दोन आठवडे झाले रोज शिवारे बघुन येतो,घास खाऊ वाटत नाही....मन लागत नाही, पोट खपाटीला गेलेल्या लेकरासारखे कोरडे झालय सगळ रान.सैरभैर वाटतय...ज्वारीचे बियाणे बहुदा वाया जाणार,सर्व झाडॆ बोडखी झाली आहेत.उन्ह काही सरत नाही....आता तर आभाळ सुद्धा भरून येत नाही,डोळे मात्र भरुन येतात....व्यवसाय जेमेतेम चालतो,घरी खाणारी तोंडे अन खिसा यांचा ताळमेळ कसा बसणार? मागच्या २- ३ दिवसापासून खूप निराश वाटते आहे ,काही सुचत नाही कुठे मन लागत नाही. घरी कोणाच्याही डोळ्यास डोळा देण्याची हिंमत आता उरली नाही...कसे होणार पुढे ?
माझे गाव - सोलापुर जिल्ह्यातील उत्तर सोलापुर तालुक्यातील कोंडी हे गाव आहे ...जमीन म्हणजे काळी आई हे माझ्यासाठी पुस्तकी वाक्य नाही. बरस रे घना ,संपव माझ्या यातना ....जास्त लिहवत नाही.
वाचने
2010
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
भावना.
??????????
प्रतिक्रियेंच्या संख्येवरुन्च
कवी - दासू वैद्य
मस्त कविता
In reply to कवी - दासू वैद्य by शुचि
:(
In reply to कवी - दासू वैद्य by शुचि