सामान्य माणुस सलमन खुर्षीद आणि दिग्विजयसिंगाच्या अक्षरशः देशद्रोही वर्तुणुकींबद्दल, आणि त्यांना मुळीच चाप न लवणार्या डबल देशद्रोही काँग्रेसश्रेष्ठींबद्दल चकार शब्द काढत नाहित... पण याचं नवल वाटेनासं झालय आता. आम आदमी जे कहि भोगतोय ते प्राक्तन त्यानेच स्वतःच्या कपाळी कोरलय.
खुर्षीद साहेबांनी कुठला देशद्रोहीपणा केला हा बालीश प्रश्न उरतोच नाहि का... तर बाटला हाऊस प्रकरणी हे महाशय मुस्लीमांना जाणुन बुजुन टारगेट केल्यल्याचा आरोप पोलीसांवर करताहेत... त्याच्या गलीच्छ भांडवलावर मुस्लीम सहनुभुती मिळवुन उत्तर प्रदेशात मतांचा खुराक पदरी पडावा म्हणुन.
पोलीस दलावर मानवाधीकार उल्लंघनाचे आरोप होत असतात... बर्याचदा त्यात तथ्यही असतं. पण मानवाधीकार उल्लंघनाला मुस्लीम धार्मीकतेचा हिरवा रंग देणं हे त्या समाजात असुरक्षीततेची भावना पेरण्या पलिकडे आणखी काय साधेल? आणि हे असले धंदे करुन आपण मतं मिळवु शकतो असं वाटणं हा मुस्लीम धर्मीयांच्या सद्सद्विवेकबुद्धीचा अपमान नाहि काय? हे गलीच्छ राजकारण गेली अनेक दशके सुरु आहे. अगोदरच सामान्य भारतीय धार्मीक तणावांनी, घावांनी घयाळ आहे... त्यावर उपाय योजायचे सोडुन ते घाव अधीक गहीरे करून आपली रक्तपिपासु सत्ता तहान भागवायची हि कुठली अघोरी वृत्ती :(
कडव्या हिंदुत्ववादाच्या उदयाला हा काँग्रेसी कावा एक प्रमुख कारण होतं असं कुठेतरी वाचलं होतं... खरं असावं काय...
अर्धवटराव
वाचने
2350
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
पोलिसांमध्ये 'एकी' नाही,
सत्य आहे... भारतात लोकशाही