Skip to main content

गुवाहाटी आणि बागपत

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी शनिवार, 14/07/2012 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसात आपल्याच देशात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे कोणाही सुसंस्कृत भारतीयाची मान शरमेने खाली जाईल आणि संतापाचे अंगार दाटून येतील.आणि दुर्दैवाने आपण त्याविषयी काहीही करू शकत नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काही करू शकणार नाही. घटना १: स्थळ: गुवाहाटी. एक १५-१६ वर्षांची मुलगी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस एका पबमध्ये साजरा करून बाहेर पडत असताना तिची काही माणसांबरोबर वादावादी झाली.त्यानंतर १५-२० जणांनी त्या मुलीचे केस ओढून तिला रस्त्यावर पाडले.त्या मुलीचे कपडे फाडायचा प्रयत्न करण्य़ापर्यंत या हैवानांची मजल गेली.आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार रेकॉर्ड होत होता आणि तो व्हिडिओ इंटरनेटवर आला आहे.त्या २० जणांची छायाचित्रे (त्या व्हिडिओतून घेतलेली) फेसबुक आणि इतर अनेक ठिकाणी आली आहेत.त्यांच्या चेहऱ्यांवर आपण करत आहोत ते कृत्य चुकीचे आहे असा पुसटसाही भाव नाही.यातील ३ जणांना पोलिसांनी पकडले आहे पण उरलेले अजूनही सापडलेले नाहीत. जर का रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला अशा पध्दतीने वागविले जात असेल, तिचे कपडे फाडायचा प्रयत्न होत असेल तर आपण आपल्याला सुसंस्कृत का म्हणवावे? काही वर्षांपूर्वी मुंबईत सुनील मोरे नामक पोलिस हवालदाराने मरीन लाइन्समधील पोलिस चौकीत एका १५-१६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता.त्याच्या पुढच्या वर्षी ३१ डिसेंबरला रात्री गेटवे ऑफ इंडियावर नववर्षाचे स्वागत करत असलेल्या जमावाने दोन मुलींचे कपडे फाडले होते आणि ते कृत्य करणाऱ्यांचे हिंदुस्थान टाइम्समध्ये फोटोही आले होते.नशीबाने या मुलींना त्यांच्याबरोबर असलेल्या तरूणांनी त्यांना वेळीच गाडीतून त्यांच्या घरी नेऊन सोडले.समजा त्यांच्याबरोबर असे कोणी नसते तर त्यांची काय अवस्था झाली असती? अशा घटना घडल्यानंतर नेहमीप्रमाणे स्वयंघोषित नैतिक पोलिसांचे ’मॉरल पोलिसिंग’ चालू झाले. (अजून गुवाहाटीच्या प्रकरणात ते कसे चालू झाले नाही याचेच आश्चर्य वाटते).दरवेळी मुलींनी तोकडे कपडे घातल्यामुळे/दारू प्यायल्यामुळे या प्रसंगांना सामोरे जायची वेळ त्यांच्यावर येते अशाप्रकारचे ठेवणीतले डायलॉग झोडले जातात. इतरांनी काय करावे (तोकडे कपडे घालावे की घालू नये, दारू प्यावी की पिऊ नये) हे सांगायचा अधिकार अशा मॉरल पोलिसांना कोणी दिला?दुसरे म्हणजे मुलींनी तोकडे कपडे घातले हे त्यांच्या अंगाला हात लावायचे समर्थन कसे होऊ शकते?तिसरे म्हणजे तोकडे कपडे म्हणजे नक्की काय?अशा बुरसटलेल्या लोकांना नऊवारी साडीसोडून इतर सर्व काही तोकडेच वाटेल.गेट वे ऑफ इंडियाप्रकरणी हिंदुस्तान टाइम्स मध्ये आलेले फोटो मी पण बघितले होते.गुडघ्याइतक्या लांबीचा स्कर्ट आणि खांदे झाकणारा टॉप असा पेहराव त्या मुलींनी केला होता.याला तोकडे कपडे का म्हणावे?कामानिमित्त मी युरोप आणि ऑस्ट्रेलियात अनेकदा गेलो आहे.तिथे त्यापेक्षाही कितीतरी तोकडे कपडे घातलेल्या मुली असतात.तरीही भर रस्त्यावर त्यांच्या अंगाला हात लावून घाणेरडी कृत्ये होत नाहीत. दृश्य क्रमांक २: राजधानी दिल्लीपासून ५०-६० किलोमीटर अंतरावरील बागपतजवळच्या एका गावातील खाप पंचायतीने ४० पेक्षा कमी वयाच्या स्त्रियांना बाजारात खरेदीसाठी जाऊ नये, मोबाइल फोन वापरू नयेत अशा स्वरूपाची बंधने घातली आहेत आणि प्रेमविवाहाला बंदी घातली आहे.आणि धक्कादायक बातमी म्हणजे उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी ’प्रत्येकाला आपले विचार मांडायचे स्वातंत्र्य आहे’ असे म्हणत एका पध्दतीने या खाप पंचायतीचे समर्थन केले आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानला का नावे ठेवा?असे तालिबान आपल्या देशातच आहेत आणि तेही राजधानीपासून इतक्या जवळ बिनदिक्कतपणे आपले बुरसटलेले विचार मांडतात आणि इतकेच नव्हे तर त्याची सक्ती करतात.मागे हरियाणातील जिंद जिल्ह्यात जातीबाहेर प्रेम केल्याच्या ’गुन्ह्याबद्दल’ एका युगुलाला ठार मारले होते आणि ते कृत्य केल्याचा कसलाही पश्चात्ताप त्या लोकांना नव्हता याची आठवण आली.त्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान नाही असे समर्थन या खाप पंचायतीच्या लोकांनी केले होते.त्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान नसले तर त्यांनी स्वत: प्रेमविवाह करू नयेत.पण ज्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान आहे अशांचा हक्क हिरावून घ्यायचा अधिकार त्यांना कोणी दिला?आणि त्याउपर त्यांना ’आमच्या जीवनपध्दतीच्या’ नावावर ठार मारायचा अधिकार त्यांना कोणी दिला? अशा घटना वाचल्या की खूप व्यथित व्हायला होते.एक समाज म्हणून आपल्याला सुसंस्कृत म्हणवून घ्यायचा अधिकारच नाही असे वाटते.या सगळ्याला जबाबदार कोण आहे?प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगायचा अधिकार आहे आणि आपल्याला ते मान्य नाही म्हणून (किंवा अन्य कोणत्याही कारणाने) अशी कृत्ये करायचा कोणालाच अधिकार नाही हे आपला समाज कधी शिकणार?आणि अशा बातम्या वाचून दु:ख व्यक्त करण्याशिवाय आपण काय करू शकतो?मला पाच वर्षांचा एक मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी आहे.या सगळ्या गोष्टी समजण्याइतकी ही मुलं मोठी नाहीत.पण ती जशीजशी मोठी होतील त्याप्रमाणे मला त्यांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या आहेत म्हणजे मोठे झाल्यावर माझी मुले अशा कृत्यांपासून दूर राहतील आणि तोपर्यंत अशा प्रकारांविरूध्द काही चळवळ उभी राहिली असेल तर त्यात पुढाकार घेतील.याव्यतिरिक्त आपण काही करू शकतो का?तुमची काय मते आहेत? (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ मी "ऐसी अक्षरे" संकेतस्थळावर "पिसाळलेला हत्ती" नावाने वावरतो मी "उपक्रम" संकेतस्थळावर "आयाळ वाढलेला सिंह" नावाने वावरतो मी "मायबोली" संकेतस्थळावर "जिभल्या चाटणारा बोका" नावाने वावरतो

वाचने 45457
प्रतिक्रिया 173

प्रतिक्रिया

गुहाटीच्या तरुणीच्या बातम्या वाचनात येत होत्या. युट्युबवर आत्ताच व्हिडियो बघितला. तरुणीशी छेडछाड चाललेली असतांना त्यांना तसे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न कोणी करतांना दिसला नाही. शेवटी पोलिसांनी तिला सुरक्षितपणे तेथुन घेऊन गेलेले दिसले. [बातमी आणि तरुणीची मुलाखत]व्हिडियोत अशी कृत्य करणार्‍यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. आरोपींना पकडणं तसं काहीच अवघड नाही. साल्यांना पोलिसांनी असा शिष्टीमॅटीक धु धु धुतला पाहिजे की आयुष्यात त्याचा त्यांना कधी विसर पडु नये. चाळीशीच्या आतल्या स्त्रियांनी खरेदीला जायचं नाही आणि मुलींनी रस्त्यावर मोबाईल वापरायचा नाही. खाप पंचायतीबद्दल तर बोलायचं काम नाही. च्यायला, आपला प्रवास कोणत्या दिशेला चालु आहे, काही कळायला मार्ग नाही. -दिलीप बिरुटे (हताश)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आणि त्याच्या अनुषंगाने चाललेल्या चर्चेत वाद-प्रतिवाद करणारे उत्तम प्रतिसाद वाचतोय. ह्यानिमित्ताने मी इथे अजुन एक मुद्दा उपस्थित करु इच्छितो तो म्हणजे जमावाची मानसिकता. खवळलेला, बिथरलेला किंवा कुठल्याशा कैफात झिंगलेला आणि जमावाच्या ताकदीचा अंदाज असणारा समूह एखाद्या वादात समोर कोण आहे ह्याची कधीच काळजी करत नाही. उपरोक्त घटनेत त्या बिचार्‍या मुलीचे केस ओढुन, कपडे वगैरे फाडुन मारहाण झाली हे वाचले (व्हिडिओ पाहण्याची इच्छा नाही). पण समजा त्या मुलीच्या जागी कोणता मुलगा असता किंवा एखादी गृहस्थ असते किंवा त्यापुढे जाऊन एखादे आजोबाही असते आणि त्यांनी काही ठिकाणी म्हटल्याप्रमाणे अशा बेफाम जमावाशी वाद घातला असता तर त्यांनाही अशीच कपडे फाडून मारहाण झाली असती असे वाटते. रोजच्या जीवनातही क्षुल्लक कारणावरुन जमावाने एकट्यादुकट्या किंवा संख्येने कमी असलेला ग्रुपला आपल्या संख्येच्या ताकदीच्या जोरावर असेच निर्वस्त्र करुन धु धु धुतल्याची उदाहरणे कमी नाहीत. इनफॅक्ट रस्त्यावर मारामारी सुरु झाली की त्या प्रकाराशी अजिबात संबंध नसलेले लोकल लोकही आपल्या स्थानिकतेचा बडेजाव मिरवण्यासाठी उगाच ह्यात घुसतात आणि जी बाजु कमजोर आहे त्याच्यावर हात साफ करुन घेतात असा अनुभव आहे. बेदम मारणे,कपडे फाडणे, गलिच्छ आणि अश्लिल शिवीगाळ करणे ह्या प्रकारात समोर कोण आहे ह्याचा जमावाला अजिबात फरक पडत नाही असे माझे ठाम मत आहे (खाली मस्त कलंदरने अशा प्रकाराचा विरोध करताना खून झालेल्या मुंबईच्या २ दुर्दैवी मुलांचे उदाहरण दिलेच आहे). त्या मुलीच्या दुर्दैवाने ती ह्यांच्या तावडीत सापडली व त्यापुढे ही दुर्दैवी घटना घडली हे सर्व खेदजनकच आहे. आता एखाद्या भांडणात जमावाला समोर कोण आहे ह्याचाच फरक पडत नसेल तर त्या मुलीने दारु पिली आहे का किंवा तिने कसे कपडे घातले आहेत हे जमावाच्या दृष्टीने दुय्यम आहे. समजा त्या मुलीने अगदी नऊवारी नेसुनही त्यांच्याशी वाद घालता असता किंवा त्या मुलीच्या जागी दुसरा एखादा एकटादुकटा किंवा असहाय्य मुलगा असता किंवा त्यापुढे जाऊन एखादे वयस्कर गृहस्थ असते तरीही थोड्याफार फरकाने हाच प्रकार घडला असते असे नमुद करु वाटते. अर्थात इतरांच्या तुलनेत ह्या घटनेचा व्हिक्टिम एक अल्पवयीन मुलगी आहे हे जमेस धरुन ह्या प्रसंगाचे गांभिर्य इतरांच्या तुलनेत जास्त आहे व त्यामुळे त्याच्या अनुषंगाने कायद्याची इतर कलमे वापरुन अधिकाधिक कठोर शिक्षा होणे जरुरीचे आहे व तेच योग्य आहे ह्यात दुमत नाही. माझ्या ह्या मुद्याच्या अनुषंगाने मला एवढेच म्हणायचे आहे की मुलीच्या वर्तनाबद्दल व त्याच्या अनुषंगाने जमावाला मिळणार्‍या चिथवणीबद्दल जी चर्चा चालली आहे त्यापेक्षा इथे जमावाच्या मानसिकतेला लक्षात घेणे जास्त महत्वाचे आहे व त्यावर उपाय शोधला पाहिले. सदर घटनेतुन झुंडशाहीने वागणार्‍या अशा बेलगाम समुहाला योग्य शिक्षा होणार असेल तर ह्याच्यावरुन धडा घेऊन पुढेमागे होऊ शकणार्‍या अशा घटनात त्रास होऊ शकणार्‍या कित्येक मुली, मुले, पुरुष किंवा सर्वच असहाय्य आणि एकट्यादुकट्या लोकांना ह्यातुन १००% संरक्षणाची अगदी हमी जरी नसली तरी किमान काही दिलासा मिळेल. - छोटा डॉन

पु. व. खरंच गुवाहटी, गेटवे ऑफ इंडिया च्या घटना, रेप केपिटल आणि दररोज पेपर मधे येणार्या अजुनही बर्याच काही बातम्या अगदी frustrate करतात... आणि मिपा वर च येणार्या असल्या कंमेट्स www.misalpav.com/node/22214#comment-412321 काय बोलणार अशा लोकांशी... molestation, rape n sexual harrassment ची सद्यस्थितीतली टक्केवारी काढली असल्याप्रमाणे 'चित्र बदलते आहे' असा दावा केलाय... आणि अजुन पुढे जाऊन 'स्त्रियांना आपले प्रायवेट पार्ट कितपत प्रायवेट ठेवायचे आहेत' अशी comment... थोडा जरी sense मुलांमधे असला तर प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारुन पहावा कि 'how many times i have stared at/commented n laughed about/touched private parts of some un/known gal आणि तेच how many times i was at receiving end of this kind of behaviour from gals' म्हणजे खरचं चित्रं किती बदललं आहे ते कळेल.

एक १५-१६ वर्षांची मुलगी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस एका पबमध्ये साजरा करून बाहेर पडत असताना........... हल्ली भारतात १५-१६ वर्षाच्या मुली एकट्यादुकट्या, रात्रीबेरात्री पब मध्ये जातात? तिची काही माणसांबरोबर वादावादी झाली. घ्या.... त्यानंतर एकटी मुलगी १५-२० जणांबरोबर वादही घालते? ऐकावे ते नवलच. जर का रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला अशा पध्दतीने वागविले जात असेल, तिचे कपडे फाडायचा प्रयत्न होत असेल तर आपण आपल्याला सुसंस्कृत का म्हणवावे? कुणा एखाद्या टोळक्याने गैरवर्तुणूक केली म्हणून आख्खा समाज असंस्कृत कसा होतो? भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अशा घटनांचे प्रमाण किती आहे? जगातील सर्व समाजांमध्ये खून, दरोडे, बलात्कार, फसवणूक, मारामार्‍या होतच असतात म्हणून तर जगात असा एकही देश नाही जिथे पोलीस, कोर्ट इ. अस्तित्वातच नाही. काही वर्षांपूर्वी मुंबईत सुनील मोरे नामक पोलिस हवालदाराने मरीन लाइन्समधील पोलिस चौकीत एका १५-१६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता.त्याच्या पुढच्या वर्षी ३१ डिसेंबरला रात्री गेटवे ऑफ इंडियावर नववर्षाचे स्वागत करत असलेल्या जमावाने दोन मुलींचे कपडे फाडले होते स्त्रियांनी आणि मुलींनीच नाही तर स्वसंरक्षण करू न शकणार्‍या सर्व व्यक्तींनी अशा वेळा, अशी ठिकाणं, असे प्रसंग टाळावेत. हा कॉमन सेन्स घरच्या संस्कारातून सर्वांनाच शिकविला जातो. अशा घटना घडल्यानंतर नेहमीप्रमाणे स्वयंघोषित नैतिक पोलिसांचे ’मॉरल पोलिसिंग’ चालू झाले. म्हणजे चार चांगल्या गोष्टी कोणी सांगितल्या की स्वयंघोषित नैतिक पोलीस म्हणून हिणवायचे आणि अशा घटना घडल्या की वरतून आपणच विचारायचे, 'ह्या बाबत काय करता येईल?' नैतिक पोलीसांचे ऐकलेच पाहिजे असे नाही. पण मग येणार्‍या प्रसंगांना आपणच तोंड द्यायचं. सिव्हील पोलीसांकडे जा, कोर्टात जा, गुंडांचा सामना करा. इतरांनी काय करावे (तोकडे कपडे घालावे की घालू नये, दारू प्यावी की पिऊ नये) हे सांगायचा अधिकार अशा मॉरल पोलिसांना कोणी दिला? मत प्रदर्शनाचा अधिकार 'लोकशाही' पद्धतीच्या राजवटीने दिला. असेही, समाजाला (आपल्या भाषेत मॉरल पोलीसांना...) काही सांगण्याचा अधिकार नसेल तर बलात्कार, खून करणार्‍यालाही 'असे वागू नकोस, हे गैर आहे' हे सांगण्याचा कोणाला अधिकार उरत नाही. तेही म्हणतील, 'आम्ही बलात्कार करावा की नाही हा आमचा प्रश्न आहे.तुम्ही कोण आम्हाला शहाणपणा शिकविणार?' अशा बुरसटलेल्या लोकांना नऊवारी साडीसोडून इतर सर्व काही तोकडेच वाटेल. खरंच? चार चांगल्या गोष्टी सांगणारी माणसे म्हणजे बुरसटलेल्या विचारांची? मग पुढारलेल्या विचारांचे कोणाला म्हणावे? बलात्कार करणार्‍याला? की तोकडे कपडे घालून, रेव्हपार्ट्यातून नशापाणी करून, रस्त्यावर अचकट विचकट अंग विक्षेप करीत जाणार्‍या तरूणींना? मी युरोप आणि ऑस्ट्रेलियात अनेकदा गेलो आहे.तिथे त्यापेक्षाही कितीतरी तोकडे कपडे घातलेल्या मुली असतात.तरीही भर रस्त्यावर त्यांच्या अंगाला हात लावून घाणेरडी कृत्ये होत नाहीत. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियात बलात्कार, अपहरण, खून होतच नाहीत? पहिल्यांदाच ऐकतो आहे. खाप पंचायतीच्या मुद्यावर तुमच्याशी सहमत आहे. कुठल्याच गुन्ह्याला नैतिक अधिष्ठान नसतं. कुठलाच गुन्हा समर्थनिय नाही. पण त्याच बरोबर बाहेरच्या जगात वावरताना सुरक्षेची काही बंधने सर्व स्त्री-पुरुषांना पाळाविच लागतात. आणि जर ती पाळली नाहीत तर अशा एखाद्या घटनेचे आपण बळी ठरू शकतो, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. हे मी 'बुरसटलेल्या विचारांचा नैतिक पोलीस' ह्या आरोपाची शक्यता स्विकारून सांगू इच्छितो. आपण दिलेल्या आणि आपल्या सर्वांच्याच माहितीच्या कक्षेबाहेरीलही सर्व अनैतिक आणि अमानुष घटनांचा मी धिक्कारच करतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाकी सर्व मुद्द्यांवर सहमत्.स्वसंरक्षण करता येत नसेल तर आजही जुनी माणसे "रात्री बेरात्री जाउ नकोस, चोर- चिलटाचं भय फार " असे काळ्जीनं सांगतात, ते चूक वाटत नाही. कुणा एखाद्या टोळक्याने गैरवर्तुणूक केली म्हणून आख्खा समाज असंस्कृत कसा होतो? भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अशा घटनांचे प्रमाण किती आहे? जगातील सर्व समाजांमध्ये खून, दरोडे, बलात्कार, फसवणूक, मारामार्‍या होतच असतात म्हणून तर जगात असा एकही देश नाही जिथे पोलीस, कोर्ट इ. अस्तित्वातच नाही. समाज असंस्कृत असणे सोडून दिले तर एक मुद्दा महत्वाचा. इतरत्र चोरी, दरवडेखोरी , विशेष्तः बलात्कार आणि लाच देणे-घेणे केल्यास जबरदस्त शिक्षा होते. ह्याला "काय्दा-सुव्यवस्था" चांगली असणे असे म्हणतत. भारतात फाशी कुणाला द्यायची हे ठरवायला दोन्-पाच्-दहा कितीही वर्षे लागू शकतात. थोडीफारही सत्ता(किंवा पुरेसा पैसा) हाती असेल तर कुणीही सामान्याचे काय वाट्टेल ते दिवसाढवळ्या करु शकतो. भरदिवसा शहराच्या मुख्य हमरस्त्यावर मुडदे पडलेत आणि एकही साक्षीदार मिळत नाही हे चित्रही वारंवर दिसते. न्यायालयांची गती बोंबलली आहे. पोलिसांचा गुंडाना धाक वाटायला हवा आणि सामान्यांना आपलेपण. इथे चित्र उलटे होते की काय असे खाजगी गप्पांतून जाण्वते.

In reply to by प्रभाकर पेठकर

हल्ली भारतात १५-१६ वर्षाच्या मुली एकट्यादुकट्या, रात्रीबेरात्री पब मध्ये जातात?
वाटलेच होते. ती मुलगी पबमध्ये गेली म्हणून हा प्रकार घडला असे कोणीच म्हटले कसे नाही!! अहो असे प्रकार दिवसाढवळ्या शाळेतून घरी परतत असलेल्या मुलींबरोबरपण होतात.मागे रिंकू पाटील या मुलीला ती दहावीची परीक्षा देत असताना भर वर्गात घुसून जाळले होते.म्हणजे आता मुलींनी दहावीची परीक्षा पण देऊ नये का?आणि शहरात जर पब असतील तर त्या ठिकाणी जायचा त्या मुलीला का अधिकार असू नये?पबमध्ये जाणे चुकीचे आहे असे वाटत असेल तर ते त्या मुलीने आणि तिच्या आई-वडिलांनी बघून घ्यावे.पण जोपर्यंत ती इतरांबरोबर काही वावगे करत नाही तोपर्यंत इतरांना याविषयी काही बोलायचे कारण नाही.आता या वयाच्या मुलीला पबमध्ये प्रवेश कसा दिला असेल?इथे कायद्याचे उल्लंघन झाले आहे का?तसे झाले आहे असे वाटते आणि त्याबद्दल पबवरही कारवाई व्हायला हवी.पण त्या मुलीचे कपडे फाडायचे समर्थन कसे होऊ शकेल?
कुणा एखाद्या टोळक्याने गैरवर्तुणूक केली म्हणून आख्खा समाज असंस्कृत कसा होतो? भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अशा घटनांचे प्रमाण किती आहे?
यात केवळ intensity चा फरक आहे. कोणत्याही स्त्रीला बसमधून जातानाचे तिचे अनुभव विचारा.त्यांच्यावर बलात्कार होत नसेल पण त्यांच्या अंगप्रत्यांगांना गर्दीचा गैरफायदा घेऊन हात लावणाऱ्यांच्या मानसिकतेत आणि बलात्काऱ्यांच्या मानसिकतेत फार फरक आहे असे वाटत नाही.बहुदा कायदा/पोलिस/समाजाचा धाक म्हणून असे लोक बलात्कार करायला धजावत नसतील.पण तो धाक नसता तर तेही त्यांनी केलेच असते असे म्हणायला नक्कीच जागा आहे.
स्त्रियांनी आणि मुलींनीच नाही तर स्वसंरक्षण करू न शकणार्‍या सर्व व्यक्तींनी अशा वेळा, अशी ठिकाणं, असे प्रसंग टाळावेत. हा कॉमन सेन्स घरच्या संस्कारातून सर्वांनाच शिकविला जातो.
ठिक आहे.पण म्हणून अशी कृत्ये समर्थनीय/कमी निषेधार्ह कशी ठरतात?मी बाहेर जाताना माझ्या घराला कुलूप लावायला विसरलो तर चोराला घरी घुसून चोरी करायचा अधिकार प्राप्त होतो का?
समाजाला (आपल्या भाषेत मॉरल पोलीसांना...) काही सांगण्याचा अधिकार नसेल तर बलात्कार, खून करणार्‍यालाही 'असे वागू नकोस, हे गैर आहे' हे सांगण्याचा कोणाला अधिकार उरत नाही.
अत्यंत हास्यास्पद नव्हे अत्यंत हिन पातळीवरचे आणि निषेधार्ह विधान आहे हे.बलात्कार/खून करणारे इतरांना कोणत्या तरी प्रकारे हानी पोहोचवत असतात.ती मुलगी जर दारू पिऊन गाडी चालवायला निघाली असती तर तिला अडवायचा इतरांना नक्कीच अधिकार आहे.पण जर तिच्या कृतीने इतरांना कसलीही हानी पोहोचत नसेल तर त्या मुलीला ’तू अमुक कर तमुक करू नको’ हे इतरांनी सांगायचे काही काम नाही.
चार चांगल्या गोष्टी सांगणारी माणसे म्हणजे बुरसटलेल्या विचारांची? मग पुढारलेल्या विचारांचे कोणाला म्हणावे? बलात्कार करणार्‍याला? की तोकडे कपडे घालून, रेव्हपार्ट्यातून नशापाणी करून, रस्त्यावर अचकट विचकट अंग विक्षेप करीत जाणार्‍या तरूणींना?
याचे उत्तर तुम्हीच दिले आहे आणि ते म्हणजे तुमच्यासारखा विचार करणाऱ्यांना मात्र नक्कीच पुढारलेल्या विचारांचे समजू नये.अहो हे ’मॉरल पोलिस’ चार चांगल्या गोष्टी सांगतात हा जावईशोध तुम्हाला कुठून लागला?यांच्या मते स्त्रियांनी अमुक एका प्रकारचे वागणे ठेवावे अशी अपेक्षा असते. आणि पूर्ण न केल्यास यांचा इगो दुखावला जातो आणि यातून हे ’मॉरल पोलिसिंग’ जन्माला येते.हे नैतिक पोलिस सद्गुणांचे पुतळे असतात का?स्त्रियांनी कोणत्या पध्दतीचे कपडे घालावे हे सांगणारे हे धोतर-सदरा घालून का नसतात?त्यांनी सुरवातीला स्वत:मध्ये सुधारणा करावी आणि मग जगाला उपदेशांचे डोस पाजावेत.
युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियात बलात्कार, अपहरण, खून होतच नाहीत? पहिल्यांदाच ऐकतो आहे.
याला उत्तर वरीलप्रमाणेच. लंडनमधील बस आणि ट्रेनमध्येही खूप गर्दी असते.पण भारतात जसे स्त्रिया आणि मुलींच्या अंगलट यायचे प्रकार चालतात त्याच्या एक शतांशही तिथे चालत नाहीत हे मी स्वत: बघितले आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

अहो असे प्रकार दिवसाढवळ्या शाळेतून घरी परतत असलेल्या मुलींबरोबरपण होतात. आपण उपस्थित केलेली घटना पब मधून बाहेर पडलेल्या मुली बद्दल आहे. बाकी, भारतात कशा कशा परिस्थितीत बलात्कार होतात हे मलाही ठाऊक आहे. पण, चर्चेत एक विशिष्ट घटना तुम्ही घेतलेली आहे. त्या बद्दल मी लिहीले आहे. म्हणजे आता मुलींनी दहावीची परीक्षा पण देऊ नये का? दहावीची परिक्षा देणे आणि रात्रीच्या वेळी पब मध्ये जाणे हे मी तरी एक मानत नाही. शहरात जर पब असतील तर त्या ठिकाणी जायचा त्या मुलीला का अधिकार असू नये? शहरात कुंटणखानेही असतात, जुगारांचे अड्डे असतात, तिथे जायचा अधिकारही आपल्या मुलांना असतोच. पण आपली मुले तिथे गेली आणि त्यांना कोणी ज्येष्ठांनी हटकलं तर मला तरी त्यात ज्येष्ठांची काही चुक आहे असे वाटणार नाही. जोपर्यंत ती इतरांबरोबर काही वावगे करत नाही तोपर्यंत इतरांना याविषयी काही बोलायचे कारण नाही तुमची काय मते आहेत? हा प्रश्न तुम्हीच तुमच्या चर्चा प्रस्तावात विचारला आहे. त्या मुलीचे कपडे फाडायचे समर्थन कसे होऊ शकेल? कपडे फाडायचे समर्थन कोणी केले आहे? माझा प्रतिसाद नीट पुन्हा वाचावा ही नम्र विनंती. वैयक्तिक पातळीवर न उतरता विधानं केलीत तर चर्चा पुढे चालू शकेल. बहुदा कायदा/पोलिस/समाजाचा धाक म्हणून असे लोक बलात्कार करायला धजावत नसतील..पण तो धाक नसता तर तेही त्यांनी केलेच असते असे म्हणायला नक्कीच जागा आहे म्हणजे समाजाचा धाक आवश्यक आहे हे तुम्हीच सिद्ध करता आहात. वर पुन्हा, बुरसटलेल्या विचारांचे, नैतिक पोलीस वगैरे दूषणेही लावणार. अशी कृत्ये समर्थनीय/कमी निषेधार्ह कशी ठरतात? पुन्हा तेच. समर्थन कोणी केले आहे? माझा प्रतिसाद नीट पुन्हा वाचावा, अशी पुन्हा एकदा नम्र विनंती. अत्यंत हास्यास्पद नव्हे अत्यंत हिन पातळीवरचे आणि निषेधार्ह विधान आहे हे. का बरे? पिडीताने कसेही स्वैराचारी वागले तरी त्याला बोलायचे नाही. तर पिडणार्‍याला तरी का बोलायचे? बलात्कार/खून करणारे इतरांना कोणत्या तरी प्रकारे हानी पोहोचवत असतात. १५-१६ वर्षाची मुलगी रात्रीबेरात्री पब मधून दारू पिऊन बाहेर पडत असेल तर ती तिच्या वयाच्या अनेक इतर मुलींसमोर चुकीचा आदर्श ठेवत आहे. अशाने हळू हळू आख्खी तरूणपिढी बरबाद होऊन, समाज पोखरला जाईल. तरूण पिढी ही देशाचे भवितव्य असते. तिच बाह्यात्कारी झाली तर देशाचं भवितव्य मातीमोल होण्यास वेळ लागणार नाही. तू अमुक कर तमुक करू नको’ हे इतरांनी सांगायचे काही काम नाही. जन्मलेल्या मुलावर संस्कार घडवून एक सुजाण नागरीक घडविला जातो. असे सुजाण नागरीक देशाची जमापुंजी असते. संस्कार कसे कसे होत जातात? घरात आई-वडील, शाळेत शिक्षक, बाहेरच्या जगात समाज, पुस्तके अशा अनेक गोष्टी मुलांवर संस्कार करीत असतात. म्हणजेच एक सुजाण नागरिक घडविण्यात पालक आणि शिक्षकांइतकाच समाजाचाही सिंहाचा वाटा असतो. आपल्या मुलांनी वाईट संगतीत राहू नये असे पालकांना का वाटत असते? मुलांवर चुकीचे संस्कार होतील ह्या भितीपोटीच नं! तुमच्यासारखा विचार करणाऱ्यांना मात्र नक्कीच पुढारलेल्या विचारांचे समजू नये. शक्य आहे. तुमच्या विचारसरणीच्या मोजपट्टीवर मी पुढारलेला नसेनही. मला त्याचे दु:ख नाही. 'स्वातंत्र्य' आणि 'स्वैराचार' ह्यात मी फरक मानतो. 'स्वातंत्र्या'बरोबर जबाबादारी येते. बेजबाबदारपणे फक्त 'स्वैराचार' होतो. स्त्रियांनी कोणत्या पध्दतीचे कपडे घालावे हे सांगणारे हे धोतर-सदरा घालून का नसतात? मी अशा समाजात वाढलो आहे जिथे पुरुषांनाही शर्टाचे वरचे बटन उघडे टाकायला बंदी होती. केसांची झुल्फे वाढवून नाक्यावर उभं राहायला बंदी होती. शीटीवर गाणे म्हणायला बंदी होती. पँटच्या मागच्या खिशात कंगवा ठेवायला बंदी होती. अशी अनेक बंधनं पुरुषांनाही होती/आहेत. ही कायद्याची बंधनं नाहित, नैतिकतेची आहेत. लंडनमधील बस आणि ट्रेनमध्येही खूप गर्दी असते.पण भारतात जसे स्त्रिया आणि मुलींच्या अंगलट यायचे प्रकार चालतात त्याच्या एक शतांशही तिथे चालत नाहीत हे मी स्वत: बघितले आहे. लंडन मधील बस मध्ये आणि रेल्वेत भारतातील बस आणि रेल्वे इतकी गर्दी मी तरी पाहिली नाही. असो. दोन देशांची संस्कृती वेगवेगळी आहे. तिथे कोणी कोणाच्या अंगचटीला येत नाही कारण संमतीने सर्व मिळत असताना जबरदस्ती अंगचटीला येण्याचे कारण काय? त्यांच्या संस्कृतीत शरीर संबंधाचा आपल्या इतका बाऊ केला जात नाही. १२-१३ वर्षाच्या मुलींच्या पर्स मध्ये आईच निरोध ठेवते असे वाचले आहे. तसेच, १३ वर्षीही माता झालेल्या केसेस पेपरात वाचल्या आहेत. लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी, ट्यूब रेल्वेच्या, खच्चून भरलेल्या, सरकत्या जिन्यावर दीर्घ चुंबन घेणारी युगुलं मी ही पाहिली आहेत. आयफेल टॉवरच्या, पर्यटकांनी भरलेल्या परीसरात दोन मुलींना एकमेकींचे चुंबन घेत बसलेले मीही पाहिले आहे. विमानात प्रियकराच्या हाफ चड्डीत.... जाऊदे मी तर लिहूही शकत नाही. जिथे शरीरसुख एवढ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तिथे अनोळखी मुलींच्या अंगचटीला येण्याची गरजच काय? तरीही, तिथेही बलात्कार होताहेत. ह्या संस्कृतीचे दुष्परीणाम त्यांनाही जाणवत आहेतच. लग्ना आधीच शरीरसुखाचा एवढा अतिरेक झाल्यावर, संसारसुखाची मुल्ये हरविलेली अनेक जोडपी लवकरच विभक्त होताना, नविन जोडीदारा बरोबर पाट लावताना, पुन्हा विभक्त होताना दिसतात. हेच संस्कार त्यांच्या मुलांवर होतात. पुण्याचे वटवाघूळ साहेब, माझ्या मनातील सर्व मुद्दे मी मांडले आहेत. अजून जास्त काही मनात बाकी नाही. आपल्याला माझी मते पटत नसतील तर ती पटवून घ्या असा माझा आग्रह नाही. प्रत्येक दोन व्यक्तींमध्ये मतभिन्नता असतेच असते. त्यामुळे तशी आपल्यात राहिल्याने मला किंवा आपल्याला काहीच फरक पडत नाही. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

समाजाचा धाक फक्त मुलींना असावा अशा पद्धतीचं तुम्ही लिहिताय. उलट आपापल्या मुलांना मुलींना नीट वागवायला शिकवणं हा एक समाजाचा धाक म्हणता येईल. इथे चोर सोडुन संन्याशालाच फाशीचं समर्थन होतंय. कुंटणखाना अन पब यातला फरक माहीती नसेल बोलु नका...पण वाट्टेल ती तुलना कशाला? १५-१६ वर्षाची मुलगी रात्रीबेरात्री पब मधून दारू पिऊन बाहेर पडत असेल तर ती तिच्या वयाच्या अनेक इतर मुलींसमोर चुकीचा आदर्श ठेवत आहे. अशाने हळू हळू आख्खी तरूणपिढी बरबाद होऊन, समाज पोखरला जाईल. तरूण पिढी ही देशाचे भवितव्य असते. तिच बाह्यात्कारी झाली तर देशाचं भवितव्य मातीमोल होण्यास वेळ लागणार नाही. हास्यास्पद याखेरीज काहीही नाही. तालिबानी मेंटॅलिटी ती हिच असावी. भारतात अल्पवयीन माता नाहीत असं म्हणायचं असेल तर दंडवत!! इथे बोलबाला होत नाही, मुलं गटारात टाकुन दिली जातात म्हणुन समजत नाही..माझ्यासमोरच एक - दोन उदा. आहेत. का बरे? पिडीताने कसेही स्वैराचारी वागले तरी त्याला बोलायचे नाही. तर पिडणार्‍याला तरी का बोलायचे? या विशिष्ट उदा. संताप आणणारं विधान...पब मधे जाणं म्हणजे स्वैराचार? अन म्हणुन कोण लोकं लगेच मुलींचे कपडे फाडणार? अन तुम्ही त्याचं समर्थन करताय? तुमच्याबद्दल जो काही आदर होता तो आता अजिबात नाही हे फक्त नमुद करते. बाकी तुमच्याशी या विषयावर काही बोलुन काहीही उपयोग नाही. असो.

In reply to by शिल्पा ब

माझ्या ह्या मूळ प्रतिसादातील 'आपण दिलेल्या आणि आपल्या सर्वांच्याच माहितीच्या कक्षेबाहेरीलही सर्व अनैतिक आणि अमानुष घटनांचा मी धिक्कारच करतो.' हे वाक्य तुम्ही वाचलेच नाही किंवा वाचूनही त्याचा अर्थच तुम्हाला समजला नाही, असे आपल्या प्रतिसादावरून वाटते आहे. तुमच्याबद्दल जो काही आदर होता तो आता अजिबात नाही हे फक्त नमुद करते. माझ्यासाठी हे दुर्दैवी आहे परंतु हरकत नाही. माझे मुद्दे समजले नाहीत म्हणून आपण असे म्हंटले आहे. पण म्हणून माझे मुद्दे गैरलागू होत नाहीत. आणि प्रतिसाद न वाचताच, मुद्दे समजावून न घेता केलेला प्रतिवाद मला तरी नुसताच 'भडकाऊ' स्वरुपाचा वाटतो. त्या पलीकडे त्यात काही 'दम' नाही. बाकी तुमच्याशी या विषयावर काही बोलुन काहीही उपयोग नाही. खरं आहे. मलाही अगदी तेच वाटते आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मी लहान आहे तुमच्यापेक्षा ..पण एक सांगेन .. सद्ध्याच्या परिस्थितितुन आम्ही मुली बर्‍याच वावरतो ,अनुभवतो .. कि व्यवस्थित अंग झाकलेले कपडे घातले तरि त्रास होतो . तुमच्या प्रतिक्रिया वाचुन खरच गोंधळायला होतय .मला वाटत तुम्हाला जे म्हणायचय ते जास्त प्रमाणात स्पष्ट होत नाहिये ..उलट वेगळेच अर्थ निघुन चिडचिड होतेय ... रागवु नका काका :( ...फक्त आम्ही मुलीनी काळजी घेऊन काही होणार नाही ,तर अश्या प्रवुत्तिला खतपाणी घरुनच ( त्यांच्या ) दिलं जातं त्यांच्यात ही प्रव्रुत्ती निर्मान का होते? त्यांच्यातल्या ह्या अमानवी प्रव्रुत्तीमुळे देशातल्या स्त्रियानी घाबरुन रहावे का?....

In reply to by प्रभाकर पेठकर

डार्क केलेलं वाक्य लिहिलं म्हणुन बाकीच्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावं म्हणत असाल तर पुढे बोलण्यात अर्थ नाही. तुम्हाला प्रतिवाद भडकाउ वाटत असेल तर तुम्ही प्रतिवाद पुन्हा वाचावा. असो. तुमचे प्रतिसाद वाचले अन माझ्याकडुन धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

मला कोणी बुरसटलेली म्हटलं तरी चालेल. माझा तुम्हाला पाठिंबा आहे. उगीच वाद घालण्यासाठी वाद घालणार्‍यांना माझी एवढी विनंती आहे की कृपया कोणाच्या व्यक्तिगत नातेवाईकांचा उल्लेख इथे करू नये. मतांबद्दल विरोध असू शकतो, तो मतापर्यंत मर्यादित ठेवा. माझ्या दृष्टीने इथे २ मुद्दे आहेत. एक तर पेठकर काका एखाद्या अनुभवी माणसाच्या दृष्टीकोनातून काय व्यवहार्य ते सांगत आहेत. घरातले एखादे काका मामा याच शब्दात बोलतील. असल्या वाईट घटनांचं ते कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाहीयेत किंवा "कोणी असे कपडे घातले म्हणून असं झालं" असंही म्हणत नाहीयेत. इतर कोणत्याही चर्चेत त्यांची मते या भूमिकेशी नेहमी सुसंगत अशीच असतात. स्त्रियांना त्रास देणार्‍याला विरोध करावा हे बरोबरच आहे. पण काळ वेळ परिस्थिती पाहून काय तो निर्णय घेतला गेला पाहिजे. उगीच हुतात्मा होण्यात काही मतलब नाही. दुसरा मुद्दा म्हणजे १५//१६ वर्षाच्या मुलीचा. आपल्या देशात १५//१६ वर्षाच्या मुलीना (म्हणजे त्या कायद्याने सज्ञान नसताना) दारू प्यायची परवानगी आहे का? अशा अज्ञान मुलींना पबमध्ये एकट्याने किंवा ग्रुपमधून जायची मोकळीक कायद्याने दिली आहे का? तिच्या पालकांच्या माहितीशिवाय तिला (१५//१६ वर्षाच्या मुलीला) पबमधे नेणारा माणूस जास्त गुन्हेगार आहे. तिच्या वयाचा मित्र असेल तर तोही बालगुन्हेगार कक्षेत येईल का नाही? आणि अशा अज्ञान मुलांना दारू विकणारा दुकानदार गुन्हेगार आहे का नाही?

In reply to by पैसा

१५//१६ वर्षाची मुले दारु पेयाला लागली हे आर्थिक सुबत्तेचे लक्षण मानावे का? कसं काय परवडतं ब्वॉ या लोकांना काही समजत नाही....

In reply to by कुंदन

१५//१६ वर्षाची मुले दारु पेयाला लागली हे आर्थिक सुबत्तेचे लक्षण मानावे का? व्वा. काय मुद्दा समोर आलाय. मुलं-मुली वय वर्ष सोळाला झिंगायला लागतात. जगण्याचं निर्भळ आणि निर्भय स्वातंत्र्य, आधुनिकता, वगैरे काही असेल ? जाणकारांच्या मतांची लैच उत्सुकता लागली आहे. -दिलीप बिरुटे (वाचक)

In reply to by पैसा

आत्ता पुन्हा एकदा पासपोर्ट काढून पाहिला. अगदी दर्शनी पानावर Republic of India असं लिहीलेलं आहे. रिपब्लिक आणि डेमॉक्रसी या शब्दांमधला फरक फार लांबचा राहिला! आपली वाटचाल Democratic republic असं मिरवणार्‍या दडपशाही देशांकडे (उदा: चीन, कॉंगो) सुरू झाली आहे का अशी भीती आजकाल वाटते. अलिकडच्याच एका कायद्यामुळे असे अनेक लोकं भारतात आता अस्तित्त्वात आहेत ज्यांना देशाचा नेता निवडण्याचं स्वातंत्र्य आहे पण दारू पिण्याचं स्वातंत्र्य नाही. आख्ख्या देशाची वाट लावू शकणारे नेते निवडू शकता, पण स्वतःचंच यकृत बरबाद करण्यासाठी दारू नाही पिता येत!
आपल्या देशात १५//१६ वर्षाच्या मुलीना (म्हणजे त्या कायद्याने सज्ञान नसताना) दारू प्यायची परवानगी आहे का?
आपल्या देशात अजूनही बिन्डोक आणि/किंवा १७व्या शतकातल्या ब्रिटीश, (पर्यायाने ख्रिश्चन) जीवनपद्धतीवर अनुसरलेले कायदे नाहीतच असं वाटतं का? तरी बरं, आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सविनय कायदेभंग अजूनही शाळांत शिकवला जातो. हो, हो, मुलीने वासरू मारलं (असेल/नसेल) म्हणून बाकीचे सरसावले लगेच गाय कापायला! आणि गाय कापण्याचं समर्थन नसेल तर वासरू मारण्याचा उल्लेखच का? संबंधच काय दोन गोष्टींचा?

In reply to by प्रभाकर पेठकर

जन्मलेल्या मुलावर संस्कार घडवून एक सुजाण नागरीक घडविला जातो. असे सुजाण नागरीक देशाची जमापुंजी असते. संस्कार कसे कसे होत जातात? घरात आई-वडील, शाळेत शिक्षक, बाहेरच्या जगात समाज, पुस्तके अशा अनेक गोष्टी मुलांवर संस्कार करीत असतात. म्हणजेच एक सुजाण नागरिक घडविण्यात पालक आणि शिक्षकांइतकाच समाजाचाही सिंहाचा वाटा असतो. आपल्या मुलांनी वाईट संगतीत राहू नये असे पालकांना का वाटत असते? मुलांवर चुकीचे संस्कार होतील ह्या भितीपोटीच नं!
मग हाच समाज या बलात्कारी, मॉलस्टर्सवर, गर्दीच्या ठिकाणी अंगचटीला येणार्‍या, हपापलेल्या नजरेने तरूण मुलींकडे बघणार्‍या तरूण, मध्यवयीन आणि म्हातार्‍याही पुरूषांवर संस्कार करण्यात का बरं कमी पडला असावा?
लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी, ट्यूब रेल्वेच्या, खच्चून भरलेल्या, सरकत्या जिन्यावर दीर्घ चुंबन घेणारी युगुलं मी ही पाहिली आहेत. आयफेल टॉवरच्या, पर्यटकांनी भरलेल्या परीसरात दोन मुलींना एकमेकींचे चुंबन घेत बसलेले मीही पाहिले आहे. विमानात प्रियकराच्या हाफ चड्डीत.... जाऊदे मी तर लिहूही शकत नाही. जिथे शरीरसुख एवढ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तिथे अनोळखी मुलींच्या अंगचटीला येण्याची गरजच काय? तरीही, तिथेही बलात्कार होताहेत.
बलात्कार ही विकृती आहे, प्रेम, वासना सर्व प्राणीमात्रांसाठी नैसर्गिक आहेत. दोन्हींची तुलना करणं हेच मुळात हास्यास्पद आहे. मुन्नाभाईने निदान आपुलकीने गळाभेट घेण्यालातरी काही प्रमाणात समाजमान्यता मिळवून दिली आहे. पाश्चात्य चित्रपटात प्रेमाचं खुल्लमखुल्ला चित्रण असतं, हिंदी चित्रपटात बलात्काराचं!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पाश्चात्य चित्रपटात प्रेमाचं खुल्लमखुल्ला चित्रण असतं, हिंदी चित्रपटात बलात्काराचं!
अरे वा !! कळफलक नाही चिमुकल्या वाशिंग्टन ची कुऱ्हाडच जणू . आपण जे लिहितो आहोत ते खरे आहे की नाही याचा काही विचार? पाश्चात्य चित्रपटात बलात्काराचे यथासांग चित्रण असते आणि गेल्या काही वर्षात आपल्याकडे प्रेमाचं खुल्लमखुल्ला चित्रण असते. गरजूंनी संदर्भ मागू नयेत. युट्युब वर जा, रग्गड संदर्भ मिळतील.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

उद्धृत वाक्याच्या आधीचं एक वाक्य वाचलंत तर तिथे हिंदी चित्रपटासंदर्भातच गौरवोद्गार दिसतील. सिलेक्टीव्ह रीडींगचा प्रश्न सर्वसामान्य आहेच. असो.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

उद्धृत वाक्याच्या आधीचं एक वाक्य वाचलंत तर तिथे हिंदी चित्रपटासंदर्भातच गौरवोद्गार दिसतील.
हे छान झाले. एका हिंदी चित्रपटाच्या एका कन्सेप्ट बद्दल एक वाक्य लिहिले की मग धादांत असत्य blanket statement करायचे परमिटच मिळते, हे माहित नव्हते. बरे झाले सांगितलेत. बाकी तुमच्या मूळ वाक्याचे काही justification दिले असतेत तर बरे वाटले असते. पण असो, ते जमले असते तर फाटे का फोडले असतेत ?
सिलेक्टीव्ह रीडींगचा प्रश्न सर्वसामान्य आहेच.
व्वा !! याला म्हणतात सेल्फ अवेरनेस !!!
असो.
असोच. बाकी या निमित्ताने व्यक्त झालात हे पाहून बरे वाटले. यामुळे पुढील ८ मार्च पर्यंतचा विदा थोडा अजून बरा असेल नै. ;-) अवांतर नको म्हणून या मुद्द्यावर शेवटचा प्रतिसाद. खव/व्यनी आहेच.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

@लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी, ट्यूब रेल्वेच्या, खच्चून भरलेल्या, सरकत्या जिन्यावर दीर्घ चुंबन घेणारी युगुलं मी ही पाहिली आहेत. आयफेल टॉवरच्या, पर्यटकांनी भरलेल्या परीसरात दोन मुलींना एकमेकींचे चुंबन घेत बसलेले मीही पाहिले आहे. विमानात प्रियकराच्या हाफ चड्डीत.... जाऊदे मी तर लिहूही शकत नाही. जिथे शरीरसुख एवढ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तिथे अनोळखी मुलींच्या अंगचटीला येण्याची गरजच काय? तरीही, तिथेही बलात्कार होताहेत. परदेशातून आलेल्या पब संस्कृती मुळे तेथील प्रगत समाजात सुद्धा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.व जनहितार्थ तेथे सरकारव व सेवाभावी संस्थांना जाहिराती कराव्या लागत आहेत. उदा झेपेल इतकी प्या व व सुरक्षित घरी जा. त्या भारतात निर्माण करण्यासाठी आपण एवढे कटीबध्द का आहोत हेच कळत नाही. परदेशात सुद्धा प्रगत शहरात काही भाग असे असतात तेथे रात्रीचे बाहेर पडलो की लुटणार हमखास आणि मार मोफत मिळतो. निदान लंडन मध्ये असे अनेक विभाग आहेत. पब्स व क्लब येथे होणाऱ्या अतिरंजित मारामाऱ्या ह्या परदेशात ह्या शेत्रांशी मी निगडित असल्याने खूप वेळा पहिल्या आहेत. रात्रीच्या वेळी स्त्री मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर फिरत असेल तर तिच्या सुरक्षेची हमी कोणत्याही शहरात जगाच्या पाठीवर देता येत नाही. शाळेत किंवा कॉलेजात जाणारा आपला पाल्य अमली पदार्थ , मद्य किंवा सिगारेट आणि लहान वयात शरीर संबंध ह्या सर्व गोष्टी तेथील कायद्यानुसार गुन्हा ठरत असल्या तरी बिनदिक्कत प्रमाणात घडत ांना आढळतात. व पालक हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहूनही ह्या बाबत काहीही करू शकत नाही. तेथील तरुणाई शिकतांना स्वतःचा पोकेट मनी स्वतः कमवते अश्या गोष्टींकडे सोयीस्कर रीत्या पाठ फिरवून नको त्या गोष्टींचे अंधानुकरण करण्यात आपल्याकडे अहमहमिका का करत आहेत ? परदेशात बलात्कारी दृश्य व त्या अनुषंगाने अंगावर काटा आणणारे कथानक असणाऱ्या सिनेमांची ही यादी तू नळीवर इरीवर्सेबल ह्या सिनेमात मोनिका बुलेस्की च्या बलात्काराचे दृश्य कोणीच पाहू शकत नाही, त्या मानाने हिंदी सिनेमातील दृश्ये म्हणजे परदेशात हिंदी सिनेमा हा कौटुंबिक नाट्य,रंगीबेरंगी पोशाख , आणि नृत्य ह्यासाठी ओळखला जातो. आदिती म्हणते तो बलात्कारी हिंदी सिनेमाचा काळ आता भूतकाळ झाला. आता कॉकटेल सिनेमांची आणि त्यातील नायिकेला नायक का आवडतो ह्या बाबतीत रोखठोक मत व्यक्त करण्याचा आहे. .

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

कोणीही असो आणि कोणाबद्दलही असो, चर्चा करतांना एखाद्या अनुभवासाठी व्यक्तिगत रोखावर चर्चा घेऊन जाण्यापेक्षा मुळ विषयावर चर्चा केली असती तर बरे वाटले असते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निषेधाचा निषेध... Victim bashing करणार्या प्रत्येकाने आपण स्वतः/आपल्या सुसंस्कृत घरातल्या स्त्रिया सुद्धा कधीही 'गुवाहटी मॉब मेँटेलिटी' चे बळी ठरु शकतो हे लक्षात ठेवायला हवे. संमतीने शरीरसुख मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आणि जबरदस्ती अनोळखी मुलीच्या अंगचटीला येणे या दोन्हीत जास्त वाईट संस्कृती कुठली आणि जास्त निषेध कोणत्या प्रवृत्तीचा केला पाहिजे??

In reply to by एमी

बै साहेब, जबरदस्तीने अनोळखी मुलीच्या अंगचटीला जाणं हे वाईटच, ते कोणत्याही आणि कोणाच्याही संस्कृतीत बसणार नाही. पण सार्वजनिक ठिकाणी चर्चा करतांना मत मतांतरे असतील तेव्हा, व्यक्तिगत रोखाची टीका टाळावी असं मी म्हणत होतो. मला अजुनही वाटतं की कोणीही अशा अंगचटीला जाण्याच्या प्रवृत्तीचं समर्थन केलेलं नाही, असं का होतं त्याची कारणं मला इतर प्रतिसादात दिसत आहेत. बाकी, तुमचं चालु द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रभाकर पेठकर

हल्ली भारतात १५-१६ वर्षाच्या मुली एकट्यादुकट्या, रात्रीबेरात्री पब मध्ये जातात?
होय. आणि हल्ली कशाला? मी कॉलेजात असताना, दहा-बारा वर्षांपूर्वीही माझ्या ओळखीतल्या मुली पबमधे जात. एकट्याच जात असं नव्हे, पण एक मुलगी आणि तिचे चार-सहा मित्र अशा जात असत. पबसारख्या ठिकाणी लोकं शक्यतोवर घोळक्यात जातात कारण तसे गेल्यास मजा अधिक येते असं बहुतेक पब-गोअर्सचं म्हणणं असतं. अन्यथा मुलींनी एकटं का जाऊ नये?
घ्या.... त्यानंतर एकटी मुलगी १५-२० जणांबरोबर वादही घालते? ऐकावे ते नवलच.
होय. असे प्रकार अगदी लहान वयापासून मी पाहिलेले आहेत. या मुली/स्त्रिया पबमधून निघालेल्या नव्हत्या पण त्याने काय फरक पडावा? मासळीबाजार, देशी दारूच्या गुत्त्याबाहेर अशी अनेक दृष्य पाहिलेली आहेत किंवा घरच्या लोकांनी पाहिल्याचं ऐकलेलं आहे. निम्न उत्पन्न गटातल्या स्त्रियांमधे असणारं हे धैर्य पबमधे जाणार्‍या वर्गातल्या मुलीमधेही आलं याचा मला आनंद झाला.
चार चांगल्या गोष्टी कोणी सांगितल्या की स्वयंघोषित नैतिक पोलीस म्हणून हिणवायचे
बरं या चार "चांगल्या" गोष्टी पीडीत व्यक्तीला सांगायच्या यात काय शहाणपण? मॉलस्ट करणार्‍यांनी शारीरिक दहशतवाद केला, "चांगल्या" गोष्टी सांगणारे बौद्धीक धाक, दहशत दाखवत आहेत. गुन्हा केला कोणी आणि डोस मिळताहेत कोणाला! मॉरल पोलिसिंग हा शब्द डाचत असेल तर १५-१६ वर्षाच्या मुलींनी पबमधे जाऊ नये, १५-२० पुरूषांबरोबर वाद घालू नये हे आपली स्वत:ची, कायद्याने अज्ञान मुलं (मुलगेही!) सोडून इतरांना सांगणं, सुचवणं हे ही मॉरल पोलिसिंगच आहे. असली पोलिसगिरी दाखवण्यासाठी काही लोकं रस्त्यावर उभे रहातात, छेड काढतात, मारहाण करतात, मुलींना मॉलस्ट करतात, काही लेखणी चालवतात. लेखणी चालवणार्‍यांना सामान्यतः अधिक घातक समजलं जातं.
... पण मग येणार्‍या प्रसंगांना आपणच तोंड द्यायचं. सिव्हील पोलीसांकडे जा, कोर्टात जा, गुंडांचा सामना करा.
मग वेगळं काय होतंय? त्याच्याच जोडीला फक्त सामान्य लोकं "आम्हाला असे प्रकार पसंत नाहीत" असं खुलेआम म्हणत आहेत. कसाब हा पण गुन्हेगारच आहे, त्या प्रसंगाबद्दल कोणी हात मोकळा सोडला तर "... मग येणार्‍या प्रसंगांना आपणच तोंड द्यायचं. सिव्हील पोलीसांकडे जा, कोर्टात जा, दहशतवाद्यांचा सामना करा." अशा प्रतिक्रिया का बरं येत नाहीत? (बाय द वे, सिव्हील पोलिस म्हणजे काय? कायदा दिवाणी, फौजदारी वगैरे असतो, पोलिस नव्हे!)
युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियात बलात्कार, अपहरण, खून होतच नाहीत? पहिल्यांदाच ऐकतो आहे.
सामान्य लोकांच्या आयुष्यात स्त्रीदाक्षिण्य दाखवण्याची वेळ येऊ नये अशा अनेक सोयीसुविधा असतात ("तुमचं सामान उचलायला मदत करू का?" इ.). तिथे ९११ ला फोन केल्यावर पाच-दहा मिनीटात हव्या त्या प्रकारची मदत हजर होते. हे झालं व्यवस्थेच्या पातळीवर. सामान्य माणसांच्या पातळीवर, तिथे समाजाने योनीशुचितेसारख्या भोंगळ गोष्टींना कोणे एकेकाळीच भंगारात टाकलं आहे. सामान्य स्त्रियांनी वरपासून खालपर्यंत कपडे घातलेले असू देत वा नसोत, गर्दीच्या ठिकाणीही गैरफायदा घेत इथे-तिथे हात लावण्याचे प्रकार होते नाहीत, जे आपल्याकडे सर्रास होतात. कोणा मुलीने कमी कपडे घातले आहेत किंवा एखादी पुरूषांशी मैत्रीपूर्ण वागत-बोलत असेल तर "आता ही आपल्याला पटलीच" किंवा "चवचालच आहे ती!" अशा प्रकारे इतर पुरूष तिच्याशी वागत नाहीत. भारतीय पुरूषांबद्दल भारतीय आणि अभारतीय सर्व प्रकारच्या मुली/स्त्रिया सरसकटीकरण करताना 'वखवखलेले' अशा शब्द जरूर वापरतील. अगदी स्त्रियाच का, अनेक पुरूषही हे मान्य करतील, करतात. आणि हे फक्त माझेच अनुभव आहेत असं नाही, वास्तववादी चित्रपट, कादंबर्‍या, नाटकं, रिआलिटी शोज, प्रत्यक्ष माणसांच्या मुलाखती या सगळ्यांमधून दिसतं. यामुळे आपला समाज अजूनही असंस्कृत आहे असं विधान फार चूक आहे असं मला म्हणवत नाही. डोळे बंद करून मॉरल पोलिसींग करणं तसंही बेकायदा नाहीच, लिहीणार्‍यांचे हात तसेही धरता येत नाहीत. चालू द्यात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्ताच अंड्यातून बाहेर पडून, मोठ्या चकित नजरेने, ह्या नव्या दुनियेकडे पाहतो आहे. बाकि, अदिती, काही लोकं रस्त्यावर उभे रहातात, छेड काढतात, मारहाण करतात, मुलींना मॉलस्ट करतात ह्यांच्याच बरोबरीत मलाही बसवलंस (काही लेखणी चालवतात) ह्याने बाकी हृदयात बारिकशी कळ आली. असो. _/\_ काही लिहिण्याबोलण्याचा मुडंच राहिला नाही. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

अरूंधती रॉय बंदूका चालवणार्‍या दहशतवाद्यांपेक्षा अधिक घातक समजली जाते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

+१ बहुदा पश्चिमात्य देशात सगळेच जण शारीरीक सुख कोणालाही देतात ही मानसिकता असण्यामुळे की काय एका पाश्चिमात्य युवतीवर ४-५ जणांनी बलात्कार करुन कसली ती प्रेग्नंट न होण्याची गोळी दिल्याची केस फार जुनी नाही. बाकी मुली पबात जातात, स्कर्ट घालतात, त्रास देणार्‍यांशी वाद घालतात म्हणजे शांतम पापम!! झेपलं नाही अन उपरोधिक झालं. स्वत:च्या मुलांवर - मुलींवर दुसर्‍याचा आदर करा हे शिकवताना आपणही तसंच वागलं तर मुलांवर तसे संस्कार होतात...घरातच लोकं आईला , बहीणीला, काकुला वगैरे कसं वागवतात हे पाहील्यावर पुढे काय संदेश जाणार?

पोट फुटॅस्तोवर हसतोय. काही गोश्टींना असं ग्लॅमर का मिळतं, त्यांची बातमी का होते हे आजवर न उमगलेले कोडे आहे. भारतात दिवसाला काही हजार बलात्कार होतात.(अंदाजपंचे बोलत नाही, सरकारी आणि युनो वगैरेची आकडेवारी प्रसिद्ध होत असते, त्यात लिहिलय.) त्यातले एक्-दोनच असे पेपरात का गाजतात हे कुणी सांगेल का. साधारणतः नगरसेवकापासून पुढे आमदार, खासदार वगैरे मंडळी आणि त्यांची प्रभावळ ही धुतल्या तांदळाची आहे का असे कुणालाही विचारले तर तो "अजिबात धुतल्या तांदळाची नाही", "सगळे एकजात हरामखोर" वगैरे वगैरे म्हणतो. शिवाय आपण खाजगी गप्पांत बोलतानाही ह्यानं अमुक मंत्रालय सोडून तमुक घेतलं म्हणजे त्याचं "यश/ प्रगती" आहे म्हणतो. त्यानं काय खरोखर त्या खात्याचा कारभार चालवायला घेतलय असं आपल्याला वाटतं का? अजिब्बात नाही. तरीही मग जेव्हा एखादे स्टींग ऑपरेशन होते तेव्हा आपण तेवढ्यापुरते दचकल्यासारखे का करतो? किंवाभारतात दिवसाला काही शेकड्यांच्या घरात हत्या होतात. पण अचानक एखादीच जेसिका लाल वगैरे केस पाहून "हिला न्याय मिळालाच पाहीजे" वगैरे म्हणून का बोंबलतो. इतरांबद्दल का बोंबलत नाही? आरुषीचा खून झाला ; वाईट झालं, पण तसेच खून आख्ख्या भारतात काही शेकड्यांच्या घरानं पडाताहेत, कित्येकदा खुद्द व्यवस्थेच्या आशिर्वादानं हे मुडदे पडताहेत; त्यांची आपण का दखल घेत नाही? जेसिका लाल हिला मारलं म्हणून आख्ख्या मिडियानं रान उभं केलं; इथं बीडमध्ये दोनेक दशकापासून एक व्यक्ती इतकी प्रभावशाली आहे की वर्दितल्या पोलिसांचा भरदिवसा खून होतोय, त्याबद्दल कुणीच कसं बोलत नाही? बरं, ही गोष्ट बीडचीच नाही, बिदरचीही आहे तशीच ती बिकानेर अन बैतूल ह्या भारतातल्याच इतर ठिकाणांचीही आहे. एका निवडणुकित काँग्रेस व भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अनुक्रमे जुदेव व अजित जोगी हे होते. दोघांवरही लागोपाठच्या दिवसात स्टिंग होउन टीव्हीवर ही संतमंडळी नोटांच्या गड्ड्या उचलताना दिसली. दोघेही आपापल्या ठिकाणाहून निवडूनही आले नंतर! पब्लिकनं नंतर सगळं सोडून दिलं. . . . ह्या घटना रोज घडातातच. त्यांचे पुढे काहीही होत नाही हे ही ठाउक आहे. उगाच नाटाके कशाला. २६नोवेंबर २००८ला हल्ला झाला, आणि सगळी मंडळी एकदम "आता काहीतरी केलेच पाहीजे" वगैरे बडबडू लागली. वस्तुतः भारत ह्यापुढे सुरक्षित नाही, कायम हे असेच होत राहणार आहे, हे कुठंतरी सगळ्यांनी मनोमन स्वीकरले आहे, आणि जणू काहीच घडले नाही असे सगळे जण वागताहेत, ..... पुढल्या हल्ल्यापर्यंत. हे आपण असे विचित्र कसे? राजीव गांधींच्या काळातही आउटलुक का कुठल्यातरी मासिकावर पहिल्या पानावर एका ओडिसामधील स्त्रीचे छायाचित्र होते. ती बाई पाचेकशे रुपयांसाठी आपल्या ५ वर्षांच्या मुलीला विकायला निघाली होती. आणि लोकांना म्हणे ह्यात धक्का वगैरे बसला. मला सांगा, रस्त्यात डोळे फुटलेले, भीक मागणारे, हिजडे बनलेले* किती जण बघतो आपण,? प्रत्येक शहरात जवळपास शेकडो.बरोबर? ह्यापैकी किती जण जन्मांध वगैरे होते? जवळपास कुणीही नाही. ह्यातले बहुतांश जणांना लहानपणीच कुणीतरी पळवून आणले,त्यांचे डोळे फोडून, हात पाय तोडून भीक मागायला बसवले. बरं, हे मी नवीन बोल्तोय असेही नाही,hippocrat भारतीयांना हे सर्वच ठाउक आहे. हे असे दिवसाला काही शे पोरांचे डोळे फोडले जातात, अनाथाश्रमातील बालके ही अघोरी संभोगासाठीच असतात, असे सर्वांनी जणू मान्यच केले आहे. तरीही होतं काय, दिवसाला शेकडो बकर्‍यांचा असा बळी जात असताना चुकून एखादा सुटून, पळून जाण्यात यशस्वी होतो आणि अचानक आपण चिंतित , व्यथित वगैरे होतो. कित्येक वेळेस तर बलात्कार स्वतः स्त्रीचे कुटुंबीयच दाबतात. कारण त्रास त्या कुटुंबियांनाच होइल अशी व्यवस्था भारतात आहे. तेव्हा आपण का शंख करत नाही? हे म्हणजे एखाद्या कत्तलखान्यात जाउन "अग बाई,ई ई ई... त्या कोंबडीचा पाय कापला हो चांडाळानं" असं किंचाळण्यासारखं आहे. स्त्री(किंवा खरे तर कुणीही दुर्बल) ही इथे ज्बरदस्त रगडली जाते हे वास्तव आहे. भारतात काही मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय चौकटी सोडल्या तर सर्वत्र नृशंस "जंगलराज"च आहे. चौकटितही ते आहे, पण तुलनेने फारच कमी. भारत हा एक कत्तलखाना आहे. मध्यमवर्गीयंना मारून त्यांना खाणे हे सोपे + चविष्ट नाही म्हणून म्हणून त्यांना सोडून देण्यात आले आहे. कत्तलखान्याच्या आसपासची कुत्री आपण. कुत्र्यांना कुणी खाउ इच्छित नाही इकडे म्हणून ती जिवंत असतात. तस्मात् संवेदनशील, विचारी व्यक्तीने आपापल्या जाणिवांची पुंगळी करुन घ्यावी हेच उत्तम. कशाकशाचा त्रास करुन घेणार. *कित्येक पुरुष हे व्यवसायापुरते हिजड्यांचे कपडे घालतात हे ठीक. पण भारतात जबरदस्तीने शिश्न कापून वगैरे अघोरीप्रकारे कित्येक हिजडे "पैदा" केले जातात. काही स्वयंसेवी संघटनांचा ह्यावरही बराच खल सुरु आहे.

अक्ख्या मुंबईत रात्रि अकरा / बारा पर्यंत एकटीने प्रवास केला पण इतक्या घाणेरड्या प्रव्रुत्तीची लोकं तिही इतक्या घोळक्याने एकत्र कधीच कुठेच पाहिलि नाहित . रात्री अपरात्री मुलीनी बाहेर फिरण चुकिच नाहि पण असं मद्यपाण करुन फिरण चुकिचं वाटतं. अजुन एक म्हणजे जर ती प्यायलेली नसती तर असं झालं नसतं का? इतका मोठा घोळका कुठल्याहि मुलिच्या पूढे आला असता तर ती प्रतिकार करु शकली असती का?? जर त्या घोळक्याला त्यावेळी असं नीच काम करायची हुक्की आलीच असेल तर त्याना तीच काय राह चलते कुठलीहि मुलगी चालली असती. मग तिच्या पिन्याचा इश्यु करुन त्या प्रव्रुत्तीला समर्थण देणारे थोड्याफार प्रमाणात त्याच विचारांचे वाटतात. रात्री सात च्या आत घरात येण शिफ्ट मध्ये जॉब करणार्‍या मुलिना नाहि जमत . ऑफिशअल पार्‍टीझ असल्या तर फारच उशिर होतो अशा घटणामुळे मग मुलीनी एन्जोयमेन्ट्ला मुकावं का?? मागे पूण्यात एका सॉफ्टवेअर इन्जिनीअर वर बलात्कार करुन तीचा खुन करण्यात आला , एका विवाहित स्त्रीवर जी बाहेरुन पून्यात परिक्षेसाठी आली असताना तिच्यावर बलात्कार करुन तिच्याथांबलेल्या ठिकाणी आनुन फेकुन देन्यात आले , त्या पिलेल्या होत्या का?? मग जे घडलं त्यात खरच चुक कोणाची??

In reply to by जेनी...

पुण्यात फक्त एक नाही बर्याच रेप &/ मर्डर केसेस झालेल्यात आणि त्या सगळ्या ऑफिसला जात किँवा परत येत असताना... ओळखीतल्या/अनोळखी लोकांनी केलेल्या... ज्योति कुमारी चौधरी, नयना पाठक पुजारी, खुशबु मिश्रा, श्रद्धा छाजेड... आणि रात्री १० वाजता बार मधुन बाहेर पडणं तर दुर ची गोष्ट राहिली दिवसाढवळ्या भर दुपारी गजबजलेल्या JM n टिळक रोडवर पण gropping n eve teasing अनुभवलय...ते सुद्धा सगळं शरिर झाकणारे कपडे घातलेले असताना... परत वर आहेतच काळजी करुन घरात बसुन रहा म्हणणारे पेठकर काकांसारखे लोकं...

In reply to by एमी

>>परत वर आहेतच काळजी करुन घरात बसुन रहा म्हणणारे पेठकर काकांसारखे लोकं... -- मला वाटतं पेठकरकाकांचं म्हणणं थोडं वेगळं आहे. थोडक्यात सांगायचं तर पेट्रोल ने काडिपेटीपासुन दूर राहावे... हे कुठलं मॉरल पोलीसींग वगैरे नाहिए, तर कॉमनसेन्स आहे. चिकन खाण्याची एंजोयमेण्ट जरुर भोगा पण ते बर्ड फ्लु वगैरे सुरु असेल, पावसाळ्यातले दिवस असतील तर तेथे संयम दाखवणे उचीत. वर मन१ म्हणतोय, तसं आपल्या भोवती व्दिपाद प्राण्यांचे जंगल आहे. ते तसं का आहे वगैरे मुद्दा वेगळा, पण आपण जंगलात आहोत याचे भान विसरणे परवडणारे नाहि. असो. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

अरा, मला सांगा पेट्रोल ने काडी पासुन दुर म्हणजे नक्की काय?? JM/टिळक रोडवर दुपारी बसची वाट पहात थांबणे म्हणजे पावसाळ्यात चिकन खाणे आहे का?? जर तिथेही सर्रास molestation होत असेल तर 'काळजी करणारे' लोक घराबाहेर पडूच नको म्हणतील...

In reply to by एमी

मोलेस्टेशन हमखास होण्याचे चान्सेस असलेले ठिकाण/प्रसंग टाळणे, ते टाळण्यासाठी प्रिकॉशन्स, झालच तर प्रत्युत्तर देण्याची तयारी, अतितटीच्या प्रसंगी पळ काढायची सावधानता... समाजात (आणि घरात सुद्धा :( ) वावरताना या सर्व बाबींचा विचार एक स्त्रि जास्त व्यवस्थित करु शकते/तिने तसं करावं. पेट्रोल ने काडि पासुन दूर रहावे म्हणजे नक्की काय हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त व्यवस्थीत कळतं पाहुणेतै. काळजी करणारे लोक जर मदत करण्याच्या बाबतीत हतबल असतील तर ते घराबाहेर न पडण्याचा सल्ला निश्चित देतील. साखळी चोरांच्या भितीने आजोबांनी आजीला पहाटे बागेत फिरायला जाण्यापेक्षा पार्कींग एरियामध्येच चकरा मारायला सांगितलं तर त्यात चुक काय ? मॉलेस्टेशनच्या केसेस जनरलाइझ्ड नाहिच करता येत. पण जेव्हढं टाळता येईल तेव्हढं टाळायलाच हवं. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

ते काळजी बिळजी ठाऊक हाय वो पण... पूण्यातलीच अजुन एक केस ३ वर्षाँच्या मुलीला शाळेच्या बस ड्रायवर कंडक्टर ने molest केला मग काय बस वापरु नका म्हणाल? बरं शाळेत नेऊन सोडलं तरी तिथं पण प्युन असतात शिक्षक असतात मग काय मुलीँनी शाळेत पण जाऊ नाय म्हणाल?? बेसिक लोच्या लहानपणापासुन अंगात वारं भरल्याप्रमाणे वागणार्या मुलांना जास्त ढिल देणे आणि आधीच शरीराने आणि मनाने weak असणार्या मुलीँना अजुनच restrict करणे यानेच होत असेल... आणि खुशबु, श्रद्धा सारख्या केस मधे नकार पचवायची क्षमता नसलेली frustru मुलं... मी तर पु. व., आत्मशुन्य, मनोबा सारखे विचार करणारे पुरुष असतील ही आशाच सोडुन दिली होती (अजुनही doubt आहेच की हे फक्त दाखवायचे दात तर नसतील... पण तरी हे ही नसे थोडके) मग माझं pessimist मन म्हणतं 'त्या female foeticide होणार्या मुली नशीबवानच जन्मायच्या आधीच गेल्या' आणि माझं cruel मन म्हणत 'देवबाप्पा जास्तिजास्त मुलांना गे बनव म्हणजे बाकीच्या स्ट्रेट मुलांना कळेल molestation काय असतं.. बघुन घेतील त्यांचत्यांच... उगाच आम्हा मुलीँना त्रास नगं' : - )

In reply to by एमी

(अजुनही doubt आहेच की हे फक्त दाखवायचे दात तर नसतील... पण तरी हे ही नसे थोडके) ह्यातल्या हे फक्त दाखवायचे दात तर नसतील पुन्हा एकदा हसून घेतले.

In reply to by एमी

अजुनही doubt आहेच की हे फक्त दाखवायचे दात तर नसतील... पण तरी हे ही नसे थोडके
होय हे फक्त दाखवायचे दात आहेत. आणी तेही नसे थोडके हेही माहीत आहे.

In reply to by एमी

मी तर पु. व., आत्मशुन्य, मनोबा सारखे विचार करणारे पुरुष असतील ही आशाच सोडुन दिली होती (अजुनही doubt आहेच की हे फक्त दाखवायचे दात तर नसतील... पण तरी हे ही नसे थोडके)
होय हो दाखवायचेच दात आहेत सगळे. बाकी पुरुष म्हणजे तसे एकजात हरामखोरच नाही का? असे म्हटल्याशिवाय अशा प्रसंगी बोलण्याचे सार्थक होत नाही म्हणा.

In reply to by बॅटमॅन

:-) पुरुष म्हणजे एकजात हरामखोर नाय वो वाल्गुदेय... काही पुरुष गुवाहटी मॉब वाले, काही बागपत खाप वाले, काही काळजी करणारे आणि बाकी बरेच सारे बघे...

In reply to by एमी

>>ते काळजी बिळजी ठाऊक हाय वो -- ते खरच असावं अशी आशा करतो. >>पूण्यातलीच अजुन एक केस ३ वर्षाँच्या मुलीला शाळेच्या बस ड्रायवर कंडक्टर ने molest केला मग काय बस वापरु नका म्हणाल? बरं शाळेत नेऊन सोडलं तरी तिथं पण प्युन असतात शिक्षक असतात मग काय मुलीँनी शाळेत पण जाऊ नाय म्हणाल? -- असं कुणी म्हटल्याचं मला तरी दिसलं नाहि. >>बेसिक लोच्या लहानपणापासुन अंगात वारं भरल्याप्रमाणे वागणार्या मुलांना जास्त ढिल देणे आणि आधीच शरीराने आणि मनाने weak असणार्या मुलीँना अजुनच restrict करणे यानेच होत असेल... -- ह्म्म. मग तर इतर कुठलीच काळजी घेण्याचं कारणच नाहि. अश्या अंगात वारं भरलेल्या बैलंची एक समग्र लिस्ट, त्यांच्या फोटोसकट लक्षात ठेवायची. >>आणि खुशबु, श्रद्धा सारख्या केस मधे नकार पचवायची क्षमता नसलेली frustru मुलं... -- त्यांना पण लिस्ट मध्ये अ‍ॅड करावे. ही लिस्ट पोलीस, मानोपचार तज्ञांकडे सोपवायची. या मुलांचे समुपदेशन करायचे, शिक्षा द्यायच्या. प्रोब्लेम खतम :) >>...माझं cruel मन म्हणत 'देवबाप्पा जास्तिजास्त मुलांना गे बनव म्हणजे बाकीच्या स्ट्रेट मुलांना कळेल molestation काय असतं.. बघुन घेतील त्यांचत्यांच... उगाच आम्हा मुलीँना त्रास नगं' --- अम्म्म्म्म्म्म... देवबाप्पा देखील पुरुष हो. गे कारखाना सुरु झाला कि लेस्बियन प्रोडक्शन पण सुरु करेल तो.... बॅलन्स, यु सी. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

मोलेस्टेशन हमखास होण्याचे चान्सेस असलेले ठिकाण/प्रसंग टाळणे, ते टाळण्यासाठी प्रिकॉशन्स, झालच तर प्रत्युत्तर देण्याची तयारी, अतितटीच्या प्रसंगी पळ काढायची सावधानता _________________________________________________ दिल्लीत ..रस्त्यावरुन आपल्या पालकांसोबत चालणार्‍या मुलीला ...काहि बावळट लोकानी कार मधुन पळवण्याचा प्रयत्न केला .. मग अजुन कुठलं ठिकाण टाळायचं ??

In reply to by जेनी...

त्याबद्दल दिल्ली वाल्यांकडूनच काही सुरस कहाण्या ऐकल्यात इथं दोनेक महिने राहताना. भोसडीचे आपल्या २०-२२ वर्षाच्या पोरीसोबत बसमधून फिरत असतानाही गर्दिचा फायदा घेउन कुठं शाळकरी नववी-दहावीच्या पोरिंच्या अंगाशिच ये, वरती बारला धरलेला हात सटकल्यासारखं करून "चुकुन" शाळकरी पोरीच्या भलत्याच ठिकाणी टाक असले उद्योग करतात. आता बोला.

In reply to by जेनी...

आमच्या अपार्ट्मेण्टमध्ये, कॉलनीमध्ये, सिक्युरीटी सिस्टीम वगैरे असताना देखील चोरी झाली ... त्या दिवसापासुन आम्हि घराला कुलुप लावणं बंद केलं... काय फायदा कुलुपं लाऊन... तसंही चोरी होतेच. अर्धवटराव

In reply to by एमी

पाहुणे ताई, एक थोडा अवांतर प्रश्न विचारतो. JM/टिळक रोडवर भर दुपारी बसथांब्यावर तुम्हाला कुणी सहेतुक स्पर्श, अंगचटीला येणे किंवा "gropping n eve teasing" मध्ये जे काही येऊ शकते ते केले आणि त्यावर तुम्ही काय केलेत ? तुम्हाला खात्री असेल की जे झाले ते सहेतुक होते तर एक कानफटात ठेऊन द्यायची होतीत किंवा किमान थोडा आरडाओरडा करायचा होतात*. चार माणसांनी जमून त्याची कणिक नसती तिम्बली? निदान पुण्यात आणि ते ही उपरोल्लेखित ठिकाणी हा उपाय करायला हरकत नव्हती . *महिलावर्गाने या प्रकारचा उपयोग थोडा जपून करावा असे मत आहे. कधी कधी गर्दीत खरेच चुकून धक्का लागतो. किंवा कधी कधी मुलींचाच धक्का लागतो आणि वरून खुन्नस पण देतात. मुलींनी अंग चोरणे वगैरे प्रकार किमान मुंबईत तरी खूप कमी होऊ लागले आहेत. रस्त्यावर पण महिलांचा समान हक्क आहे म्हणून असेल कदाचित. पण "तुमचा धक्का लागला तर विनयभंग आणि आमचा लागला तर मेहेरबानी " हा दृष्टीकोन जाणवतो कधी कधी :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमे grop चा अर्थ dictionary त बघा म्हणजे चुकुन धक्का लागणे व gropping मधला फरक कळेल. मागुन अचानक येतात आणि शॉक मधुन recover होईपर्यँत गर्दीत मिसळुन ही गेलेले असतात... किँवा बस मधे चढताना उतरताना असे प्रकार होतात... आणि ते आरडाओरडा करुन कणिक तिँबणे वगैरे I doubt...भारतीय शक्यतो बघ्यांमधेच असतात...पण एकदा एका मुलाच्या घोट्यावर जोरदार लाथ मारलेली : - )

In reply to by एमी

विमे grop चा अर्थ dictionary त बघा म्हणजे चुकुन धक्का लागणे व gropping मधला फरक कळेल.
मला या शब्दाचा अर्थ माहित नसेल आणि तरीही मी कुठेही अर्थ न बघता प्रतिसाद दिला असेल असे गृहीत धरण्याच्या तुमच्या कसबाला सलाम.त्रिवार सलाम. असो, शब्दांचा अर्थ शब्दकोशात बघता येतो. बेसिक रीडिंग कॉम्प्रेहेन्शन* मात्र शाळेत जाऊन शिकावे लागेल.
मागुन अचानक येतात आणि शॉक मधुन recover होईपर्यँत गर्दीत मिसळुन ही गेलेले असतात... किँवा बस मधे चढताना उतरताना असे प्रकार होतात...
तुम्हाला असे म्हणायचे आहे की आजवर (खालील एक प्रसंग सोडला तर) एकदाही तुम्हाला पक्के खात्रीनिशी माहित नव्हते कुणी हा प्रकार केला आहे ते ??
आणि ते आरडाओरडा करुन कणिक तिँबणे वगैरे I doubt...भारतीय शक्यतो बघ्यांमधेच असतात...पण एकदा एका मुलाच्या घोट्यावर जोरदार लाथ मारलेली : - )
इथे जोरदार असहमती. कधी कधी तर पब्लिक हात साफ करायला इतकी उत्सुक असते की नक्की काय झाले हे समजून घेण्याची पण वाट बघत नाहीत. खाली पियुषा आणि मकीमावशी ने दिलेली उदाहरणे परत वाचा तिथे जमावाने पिडीत महिलेला पाठींबा दिला आहे . दुर्दैवाने असा प्रकार परत घडला तर किमान कॉलर धरायची हिम्मत दाखवा (अर्थात स्थळ, वेळ, काळ बघून), आणि मग अनुभव सांगा. आणि तशी हिम्मत नसेल तर सहन करीत राहणे आणि मग जालावर येऊन उद्वेग व्यक्त करणे इतकेच हाती राहील. तुम्ही केलीत हिम्मत आणि नाही कुणी पाठीशी उभे राहिले तर मग "भारतीय शक्यतो बघ्यांमधेच असतात" असे हक्काने म्हणू शकता. (इतर वेळेला आपण पण त्याच बघ्यांमध्ये असतो हा भाग वेगळा) *या शब्दाचा अर्थ पण असेल हो शब्दकोशात. जालावर पण माहिती मिळेल.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमे, 'तुम्हाला खात्री असेल की ते सहेतुक होते' आणि '*च्या पुढील वाक्यांमुळे', 'gropping हे सहेतुकच असते आणि gropping व चुकुन लागलेल्या धक्क्यांमधे फरक लगेच कळतो' हे माहीत नसेल असे वाटले, म्हणुन dictionary बघायला सांगीतले. असो, तुम्हाला अर्थ माहीत होता/आहे, तरीही तुम्ही ती वाक्ये लिहीलीत म्हणुन तुम्हाला सलाम... नाही, मला २ जणांबद्दल शंका होती पण त्यातला नक्की कोण हे नसते सांगता आले. खाली पियुशा व मकं (उदा.१) यांनी दिलेली उदा. तुम्ही परत वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की त्या उदाहरणांत अंगचटीला येणे/gropping दररोज एकाच रुटच्या प्रवासात होत होतं. मकं च्या उदा.१ चा पहीला पेराग्राफ परत वाचा. त्या मुली पाळतीवर राहील्या होत्या हेही परत वाचा. मकं ची बाकी उदा (३,४,५), aparna akshay यांचा अनुभव ही वाचा. त्यावरुन तुमच्या लक्षात येईल की नेहमीच अशा माणसांना पकडुन चोप देणे शक्य नसतं. मला त्या अनुभवांबद्दल डिटेल बोलायला आवडत नाही... डिटेल माहीत नसताना ही तुम्ही बरेच काही गृहित धरले आहे त्यामुळे तुमच्या 'इथे जोरदार असहमती.... हा भाग वेगळा)' या jumping to conclusion वाक्यांसाठी तुम्हाला परत एकदा सलाम. आपण पण त्याच बघ्यांमधे असतो याबद्दल थोडेसे: इथेही जास्त डिटेल सांगणार नाही. पण माझ्या bmi १८/१९ नुसार मी दोनदा जेवढं शक्य होईल तेवढं intervene केलेलं आहे. आणि एकदा मेणबत्त्यांवाल्या CEO ला मुर्ख कंपनी पॉलिसीज् बदलायला लावल्या आहेत. आता त्याचे effects n side effects काय झाले तो वेगळा मुद्दा. अवांतर: 'माझं cruel मन म्हणतं देवबाप्पा जास्तिजास्त मुलांना गे बनव म्हणजे बाकीच्या स्ट्रेट मुलांना कळेल molestation काय असतं' या वाक्यात मुलांना गे बनव हे cruel नसुन, molestation काय असतं हे मुलांना समजावं यासाठी त्यांना कोणीतरी molest करावं हा विचार cruel आहे...

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

@ वि.मे . तुमचा मुद्दा पटला पण काही गोष्टि वेळेच अन काळाच बंधन ठेवुन कराव्या लागतात माझ्या समोर घडलेला किस्सा आहे कॉलेजला असताना सीटी बस मधुन प्रवास करायचो बस हमखास फुल्ल असायची , एक स्टॉप असल्याने सर्व चेहरे परिचयाचे होते ,त्यात एक मुलगी होती बहुतेक ती जॉब करत असावी रोज ती आमच्याबरोबर असायची ,एकदा बसमध्ये खच्चुन गर्दी होती , आम्ही सगळ्या उभ्या होतो , स्याकमधुन पास काढायची घाइ होती तेव्ह्ड्यात बसच्या मागच्या साइडला काहितरी गोंधळ अन बाचाबाची झाली कंडक्टर मध्ये पड्ला , आमच्या बरोबर रोज प्रवास करण्यार्या त्या युवतीने एकाच्या श्रीमुखात भडकवली होती , तो नेहमी तीच्या मागे उभा राहुन अंगलटीला जाण्याचा प्रयत्न करायचा , असे तीने एकदा पाहिले दोनदा पाहिले तिनदा पाहिले रोज रोज इतकी गर्दी नसताना देखील हे प्रकार वरचेवर होउ लागल्याने तीचा संयम संपला अन तीने सणसनीत उत्तर दिले , कंड्क्टर अन बाकिच्या इतर प्रवाश्यांनी त्याला फैलावर घेतले अन बसमधुन खाली उतरवले थोडा वेळाने ती युवती उतरौन गेली नंतर च्या चर्चा ऐका एक ज्येष्ट सदस्य : " बसमध्ये त्रास होतो तर सरळ सरळ स्वतःची गाडी घेउन टाकावी " उगा दुसर्यांचा वेळ कशाला वाया घालवायचा ? दुसरा : हो ना १५ मिनिट लेट झालोय राव ऑफिसला . एक महीला : काय नाय हो ,मला तर ती मुलगीच फालतु वाटते , धक्का लागला म्हणुन सरळ कानामागे ? अतीच झाल हे , दुसरी : एव्हढा मेक अप काय ,काय ती स्टाइल , अन काय ते परफ्युम ,म्हणजे " आ बैल मुझे मार टाइप " शिकल्या तेव्ह्ढ्या हुकल्यात हल्लीच्या मुली . आता बोला

In reply to by पियुशा

त्या पिडित मुलीचे कौतुक आणि अभिनंदन. एक ज्येष्ट सदस्य : " बसमध्ये त्रास होतो तर सरळ सरळ स्वतःची गाडी घेउन टाकावी " उगा दुसर्यांचा वेळ कशाला वाया घालवायचा ? दुसरा : हो ना १५ मिनिट लेट झालोय राव ऑफिसला . एक महीला : काय नाय हो ,मला तर ती मुलगीच फालतु वाटते , धक्का लागला म्हणुन सरळ कानामागे ? अतीच झाल हे , दुसरी : एव्हढा मेक अप काय ,काय ती स्टाइल , अन काय ते परफ्युम ,म्हणजे " आ बैल मुझे मार टाइप " शिकल्या तेव्ह्ढ्या हुकल्यात हल्लीच्या मुली . पियुशा, ही वक्तव्ये एकूणातच उथळ आणि संतापजनक आहेत. पण त्या बस मध्ये त्या मुलीच्या बाजूने बोलणारा/बोलणारी एकही पुरुष/स्त्री नव्हती? हे जास्त खेदजनक आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

@ पे. काका तिच्या साइडने बोलणारे अगदी वर वर बोलत होते वेळ मारुन न्यावी असे पण तुम्हाला सांगु का मुलींनी अशी कार्यवाही केली तर तिची पाठ थोपटुन शाबसाकी देन्यापेक्षा तीला घाबरवणारे अन दुषणे लावणारेच अधिक ! " आता हीच काही खर नाही ,तो मुलगा आता ह्या अपमानाचा बदला घेइल तिच्यावर पाळत ठॅवील , डु़ख धरेन हीने कशाला जास्तीचा शहाणपणा करायचा नसता ? वरतुन "मुलीची जात" , भावाला नै तर पप्पांना सोबत घेउन जाणे वैग्रे वैग्रे लेक्चर आहेच ,

In reply to by पियुशा

पियुशा, तिच्या साइडने बोलणारे अगदी वर वर बोलत होते वेळ मारुन न्यावी असे म्हणजेच त्या ज्येष्ठांच्या बेजबाबदार आणि उथळ वक्तव्याबद्दल, पर्यायाने त्या मुलीवर होणार्‍या अन्यायावर, कोणालाही मनापासून चीड वाटत नव्हती. त्या गुंडाला प्रतिकार करणे जाउदे, त्यासाठी वेगळे धाडस आणि शारीरिक बळ लागते, पण त्या निरुपद्रवी ज्येष्ठांनाही तुम्ही प्रतिकार करू शकला नाही? ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तो मुलगा आता ह्या अपमानाचा बदला घेइल तिच्यावर पाळत ठॅवील , डु़ख धरेन हीने कशाला जास्तीचा शहाणपणा करायचा नसता ? खरं आहे. आजकाल राजकिय वरदहस्त, पोलिसांशी असणारे साटेलोटे इत्यादींमुळे बेताल तरूण बोकाळले आहेत. त्यांचा त्रास फक्त स्त्रियांनाच आहे असे नाही तर पुरुषांना ही आहे. मिपावर तावातावाने लिहिणारे सुद्धा तलवारी, चॉपर, गावठी कट्टे ह्यांचा सामना करू शकत नाहीत. त्यामुळे असे प्रसंग टाळावेत. हं..स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा जीव मातीमोल असेल तर जरूर भिडावे. पेपरला नांव येईल आणि घरचे तुमचे दहावे-बारावे उरकत नाहीत त्याआधीच 'समाज' त्याच्या दिनक्रमात गुंतलेला असेल. तरूणपणी अंगात रग होती तेंव्हा अनेक अनोळखी लोकांच्या भांडणात पडून न्यायाची बाजू घेतली आहे. प्रसंगी ४-६ जणांशी दोन हातही केले आहेत.पण, त्या काळी तलवारी, चॉपर आणि गावठी कट्टे, सुपार्‍या एवढ्या बोकाळल्या नव्हत्या. आता ह्या वयात शारीरीक लढा जमत नाही. खात्री वाटत नाही. पण मनात अन्यायाची चिड ठासून भरली आहे. आवका पाहून दोन हात करायलाही पुढे होतो पण बायको-मुलगा ओढून दूर नेतात. असो.

In reply to by पियुशा

कालेजात असताना आम्ही एक तक्रार घेउन पोलिसात गेलो होतो. मुलगी सुंदर ,(खास भारतीयांना भुलवेल अशी) गोरीपान होती. व जीन्स - (स्लीवलेस) टॉप असा काहीसा ड्रेस होता. ह्या अवतारात त्रास झाल्याचे समजताच पोलिसात तक्रार करायला गेल्यावर त्यानेच उलट गलिच्छ नजरेने स्कॅन करून वर (स्लीवलेस घातल्याबद्दल) "अन्न उघडे ठेवले तर माशा बसणारच" असं सुनावलं. आता बोला! कायदा राखणार्‍या मंडळींची ही मानसिकता समाजाची प्रतिनिधित्व नक्कीच म्हणता यावी. पोरींच्या पिण्याबद्दलः- पंधराएक वर्‍षांची पोरगी दारु पीत असेल तर कायद्यानं शिक्षेची तरतूद आहे, बलात्कार वगैरे करणं हरामखोरी आहे. माजी अध्यक्ष जॉर्ज बुश ह्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत त्यांच्या अल्पवयीन पोरीने दारु पिल्याबद्दल दिला कायद्यानुसार् शिक्षा झाली होती, तशीच शिक्षा आक्षेप असणार्‍यांनी गुन्हा सिद्ध झाल्यास करावी. "दारु पितेस काय, थांब करतोच बलात्कार" असला काहीसा टोन (बेंगलोरला पब फोडणार्‍या) श्रीराम सेनेसारख्या गुंडांचा दिसतो. दुर्दैवाने ह्यांचे कुणी काही झाट वाकडे करु शकत नाही.

In reply to by मन१

पोलिसांकडे तक्रार करायला मुलगी किंवा स्त्री जर गेली तर पोलिंसाचं आणि तत्त्पर अधिकार्‍यांच वर्तन सालं लै बेक्कार असतं. तरुणीकडे, स्त्रीकडे असं पाहतात आणि असं बोलतात की पुढल्या वेळी तीच स्त्री, तरुणी पुन्हा पोलिस स्टेशनला कधी पाय ठेवणार नाही. कदाचित चांगली उदाहरणंही असतील पण क्वचितच असावीत असेही वाटते. (विदा खरंच कोणी गोळा केला पाहिजे) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मध्यंतरी फक्त महिलांसाठी आणि महिलांनी चालविलेली पोलीस स्टेशन्स अस्तित्वात आली होती. तसे पेपर आणि दूरचित्रवाणीद्वारे समजले होते. ती पोलीस स्टेशन्स कुठे आहेत हे शोधून ठेवले पाहीजे.

In reply to by एमी

पाहूणे अतिरेक करीत आहेत असे वाटते. त्यांच्या म्हणण्यानुसारचे जंगली महाराज रोड (JM) टिळक रोड वगैरे ठीकाणाहून आम्हीही अनेकवेळा फिरत असतो. आमच्या पाहण्यात तरी असे आलेले नाही. सदर प्रतिसादांनंतर आमच्या मैत्रिणींकडून सदर २ रस्ते आणि या व्यतिरिक्त ३-४ रस्ते इथे असा अनुभव आला आहे का असे विचारून खात्री करून घेत होतो की त्याना असा अनुभव आला आहे का. त्यांच्याकरुन नकारार्थी उत्तर आल्यामुळे सदर रस्ते पुण्यातले जे आहेत त्या बद्दलच पाहुणे बोलत आहेत का असे विचारु इच्छीत आहे.

पेठकर काका आणि मन१ यांच्याशी सहमत! ही व्यथा/ संताप वगैरे काही कोटी लोकांचा होतो, पण ज्यांचा होत नाही असे जवळपास शंभर कोटी असतील! त्याची कारणे काहीही असतील..(विदा मागू नये!) नुसते शिक्षण काही कामाचे नाही, संस्कार त्याहून महत्वाचे. पण ते होऊ नयेत याचा मागच्या शतकात पुरा बंदोबस्त झाला आहे. त्या-त्या लोकांच्या दृष्टीने पाहिले तर त्यांचं गाव, जात, कोणत्याही मार्गाने मिळालेला पैसा जमवणे, आणि हितसंबंध यापलीकडे त्याना समाज किंवा भारताशी काही घेणे नाही. आणि त्यांचे कुणी वाकडं करू शकत नाही. त्यांचं खात्रीनं आणि त्वरित वाकडं होण्याची व्यवस्था आली पाहिजे इतकंच.. सुसंस्कृत घरातली मुले यापासून दूर असतातच.पण काहीच न करणे हा यावर उपाय नक्कीच नाही. ज्याला समाजसुधारणा म्हणावे अशी उदाहरणे नगण्य होत आहेत. कारण सर्व समाज स्वीकारेल असे नेतृत्व पण नाही. काही लोकाना हुकुमशाही हाच पर्याय वाटतो. कारण ते उथळ आहेत म्हणून नाही, तर त्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास संपलाय म्हणून. हे सरकार बदलावे असे फारच थोड्यांना वाटते. तशी शक्यता पण दिसत नाही. क्रांती व्हावी असेही काहींना वाटते पण म्हणजे काय आणि कशी माहीत नाही. अण्णा किंवा बाबा अशा लोकाना पुरेसा लोकाश्रय नाही. समजा मिळालाच, तर पुढे नवे सरकार कोण सांभाळेल? वेगळे दिसणारे पण आतून तसेच असलेले लोक. सध्या तरी विचार करू शकणारे लोक स्वतः चा विचार करत आहेत. आपल्याला झळ बसू नये इतकी काळजी घेणे सामान्यांच्या हातात आहे. आता वरील घटनांमध्ये कारणं बघितली तर गुन्हेगार कायद्याच्या एक पाउल आधीच पुढे असल्याचे दिसते. किंवा कायद्याचं रक्षण करणारेच गुन्हेगारांचं रक्षण करतायत. ही अवस्था फक्त मागास राज्यांमध्ये नसून वेगळ्या स्वरूपात सर्व राज्यांत आहेच. बाकी वाढदिवसाची पार्टी पब मध्ये करणे, मित्रांबरोबर मुलीने रात्री उशीरा बाहेर जाणे, हे सुसंस्कृत पणाचे लक्षण नाहीच म्हणता येत. बागपत आणि गुवाहाटी ची तुलना युरोपाशी कुठं करता राव! तिथल्याच काय पण पुण्या-मुंबईतल्या लोकांनी पण सावधच असायला पाहिजे. आपल्याकडे काय वेगळं आहे?

पुरुषी अहंकार डिवचला गेला की कशी एखाद्या संतापजनक वा घ्रूणास्पद घटनेची निर्मिती होते याचं गुवाहाटी प्रकरण एक उत्तम उदाहरण ठरावं. इथं मुलीला तिचं वागणं वाइट, दारुपिते, तोकडे कपडे घालते म्हणुन न्हवे (तशा त्या पब बाहेर बर्‍याच मुली तोकड्या कपड्यात आणी दरुच्या नशेत येजा करत असाव्यात उगाच का तिथे चित्रीकरण चालु होतं ?) तर इतक्या लोकांसमोर तिनं व तिच्या मित्रानं त्यांच्या व्हिडीओ चित्रीकरणाला विरोध करण्यांच धारीष्ट्य दाखवलं म्हणुन अशा अपमानास्पद परीस्थीतीला सामोरं जावे लागले. आणी त्याही परीस्थीतीत ती ज्या त्वेशाने लोकांना म्हणत होती की माझ्या अब्रुशी खेळु नका तुम्हालाही बहीण आहे I feel damn proud about her, She faught extremely well.

In reply to by आत्मशून्य

बोल्ड टाइप मधल्या वाक्यांशी भयंकर सहमत. दारु पिते म्हणून public property आहे, असे कुणीही समजू नये. एखाद्या स्त्री दारु प्यायली म्हणून बलात्कार करणे हा आख्ख्या समजाचा हक्क आहे; असे काहीसे आपल्याकडे पसरत चालले आहे, ते चूक आहे. महाभारतातल्या द्यूत प्रसंगाची आठवण होते. राजसभेत आणलेल्या पूर्वीच्या राणीला :- "तशीही पाच जणांसोबत झोपतेसच, आमच्यासमोर उघडी हो, मांडीवर बस." असलं काही म्हणणं हिडिस आहे. आपण लगेच ती पतिव्रता वगैरे म्हणून समर्थन करतो तिचं; मुळात असंही समर्थन करायची गरजच पडू नये. कुणाच्याही(अगदि वेश्येच्याही) वस्त्राला इतर कुणाही व्यक्तीने नागवायच्या हीन उद्देशाने, जबरदस्तीने हात घालणे गलिच्छ आहे. हात "कुणावर" टाकला हे का पाहिले जावे? "कुठल्या" उद्देशाने टाकला हे पहावे. भारतातली मानसिकता :- समजा एखादी कुमारिका पोलिसांत अन नंतर कोर्टात तक्रार घेउन आली की अमुक अमुक व्यक्तीनं माझ्याशी गैरवर्तन केलं> तर लागलीच हे सिद्ध करायचा प्रयत्न होतो की तशीही ही साली कसली बदफैली आहे. आधीच हीचे इतर कुणाशी कसे विवाह्पूर्व संबंध आहेत वगैरे वगैरे. आणि अचानक तिच्याबद्दलचा सगळ्यांचाच दृष्टीकोन बदलतो. एकदा तिचे कुठे संबंध आहेत असा वास जरी आला, तर तिच्यासोबत काय वाटेल ते केले तरी हरकत नाही, असा सुप्त आवाज त्यात असतो. अरे काय हे? असेल ती बागेत फिरत तिच्या मर्जीने कुणासोबत. पब्लिकला काय त्रास आहे? किंवा ती बागेत फिरते म्हनून आख्ख्या शहराने रोज रात्री आळीपाळीने तिच्यासोबत जबरदस्ती करावी काय? भिकारचोट साले. वस्तुतः "अशा चारित्र्याची आहे म्हणून बलात्कारणीय आहे" असे म्हणणे हे १००% एखाद्या सिगारेटप्रेमीला "सिगारेट पितोस तर तुझा गळा कापला पाहीजे " असे म्हणण्यासारखेच आहे. तुम्हाला सिगारेट पिणे चूक वाटते, तुमची मर्जी. गळा कापण्याचाही अधिकार तुम्हाला नाही, आणि बलात्कार करण्याचा हक्कही. Alas भारतात कायदे योग्य असले तरी अंमलबजावणी शून्य आहे.कायदा -सुव्यवस्था सर्वत्र समान, हवी तेवढी सशक्त नाही. कुणी कुणासोबत काय करावं किंवा काय प्यावं हे ठरवायचा अधिकार दिला कुणी तिच्यायला इतर पब्लिकला? अवांतर :- मला लंडनला कित्येकदा रात्रपाळीत घरी सोडायला येणार्‍या कॅब ड्रायव्हर स्त्रिया असत. रात्री दोन- तीन्-चार कधीही त्या येत. नेमके असेच भारतात होउ शकते का? रात्री निव्वळ एक जॉब, "रोजगार" म्हणून एखादी स्त्री ह्या वेळेस फिरु लागली तर असली मंडळी तिच्यासोबत झुंडीने काय काय करतील देव जाणे.

In reply to by आत्मशून्य

हो अगदी सहमत आत्मशुन्य .. खाली पियुशाने दिलेलं उदाहरनासव किस्सा ... मुलीना विरोधाचा परिणाम भोगावा लागतो ...वेळ ,काळ आणि ठिकाण बघुन प्रतिक्रिया द्यावि लागते . मुंबईत जसं ,अंधेरी स्टेशनवर काही झालं तर प्रतिकार करण एकवेळ सेफ पण तेच कुर्ला स्टेशनवर अतिशय घातक . तिथे गप्प बसणच जास्त योग्य वाटतं .:(

भयानक व्हीडीओ आहे. त्या १५-१६ वर्षाच्या मुलीला ५-२५ पुरुष केसाने ओढताहे, तिच्या छातीला, कमरेखालच्या अंगाला हात लाउन हसताहेत, मजा घेताहेत अन त्याचं समर्थन करणार सुद्धा आहेतच. हरामखोरांना जेलातच घातलं पाहीजे तिथे त्यांना त्यांना आडवं पाडुन जो प्रसाद मिळेल तो सुद्धा कमीच.. नीचपणा नुसता...नालायक लोकं!!

एकूणच चर्चा वाचली.चर्चेचा सूर on expected lines आहे. मुलींनी/स्त्रियांनी वेडावाकडा प्रसंग होईल याची शक्यता असलेली ठिकाणे टाळावी हे म्हणणे theoretically ठिक आहे.पण असे प्रकार करणारे भर रस्त्यात/बसमध्ये किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी असतील तर मुलींनी अशी किती ठिकाणे टाळणे अपेक्षित आहे?की त्यांनी काही न करता घरी बसणे ही "बुरसटलेली" प्रवृती आहे का? दुसरे म्हणजे मुलींनी अशी ठिकाणे टाळावीत असे म्हणणे हे घरातील लोक काळजीपोटी सांगत असतात यात अजिबात शंका नाही. मुलींनी अशी ठिकाणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी टाळावी असे म्हणणे म्हणजे थोडेसे सुरक्षित प्रवासासाठी दुचाकी चालवत असताना हेल्मेट वापरावे अशा सल्ल्यासारखे आहे.समजा हेल्मेट न वापरल्यामुळे अपघाताच्या वेळी काही वाईट झाले तर ती चूक हेल्मेट न वापरणाऱ्याची असे म्हणता येईल.पण तो रस्त्यावरचा दुचाकीवाला हेल्मेट न घालता चालला आहे म्हणून त्याच्या डोक्यात दगड घालायचा अधिकार इतरांना कसा मिळाला?इतकेच नव्हे तर हेल्मेट न घालून दुचाकी चालविल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्याने त्याच्या डोक्यात दगड घालायला प्रवृत्त केले असे म्हणता येईल का?त्याचप्रमाणे एखादी मुलगी अशा ठिकाणी नको त्या वेळी समजा गेली तरी तिच्या अंगाला हात लावून काही वावगा प्रकार करायचा अधिकार इतरांना कसा मिळाला?तसेच मुली "तोकडे कपडे" घालून मुलांना चाळवतात आणि त्यातूनच अशा घटना घडतात (म्हणजे एका परीने तोकडे कपडे घालून मुली बलात्कार करायला प्रवृत्त करतात) अशा पध्दतीचे विधान अनेकदा केले जाते.म्हणजे वरील उदाहरणाप्रमाणे हेल्मेट न घालून दुचाकी चालवणारे इतरांना डोक्यात दगड घालायला प्रवृत्त करतात असे म्हणण्याप्रमाणे झाले. तेव्हा झाल्या प्रकाराबद्दल (गुवाहाटी/गेट वे ऑफ इंडिया/मरीन लाईन्समधील चौकी किंवा अन्य शेकडो ठिकाणी घडलेल्या घटनांबद्दल) मुलींना जबाबदार ठरविणे म्हणजे victim लाच शिक्षा देण्यासारखे आहे जे माझ्या मते सर्वथैव अयोग्य आहे. या संदर्भात पेठकर काकांसारख्या ज्येष्ठ मिपाकराने " पिडीताने कसेही स्वैराचारी वागले तरी त्याला बोलायचे नाही. तर पिडणार्‍याला तरी का बोलायचे?" असे विधान करावे याचे खरोखरच सखेद आश्चर्य वाटले.यात स्वैराचार म्हणजे नक्की काय?दारू पिणे हा?की अल्पवयीन व्यक्तीने दारू पिणे हा?की मुलीने दारू पिणे हा?या particular उदाहरणात ती मुलगी अल्पवयीन आहे आणि तरीही तिने दारू प्यायली असेल तर कायद्याप्रमाणे तिला समज (किंवा इतर काही असेल ते) आणि त्या पबने अल्पवयीन व्यक्तीला (मुलगा किंवा मुलगी) दारू देऊन कायद्याचे उल्लंघन केले म्हणून त्यावर त्या पबचे लायसेन्स जप्त करण्यासारखी कारवाई व्हायला हवी यात शंका नाही.पण ती मुलगी अल्पवयीन असल्यावर भर देऊन आपण मुख्य मुद्द्याला बगल कशी देऊ शकतो?समजा ती मुलगी १५ नाही २५ वर्षांची असती तर तिने किंवा पबने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नसते.मग तिच्याबाबत झालेला प्रकार कमी घृणास्पद ठरला असता का? दुसरे म्हणजे दारू पिणे हा वाटतो तितका वाईट प्रकार नाही.मी अमेरिकेतला माझ्याच बाबतीत घडलेला एक किस्सा सांगतो.मी तिथे एक अत्यंत बथ्थड पी.एच.डी विद्यार्थी होतो आणि पी.एच.डी मला झेपली नव्हती हे मी यापूर्वीच मिसळपाववर स्पष्ट केले आहे.त्या दरम्यान एका conference साठी मी फ्लोरिडातील एका शहरात गेलो होतो.Conference तीन दिवसांची होती आणि दुसऱ्या दिवशी रात्रीचे जेवण करायला आम्ही भारतीय विद्यार्थी जवळच्या एका Restaurant मध्ये गेलो होतो.तिथे काही गोरे विद्यार्थीही आले होते.त्यातील एकाने अगदी टल्ली होण्याइतकी नाही पण बऱ्यापैकी दारू प्यायली हे कोणालाही सहजपणे समजून यावे.स्वत:ला अतिशहाणे समजणारे आम्ही "सोवळे" भारतीय विद्यार्थी "या अशा लोकांमुळे अमेरिकेची ही गत झाली आहे" अशा प्रकारचे डायलॉग (अर्थातच हिंदीतून) मारत होतो.आणि आश्चर्य म्हणजे conference च्या शेवटच्या दिवशी (या घटनेच्या नंतरच्या दिवशी) नेमक्या त्याच गोऱ्याचा पेपर best paper म्हणून निवडला गेला आणि त्याला त्याबद्दल बक्षिस मिळाले.तो गोरा Stanford University मध्ये होता ही पण माहिती तेव्हाच कळली.अर्थातच आमचे चेहरे शालजोडीतले मारल्याप्रमाणे बघण्यासारखे झाले होते हे सांगणे न लागे.तेव्हा दारू पिणे हे वाईट आहे असे कोणी म्हणू नये.त्याचा अतिरेक केल्यास त्याचे दुष्परिणाम होतील ही गोष्ट खरी आहे (पण त्याचप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास त्याचेही दुष्परिणामच होतील तेव्हा याबाबत दारूला single out करायची काही गरज नाही). अमेरिकेचे अशा लोकांमुळे नुकसान होत आहे की नाही हे मला माहित नाही आणि मला ते शोधून काढण्यात काडीमात्र रसही नाही.पण आम्हीच कसे लई-शहाणे, आमचीच जीवनपध्दती कशी सर्वश्रेष्ठ,जगातील सर्व morals चे repository केवळ आम्हीच असे समजायच्या smug प्रवृत्तींमुळे भारताचे मात्र अपरिमित नुकसान झाले आहे हे मात्र मला त्या दिवशी प्रकर्षाने जाणवले. तेव्हा झालेल्या प्रकारात स्वैराचार झाला असे वाटत असेल तर दारू मुलीने प्यायली हेच असे वाटण्यामागचे कारण होते असे म्हणावेसे वाटते.आपण कसेही वागले तरी स्त्रिया/मुलींनी अगदी आदर्श वागले पाहिजे अशी अनेकांची अपेक्षा असते.म्हणजे स्वत: दारू पित असले तरी मुलींनी ती प्यायला नको, स्वत: भारतीय पेहराव करत नसले तरी मुलींनी मात्र भारतीय पेहराव करावा अशी अपेक्षा असणे हा याचाच (moral policing) चा भाग आहेत.पुलंनी १९८७ साली न्यू जर्सी मध्ये बृहन्महाराष्ट्र अधिवेशनात भाषण केले होते.त्यात त्यांनी म्हटले होते की काळ बदलला त्याप्रमाणे अनेक गोष्टी बदलल्या.दळायची जाती जाऊन पिठाच्या चक्क्या आल्या त्याप्रमाणे पिठ दळतानाच्या ओव्याही जवळपास नामशेष झाल्या.आता आपल्या संस्कृतीचा हा ठेवा नाहिसा झाला म्हणून स्त्रियांनी त्यांची कंबर मोडेपर्यंत जाती दळायची अपेक्षा करणे कसे योग्य ठरेल?त्यापुढे मी म्हणतो की जर कोणाला संस्कृतीची इतकीच पडली असेल तर त्यांनी त्यांची कामे करताना ओव्या म्हणाव्यात.तुम्ही अमुक करा आणि तमुक करा अशा उंटावरून शेळ्या हाकणे सर्वथैव असमर्थनीय आहे. तेव्हा कोणा मुलीला (किंवा मुलालाही) दुष्परिणाम होणार नाही इतकी दारू प्यावीशी वाटली (आणि ती/तो त्यानंतर गाडी चालवणार नसेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारे इतरांना इजा पोहोचवत नसेल) तर त्यात आक्षेप घेण्यासारखे मला तरी काहीही वाटत नाही. मुलामुलींना असे (सर्वसामान्य संकेतांविरूध्द वर्तन) का करावेसे वाटते याचाही विचार होणे गरजेचे आहे. प्रचंड प्रमाणावर सामाजिक स्थित्यंतरे होत असलेल्या सध्याच्या काळात पालकांची जबाबदारी बदलली आहे.अगदी २०१२ च्या काळातही मुलांच्या प्रत्येक लहानसहान गोष्टीत पालकांचा नको तितका हस्तक्षेप होत असल्याची किमान पाच उदाहरणे माझ्याच अगदी जवळच्या नात्यात मी बघितली आहेत. इतर ठिकाणी परिस्थिती काय आहे याची कल्पना नाही.पण असा प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप होत असेल तर मुले मोठी झाल्यानंतर त्याच्या अगदी विरूध्द (कदाचित टोकाची) प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे (उदाहरणार्थ लहानपणी देवपूजेची सक्ती झाल्यास मोठेपणी तिच मुले त्याविरूध्द प्रतिक्रिया उमटून पूर्णपणे नास्तिक बनतात हे अनेक ठिकाणी बघायला मिळते). माझी मुले मला वचकून (खरं म्हणजे दहशतीत) असणे ही ego satisfying urge या पालकांमध्ये मला बघायला मिळाली आहे.माझ्या मते हा प्रकार सर्वथैव चुकीचा आहे.मुलांच्या प्रत्येक गोष्टीत पालकांनी इतका हस्तक्षेप करू नये तर मुलांना चांगले काय आणि वाईट काय याचा स्वतंत्रपणे निवाडा करण्याइतके सक्षम बनविण्यापुरतेच पालकांचे काम मर्यादित असावे.पुढे यशस्वी झाल्यानंतर "मी आज जो काही आहे तो माझ्या पालकांमुळेच आहे" असे मुलांनी म्हणणे हा त्या पालकांना सर्वात मोठा tribute झाला पण "माझी मुले मला वचकून आहेत" ही ego satisfying urge म्हणजे एक मृगजळ आहे. मुले लहान आहेत तोपर्यंत कुरकुर करत का होईना ती हे सहन करतील पण संधी मिळताच मोठे झाल्यावर त्याविरूध्द बंड करतील हे नक्कीच. सध्याच्या काळात इंटरनेट आणि इतर अनेक गोष्टींमुळे याविरूध्द बंड करायचे अनेक मार्ग मुलांना उपलब्ध आहेत आणि त्या मार्गांचा संधी मिळताच ती मुले अवलंब करतील यात शंका नाही. (म्हणजे मला कायम दहशतीत ठेवलेत काय?मग बघाच--म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीचा तिटकारा आहे उदाहरणार्थ दारू-- नेमकी तीच गोष्ट मी करेन अशी प्रवृत्ती बनणे) आणि या सगळ्याचे avenues सध्याच्या काळात पूर्वीपेक्षा जास्त उपलब्ध असल्यामुळे हा धोका सध्याच्या काळात जास्त आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे सतत "तू असे करू नकोस तू तसे करू नकोस" अशा प्रकारचे moral policing केल्यास जो परिणाम अपेक्षित आहे त्याच्या नेमका विरूध्द परिणाम बघायला मिळायची शक्यता बरीच जास्त आहे.तेव्हा योग्य/अयोग्य काय याचा निवाडा करायला मुलांना समर्थ न बनविता नुसतीच लेक्चरबाजी करून हे घरातले आणि समाजातलेही विविध गोष्टींसाठीचे moral police खूप हानी करत आहेत हे नक्कीच. असो.गुवाहाटीतला प्रकार अत्यंत अश्लाघ्य आहे आणि त्याबद्दल हा प्रकार करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायलाच हवी.आणि या (आणि अशा अनेक) घटनांबद्दल मुलींना जबाबदार धरणे अजिबात योग्य नाही.आणि एकतर्फी moral policing चालते ते पण माझ्या दृष्टीने अजिबात योग्य नाही.वरकरणी ते हिताचे आहे असा देखावा उभा केला जात असला तरी पुरूषी अहंकार दुखावला जाणे हेच त्यामागचे कारण आहे असेही मला स्पष्ट म्हणायचे आहे.

In reply to by क्लिंटन

यात स्वैराचार म्हणजे नक्की काय?दारू पिणे हा?की अल्पवयीन व्यक्तीने दारू पिणे हा?की मुलीने दारू पिणे हा?या particular उदाहरणात ती मुलगी अल्पवयीन आहे आणि तरीही तिने दारू प्यायली असेल तर कायद्याप्रमाणे तिला समज (किंवा इतर काही असेल ते) आणि त्या पबने अल्पवयीन व्यक्तीला (मुलगा किंवा मुलगी) दारू देऊन कायद्याचे उल्लंघन केले म्हणून त्यावर त्या पबचे लायसेन्स जप्त करण्यासारखी कारवाई व्हायला हवी यात शंका नाही. +१ तेव्हा कोणा मुलीला (किंवा मुलालाही) दुष्परिणाम होणार नाही इतकी दारू प्यावीशी वाटली (आणि ती/तो त्यानंतर गाडी चालवणार नसेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारे इतरांना इजा पोहोचवत नसेल) तर त्यात आक्षेप घेण्यासारखे मला तरी काहीही वाटत नाही. स्वच्छ सांगतो. मी पीत नाही. मुलींनी पिलेले मला आवडत नाही. पण "दारु पिलीस तर आख्खे गाव उठसूट बलात्कार करेल" हे असले लॉजिक गलिच्छच आहे. दारु पीत नसलेल्या मुलीसोबतही गैरप्रकार केले तरी त्याचे समर्थन करणार्‍यांची इथे कमी नाही. माझेच वरचे बोल quote करतोयः- भारतातली मानसिकता :- समजा एखादी कुमारिका पोलिसांत अन नंतर कोर्टात तक्रार घेउन आली की अमुक अमुक व्यक्तीनं माझ्याशी गैरवर्तन केलं तर लागलीच हे सिद्ध करायचा प्रयत्न होतो की तशीही ही साली कसली बदफैली आहे. आधीच हीचे इतर कुणाशी कसे विवाह्पूर्व संबंध आहेत वगैरे वगैरे. आणि अचानक तिच्याबद्दलचा सगळ्यांचाच दृष्टीकोन बदलतो. एकदा तिचे कुठे संबंध आहेत असा वास जरी आला, तर तिच्यासोबत काय वाटेल ते केले तरी हरकत नाही, असा सुप्त आवाज त्यात असतो. अरे काय हे? असेल ती बागेत फिरत तिच्या मर्जीने कुणासोबत. पब्लिकला काय त्रास आहे? किंवा ती बागेत फिरते म्हणून आख्ख्या शहराने रोज रात्री आळीपाळीने तिच्यासोबत जबरदस्ती करावी काय? "दारु पितेस काय, थांब करतोच बलात्कार" असला काहीसा टोन (बेंगलोरला पब फोडणार्‍या) श्रीराम सेनेसारख्या गुंडांचा दिसतो. दुर्दैवाने ह्यांचे कुणी काही झाट वाकडे करु शकत नाही. गुवाहाटीतला प्रकार अत्यंत अश्लाघ्य आहे आणि त्याबद्दल हा प्रकार करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायलाच हवी. जर गुन्हेगाराकडे पुरेशी सत्ता किंवा पैसा असेल तर शिक्षा होणे भारतात rarest of rare शक्यता वाटते. शाबित करणार कोण? शोध घेणार कोण? तेच जर http://www.misalpav.com/node/22254#comment-412944 दिल्यासारखे विचारु लागले तर काय घंटा तपास होणार आहे? आणि या (आणि अशा अनेक) घटनांबद्दल मुलींना जबाबदार धरणे अजिबात योग्य नाही. पुन्हा +१ पण आणि एकतर्फी moral policing चालते ते पण माझ्या दृष्टीने अजिबात योग्य नाही.वरकरणी ते हिताचे आहे असा देखावा उभा केला जात असला तरी पुरूषी अहंकार दुखावला जाणे हेच त्यामागचे कारण आहे असेही मला स्पष्ट म्हणायचे आहे. अडचण अशी की गैरप्रकराला भारतात शासन/शिक्षा मिळेलच ह्याची शाश्वती नाही. म्हणून (सभ्य म्हणवल्या जाणार्‍या घरातील )पब्लिकला असे वचकून रहावे लागते. कायद्याचा धाक योग्य त्या व्यक्तींना बसल्यास बाकी गोष्टी आपोआप सरळ होतील. सध्या सभ्य लोकांना पोलिसांची भीती वाटते, गुंडांना आपल्याला काय वाटेल ते "मॅनेज" करता येइल हा भरोसा आहे. हे चित्र चूक आहे. सभ्य लोकांना पोलिसांबद्द्ल आपुलकी वाटली पाहिजे.