॉचींग यु' यासारखा सकारात्मक उपयोग होत असेल तर तसा उपयोग का करु नये... त्याला सिम्पल उत्तर असं कि त्या 'कल्पनेचा' खरच उपयोग होत असेल तर ज्याचा त्याने अवष्य करावा. राहिला भाग त्या 'कल्पनेच्या' दुरुपयोगाचा, तर उपयुक्ततावादाच्या सर्व मर्यादा (दुधारी तलवारीप्रमाणे स्वघात करणे) या 'कल्पनेला' देखील लागु होतात.
या सर्व वादाचं मूळ म्हणजे 'देव' हि 'कल्पना' म्हणुन स्विकारणे. आणि त्यावादाचं एकमेव सोल्युशन म्हणजे 'देव' हि कल्पना नसुन ते एक 'तत्व' आहे... किंबहुना ते मूळतत्व आहे हा उलगडा.
श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे देव, किंवा भक्ती म्हणुया, या सत्याला अक्षरशः प्रचंड वैविध्यपूर्ण मार्गाने प्रतिपादीत केल्या जाउ शकतं.. किंबहुना तसं केल्या गेलय.
बुद्धाने सत्याला "शुन्य" म्हटलं. पण या शुन्याला "व्होईड" म्हणुन कन्सीडर केल्या गेलं आणि इथेच आकलनाची गोची झाली. तांब्याची तार हवेत धरा, त्यातला करंट "व्होईड" आहे. ती तार "ग्राउण्ड" केली असेल तर तो "झीरो" आहे. बुद्धाने अस्तीत्वाला व्होईड म्हटलेलं नाहि. बुद्धाचा शुण्य (कशाच्याही, कुणाच्याही आत-बाहेर काहिच नाहि) नकारात्मक नाहि, अस्तित्वहीन नाहि... तर तो बॅलेन्स पॉईंट दर्शवणारा आहे. तो सम-आणि-विषमचा मध्य आहे. तो तराजुच्या दोन पारड्याचा इक्वीलिब्रीयम पॉईंट आहे... बुद्धाचा रोख या इक्वीलिब्रीयमवर फोकस करणारा आहे.
शंकराचार्यांनी देखील हेच तत्व मांडलं, पण त्यांचा एम्फसीस या इक्वीलिब्रीयम पॉईंटच्या "युनिफॉर्मनेस" वर आहे. हि युनिफॉर्मीटी सदा-सर्वदा अभंग राहाते कारण मूळतत्व एकमेवाद्वितीय आहे. हाच अद्वैतवाद.
पण हे सदा सम अवस्थेत राहाणारं, अभंग आणि एकमेवाद्वितीय तत्व आहे तरी काय? भक्तीचा एम्फसीस याच तत्वाच्या "कंटेण्ट"वर आहे... आणि ते कंटेण्ट म्हणजे "चैतन्य". मूळतत्व १००% "जीवंत" आहे, ते बत्थड नाहि. जीवनानी परीपूर्ण रसरसलेलं चैतन्य, उत्पत्ती-प्रलय आदि क्रिडा करुन देखील आपलं अभंगत्व टिकवुन ठेवते कारण त्याची प्रेरणाच मुळी आनंद आहे. "सदा-सर्वदा इक्वीलीब्रीयम जोपासणारं (बुद्धाचा शुण्यवाद), युनीफॉर्म (शंकरचार्यांचा अद्वैतवाद) असं हे सच्चीदानंद (खरं, निरंतर, आनंदमय) चैतन्य आहे" हा भक्तीचा गाभा होय. मानवी (किंवा कुठल्याही सजीवाच्या) मनात या सच्चीदानंद तत्वाची जी प्रतीमा उमटते, वा स्फुरण तरंग उमगतात त्यालाच "प्रेमाभक्ती" म्हणतात. "प्रेम" दुसरं तिसरं काहिही नसुन "कनेक्शन"ची भावना आहे, जाणीव आहे. "जो विभक्त नाहि तो भक्त" हे भक्तीमार्गीयांचं स्लोगन याच "कनेक्शन" प्रेरणेवर आधारीत आहे. दुर्दैवाने त्याचं नीट आकलन न झाल्यामुळे त्यात विरोधाभास दिसतो. कनेक्शन कोणाचं ? आणि कोणाशी? तर ते माणसाचं (जीवाचं) त्या सच्चीदानंद तत्वाशी. "डिस्कनेक्ट" भासल्यामुळे "जन्म मृत्युचा फेरा". हे "डिस्कनेक्ट" संपलं कि आवरणात असलेलं चैतन्य मूळ चैतन्यात मिसळलं... एज सिम्पल एज दॅट.
या चैतन्यतत्वाची आणखी एक मोठी खासीयत... कि त्याला आपल्या स्वतःचं पूर्ण "ज्ञान" आहे. It knows itself. चैतन्य सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट अशा दोन्ही भुमीका स्वतःच निभावतं... आणि म्हणुनच ते भिन्नत्व आणि अभिन्नत्व या दोन्ही कसोट्या लिलया पार पाडतं. हाच तो "विशिष्टाद्वैतवाद"... एक असुनही अनेक, वा अनेक असुनही एक.
भक्तीमार्ग समजुन घेताना इतक्या सर्व बाबी ध्यान्यात घ्याव्या लागतात... कारण भक्ती इतर सर्व आकलनांचा सुपरसेट आहे. कुठल्याही मार्गाने गेलं तरी त्याची परिणीती भक्तीतच होते... मौज म्हणजे, या परिणीत अवस्थेला भक्ती म्हणतात याचचं ज्ञान अनेकदा होत नाहि... पण "भक्ती" हा शब्द महत्वाचा नाहि, ति अवस्था महत्वाची, आणि ज्या सच्चीदानंदाशी "भक्त" व्ह्यायचं तोच तो परमेश्वर.
आता दुसरा मुद्दा... कि असं जर असेल तर कर्मकांड, पूजाअर्चा, वगैरे वगैरे सगळं येतं कुठुन? पूजेबद्दल आपली कल्पना काय? तर मंदीरात घंटा बडवणे, आरती नामक गीत गाणे... पण पूजेचा अॅक्च्युअल अर्थ "पूज्य भाव प्रकट करणे" इतका सरळ आहे. पूज्य भावाच्या मूळाशी "इंड्युसमेण्ट" आहे. या इंड्युसमेण्ट्चा विकास भक्तीत होणे अशी ति प्रोसेस. आता मूळात इंड्युसमेण्टच नसेल तर कितीही अवडंबर केलं तरी हाती गोंधळाशीवाय काय लागणार? मग त्याचा दोष पूजेला का द्यावा?
थोडं पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुनर्जन्माविषयी...
तसं बघितलं तर भक्ती, पुनर्जन्म, पाप-पुण्य... या अतिशय भिन्न बाबी आहेत. पण त्यांची सरमिसळ करुन एकत्र विचार करायची आपली खोड आहे. पुनर्जन्म, स्वर्ग-नरक म्हणुन जे काहि आहे त्याचे सो कॉल्ड वैज्ञानीक पुरावे मिळणे अवघड आहे... पण कन्सेप्ट्च्युअली ते समजुन घ्यायचं असेल तर त्याला दोन प्रिकंडीशन आहे... १) "निसर्ग एक लाईव्ह सीस्टीम आहे" हा विश्वास.
२) माणसाला आपले (भविष्य आकारण्याचे) कर्मस्वातंत्र्य आहे हा विश्वास
आपण जे काहि कर्म केलय... कुठल्याही उद्देशाने, त्याची निसर्गात "नोंद" झाली आहे, व निसर्ग एक लाईव्ह सिस्टीम असल्यामुळे आपल्या कर्माला प्रतिउत्तर मिळेलच मिळेल, अगदी मृत्यु देखील त्यात आडकाठी आणु शकत नाहि. हे जर उमगलं तर मरतेळी एक शरीर सोडलं, तरी निसर्ग आपली ट्रान्सफर "दुसरीकडे कुठेतरी" करेल आणि आपला हिशोब चुकता करेल. हे "दुसरीकडे कुठेतरी" म्हणजेच स्वर्ग-नरक वगैरे स्टेशनं... व हा हिशोब चुकता होताना सुख जाणवतय कि दु:ख यावरुन आपण पाप पेरलं होतं कि पुण्य याचे तर्क.
राहता राहिलं हे अवतार वगैरे भानगड काय आहे... सोप्या शब्दात सांगायचं तर सच्चीदानंद तत्वाने एक विशिष्ट रुप घेउन केलेलं प्रकटन म्हणजे अवतार. पण हे शक्य आहे काय? टेक्नीकली यस... चैतन्याचा पसारा आपल्या लॉजीकमध्ये कधी बसणार नाहि... त्याला जर वाटलं अवतार वगैरे घ्यावा तर आपण आडकाठी करु शकत नाहि :) आपल्याला नाहिच पटलं कि मूळतत्व असल्या भानगडीत पडत असेल तर अवतार संकल्पना आपल्यापुरती तरी बाद...
पण मग हे सच्चीदानंदाच्या नवाने हेवेदावे, भांडण तंटा, अगदी एकमेकांचा जीव घेण्याइतपत गोंधळ का? यालाही एकच उत्तर... असला गोंधळ घालणे माणसाची हौस आहे. १०००० मुलं निवडा... देवा-धर्मापासुन अगदी अलिप्त वातावरणात जगातल्या सर्वात नाववंत वैज्ञानीकांच्या देखरेखेखाली त्याचं पालनपोषण करा. मोठी झाल्यावर त्यांच्यात भांडण तंटे वगैरे गोष्टींची प्रॉबॅबीलीटी धार्मीक वातावरणात वाढलेल्या मुलांइतकीच आढळेल.... माणसाची हौस, बाकी काहि नाहि.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त लेख.
एकदा अध्यात्म आणि विज्ञान यावर लेख लिहावा अशी नम्र विनंती.
शांतम् पापम् शांतम् पापम्
लेख नाही पण...
म्हणुन आम्हि तुमचे फॅन बघा.
पुढचा विषय, देवाची अ
पुरे झालं कि...
चित्रगुप्त महाराजांची डायरी
आमच्याबद्दल काय लिहीलय...
वाचतच होतो तेव्हढ्यात हिसकवली
चला पळायला हवं आता
होय तोच पण तुम्ही नका घाबरु
हम्म...
९१६०
चैतन्याचा पसारा आपल्या
>>>कारण लॉजिक हे अनुभवावरुन
अशी जगदंबा आलीच...
काय लिहू बरं
ह्याचं नाव बदला रे कुणीतरी...
विज्ञान आणि आध्यात्म
अर्धवटराव
+१
काही नाही. फार ऐकावस वाटल म्हणुन.