आपल्याकडे इतके छान छान सण आहेत आणि प्रत्येक सणाचा काही खास मेनू अगदी ठरलेला असतो. नुकतीच नारळी पोर्णिमा येऊन गेली. नारळी भात केला होता. एकदम मस्त झाला होता.
तशी सोपी आहे रेसिपी. नक्की करून पहा.
साहित्यः १ वाटी तांदूळ, २ वाट्या चिरलेला गूळ, १ वाटी किसलेले ओले खोबरे, ५-६ काजूचे तुकडे, १५-२० बेदाणे, केशराच्या काड्या (ऑप्शनल), ३ वाट्या पाणी, ५-६ चमचे तूप, ४ लवंगा
कृती:
१) तांदूळ धुवून ५-१० मिनिटे निथळत ठेवा. एका गॅसवर ३ वाट्या पाणी गरम करत ठेवा.
२) एका पॅनमध्ये तूप घेऊन गरम करत ठेवा. तूप गरम झाले की त्यात लवंगा घाला. लवंगा चांगल्या तळल्या गेल्या काजू, बेदाणे, केशराच्या चुरलेल्या काड्या घाला. थोडे परता आणि लगेचच त्यात हा धुतलेला तांदूळ घालून ३-४ मिनिटे तूपावर चांगला भाजून घ्या.
३) मग त्यात ३ वाट्या गरम पाणी घालून पॅनला झाकण लावून मध्यम आचेवर गॅसवर ठेवा.
४) अधेमधे लक्ष ठेवत रहा. पाणी संपत आले की अंदाजाने १ वाटी गरम पाणी घालून, झाकण ठेवून भात शिजत राहू द्या. भात करपू देऊ नका.
५) भात जवळजवळ पूर्ण शिजत आला की (साधारण ९५% शिजला की) मग त्यात चिरलेला गूळ घालून भात एकदा परतून घ्या.
६) मग ओलं खोबरं घालून परत एकदा भात परतून घ्या, सारखा करून घ्या. आणि एकदम मंद आचेवर भात चांगला शिजू द्या. (गरज पडेल तेव्हा थोडे थोडे गरम पाणी घालून भात चांगला शिजू द्या.) भात पूर्ण शिजला की गॅसवरून खाली उतरवा. आणि आवडत असेल तर वरून चमचाभर तूप घालून खा.
टीपः ज्यांना जास्त गोड भात आवडत नाही त्यांनी दोन ऐवजी दिड वाटी गूळ घालावा.
वाचने
6887
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान !!
सुंदर..फ़ोटु झकास आहे
झकास आणि माझा आवडता पदार्थ...
फारच छान..
छान!
छान !
छान
मस्त
छान छान
काल करून पाहीला
धन्यवाद अमृत. >>पहिल्यांदाच
In reply to काल करून पाहीला by अमृत
चान चान....
धन्यवाद.