Skip to main content

दु:खाला गालबोट!

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 20/11/2012 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
बाळासाहेब ठाकरे गेले हे अत्यंत वाईट झाले पण त्यानिमित्त जो बंद पुकारला गेला त्याविरुद्ध एका तरुणीने फेसबुकवर सौम्यसा निषेध व्यक्त केला आणि तिच्या एका मैत्रिणीने ते लाईक करुन आपले समर्थन व्यक्त केले तर पोलिसांनी दोघींना तात्काळ अटक केली. समाजातील विविध घटकात तेढ निर्माण करणे असला काहीसा आरोप होता. माझ्या मते हे अतिरेकी आहे. जबरदस्तीने बंद लादला तर निषेध व्यक्तही करायचा नाही हा जुलूम आहे. ही लोकशाही नसून मोगलाई आहे. खुद्द ठाकर्‍यांना असली जोरजबरदस्ती आवडली नसती असे मला वाटते. एखाद्याच्या बंदविरोधी मतावर इतकी टोकाची भूमिका घेणे हे व्यक्तीप्रेमाचे स्तोम वाटते. महंमदाच्या कार्टून प्रकरणाची ही मराठी आवृत्ती वाटते आणि असले प्रकार आजिबात होऊ नयेत असे वाटते. अशाने नस्ते पायंडे पडतील. उद्या काँग्रेसच्या राजघराण्याचा कुणी मेला आणि त्याच्या बंदच्या वेळेस कुणी असेच मत व्यक्त केले तर त्यालाही तुरुंगात टाकतील. ह्या निसरड्या उतारावरुन घसरत परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी ह्याचा समूळ उच्छेद व्हाव हीच इच्छा. असले आततायी कृत्य करणार्‍या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर काही रेम्याडोक्या माथेफिरू तरूणांनी त्या स्त्रीच्या काकाच्या हॉस्पिटलवर हल्ला करून नासधूस केली. हे आणखी पुढे! http://ibnlive.in.com/news/antithackeray-fb-post-nine-arrested-for-vand… इंदिरा गांधीच्या हत्येनंतर शिखांचे शिरकाण झाले त्यावर प्रतिक्रिया म्हणून त्यांच्या थोर चिरंजीवांनी मोठे झाड पडले की बारीकसारीक झुडुपे त्याखाली चिरडली जाणारच असे "मार्मिक" "स्पष्टीकरण" दिले होते तसे इथे होऊ नये ही आशा.

वाचने 15393
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

In reply to by श्री गावसेना प्रमुख

सहमत त्या काटजू नावाच्या तथाकथित विचारवंत माणसाने केले आहे त्याप्रमाणे. जर कोणाला समाजहीतापेक्षा एखाद्याची अभिव्यक्ती इतकी महत्वाची वाटत असेल तर त्याला सरळ फाट्यावर मारले जावे. आणि असल्या आचरट असंवेदनशील व्यक्तीच्या अभिव्यक्तीची चिंता करण्याची काही गरज आहे असेही वाटत नाही. पोलिसांनी तसे केले असेल तर पोलिसांचे अभिनंदन करायला पाहीजे. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

काटजु च्या अगोदर त्या जागेवर कोनीही नव्हते काय? तो म्हणतो की तुम्ही कारवाइ नाही केलि तर तुम्ही राज्य चालविण्यास असमर्थ आहात् असे मी समजेन,उद्या तुझ्याबद्दल लिहीले तर तु काय करशिल म्हणाव. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे उचलली जिभ लावली टाळ्याला असे नव्हे.

गालबोट हा साधारणपणे 'एखाद्या चांगल्या गोष्टीला लागलेली नजर' यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. प्रस्तुत घटनेच्या संदर्भात हा शब्दप्रयोग श्री. हुप्प्या यांना का करावासा वाटला हे समजले नाही.

In reply to by आजानुकर्ण

"(हिंसाचाराचं) गालबोट नको" हाच शब्दप्रयोग मा. बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या आजारात आणि मृत्यूप्रसंगाबाबतही टीव्ही चॅनेल्स आणि अनेक वक्त्यांकडून वापरला जात होता, तेव्हाही हाच प्रश्न पडला होता. त्यावेळी तो फार महत्वाचा नव्हता आणि कोणाला विचारणार आणि काय करणार, हेही होतंच.. मराठीतले शब्दप्रयोग, वाक्प्रचार चुकीच्या संदर्भात वापरणं हे इतकं कॉमन झालं आहे की ते कधीकधी जाणवतही नाही. .. शांतता राखण्याचं "आव्हान".. .. कार्यक्रम करुन तर दाखवा असं "आवाहन" . इत्यादि.. ..

फेसबुक वर अश्या गोष्टी लिहिणार्या लोकांवर दुर्लक्ष केलेला बरं, माझा एक बिहारी मित्र पऊ ह्याच आशयाचे स्टेट्स टाकत होत. एक दोन वेळेस त्यास सांगुन पाहिले पण त्याने तेच सुरु ठेवला. व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही इ. बद्द्ल बोलत होत. मी सर्ळ त्याला माझ्या मित्रयादी तुन काढुन टाकले. गम्मत अशी कि त्याला व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही च्या बिहार, उ. प्र. मध्ये होणार्या गळचेपी बद्द्ल कधी फेसबुक वर लिहावे वाट्ले नाही.

सोशल मीडियाचा समाजविघातक वापर ज्या दिवशी अवघी मुंबई रस्त्यावर लोटली होती, आणि कलानगर वांद्रे ते शिवाजीपार्क सेनाभवनच्या तीन चार किलोमिटर्स रस्त्यासह आसपासच्या इमारतीवर जनसागराची त्सुनामी आली होती, तेव्हा मुंबईपासून ७०-८० किलोमिटर्स दूर असलेल्या पालघर या छोटेखानी शहरामध्ये एका विशीतल्या मुलीने फ़ेसबुकवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. ‘जगात रोज कित्येक माणसे मरत असतात, पण जग चालूच असते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या मृत्यूनंतर दोन मिनिटांची शांतता पाळली गेली, त्यांच्याच बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मग सक्तीने बंद पाळावा का?’ काहीशी तशीच पण अस्पष्ट प्रतिक्रिया आयबीएन वाहिनीचे संपादक राजदीप सरदेसाई यांनीही ट्विटर माध्यमातून व्यक्त केली होती. पण त्यांच्याकडे कोणी गंभीरपणे लक्ष दिले नाही. मात्र पालघरच्या त्या मुलीच्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकार्‍याने तक्रार नोंदवली आणि तिच्यासह तिच्याशी जाहीर सहमती व्यक्त करणार्‍या दुसर्‍या एका मुलीला पोलिसानी अटक केली. नंतर त्या मुलीच्या काकांच्या पालघरमधल्या इस्पितळावर जमावाने हल्ला केला व मोडतोड केली. त्या मुलीने आपली प्रतिक्रिया पुसून टाकली होती. मग सोमवारी वाहिन्यांवर त्या मुलीच्या अविष्कार स्वातंत्र्यावर मोठमोठे विद्वान चर्चा करत होते. पोलिस, शिवसैनिकांचा धुडगुस व त्या मुलीचे स्वातंत्र्य अशा विषयावर आपापले शहाणपण मिरवण्याची अहमहमिका चालू होती. मात्र आपण काय बोलतो त्याचे भान त्या चर्चेमध्ये सहभागी होणार्‍या किती लोकांना होते; याचीच शंका आहे. फ़ेसबुकला सोशल मीडिया म्हणतात, अविष्कार स्वातंत्र्य हे दुसर्‍याला बाधा आणण्यासाठी नसते, प्रसंग काय होता. भगतसिंग वगैरे स्वातंत्रासाठी बलिदान करणारे होते. इत्यादी गोष्टी या शहाण्यांना माहिती तरी आहेत काय, याचीच शंका आली. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मुलीने ती प्रतिक्रिया लिहिली, ती प्रतिक्रिया तरी यातल्या कोणी वाचली होती काय याचीही शंका आहे. शिवाय स्वातंत्र्य देताना वा घेताना तो आगीशी खेळ असतो याचीही जाणिव कुठे दिसली नाही. एक मुद्दा पहिला घेऊ. फ़ेसबुक वा अन्य इंटरनेटचे जे माध्यम आहे, त्याला सोशल मीडिया म्हणतात. त्यात सोशल याचा अर्थ सामाजिक असा होतो; याबद्दल तरी वाद होण्याचे कारण नाही. आणि म्हणूनच जे काही सामाजिक असते; त्याचा वैयक्तीक हेतूने व सामाजिक स्वास्थ्याला बाधा आणण्यासाठी वापरणे सामाजिक म्हणता येणार नाही, हेसुद्धा मान्य करावेच लागेल. ज्यामुळे सामाजिक शांतता व सौहार्दाला बाधा येऊ शकते वा आणली जाते; अशा कुठल्याही कृतीला असामाजिक म्हणतात, याबद्दलही वाद होण्याचे कारण नाही. इथे समाज म्हणजे मोठी लोकसंख्या असा अर्थ होतो. संपुर्ण समाज वा देशाची संपुर्ण लोकसंख्या, असाच त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे त्याच लोकसंख्येतील एखादी व्यक्ती, मोठ्या लोकसंख्येला विचलित करणारे कुठलेही कृत्य करणार असेल वा करत असेल; तर त्याची ती कृती असमाजिक ठरते. मग तो बॉम्बस्फ़ोट असो, हिंसाचार असो किंवा हिंसाचाराला प्रवृत्त करणारे शब्द वा आवाहन असो. या मुलीने जे माध्यम वापरले ते फ़ेसबुक म्हणजे सोशल माध्यम आहे, त्याचा वापर तिने कोणत्या सामाजिक हितासाठी केला आहे काय? ज्या घटनेमुळे मुंबईच्या रस्त्यावर पंचविस लाख लोक उतरले आहेत व त्यांच्या भावना कमालीच्या हळव्या आहेत, त्यांचे मन विचलित करणारी प्रतिक्रिया त्या वेळी व्यक्त करणे समाजहिताचे कृत्य होते काय? आणि असे लिहिण्यासाठी सामाजिक माध्यम वापरणे, हीच मुळात समाजविघातक कृती नाही काय? आपल्या प्रतिक्रिया व मते आपल्यासाठी माह्त्वाची आहेत, पण त्याचा जाहिर उच्चार केल्याने, कुणाच्या भावना दुखावणार असतील व त्याचे प्रक्षुब्ध प्रतिसाद उमटू शकतात, हे माहिती असेल, तर ते बोलण्या व व्यक्त करण्याचा हेतू शुद्ध रहात नाही. मग ती व्यक्तीगत प्रतिक्रिया रहात नाही तर डिवचण्याचा मामला होऊन जातो. एक उदाहरण घेऊ. ती मुलगी बंदच्या विरोधात लिहिते आहे काय? ती सक्तीच्या बंदच्या विरोधात बोलते आहे काय? एकूणच वाहिन्यांच्या व माध्यमांच्या चर्चेतला सूर असा होता, की तिच्या बंदविषयक मताची गळचे्पी करण्यात आली व त्यासाठीच पोलिसांनी तिला विनातपास अटक करून गजाआड ढकलले, असे भासवले जात होते. पण ती माध्यमांची शुद्ध बदमाशी होती. त्या मुलीने जे काही लिहिले ते संपुर्ण सांगितले जात नव्हते. तिच्या प्रतिक्रियेतून लोकभावना दुखावण्याचा मुद्दाम केलेला प्रयास व हेतू लपवला जात होता. तिने सक्तीच्या बंद विरोधात भूमिका मांडली असती वा प्रतिक्रिया दिली असती, तर नक्कीच इतके तीव्र पडसाद उमटले नसते. पण त्या मुलीची प्रतिक्रिया अत्यंत स्पष्ट आहे. बंदमुळे आपल्या अडचणी वाढल्या वा त्रास झाला; याबद्दल तिची तक्रार अजिबात नाही. तिला त्याबद्दल तक्रारच करायची नाही. तिला कोणाच्या तरी भावना दुखावण्यातच रस होता आणि तेच तिच्या संपु्र्ण प्रतिक्रियेतून स्पष्टपणे दिसून येते. जे काही तिने लिहिले आहे, त्या शब्दाचे अर्थ तिला कळत नसावेत किंवा जाणीवपुर्वक तिने जा गुन्हा केलेला आहे. आपण जे शब्द लिहितो आहे, त्यातून समाजात प्रक्षोभ निर्माण होईल, हे तिला कळत नसले तर ती मुलगी सोशल मीडियाचा वापर करण्यास अपात्र आहे आणि म्हणुनच ते माध्यम वापरण्याचा मर्यादाभंग तिने केलेला आहे. म्हणूनच चर्चा करताना तिचे सर्व शब्द वा फ़ेसबुकवरील पोस्ट; माध्यमे लपवित होती. त्यातला प्रक्षोभक भाग लपवून सगळी चर्चा चालली होती. ती आरंभी काय म्हणते? ‘जगात रोजच माणसे मरत असतात, पण जग चालूच असते.’ याचा अर्थ काय होतो? जगात जी सात आठशे कोटी लोकसंख्या आहे, त्यापैकी एक कोणीतरी आज मेला असेल. तिच्या लेखी बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला काहीही मोल नाही. अब्जावधी मानव प्राणीमात्राप्रमाणे तोही एक आहे. त्या दिवशी जगात हजारो मृत्यू झाले असतील. मग याचे कौतुक कशाला? असे तिला त्या आरंभीच्या विधानातून सुचवायचे आहे. ते समाजातील एका मोठ्या नव्हेतर प्रचंड लोकसंख्येच्या भावना दुखावणारे नाही काय? त्या मुलीचा बाप किंवा कोणी कुटुंबातला कोणी अगदी नैसर्गिक मृत्य़ुने मरण पावला असताना, कोणी तिला असे बोलले तर काय होईल? म्हणजे तिच्या घरात शोकाकुल वातावरण असताना शेजारी उभा राहुन वा तिला ऐकू येईल, अशा आवाजात कोणी असेच मत व्यक्त केले; मग तिची प्रतिक्रिया काय असेल? समजा कोणी तिथे जाऊन म्हणाला, ‘त्यात काय मोठे जगात रोजच माणसे मरतात, तुम्ही कशाला रडत बसला आहात, चला उठा कामाला लागा, जग चालुच असते ना?’ ही जी कोणी मुलगी आज अविष्कार स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा झालेली आहे, ती असे तिला ऐकू येईल अशा सुरात बोलणार्‍याला हारतुरे देईल काय? की असे जो कोणी बोलेल त्याच्या अंगावर धावून जाईल? त्याच्यावर शिव्यांचा वर्षाव करील, की स्तुतीसुमनांचा वर्षाव करील? तिला असे बोलणार्‍याचे अविष्कार स्वातंत्र्य मान्य होईल काय? बाकी सगळ्या गोष्टी व मुद्दे बाजूला ठेवून केवळ तिच्याच बाबतीत असा भावनिक प्रसंग आला; तर तिची प्रतिक्रिया काय असेल, त्याचा चर्चेत पाल्हाळ लावणार्‍यापैकी एकाने तरी विचार केला काय? शनिवार रविवारी मुंबईची जी परिस्थिती होती, त्यात किमान पंचविस तीस लाख लोकांना आपल्याच घरातील, कुटुंबातील कोणी आप्तस्वकीय प्रियजनाचा मृत्यू झाल्याची भावना होती. मुंबई बाहेर अनेक गावात शहरात वस्त्यांमध्ये तीच शोकाकूल भावना होती. हे त्या मुलीला कळत नसेल, तर तिला फ़ेसबुक वगैरे माध्यम वापरण्याची मुभाच असता कामा नये. कारण ज्यातून लोकांच्या संपर्कात रहावे, अशी सुविधा देण्यात आली आहे, त्याचाच वापर त्या मुलीने इतरांच्या भावना दुखावण्यासाठी व त्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी हेतूपुरस्सर केला आहे. तिची प्रतिक्रिया एकाच मैत्रीणीला आवडली आणि तिच्या प्रोफ़ाईलवर फ़ारसे मित्र नाहीत असा दावा दिशाभूल करणारा आहे. कारण फ़ेसबुकवर तुम्ही जे लिहिता, ते अब्जावधी लोकांपर्यंत विनाविलंब पोहोचते करण्याची क्षमता आहे. म्हणूनच विनाविलंब त्याबद्दल पोलिसात तक्रार होऊ शकली. ज्यांनी तक्रार केली ते तिच्या मित्रयादीमध्ये नव्हते, तरीही त्यांच्यापर्यंत ती प्रतिक्रिया पोहोचली व त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. म्हणजेच एकालाच आवडले हा बचाव फ़सवा आहे. मुद्दा आहे, तो अविष्कार स्वातंत्र्याचा नसून दुसर्‍याच्या भावना दुखावण्यासाठी वा त्यातून समाज स्वास्थ्य विघडवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करायची मुभा असावी काय, असा मुद्दा आहे. ज्यांना साधन वापरण्याची अक्कल वा भान नाही त्यांच्या हाती अशी साधने द्यावीत काय, हा मुद्दा आहे. म्हणूनच अविष्कार स्वातंत्र्याचे ढोल वाजवून सत्य लपवण्याचे कारण नाही. कुठल्याही गुन्ह्याचा तपास व दोषपात्र ठरवण्याची प्रक्रिया हेतू तपासून होत असते. या मुलीचा हेतू गुन्हा करण्याचा होता काय? ( क्रमश:) -भाऊ तोरसेकर http://bhautorsekar.blogspot.in/2012/11/blog-post_20.html

In reply to by अनामिका

शिवसैनिकांनी तक्रार केली इथवर ठीक आहे. तोडफोड का केली याचे उत्तर आहे काय? तो गुन्हाच नाही असे म्हणणे असेल तर गोष्ट वेगळी. कालच्या सामना मध्ये संजय राऊतने बाळासाहेबांची तुलना शिवाजी राजांशी केली आहे. एक मराठी माणूस म्हणून मला स्वतःला हे अतिशय वेदनादायक वाटले. आजच्या एकाही राजकारणी माणसाची शिवाजी महाराजांशी तुलना करणे ही मला महाराजांची अवहेलना वाटते. आता मी एक सामान्य माणूस म्हणून काय करावे? माझ्याकडे झुंड नाही त्यामुळे मी सामनाचे ऑफिस फोडू शकत नाही. पोलिसांकडे तक्रार करावी तर मलाच आत टाकतील ही भीती आणि आंतरजालावर काही लिहावे तर शिवसैनिक झोडतील ही भीती. आपणच मार्गदर्शन करावे. - घाबरलेला शिवसैनिकांचे शिवप्रेम मरुन गेले असे समजावे काय?

In reply to by अप्पा जोगळेकर

अप्पा साहेब जाउ द्या,तुलना केली ना त्यांचा अवतार होते असे तर नाही ना बोलले त्यांच्या साठी बाळासाहेब

दैवतच

होते,भावनेच्या भरात होउन जाते,जयललीता समोर नाही का त्यांचे मंत्री लोटांगन घालतात.

. शांतता राखण्याचं "आव्हान".. .. कार्यक्रम करुन तर दाखवा असं "आवाहन" गवि हे उलटे झालेय. आवाहन म्हणजे विनंती आव्हान म्हणजे मराठीत चॅलेंज चॅलेंज

In reply to by इरसाल

आरं येड्या गविने हल्लीची माध्यमे काय 'गुण' उधळतात त्याचा दाखला दिला आहे. :) सरपटी बॉलवर विकेट फेकलीस गड्या तू. ;)

In reply to by गणपा

धन्यवाद.. एक बारीक बदल.. "हल्लीची" नव्हे.. माझ्या ऐकण्यात येणारी माध्यमं अगदी आठवतात तेव्हापासून कमीजास्त फरकाने. "पूर्वी" माध्यमात काय शब्दप्रयोग होत होते हे न ऐकल्याने त्याची माहिती नाही. त्यामुळे पूर्वी योग्य रचना व्हायची याला काही आधार नाही. मुळात "हल्ली" हा बद्धकोष्ठी शब्द मला नापसंत आहे म्हणून इतकं स्पष्टीकरण. बाकी सर्व बरोबर. :)

वागळेंनी ट्विटरवर केलेल्या विखारी विधानावास्तविक माननिय बाळासाहेबांना शिवसैनिकांनी ,अभिमानी हिंदूंनी ,अस्सल मुंबईकरांनी ,स्वाभिमानी मराठी जनतेने ज्या शिस्तबद्द रितीने कोणतीही आगळीक न करता न भुतो न भविष्यती असा अखेरचा निरोप दिला ते पाहून बर्‍या नतद्रष्टांना पोटशूळ उठणे स्वभाविक होते.."बाळासाहेब ठाकरे हे भारतिय लोकशाहीतील अनौरस अवलाद आहेत" असा विखारी विचार व्यक्त करणार्‍या निखिल वागळे नामक तथाकथित पत्रकार व स्वयंघोषित विचारवंतांच्या बाबतीत का सेनेने आवाज उठवायलाच हवा होता ? का त्यांच्या विरुद्ध शिवसैनिक पेटून उठत् नाही..?....(वागळेंनी ट्विटरवर केलेल्या विखारी विधानाचा पुरावा येथे देते आहे...)जिथे पुरस्कारप्राप्त स्वतःला थोर म्हणवणारे पत्रकार सोशल मिडीयाचा वापर करताना तारतम्य बाळगत नाहीत तिथे शाहीन तर तिच्या धर्माला अनुसरुनच आपले विचार प्रकट करत होती असा समज शिवसैनिकांनी करुन घेतला असेल तर त्यात वावगे ते काय?

In reply to by अनामिका

निखिल वागळे म्हणजे पार्श्वभागामध्ये मिरचीचा ठेचा भरलेले वटवाघूळ आहे असे विधान शिवसेनेच्या कुठल्यातरी नेत्याने केल्याचे स्पष्टपणे आठवते आहे. अर्थात ही फार जुनी गोष्ट असल्याने त्याची लिंक उपलब्ध नाही. अर्थात ते शिवसेनेच्या नेत्याने केले होते त्यामुळे ते बरोबरच असणार असे मानले पाहिजे.

असीम सरोदे (पुन्हा असीम) सांगत होते कि भाषा शिवराळ असल्याने अटक समर्थनीय आहे. कायदेतज्ञ असल्याने विश्वास ठेवण्यास हरकत नसावी. असीम त्रिवेदीच्या बाबत ज्या मानकांचा सन्मान करायचा त्यांच्याबाबत हीन अभिरूचीपूर्ण चित्रे जाणिवपूर्वक प्रदर्शित केली असं म्हणता येईल. त्या वेळी असीम त्रिवेदीचं वय २४ असल्याने बच्चा है, जाने दो असा सूर सर्वत्र होता. भारतीय राज्यघटना, संसद आणि मानचिन्हे याबद्दल कुणाच्याही कुठल्याही भावना दुखावण्याचा प्रश्न नसल्याने कारवाई मागे घेण्यात आली होती पण त्रिवेदींनी जामीन नाकारल्याने अटक झाली. बाकि भारत या देशात बुद्धीजीवी आणि भाव(ना)जीवी असे दोन वर्ग असल्याने सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची सध्या गरज आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

फेसबुक प्रकरणावरून झालेला वाद ,अटक , अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खच्चीकरण अश्या सर्व मुद्यांवर माझे मत सोशल मिडिया सगळ्यासाठी नवीन आहे आता ह्या संस्कृतीला कुठे पालवी फुटली आहे. त्यांचे संकेत , अलिखित नियम काय असावेत हे अजून ठरले नाही आहे तर ठरत आहे. अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य त्याने समाजातील प्रत्येकाला दिले आहे ह्याचा अर्थ असा नाही की वर्षोवर्ष मनात साठवलेली खदखद ,त्रागा ह्या जागतिक व्यासपीठावर कुठेही ,कसाही ,कोणावरही काढावा , वड्याचे तेल वांग्यावर काढू नये असे मला वाटते. भारतात जेथे भावनेचे राजकारण करणे ही नेहमीची बात आहे. जेथे प्रत्येक समजा कोणासाठी ,कोणत्यातरी मुद्यावर ,व्यक्तीसाठी प्रचंड संवेदन शील आहे. भारतीयांचे अर्थ शास्त्रानुसार वर्गीकरण म्हणजे कनिष्ठ , मध्यम ,उच्च वर्गीय असे केले तरी ह्या स्तराला देखील जातीचे , धर्माचे , अस्तर लावलेले असते. तेव्हा व्यक्त व्हा ,पण संयमित पणे

फेसबुक प्रकरणामुळे जन्माची अद्दल घडलेली अतिशाहाणी शाहिन दाढा शांतता हवी म्हणुन गुजराथमधे स्थालंतरीत होते आहे असे समजले ..चला अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींचे भाजपा शासित गुजराथ हे राज्य वास्तव्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी शासित महाराष्ट्राच्या तुलनेत योग्य असल्याची जाहिरात विनामोबदला केल्याबद्दल शाहिन दाढाचे आभार..