http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17248448.cms
मांसाहारी लोक खोटारडे असतात आणि बलात्कारासारखे गुन्हे मांसाहारी लोकांकडूनच जास्त घडतात असा आचरट धडा एन सी ई आर टी च्या पाठ्यपुस्तकात आढळला आहे. हा शोध कुणी आणि कसा लावला आणि तो पाठ्यपुस्तकात नेमावा हे कुण्या विद्वानाच्या भेज्यातून निघाले हे बघणे उद्बोधक ठरेल.
मला वाटते भारतात ५० टक्क्याहून अधिक लोक मांसाहारी असावेत. इतक्या लोकांना खोटारडे आणि बलात्कारी ठरवणे केवळ ते अमुक एक प्रकारचे अन्न खातात म्हणून हे अगदी अचाट आहे. मांसाहार हा काय एका पारड्यात घालून मोजता येतो का? विविध प्रकारचे, विविध प्राण्यांचे, वेगवेगळ्या अवयवांचे मांस, विविध पद्धतीच्या पाककृती, वेगवेगळ्या प्रमाणात सेवन हे सगळे सारखे मानणे हाच मुळी अपमान आहे. आणि त्याचे तथाकथित दुष्परिणाम हे आणखी पुढचे पाऊल!
असले भलते सलते लिहिणार्यांना मिपावरील तरबेज खानसाम्यांच्या सामिष पाककृती वाचायला लावल्या तर ते ताळ्यावर येतील याबद्दल मला तरी शंका नाही!
वाचने
2220
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
श्री हुप्प्या यांनी काढलेल्या धाग्याशी सहमत
हा पॉपकॉर्नी धागा असेल का?
हॅ हॅ हॅ... मांसाहारा बद्दलचा
अत्रुप्त आत्मा,
In reply to हॅ हॅ हॅ... मांसाहारा बद्दलचा by अत्रुप्त आत्मा
शाकाहारी गावरान कोंबडी खाणं
आमच्यावेळी अशी शैक्षणिक
त्यांच्याकडुन बहुतेक नॉन