✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रशियाचा धडा

भ
भास्कर केन्डे यांनी
Sat, 08/16/2008 - 02:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3495 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

स
सखाराम_गटणे™ Sat, 08/16/2008 - 09:50 नवीन

मित्रहो,

मित्रहो, फुकटचा मनाला ताण घेउ नका, भारत सरकार असे काही ही करणार नाही. उगाच असले विचार मनात आणुन स्वतःला त्रास देउ नका. आपण विचार करुन काहीही होणार नाही. जे सरकार संसदेवर ज्याने हल्ला केला त्याला फाशी देउ शकत नाही, ते असल्या गोस्टीचा विचार करु तरी शकतील??? ऐकादे विनोदी लिखाण वाचा, लिहा मस्त पैकी दुपारचे झोपा, आयुष्य उपभोगा. मी विचार करतोय, भारतातील पक्ष, पाकीस्तानबरोबर झालेल्या लढाईमध्ये झालेली नुकसान भरपाई कधी पाकीस्तान ला कधी देता आहेत ते? खुपच वाईट, बिचारा पाकीस्तान नाही का? सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sat, 08/16/2008 - 10:36 नवीन

१००% हेच

१००% हेच म्हणतो ! मी विचार करतोय, भारतातील पक्ष, पाकीस्तानबरोबर झालेल्या लढाईमध्ये झालेली नुकसान भरपाई कधी पाकीस्तान ला कधी देता आहेत ते? खुपच वाईट, बिचारा पाकीस्तान नाही का? :& राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
संजय अभ्यंकर Sat, 08/16/2008 - 10:41 नवीन

+१

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सर्वसाक्षी Sat, 08/16/2008 - 15:24 नवीन

व्यर्थ

<<वेळोवेळी जगातल्या मुत्सद्दी राज्यकर्त्यांनी त्यांचे प्रश्न तत्पुरता राजकीय तोटा सहन करून मोठ्या हिमतीने सोडवले आहेत. रशिया त्यांच्या शेजार देशातील गडबडीला तर श्रीलंका त्यांच्या फुटिरवाद्यांना तसेच हिमतीने हताळत आहेत. हेही तसेच एक उदाहरण. त्यातून भारताचे नेते/मुत्सद्दी (कोणी असतील तर) काही शिकतील का? आपले मिळमिळीत धोरण हा प्रश्न सोडवू शकेल का?>> तसे करायची ईच्छा आहे कुणाला? खुर्ची मिळवा, खुर्ची टिकवा आणि नोटा छापा. खड्ड्यात गेलया समस्या - हो खड्डे मात्र मुबलक आहेत. समस्या संपतील पण ते नाही संपणार. भास्करराव, रक्त आटवणे व्यर्थ आहे. काल लाल चौकात पाकसदृश ध्वज फडकला. आपल्या समंजस सरकारने काय केले? असो.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Sat, 08/16/2008 - 17:02 नवीन

मागच्या

मागच्या आठवड्यात रशियाने एका धडाक्यात जवळ जवळ अख्खा जॉर्जिया पदक्रांत केला. अख्खा जॉर्जिया पादाक्रांत केलेला नाहीये तर दक्षिण आसेतिया केला आहे. आणि दक्षिण आसेतियात तसेही रशियाचे शांतीदुत होते.आंतरराष्ट्रीय मिडीयाचा साकश्विलीनी चांगला वापर करुन घेतला आहे पण वस्तुस्थिती ही आहे की जॉर्जियाने रणगाडे दक्षिण आसेतियात घुसवले होते कर्फ्यूच्या काळात लाखो लोक (त्यात खरे कश्मिरी किती व पाकचे भाडेकरू किती हा प्रश्न निराळा) पकिस्तानी झेंडे हातात घेऊन ताबारेषा ओलांडून मुजफ्फराबादला निघतात हाच आपल्या आणि रशियातल्या परीस्थितीतला फरक आहे.कारण दक्षिण आसेतियातील जनतेला रशियात जायचय तर काश्मिरमधील जनतेला पाकीस्तानात जायचय (अथवा स्वतंत्र रहायचय)
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 08/16/2008 - 17:37 नवीन

लष्करी उपाय?

काश्मिरवादाची रशिया-जॉर्जियाप्रकरणाशी तुलना मूळातच गैरलागू आहे. त्याची फारफारतर चेचन्यावादाशी तुलना होऊ शकेल. दुसरे, तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते स्पष्ट होत नाही. लष्करीबळाने काश्मिर प्रश्न सोडवला पाहिजे असे आपण सुचवित आहात का? तसे असल्यास, आजच्या घडीला जम्मू-काश्मिर राज्यात भारताचे (लष्करी-निमलष्करी) मिळून जवळपास ७ लाख जवान तैनात आहेत. शिवाय त्यांना भरपूर अधिकारदेखिल आहेत. एक कोटी लोकसंख्येसाठी ७ लाख म्हणजे दर शंभर व्यक्तींमागे ७ जवान (काश्मिरखोर्‍यात तर हे प्रमाण अधिकच वाढते). असे असूनही जर हा प्रश्न कायम असेल तर आपले रोगनिदानच चुकले आहे हे निश्चित! (आता निदानच चुकले तर उपचार चूकणारच). वर चिन्या ह्यांनी म्हटल्याप्रमाणे बहुसंख्य काश्मिरींना ना भारतात रहायचे आहे ना पाकिस्तातात जायचे आहे. त्यांना हवी आहे "आझादी". भारताने प्रचंड लष्करी ताकदीवर हा भूभाग (म्हणजे फक्त जमीन) भारतात ठेवली आहे. सर्वसामान्य काश्मिरी जनता मनाने कधीच भारतीय झालेली नाही. काश्मिरी पंडीत त्याला अपवाद. पण ते संख्येने अत्यल्प. उद्या सर्वच्या सर्व पंडीत काश्मिर खोर्‍यात परतले तरी काश्मिरची डेमॉग्राफी (आणि म्हणूनच परिस्थिती) फारशी बदलणार नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 08/20/2008 - 00:07 नवीन

सर्वसामान्य काश्मिरी जनता

सर्वसामान्य काश्मिरी जनता मनाने कधीच भारतीय झालेली नाही. -- काश्मिरबद्दल पूर्वी कुठेतरी वाचनात आले होते की काश्मिरी जनता भारताला पूर्णपणे अनुकूल कधीच नव्हती असे नव्हे. १९४७ ते ५० या वर्षांत काश्मिरमध्ये पाकिस्तान तसेच अफगाणिस्तानातून जी प्रचंड घुसखोरी झाली त्याने प्रत्यक्ष (धुसखोर) तसेच अप्रत्यक्ष (खुसखोरांनी चिथावनी देऊन तयार केलेले) भारतविरोधी लोक वाढू लागले. त्यानंतर ऐंशीच्या दशकात सुरु झालेल्या हिंसाचारामुळे भारतविरोधी मतप्रवाह वाढू लागले. आता मात्र परिस्थिती हाता बाहेर गेली आहे असे वाटते. लष्करीबळाने काश्मिर प्रश्न सोडवला पाहिजे असे आपण सुचवित आहात का? -- केवळ लश्करी उपायांनी भागनार नाही. वेगेवेळे देश त्यांचे असे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने सोडवत आहेत. त्यात बरेच यशस्वी प्रयोग आहेत. त्यांचा अभ्यास करून आपण आपल्याला योग्य असे प्रयोग केले पाहिजेत. पण त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती हवी. जसे की कायद्यामध्ये बदल करून इतर भारतीयांना काश्मिरात वसाहती निर्माणासाठी प्रोत्साहन देणे. उदा. तिबेट्-चिन, वेस्ट बँक - इस्त्राईल, अंदमान - भारत, वगैरे. काश्मिरवादाची रशिया-जॉर्जियाप्रकरणाशी तुलना मूळातच गैरलागू आहे. --रशियाने केलेल्या धाडसाने हा विचार पुन्हा डोक्यात आला एवढाच रशियाचा संदर्भ म्हणा हवे तर. आपला, (भारतीय) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा