Skip to main content

माजोरडेपणा!

लेखक amit_m यांनी गुरुवार, 19/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपुर्वी टीव्हीवर बातमी पहिली, एका दुध कंपनीने दरवाढ केली म्हणून दुध उत्पादकांनी अक्षरशः हजारो लिटर दुध रस्त्यावर ओतून दिले. हा माजोरडेपणा झाला! एकीकडे ह्यांना दर वाढवून पाहिजेत (दूध कंपनीला नव्हेत) आणि दुसरीकडे अशी नासाडी करायला लाजादेखील वाटत नाहीत. एका सामान्य शेतकऱ्याला ज्याच्या घरी 1-2 गाई किंवा म्हशी आहेत त्याला असले उद्योग परवडण्यासारखे असतात का? 'महागाई फार वाढली' अशी ओरड आपण सतत करत असतो.. अशा घटनाच महागाईला वाढीला प्रोत्साहन द्यायला कारणीभूत असतात का? ह्यातून काय निष्पन्न होते? उद्या पेट्रोल भाववाढ व्हावी म्हणून पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल रस्त्यावर ओतले तर चालेल काय? आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी जगाला वेठीस धरण्याचे प्रकार आजकाल फारच वाढले आहेत. ह्यात रिक्षा संप, हगल्यामुतल्या रास्तारोको करणारे, मोर्चे काढणारे सगळेच आले. भारतात भावी काळात येऊ शकणाऱ्या अराजकाची ही नांदी असू शकेल?

वाचने 5239
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

>>>>>>>>> उद्या पेट्रोल भाववाढ व्हावी म्हणून पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल रस्त्यावर ओतले तर >>>>>>>>> चालेल काय? >>>>>>>>>>>>>>>>>चालेल की, भरणारे घेतील भरून............. नाहीतर कोणीतरी लावतील काडी................. तुमच्यासारखी :wink:

त्यांचं प्रॉडक्शन त्यानी काहीही करावं. आपण कोण सांगणार? पेट्रोलवाल्याला त्याचे पेट्रोल निषेध म्हनुन विकायचे नसेल तर तो तसेच टाकीत ठेऊ शकतो... पण दुधवाल्याने काय करायचे? त्याला ओतावेच लागेल ना? नाहीतर दुसर्‍या दिवशीचे नवे दूध त्याने कशात ठेवायचे? भाजीपाला विकनार्यांचाही हाच तोटा असतो... बाजारात भाव आला नाही तरी त्याना तो माल दलालाला द्यावाच लागतो. नाहीतर तो माल पुन्हा घरी न्यायचा म्हणजे परत वाहतूक आणि साठवायचा खर्च अंगावर पडणार.. त्यामुळे असे लोक आंदोलन करताना त्यांचा माल सरळ ओतून/ फेकून/ टोमॅटो चिरडून टाकतात.. त्यांच्याकडे आंदोलन करायलादेखील दुसरा ऑप्शनच उपलब्ध नाही. त्यांची आणि इतर व्यावसायिक यांची तुलना करणेदेखील अयोग्य आहे.

पूर्वीच्या काळी चित्रपटाची तिकिटे काळ्या बाजारात विकणारे, चित्रपट सुरु होऊन १० मिनिटे झाली की, उरलेली तिकिटे फाडून टाकायचे. भाव पडेल म्हणून तिष्ठत उभ्या असलेल्या गिर्‍हाईकांना पडेल भावात विकायचे नाहीत. दुधाची नासाडी करणे समर्थनिय नाहीच. गोरगरीबांना वाटून टाकावे. त्यानेही आंदोलन यशस्वी होऊ शकेल.कारण जे विकत घेणारे आहेत त्यांच्या पर्यंत ते दूध पोहोचत नाही. पण ते ओतून नसाडी करणे म्हणजे माजुरडेपणाच म्हणावा लागेल. राजस्थानात नाथद्वारा इथे श्रीनाथजी मंदिरात देवाच्या मुर्तीवर हजारो लिटर दूध ओतले जाते. ते गटारात वाहून जाते. श्रद्धेच्या नांवाखाली होणारी दूधची ही नासाडी समर्थनिय म्हणावी काय?

पेठकरांचं म्हणणं पटतं. उगाच नासधुस करायच्या ऐवजी कमी उत्पन्न वाल्या गटाला फुकटात देउन टाका किंवा मग असं आंदोलन करताना त्यांचा माल कंपनीऐवजी स्वतःच विकायचा म्हणजे कंपनीला न देता, नुकसान होता, कमी उत्पन्न वाल्या लोकांना त्याचा उपयोग होउन तिहेरी फायदा होउ शकेल. का ते शक्य नाही? कदाचित मुटे साहेब सांगु शकतील.

In reply to by शिल्पा ब

पेठकर काकांशी सहमत आहे. प्रतिकात्मक म्हणून एखाद भांडे दूध किंवा एखाद जोडी भाजी रस्त्यावर फेकून उरलले सर्व पदार्थ अनाथाश्रम, वृद्धाश्रम किंवा इतर सामाजीक संस्थांना द्यायला काय हरकत आहे ? शेवटी रस्त्यावर सगळे दूध किंवा भाजीपाला फेकून देखील आरोळ्या मारत निषेध करावाच लागतो ना ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

अनाथाश्रम, वृद्धाश्रम हे जागोजागी नसतात... कुठेतरी दूरवर असणार. तिथपर्यंत दूध, भाजीपाला घेऊन जाण्याचा वाहतूक खर्च कुणी करायचा? तो खर्च परवडत असता तर त्यानी माल घरीच नसता का नेला?

In reply to by JAGOMOHANPYARE

अनाथाश्रम, वृद्धाश्रम हे जागोजागी नसतात... कुठेतरी दूरवर असणार. तिथपर्यंत दूध, भाजीपाला घेऊन जाण्याचा वाहतूक खर्च कुणी करायचा? तो खर्च परवडत असता तर त्यानी माल घरीच नसता का नेला?
किती तरी संस्था स्वखर्चाने ही उत्पादने घेऊन जाण्यास तयार होतील. काही सामाजीक संस्था तर अशा प्रकारची मदत एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी विनामोबदला पोचवण्याची सोय करतात. शेवटी इच्छा तेथे मार्ग.

In reply to by JAGOMOHANPYARE

तेच. आयत्या वेळी बाजाराकडे आणलेला पण भाव पडलेला किंवा मागणी नसलेला असा माल नेमका गरीबांना / निम्नउत्पन्नगटाला वगैरे कसा वाटपायचा ? (दूध वगैरे तर ऑलरेडी खराब व्हायला सुरुवात झालेली असू शकते.) असं काही गोरगरीबांना वाटप करण्याचा नेक विचार येण्याच्या मनःस्थितीत आणि लॉजिस्टिक स्थितीत हे निराश झालेले / खचलेले / संतप्त उत्पादक असतील का? माल कमी दरात न पुरवल्याने (पक्षी नष्ट केल्याने) माजोरडेपणा वाटणे साहजिक आहे पण अगतिक, असहाय्य करणारा संताप त्या तीव्र कृतीमागे असतो तो दिसत नाही का? अशा स्थितीत मनुष्य समाजहित, गरीब, नासाडी वगैरे तार्किक विचार करण्याच्या स्थितीत राहात असेल का? माल पडेल दरात तेवढंच नुकसान कमी अशा पडेल भूमिकेतून तसाच बाजारात पुरवत न राहता तिथे तो नष्ट केला तर त्याचा तुटवडा निर्माण होऊन दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी तरी भाव वाढण्याची शक्यता निर्माण होत असावी. अर्थात त्यासाठी माल ओतून देणे ही क्रिया होत असेल असं नाही, किंवा ती समर्थनीय नाही. पण ती कदाचित अपरिहार्य आहे. अशा स्थितीत काहीसं समांतर उदाहरण सुचतंय. समजा एक तरुण एखाद्या अन्यायाविरुद्ध / भ्रष्टाचाराविरुद्ध कलेक्टर कचेरी /मंत्रालयासमोर गेला आणि पेटवून घेतलं, तर त्याला असं म्हणावं का, की अरे जीवच द्यायचा होता तर सीमेवर जाऊन शत्रूशी लढतालढता जीव द्यायचा होतास.. किंवा गेलाबाजार नेत्रदान तरी करुन ठेवायचंस.

In reply to by गवि

असहमत ! बाजारात आलेला माल मग तो दूध असो वा भाजीपाला, हा खराब व्हायला निदान एक दिवस तरी नक्की लागतोच लागतो. बाजारापासून अनेक सरकारी शाळा जवळ असतात, तिथे दुपारच्या अन्नासाठी बचतगट नेमलेले असतात. ह्यातले काही दूध किंवा भाजीपाला अशा गटांना दिल्यास ते गट त्याची नक्की काळजी घेऊ शकतील.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ही तुमची कल्पना झाली. प्रत्यक्षात सरकारच्या परवानगीशिवाय सरकारी पुरवठ्याशिवाय इतर काहीही मुलाना देता येत नाही.. त्यांच्या सुरक्षिततेची हमी कोण घेणार? बरं, मुलं असं किती दूध पितील? २०० मिली पर हेड असे जरी धरले तरी अजून दूध आंदोलनकर्त्यांकडे शिल्लकच राहील. त्याचे काय करणार?

In reply to by परिकथेतील राजकुमार

ठीक आहे. समजा खराब नाही झाले तरी निराश आणि खचलेल्या स्थितीत रोजचा धंदापाणी करणार्‍या उत्पादकांनी भाव पडल्याचे कळल्यावर एकदम मनःस्थिती आणि उद्देशाचा रोख बदलून शाळा, आश्रम इत्यादिंकडे मोर्चा वळवावा हे शक्य आहे का? शिवाय उत्पादन (निदान दूध) जसे आले तसे थेट कोणाला पुरवले तर त्याचे कोणतेही प्रोसेसिंग / शुद्धतेची चाचणी, खात्री होईलच असंही नाही. भाज्यांच्या बाबतीत हे ठीक आहे. हां, जर असा निराशेचा क्षण साधून आश्रम, शाळा इत्यादिंचे कोणी प्रतिनिधी बाजारपेठेत उभे असतील आणि दूध /भाजी फेकणार्‍यांना आवाहन करुन ते गरीबांकडे स्वखर्चाने वाहून घेऊन जाण्याची तयारी दाखवली तर ते उचित ठरेल. पण असा मोका साधणं तरी कितपत भरवशाचं ठरेल कोण जाणे. हे काही रोज घडत नाही.

In reply to by गवि

तेच म्हणतो मी... ऐन वक्ताला आंदोलन करायच्या वेळी अन्नदान अरेंज कसं करणार? शिवाय, संपूर्ण गावासाठी /समाजासाठी विकले जाणारे असे हजारो लिटर दूध जमा झालेले असनार.. वृद्धाश्रम, अनाथाश्रम यातल्या ५ -५० लोकाना आंघोळ करायला जरी दूध दिले तरी आणख्गी बरेच शिल्लकच राहील. त्याचे काय करणार?

In reply to by गवि

असं काही गोरगरीबांना वाटप करण्याचा नेक विचार येण्याच्या मनःस्थितीत आणि लॉजिस्टिक स्थितीत हे निराश झालेले / खचलेले / संतप्त उत्पादक असतील का? हा असला संताप काय कामाचा? त्यांचंच नुकसान होतंय.त्यापेक्षा जरा थंड डोक्याने विचार केला तर एवढं नुकसान होणारच नाही. कोणताही माल एका ठीकाणी जमुन उदा. जिथे फेकुन दिला ती जागा धरा ..मग कीमान आजुबाजुच्या काही बिल्डींगी, शाळा, कचेर्‍या वगैरे ठीकाणी अमुक कारणाने नुकसान होतंय पण त्याचा निषेध म्हणुन कमी दरात उत्पाकांकडुन/ दलालांकडुन (जे असेल ते) कमी दरात उपलब्ध आहे. अहो, एका बाईला जरी हे कळालं तरी संपुर्ण बिल्डींगमधल्याच नै तर आजुबाजुच्या ८-१० बिल्डींगमधल्या बायका खरेदीला येतील. अन कमी दरात मिळतोय म्हणुन जास्तीची बेगमी करतील ते वेगळंच. अन जाहीरात कुठल्याकुठे पोहोचेल सांगता येत नाही. हे एक उदा. आहे. कदाचित लोकमत या उत्पादकांच्या / वितरकांच्या बाजुने उभं रहायला पण मदत होउ शकते. शेवटी नाशिवंत भाजीपाला व इतर माल कचर्‍यात टाकुन दिलेला पाहील्यावर लोकांना त्यांच्याबद्दल सहानुभुती वाटण्याची शक्यता कमीच नै का!! तुमचं समांतर उदा. येथे समांतर अजिबात म्हणवता येत नाही. दोन्ही प्रसंगात प्रचंड अंतर आहे. अवांतरः यक्कुला दात काढायला आणि काय झालं!! मेल्या जरा गंभीर हो की!!

In reply to by शिल्पा ब

ते आहे हो शिल्पातै, पण अनोळखी मनुष्याकडून दूध भाजीपाला कितीजण घेतात आजकाल? माझ्या (भारतवारीतल्या) बघण्यातच डॉ. एका पेशंटला दूध घ्यायला सांगत होते पण त्यांनी सांगितले की आजकाल भेसळ बरीच असते म्हणून खात्रीलायक मनुष्याकडूनच घ्या (चुन्याची निवळी,युरिया आणि काय काय मिसळतात). शिवाय भाजीपाला हा बरा रंग यावा म्हणून त्या त्या रंगाच्या पाण्यात मुळासकट बुडवून ठेवतात. उदा. गाजरे केशरी पाण्यात इ. कलिंगडांना तर म्हणे लाल रंग असलेलं इंजेक्शन देतात. रोजच्या भाजीवाल्याला असं काही झाल्यास (ते फसवतातच, पण उघडकीला आलं तर) आपण बोलू शकतो. दूध असं कोणत्या शाळेला द्यायचं, ते आणताना चांगलं असेल असंही धरू पण ते तापवणे, ग्लासातून देण्यात काही जंतूसंसर्ग झालाच तर जबाबदारी कोण घेणार? आता सरकारी योजनेतून काही फार चांगलं अन्न नाही मिळत पण शेकडो मुलांना काही झाल्यास जबाबदारी तरी सरकारवर ढकलता येते. प्रत्येक गावात जशी मोठी मंडई असते तश्या मंडयांमध्येही लोक ठराविक भाजीवाल्यांकडून घेतात शिवाय ते (बरेचदा) परवानाधारक असतात. निषेध व्यक्त करताना आपल्याकडे जे काही अतोनात प्रमाणात आहे, ज्याचे नुकसान झाल्यास कदाचित (खरेतर नाहीच) परवडू शकेल असे प्रकार वापरत असावेत.;) आणि गोरगरीबही आजकाल चुझी झालेत, आणि का होवू नये? :) देणारेही काही हरिश्चंद्र नसतात......

In reply to by शिल्पा ब

>>>>अवांतरः यक्कुला दात काढायला आणि काय झालं!! मेल्या जरा गंभीर हो की!! :| :-| गंभीर होऊन काय होणारे? वर पराशेठ म्हणतात ते मला पटले आहे. ;-)

कुछ पाने के निये कुछ खोना पडता है.. निदर्शनाचे बहुतेक मार्ग हे destructive च असतात. उदा. रास्ता/रेल रोको, दगडफेक, तोडफोड, मालाची नासाडी. गांधीवादी मार्गांची विशेष दखल घेतली जात नाही. त्यामुळे बहुतेक लोक त्यामार्गाने जात नाहीत. म्हणजे हे मार्ग समर्थनीय नव्हेत. निदर्शक व सरकार दोन्ही बाजूनी किती फायद्यासाठी किती नुकसान होत आहे याचे भान राखायला हवे.

हे म्हणजे विदेशी कपड्यांची होळीच का केली? ते ही गोरगरीबांत वाटता आले असते विचारण्यासारखे झाले :)

In reply to by ऋषिकेश

हे म्हणजे विदेशी कपड्यांची होळीच का केली? ते ही गोरगरीबांत वाटता आले असते विचारण्यासारखे झाले
तुला किती वेळा सांगीतले आहे की स्टार माझा आणि निखिल वागळे दोन्ही ऐकणे बंद कर म्हणून.

दुध संकलित करणारी कंपनी बंद आहे म्हणून ते रस्त्यावर फेकले जात नसून, स्वतःची उपद्रवमुल्ये जगाला दाखवून द्यायचा हा खटाटोप असतो, ह्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊच शकत नाही. प्रश्न राहतो तो निषेध व्यक्त करण्याचा..यासाठी शेतकऱ्यांना पूर्वसूचना देऊन दुध संकलन एक दिवस बंद ठेवता येऊ शकते.

In reply to by amit_m

म्हशींना पूर्वसूचना देउन दुध देउ नये असा सांगा ... बर्याच ठिकाणी शीत कपाटे नसतात दुध साठवायला ..ती घेतली तर वीज नसते १०-१२ तास .. आणि हे ए सी मधे बसून फुकाचे सल्ले देणार !!