Skip to main content

आता फाशीची काय गरज?

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 22/05/2012 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानातून शांतिसंदेश घेऊन आलेले लोकोत्तर पुरुष जनाब अजमल कसाब ह्यांची बिर्याणी नुकतीच बंद झाल्याचे दु:खद वृत्त कळले. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13343396.cms आपल्या जनजागृतीच्या प्रयत्नाला अनवधानाने किंचित हिंसक स्वरुप लाभून त्यात किरकोळ लोकांची हानी झाली त्याबद्दल ह्या महात्म्याला मृत्युदंड झाला म्हणून ह्या देशाचे शांतिप्रिय पिते स्वर्गात तळमळले असतील ह्यात शंका नाही. पण सरकारने आपल्या परीने ह्या क्रूर शिक्षेला पुढे ढकलून आपले शांतिपूर्ण हेतू सिद्ध केले आहेतच. आजपर्यंत ह्या शंतिदूताला त्याच्या आवडीचा मांसाहार पेश केला जात होता. एखाद्या व्ह्यायपीला लाजवेल अशा पद्धतीने ह्या थोर मनुष्याला खाना खिलवायला सहा पोलिसी खानसामे राबत होते. आता त्यांना अन्यत्र हलवले आहे. अर्थात त्यांनी आजपर्यंत दिलेल्या सेवेचा यथोचित सन्मान होईल अशी खात्री बाळगू. काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना ह्या विभूतीच्या मांसाहारामुळे बदहजमी झाली असावी. निदान मांसाहार बंद करायच्या ह्या क्रूर शिक्षेमुळे ह्या वीराला फाशीसारखी अनावश्यक शिक्षा देण्याचा अनाठायी दुराग्रह नष्ट होईल ही आशा. इस बहादूर शेर को घासफूस का खाना खिलाना तो मौत से भी बदतर है.

वाचने 1887
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया


मानवी हक्कांची पायमल्ली केल्याबद्दल जाहीर निषेध. सबरंग आणि ते चालवणार्‍या टिस्टा सेटलवाड जीं नी या बाबत तात्काळ आवाज उठवावा ही विनंती.

जवळपास याच विषयावर नुकतीच मिपावर चर्चा झालेली आहे. आपल्या बघण्यात आली नसेल तर इथे वाचू शकता. http://www.misalpav.com/node/21621 याउपर जर चर्चा सुरू ठेवायची असेल तर.... मर्जी आपकी... (त्याच त्याच वांझोट्या चर्चांचा वीट आलेला) अमृत

In reply to by अमृत

अमृतही असे गरळ ओकते हे वाचून गंमत वाटली. असो. तो विषय वेगळा. तो निव्वळ कसाबसाहेबांच्या संरक्षणावर होत होता. सदर विषय त्यांच्या आहाराबद्दल आहे त्यामुळे त्याचा संबंध थेट त्याच्या पोटाशी येतो. त्याचे संरक्षणाकरता किती पोलिस राबतायत ह्यापेक्षा त्याच्या सामिष भक्षणाकरता किती पोलिशी खानसामे राबतायत ही बातमी खचितच रोचक आहे असे आम्हास वाटते. तमाम पेपरातही ही बातमी आलेली आहे. तेव्हा आम्ही एकटे नाही. अतिरेक्याला योग्य ती शिक्षा देण्यात सरकार कुचराई करत आहे ह्या वस्तुस्थितीचे घोंगडे त्यावरील चर्चेपेक्षा जास्त भिजत आहे ह्या विषयी खात्री बाळगावी.