आमचा एक इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुप आहे. जो मोठ्या कलाकारांचे कार्यक्रम आयोजीत करतो. अशाच एका महान कलाकाराचा कार्यक्रमाची साक्षीदार होण्याचे भाग्य नुकतेच मला लाभले. ‘Lamhe A Journey With The Hundred Strings’ असे या कार्यक्रमाचे नाव ठरले.
पंडित शिवकुमार शर्मां यांचा हा कार्यक्रम धारवाड मध्ये करायचे ठरले आणि आम्ही तयारीला लागलो.ह्या कार्यक्रमाचे स्वरूप शिवकुमारजींचे फक्त संतूरवादन असे नसून त्यांचा सांगीतिक जीवन प्रवास अर्थात स्वतः त्यांचा कडून ऐकण्याची सुवर्णसंधीही होती.. पूर्वार्धात त्यांचे संतूरवादन व उत्तरार्धात त्यांचा संगीत प्रवास व त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील
गाजलेली गाणी पडद्यावर पाहणे असे होते. .
तसेच त्या काळी त्यांना संगीत देताना आलेले अनुभव खुद्द त्यांच्याकडून ऐकणे हि एक पर्वणीच होती.सगळे तयारीला लागलो त्यांना हुबळी विमानतळ वरून घ्यायला कोणी जायचे पासून राहण्याची सोय कुठे करायची वगैरे सगळी तयारी चालूच होती..
हा कार्यक्रम धारवाड मध्ये करायचे ठरले. धारवाड हे एज्युकेशनल हब आहे हे तिथे गेल्यावर समजले. तिथली कर्नाटक युनिव्हरसिटी, मोठे डेंटल कॉलेज, इत्यादि भरपूर पाहायला मिळाले.अतिशय निसर्ग रम्य आणि प्रसन्न वातावरण असलेले धारवाड आम्हा सगळ्यांना खूपच आवडले. प्रसिद्ध गायिका गंगुबाई हनगल ह्या पण धारवाडच्याच आहेत. अशा या पावन ठिकाणी अतिशय सुंदर अशा ऑडिटोरिअम मधे हा कार्यक्रम करायचे ठरले.
सगळी तयारी पूर्ण झाली.त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही हुबळी विमानतळावर गेलो. हातात पुष्पगुच्छ घेऊन आम्ही त्यांचा वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. इतक्यात कोणीतरी म्हणाले 'आलेत ते'. आमची नजर सगळ्या गर्दीतून त्यांना शोधत होती इतक्यात ते समोरून बाहेर आले. त्या रुबाबदार व्यक्तिमत्वाकडे आम्ही पाहताच राहिलो. वयाची सत्तरी ओलांडली तरीही अतिशय देखणे, अंतर्मुख, शांत, तेजस्वी असे व्यक्तिमत्व आहे. इतके दिवस ज्यांना आपण टीव्ही आणि रेडिओ वर ऐकत आणि बघत आलो तेच हे पंडित शिवकुमार शर्मा आपल्या समोर उभे आहेत यावर काही क्षण विश्वास बसेना .
आम्ही त्यांचे स्वागत केले पण सगळेजण इतक्या जवळून त्यांना पाहायला मिळाले त्यामुळे भारावून गेलो होतो. त्यांची गाडी हॉटेल कडे रवाना झाली.
कार्यक्रमाची वेळ जवळ आली तसे सगळे जण सज्ज झालो. साउंड वगैरे सेट झाले. सगळी तयारी झाली. पूर्ण हॉल लोकांनी तुडुंब भरला होता. कार्यक्रमाची वेळ झाली. बरेचसे लोक मागे उभे होते. सगळे जण पंडितजीं चे व्यासपिठावर वर आगमन होण्याची वाट पाहत होते. इतक्यात कार्यक्रमाला सुरुवात झाली. अनाउन्समेंट झाली. पंडितजी आणि विजय घाटे हे दोघे व्यासपीठावर आले. टाळ्यांचा कडक़डाटात त्या दोघांचे स्वागत झाले. माईक पंडितजींचा हातात होता. ते म्हणाले मी मधुवंती राग वाजवणार आहे आधी रूपक ताल आणि मग त्रिताल. मधुवंती राग हा खूप जणांचा आवडता असल्याने टाळ्यांने स्वागत झाले. ते पुढे म्हणाले "मधुवंती राग बाजाने के बाद मै मेरे म्युजिक करिअर के बारेमे बात करुंगा..तब आप मुझे बताइये के मै बजाता अच्छ हूं या बाते अच्छी करता हूं " दिसणे जसे रुबाबदार आहे तसेच त्यांचा आवाजही भरदार आहे. सगळे जण तन्मयतेने संतूरवादन ऐकत होते. त्यांचा जादूई संतुर वादनाने मध्यंतर कधी झाली ते समजलेच नाही. १० मिनिटांचा विश्रांती नंतर. श्रीयुत दिलीप काळे यांनी त्यांची मुलाखत घेण्यास सुरुवात केली. मला व माझा सारख्या अनेक जणांना कदाचित हे माहिती नव्हते की पंडितजी हे उत्कृष्ट तबला वादक आहेत. वयाचा ५ व्या वर्षापासून त्यांनी तबला शिकायला व वाजवायला सुरुवात केली. त्यांचे वडील हे त्यांचा कडून खूप रिआज करून घेत असत. १०-१० तास ते तबला वाजवण्यात मग्न असायचे. एकटे असताना ताब्ल्याचेच बोल बोलत असायचे. त्यांचे वडील हे त्यांचे संगीत गुरु देखील होते. अचानक एक दिवस त्यांचा वडिलांनी त्यांना संतूर हे वाद्य हातात आणून दिले आणि आज पासून तू तबला बंद करून हे वाजवायचे असे सांगितले. पूर्वी कधीही न पाहिलेले आणि ऐकेले हे वाद्य त्यांना वाजवण्यासाठी देण्यात आले होते. ह्या वाद्याचा पूर्वीचा कोणताही संदर्भ त्यांचा कडे नव्हता. अर्थातच त्यामुळे गुरुही नव्हता स्वतः संशोधन करायचे होते. त्यांनी ते आव्हान स्वीकारले आणि संतूर वादन सुरु केले. नुसते स्वीकारले नाहीतर त्या वाद्याची नवीन ओळख जगाला करून दिली आणि त्यामध्ये बरेच प्रयोग करून ते नावारूपाला आणले. त्यांचे संतूर वादनात किती महत्वपूर्ण योगदान आहे हे इथे सांगणे कठीण आहे.
वयाचा १९ व्या वर्षी त्यांनी जम्मू मधले आपले घर सोडले व काहीतरी करण्यासाठी मुंबई मध्ये आले. कुठे जायचे नक्की काय करायचे काहीच ठरवले नव्हते वडिलांची कोणतीही ओळख व मदत न स्वीकारता त्यांना स्वतःचे स्थान बनवायचे होते. हातात फक्त होते ते संतूर. ते घेऊन ते मुंबई ला आले. रेडिओ वर आणि अनेक कार्यक्रमात त्यांनी संतूर वादन केले. व्ही शांताराम यांनी त्यांचे संतूर ऐकून त्यांचा एका चित्रपटात त्यांची संगीत दिग्दर्शक म्हणून निवड केली.त्या काळी इतक्या मोठ्या निर्मात्या कडून आमंत्रण मिळाले तरी त्यांनी मला आत्ता वेळ नाही नंतर बघू असे सांगून ते टाळले करण चित्रपट संगीत हे त्यांचे ध्येय नव्हते. तरीही स्वतः व्ही शांताराम त्यांना भेटले आणि ते कसे बसे तयार झाले. त्यानंतर अनेक गाजलेल्या चित्रपटात त्यांनी संगीत दिले. अनेक महान संगितकारांबरोबर त्यांनी काम केले. हरिप्रसाद चौरासिया यांचा बरोबर शिव-हरी नावाने यश चोप्रा यांचा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या आणि गाजलेल्या गाण्याची यादी फारच मोठी आहे. सिलसीला, चांदनी, लमहे, डर ह्या व अशा अनेक चित्रपटांचा त्यांचा संगिताला अनेक पुरस्कार मिळाले. अनेक वर्षे त्यांनी संतूर वादनात संशोधन करून नवीन प्रयोग करून देश विदेशात संतूर वादनाचे कार्यक्रम केले आणि या वाद्याची जगाला ओळख करून दिली. ५० वर्षांपेक्षाहि जास्त वर्षे तपश्चर्या करून ह्या वाद्याला मानाचे स्थान मिळवुन दिलेया बद्दल सगळेच विशेषतः भारतीय संगीत क्षेत्र त्यांचे ऋणी राहील. मंत्र मुग्ध करणारे त्यांचे संतूरवादन ऐकून अनेक श्रोते भारावले.
सत्तर हून अधिक वय असून त्यांचा ठायी असणार्या जिद्दीचे, उत्साहाचे कौतुक वाटते..
आत्ता त्यांचे सुपुत्र राहुल शर्मा हे त्यांचा वारसा चालवत आहेत हे पाहून समाधान वाटते. स्वतः त्यांचा तोंडून ऐकलेला त्यांचा सांगीतिक प्रवास, सोसलेला त्रास, स्वतः कडे काही नसताना आणि तेंव्हाचा काळातल्या तांत्रिक आव्हानांना तोंड देत कलेसाठी आयुष्य पणाला लावणारे असे महान कलावंत आपल्या भारतवासीयांना लाभले हे आपले भाग्य आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले पद्मभूषण,पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी झाले. संतूर म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा असे समीकरणच झाले आहे.. अशा ह्या महान The Pioneer of Santoor असलेल्या कलाकाराला मनापासून प्रणाम!!
वाचने
5361
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
संस्मरणीय अनुभव!
+१
In reply to संस्मरणीय अनुभव! by बहुगुणी
+२
In reply to +१ by कवितानागेश
हेच म्हणतो..
In reply to संस्मरणीय अनुभव! by बहुगुणी
+३
In reply to संस्मरणीय अनुभव! by बहुगुणी
यु लकी चॅप !!
हेवा वाटतो हो तुमचा.
पंडित शिवकुमार शर्मा - एक मनस्वी कलाकार.
धन्यवाद!!
चूक मान्य.
In reply to धन्यवाद!! by अक्षया
ओये लक्की लक्की ओये बहुत
+1
In reply to ओये लक्की लक्की ओये बहुत by बॅटमॅन
+११
In reply to +1 by sagarpdy
+२२
In reply to +११ by मोदक
This is the exact reason why
प्रचंड हेवा वाटला !
सही!
न भूतो न भविष्यती....
चिरंतन आठवणीत राहणारे 'लम्हे'.
हो नक्कीच!!
In reply to चिरंतन आठवणीत राहणारे 'लम्हे'. by श्रीरंग_जोशी
अय्या कित्ती छान!
खरंच की काय??
In reply to अय्या कित्ती छान! by दादा कोंडके
अरेच्चा!
In reply to खरंच की काय?? by अन्या दातार
विषय दिलेला नाही
In reply to अरेच्चा! by प्रास
व्वाह!! खरंच फारच भाग्यवान
नक्कीच सांगेन. :)
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद !!