Skip to main content

लग्नाआधी आणि लग्नानंतर!

लेखक दादा कोंडके यांनी शुक्रवार, 03/02/2012 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एक मित्र लग्नाच्या फायनल बोलणीसाठी गावाला जाउन आला. लग्न अगदी ठरल्यातच जमा होतं म्हणून आल्यावर मी त्याच्याकडे पार्टी मागितली पण तो म्हणाला ऐनवेळी बोलणी फिसकटली. थोडसं खोदून विचारल्यावर कळलं की त्या मुलगीला :) लग्नानंतर एक दिड वर्षेतरी तीचा पगार तीच्या घरी द्यायचा होता. हुंड्याचा वगैरे तर प्रश्नच नव्हता आणि माझा मित्रपण पगार न-देण्याबद्दल आग्रही नव्हता. पण त्या मूलीचा भाउही नुकताच इंजिनीअर होउन नोकरीला लागला होता आणि तीचा पगार कारचे हप्ते भरायला द्यावा लागणार होता. जे माझ्या मित्राच्या मते योग्य जस्टीफिकेशन नव्हतं. अजुन एक उदाहरण माझ्या ओळखीचं आहे. अश्याच कुठल्याश्या छोट्या कंपनीत नोकरी करणारी मुलीचा पगार बारा हजार होता. तीला आयटीत नोकरी लागल्यामूळे तीचा पगार एकदम पंण्णास हजार झाला. त्याच्या जोरावर त्यांनी नवीन घर (तीच्या वडिलांच्या नावावर) घेतलं, कार घेतली. एका वर्षात वडील रिटायर झाले, लहान भावंडांची शिक्षणं चालू. म्हणून ती कर्ज फेडेपर्यंत तीला पगार मग घरी देणं आलं. हिच्या लग्नाचे प्रयत्न चालूच होते पण त्या अटी मूळं खूपशा स्थळांकडून नकार आला. हीच उदाहरणं नाही, पण ह्या दोन-चार वर्षात खूप मित्रांना अशा अटी ऐकायला मिळाल्यात आणि मैत्रिणींनी अटी घातल्या आहेत. पुर्वी (म्हणजे अपने जमानमे) मूलीचे पैसे आईवडील घ्यायला अवघडत असत. अगदीच घेतले तर तुझ्याच लग्नाला होतील म्हणून बँकेत ठेवत असत. पण आता मूलींच्या शिक्षणाबाबतही जागरूक असणारे पालक मुलीच्या लग्नाआधी आणि लग्नानंतरही पैसे अगदी हक्काने घेतात असं दिसतं. अगदी गरज पडली तर मदत करणं वेगळं किंवा हेल्थ इंश्युअरन्सचे पैसे भरणं वगैरे समजू शकतो, पण सरसकट लग्नानंतर अर्धापगार किंवा पूर्ण पगार घरी देणार्‍या मूली पण बघितल्या आहेत. या अनुषंगानं मला काही पडलेले काही प्रश्न, १. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण होई पर्यंत मूली १-२ वर्षे का थांबू शकत नाहीत? २. नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत? या बद्दल मिपाकरांना काय वाटतं?

वाचने 41686
प्रतिक्रिया 127

प्रतिक्रिया

१. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण होई पर्यंत मूली १-२ वर्षे का थांबू शकत नाहीत? २. नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत?
दिलेली उदाहरणं आणि एकूण वस्तुस्थिती पाहता फक्त १-२ वर्षांचा प्रश्न आणि त्यानंतर कर्ज फिटलं, हप्ते संपले, गरज मिटली असं होणार आहे असं वाटत नाहीये. बाकी मुलीने तिच्या घरी अर्धा पगार दिला तर काय प्रॉब्लेम आहे बुवा?? फारतर तिने सासरी घरचा किमान खर्च स्वतः उचलून बाकीचा सर्व पगार माहेरी कायमच दिला तरी तिची मर्जी.. आणि ते योग्यही आहे. मुलाचा चालतो पण मुलीचा पगार घेण्यात मात्र काही लज्जास्पद आहे का?

In reply to by गवि

मुली॑नी सुद्धा थोडा पगार सासरी व काही थोडा माहेरी द्यायला हरकत नाही. मुलगा जर आई वडील व बायको दोघा॑चा खर्च चालवीत असेल तर मुलीने चालवायला काय हरकत आहे ?

हम्म .......प्रश्न फार गहन आणी" डोक्याला शॉट्ट देणारा आहे " (ह्.घ्या.) जाणकार / माहितागार / सुज्ञ मि .पा. कराच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत :) (नोकरी करणारी पियु )

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

अजुन एक जोक सांगा ना!
दिवसाला एकच जोक ऐकण्याची सवय करुन घे... तिला जास्त जोक्स येत नाहीत... अन आजच २ सांगितले तर उद्या काय सांगेल ती...

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

@अजुन एक जोक सांगा ना! मि....का. ?... मेलो हसून हसून सांगा ना..?

In reply to by अत्रुप्त आत्मा

@ व.प्या.,मि.का अन अत्रुप्त आत्मा काय चालवलय रे ? ;) अजुन जोक येत नै ब्बास आता ;) तुम्हाला तिघानाही तोफेच्या तोण्डी देउ का रे ? ;)

In reply to by पियुशा

वप्या अणि मिकाला तोफेच्या तोंडी देऊ शकाल, पण आत्म्याला देऊन काय साध्य होणार आहे? आत्मा अमर आहे. नैनं छिन्दन्ति शस्त्राणी नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।

In reply to by किचेन

ओ ताई तो आत्मा आहे आणी ते सुद्धा अत्रुप्त :crazy: असे आत्मे काहीही करु शकतात .त्यांच्या बोट नसण्यावर जाउ नका. आम्हि अनुभव घेतलेला आहे त्यांच्या नसलेल्या बोटांचा. :bigsmile:

In reply to by किचेन

@पण त्या आत्म्याला बोट नसतात. >>> अगं किच्चु तै...बोट नै गं... बोटं... आणी मला बोटे नाहीच आहेत,,, आत्म्याला देहच नसतो,मग बोटे कुठची...? मी हे लिहिताना कंप्युटरच्या हार्डडिस्क मधेच प्रवेश केलेला असतो...त्यामुळे तर मुक्त संचार करु शकतो... ;-)

In reply to by पियुशा

@-तुम्हाला तिघानाही तोफेच्या तोण्डी देउ का रे ? >>>अग्गं बाबौ... पियु चिडली,,, पळा...पळा...पळा...

In reply to by अत्रुप्त आत्मा

मा. अहिंसावादी मिपाकरांना न मर विनंती, सदर मिपाकर मा. पियुषाताई यांचा सामुहिक बधकांड आरंभण्याचा उघड उघड मनोदय पाहुन आपले दयार्द हृदय अजुन द्रवले कसे नाही, का या बिचा-या वधस्तंभाकडे पक्षी तोफमुखाक्डे ओढुन नेल्या जाणा-या इतर मिपाकरांबाबत आपल्या मनात काही आस्था नाही असे समजावे की काय ? हे भगवान निलकांता , हे प्रत्यक्ष जग कृर व निष्ठुर आहे याची जाणिव होतीच पण तीच कृरता आणि हिंसात्मक जाणिवा जर या आभासी जगात प्रलयंकारी स्पंदने उत्पन करु लागल्या तर आम्हा सारख्या ससका असणा-या लोकांनी कुठे जावे, गिरनार पर्वतावर की काय ?

In reply to by ५० फक्त

@ ५० फक्त हे भगवान निलकांता __/\__ माझा पण णमस्कार सान्गा त्याना ;) ५० राव , मला वाट्त कि नै ,कि नै,कि नै , माझा ,व.प्या.चा ,अत्रुप्त आत्मा अन पक पक पक या सर्व माननिय सदस्याचा " बाजार ऊठ्वनार वाट्ट्ता आपण ;) पण आमच्याकडे M3 - A light tank , jermen made flank gun, अन shrman cab tank आहे म्हणल ;)

In reply to by पियुशा

एक ससका मिपाकर म्हणुन प्रामाणिक शंका विचारतो - M3 - A light tank , jermen made flank gun, अन shrman cab tank - हे हे सगळं चालवण्यासाठी लागणारे लायसन आपल्याकडे आहे काय ? असल्यास आणि नगरहुन निघताना, सगळ्या टायरमधली हवा, ऑईल, हेडलाईटचे बल्ब् वगैरे वगैरे चेक करुन निघा, पुण्यात अशा चिल्लर वाहनांची दुरुस्ती केली जात नाही, आणि हो शक्यतो लकडी पुलावरुन येउ नका . आणि प्रवासात खिडकीतुन (असेल तर) डोकं बाहेर काढु नका, हायवेला बाकी गाड्या फार फास्ट असतात. म्हणजे नगर ते पुणे अंतर साधारण ३ तास, टँकला ४ तास लागतील, त्या हिशोबानं आम्हाला इथुन पळुन जाण्याची तयारी करायला बरं.? का ओककाकांना विचारावं बरं या हल्ल्याला कसं तोंड द्यायचं ते का चितळे काकांना विचारावं ? अवांतर - दुस्-या परिच्छेदातला कंस मागच्या किंवा पुढच्या, ज्या हव्या त्या शब्दाला लागु करुन घेउ शकता, आमची हरकत नाही.

In reply to by ५० फक्त

अहो ५०, इकडं, तिकडं कशाला पळता, नगरलाच पळा की. तिथे भुईकोट किल्ला आहे, त्याच्याभोवती खंदक आहे. तिथे हे टँक वैग्रे नाही येऊ शकणार.

In reply to by ५० फक्त

@ ५० फक्त आणि हो शक्यतो लकडी पुलावरुन येउ नका . आणि प्रवासात खिडकीतुन (असेल तर) डोकं बाहेर काढु नका, हायवेला बाकी गाड्या फार फास्ट असतात. तुम्ही त्याची काळ्जी करु नका, तसही MH-16 पाहीले ना MH-12 वाले " नगरचे सनकी लोक्स" आल्येत म्हणुन आपोआप साइड देत्तातच्च ;) म्हणजे नगर ते पुणे अंतर साधारण ३ तास, टँकला ४ तास लागतील, त्या हिशोबानं आम्हाला इथुन पळुन जाण्याची तयारी करायला बरं.? का ओककाकांना विचारावं बरं या हल्ल्याला कसं तोंड द्यायचं ते का चितळे काकांना विचारावं ? ते तुमच तुम्ही बघुन घ्या काय तयारी करायची ते , पलायन करायचे का सामना करायचा ;) " तह " करणार का? ;)

In reply to by यकु

लेडी औरंग्झेब ?????? " द्येवा हे काय एकतेय मी ;) उचल ,मला नाही ह्या दोघाना ;) य. कु अन पक पक पक रणगाडा तुमच्याच दिशेने वळ्वते आता ;)

In reply to by पियुशा

@लेडी औरंग्झेब ?????? वरती अनेकांनी लेडी औरंगजेब म्हटल्यामुळे आमच्या अंतःचक्षूंपुढे पियुशा बैं चे चित्र, कुठल्याश्या हिंदी शिनुमातल्या... सैनिकी पोशाखातल्या... पाठिला धनुष्यबाण लावलेल्या... घोड्यावर बसलेल्या... नगरहुन पुण्याच्या दिशेने येणार्‍या....(हुश्श...सुटलो एकदाचा वर्णनातून ;-) ) हेमा मालिनी सारखे आले आणी बेजान हसू आलं

In reply to by अत्रुप्त आत्मा

हेमा मालिनी सारखे
अह्हा .. बाकी वप्या नी जीम लावली पाहिजे राव .. धर्मेंद्र च्या तोडीस उतरेल नक्की तो ... आणि हा रणगड्याला वळवण्यासाठी मदतनीस नाय म्हणत मी .. बरका ..

In reply to by गणेशा

मला फुलानदेविच्या वेशात पियू दिसली.ak ४७ घेऊन ;) .( पिवशीच्या मनामध्ये ..बघतेच आता ह्या सगळ्यांना सारखे सारखे माझ्यावा शुद्धलेखनाची खिल्ली उडवतायत काय....एकेकाची अशी अवस्था करीन कि शुद्धलेखन काय लेखन करायच्या लायकीचा राहणार नाही.हि हि हा हा हा...मला डोक नाही काय...हसायला येतंय न..आता असे एक एक विनोद सांगेल न हसन विसराल रडायला लागाल.भिग मागाल माझ्याकडे , पियुताई तू लिहितेस तेच शुध्द ,पण आम्हाला विनोद सांगू नकोस.हि हि हा हा हा .)

In reply to by किचेन

ज्या ज्या लोकांना पियु दिसत्ये त्यांनी ती कशी दिसते हे सांगावे अशी नम्र विनंती आहे. @वप्या: तू उगाच डू. आयडी डू. आयडी असं म्हंतोस लेका; लोकांना दिसत्ये ती ;)

In reply to by किचेन

@माझ्यावा शुद्धलेखनाची @आता असे एक एक विनोद सांगेल न हसन विसराल रडायला लागाल. @भिग मागाल माझ्याकडे , @पियुताई तू लिहितेस तेच शुध्द ,पण आम्हाला विनोद सांगू नकोस. (?)

In reply to by वपाडाव

@ किचेन तु माझीच्च शिष्या आहेस हे पुन्हा एकदा तुझ्या लेखनाने सिद्ध केले ग बै ;) कित्ती ह्सवशील ? ;)

In reply to by पक पक पक

@निजामशाही अन अदिल्शाही एकत्र झाल्या सारख वाटु लागलय >>> चुकून ऐति-हासिक सत्य बाहेर पडलय...हे देवा...!याचा वर्तमानाशी तर संमंध नाही ना..? ;-) अवांतर-कॉलिंग वल्ली... निजामशाही व अदिलशाहीचा अंमल असलेली महाराष्ट्रातली गावे कोणती हो...? ;-)

In reply to by पियुशा

@ ५० फक्त आणि हो शक्यतो लकडी पुलावरुन येउ नका . आणि प्रवासात खिडकीतुन (असेल तर) डोकं बाहेर काढु नका, हायवेला बाकी गाड्या फार फास्ट असतात. तुम्ही त्याची काळ्जी करु नका, तसही MH-16 पाहीले ना MH-12 वाले " नगरचे सनकी लोक्स" आल्येत म्हणुन आपोआप साइड देत्तातच्च - माहिती साठी धन्यवाद, मुळ लेखाला अनुसरुन तुम्ही जर आमच्या कर्जाचे हफ्ते भरणार असाल तर आम्ही सुद्धा एक एमएच १६ चा एक टँक विकत घेउ असा विचार आहे . पण टँक शक्यतो सिएनजीवर चालणारा बघा , तुम्ही काय पेट्रोलचे पैसे नाय देणार ना. म्हणजे नगर ते पुणे अंतर साधारण ३ तास, टँकला ४ तास लागतील, त्या हिशोबानं आम्हाला इथुन पळुन जाण्याची तयारी करायला बरं.? का ओककाकांना विचारावं बरं या हल्ल्याला कसं तोंड द्यायचं ते का चितळे काकांना विचारावं ? ते तुमच तुम्ही बघुन घ्या काय तयारी करायची ते , पलायन करायचे का सामना करायचा " तह " करणार का? - अरे कधी पण, कारण काय सामना म्हणलं की पुर्वी पराशेट मदत करायचे पण हल्ली काय माहित नाही ? , बरं कधी येताय तह करायला, करार छापुन वगैरे घ्यायचा का कसे, नाही आधीच टायपिंग करुन लेखनाची ही अवस्था आहे हाताने लिहुन, काय होईल कोण जाणे. शक्यतो स्वाक्षरीचा सुद्धा शिक्का किंवा स्टिकर घेउन यावे ही विनंती. बाकी तहाची भेट म्हणुन हुरडा घेउन आलात तर आनंदच होईल, इकडे माओ कोळ्से पेटवुन त्यावर गरम करुन खाउ, हाकानाका. पियुशा......

In reply to by पियुशा

@M3 - A light tank , jermen made flank gun, अन shrman cab tank आहे म्हणल >>>ही घ्या आणखिन तयारी....भुई-कोट किल्ल्यातुन ;-) (हम्कू नगर का चप्पा,चप्पा मालुम है..;-) ) आर्म्ड फोर्स :-

In reply to by पियुशा

हम्म .......प्रश्न फार गहन आणी" डोक्याला शॉट्ट देणारा आहे " (ह्.घ्या.) लग्न झाल्यावर विचार करा की , काय घाई आहे.पुर्ण क्षमतेने डोक्याचा वापर साधारण्तः त्यानंतरच सुरु होतो. जाणकार पक पक

१. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण होई पर्यंत मूली १-२ वर्षे का थांबू शकत नाहीत? २. नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत? लग्न हा पैसा मिळ्वण्याचे एक साधन आहे असे समजुन ज्यांना 'कर्तव्य' असते असे लोकं या तड्जोडी का करतील...?मुळात लग्न कोणाशी त्या व्यक्ती बरोबर कि तिच्या मिळ्णार्‍या उत्पन्नाबरोबर हे ठरवावे ,आणी मग असले प्रश्न उपस्थित व्हावेत..

जर माहेरी गरज असेल तर पैसे जरुर द्यावेत... पण कधी कधी असेही होते की माहेरची परिस्थिती सुखवस्तु असते आणि तुलनेत सासरी भक्कम नसते... जर मुला-मुलीला मुळ गावापेक्षा वेगळ्याच जागी रहायचे असेल आणि घर, मुल आणि इतर खर्च स्वतः करावा लागणार असेल तर त्यांचा पगार हा सासर्-माहेर ह्या पेक्षा त्यांना स्वतःलाच जास्त आवश्यक असतो... अशा वेळी मुली पगार माहेरी न देता स्वतःच्या संसारात देउ शकतात... माझ्या मते सासर्-माहेर ह्या पेक्षा गरज जिथे आहे तिथे व गरज जेवढी आहे तेवढा पैसा द्यावा...

In reply to by पिलीयन रायडर

पण कधी कधी असेही होते की माहेरची परिस्थिती सुखवस्तु असते आणि तुलनेत सासरी भक्कम नसते... >> आणि जर असे असेल की 'सासरची परिस्थिती सुखवस्तु असते आणि तुलनेत माहेर भक्कम नसते' तेव्हा १)अशा वेळी ती आपला पगार (पूर्ण सोडाच पण काही रक्कम) तिच्या माहेरच्या घरासाठी खर्च करू एच्छित असेल तर तिला तो करता येइल आणि तिच्या आई-वडिलांनाही तो ताठ मानेने स्वीकारता येइल अशी परिस्थिती आज समाजात आहे का. २)आणि समजा अशा वेळी ती जर नोकरी करत नसेल आणि तिला तिच्या माहेरच्याना मदत करायची असेल तर तिने काय करावे.

In reply to by Pearl

१)अशा वेळी ती आपला पगार (पूर्ण सोडाच पण काही रक्कम) तिच्या माहेरच्या घरासाठी खर्च करू एच्छित असेल तर तिला तो करता येइल आणि तिच्या आई-वडिलांनाही तो ताठ मानेने स्वीकारता येइल अशी परिस्थिती आज समाजात आहे का.
समाजात अशी परिस्थिती इन जनरल नाही पण प्रत्येकाने आपापली लाजलज्जेची कल्पना ठरवून घेतली तर बरं. आणि ज्याचा पगार आहे त्याला त्याच्या विनिमयाचा पूर्ण हक्क असावा. पूर्ण की काही भाग द्यायचा हे सर्व कमावणार्‍याने ठरवायला हवं.
२)आणि समजा अशा वेळी ती जर नोकरी करत नसेल आणि तिला तिच्या माहेरच्याना मदत करायची असेल तर तिने काय करावे.
ती नोकरी करत नसेल... पुन्हा एकदा.. इथे कमावणारा "तो" असेल आणि ती कमावत नसेल तर ती काही "करण्याच्या" स्थितीत नाहीच आहे. तेव्हा मदत करायची असेल तर "तिने" काय करावे हा प्रश्न उद्भवतच नाही. फार तर कमावणार्‍या नवर्‍याला विनंती करु शकते.

In reply to by गवि

फार तर कमावणार्‍या नवर्‍याला विनंती करु शकते.
गवि... केलतं ना युद्ध सुरु...!!! जर ती मुलगी घर , मुल सांभाळ्ण्यासाठी नोकरी करत नसेल तर तिच्या नवर्याच्या पगारावर तिचा हक्क नाही का...??

In reply to by पिलीयन रायडर

आपण मॉडेल आन्सर शोधतोय की प्रत्यक्षातलं? कितीही घरकाम केलं तरी (तीनचार लाख पर अ‍ॅनमच्या योग्यतेचं काम घरी केलं तरी) नोकरी करुन टँजिबल कॅश आणणारी व्यक्ती ती कमावती आणि बाकी सगळे "डिपेंडंट्स" ही क्रूड फॅक्ट आहे. त्यामुळे बायकांनी घरी बसून घरकामाची किंमत होत नाही म्हणत राहण्यापेक्षा नोकरी करावी हे जास्त बरं. आता नोकरी करुनही घरकाम करावंच लागेल असं म्हटलं जाईल आणि ते खरंही आहे. पुरुषांची मानसिकता बदलायला वेळ लागेल. पण निदान सुरु तरी करा प्रयत्न..

In reply to by गवि

अहो माझंही अगदी डीट्टो हेच मत आहे... पण पुर्वी इथे मी "एका बाईने नोकरी केल्यास एक घर उद्ध्वस्त होते..कारण बायका टाईम्पास साठी नोकरी करतात आणि त्यामुळे एका गरजु पुरुषाची नोकरी जाते" इथ पर्यंत मते वाचली आहेत.. हे सगळं बदलायला वेळ लागणारे.. खुप खुप वेळ... पण कधी तरी आपल्याला उत्तर मिळेल...!!

In reply to by गवि

माझे लग्न ठरले तेव्हा मी आणि माझा नवरा दोघेही नोकरी करत होतो. त्याच्या आईवडिलांची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. माझ्यावर तेव्हा जबाबदारी नव्हती पण मला भाऊ नाही तेव्हा आई-वडिलांची जबाबदारी भविष्यात माझ्यावर असेल याची आधीच कल्पना दिली होती. लग्नानंतर काही कारणांमूळे मी पूर्णवेळ गृहिणी झाले. आमच्या कुटुंबाच्या गरजा भागवून उरलेल्या पैशात सासरी तसेच माहेरी आम्ही गरजेप्रमाणे आर्थिक मदत केली/करतो . माझ्या आई-वडीलांनी मला वाढवताना मुलगा-मुलगी भेद केला नाही. माझा जोडीदारही समंजस आणि पुरोगामी विचारांचा आहे. त्यामुळे मी नोकरी करत नाही तेव्हा माहेरी मदत कशी करू असा प्रश्न मला कधीच पडला नाही.

In reply to by स्वाती२

माझा जोडीदारही समंजस आणि पुरोगामी विचारांचा आहे.
म्हणुनच आपण मिपावर इतक्या शांत व व्यवस्थितपणे, नेटक्या शब्दांत आपले विचार मांडु शकताय...

In reply to by गवि

@ गवि, प्रतिसाद पूर्णपणे पटला नाही. घरकामाची किंमत घरच्यांनी केली तर होते. आम्ही निदान या पिढीत तरी बदलणार नाही (किंवा किंचित बदलू) हे एकदा ठरवून घेतले की मग पुढे बोलायलाच नको. तुम्ही असे वागताय असं माझं म्हणणं नाही, हेतूही सर्वसामान्यपणे काय होते ते सांगण्याचा असेल पण जग वेगात बदलत असताना त्याचे फायदे घेत रहायचं आणि मानसिकता मात्र बदलायला जरा वेळ हवा हे म्हणताना दुटप्पीपणा (अश्या नवर्‍यांचा, तुम्हाला काही म्हणत नाहिये) जाणवतो.

In reply to by गवि

इथे कमावणारा "तो" असेल आणि ती कमावत नसेल तर ती काही "करण्याच्या" स्थितीत नाहीच आहे. तेव्हा मदत करायची असेल तर "तिने" काय करावे हा प्रश्न उद्भवतच नाही. फार तर कमावणार्‍या नवर्‍याला विनंती करु शकते. अगदी अगदी. शिवाय 'तो' नेहमी कमावणारा असलाच पाहिजे असे गॄहीतक समाजात आहेच. या संदर्भात 'ऐसी अक्षरे' या संस्थळावर तुम्ही उदाहरण दिले होते त्याची आठवण झाली. शिक्षण झाल्यावर काहीच न करता उनाडक्या करणार्‍या मुलाला उडाणटप्पू म्हणतात. काहीच न करणार्‍या मुलीला 'लग्नाची' आहे असे म्हटले जाते. शिवाय अलीकडच्या काळात मुलाचे स्वतःचे मालकीचे घर असावे अशी मागणी करुन निराळ्याच पद्धतीने वधूपक्षाकडून हुंडा मागण्याची प्रथा चालू झाली आहे ती वेगळीच.

In reply to by Pearl

'सासरची परिस्थिती सुखवस्तु असते आणि तुलनेत माहेर भक्कम नसते'
जिथे गरज आहे तिथे पैसा जावा...
आणि समजा अशा वेळी ती जर नोकरी करत नसेल आणि तिला तिच्या माहेरच्याना मदत करायची असेल तर तिने काय करावे.
खरं तर जर तिला शक्य असेल (स्वतःचा संसार सांभाळुन...(कदाचित तिच्या नवर्याचा तेवढा पगार नसेल तर...)) तर तिने माहेरी मदत करायला हवी... पण असं होण्याची शक्यता आपल्या समाजात फार फार कमी आहे... पण नाहीच आहे असही नाही.. माझ्या माहितीतील एका आजीना त्यांच्या एकुलत्या एक मुलीने त्यांच्या इच्छेखातर भावा-बहीणी जवळ घर घेउन दिले आहे.. ती त्यांना घर खर्च पण देते..आणि आजीनी पण एक मुलगी सोबत रहायला ठेवुन (पेईंग गेस्ट) थोडासा खर्च उचलला आहे... आणि मी एक असाही मुलगा पाहीला आहे ज्याला स्वतःला आई-वडील्-बहीण्-भाऊ कोणीही नसताना एका चांगल्या मुलीचे स्थळ "तिला वडिल नाहीत फक्त आई आहे..म्हण्जे आइचा खर्च मलाच करावा लागेल" ह्या कारणा साठी नाकारले... शेवटी हे सगळं ज्याची त्याची मतं, संस्कार आणि परिस्थिती ह्यावर अवलंबुन आहे..

या प्रश्नांवरचे माझे विचार टंकेनच. पण तूर्तास अजून माझ्याही २ प्रश्नाबद्दल पण मत जाणून घ्यायला आवडेल की, १)लग्नानंतर मित्र(नवरा मुलगा) त्याचे आई-वडिल (आय मीन त्यांची कार, इतर सुखसोयी वगैरे) किंवा आई-वडिलांच्या घरावर जो खर्च करेल त्याआधी प्रत्येक वेळी बायकोला विचारेल आणि तिला योग्य जस्टीफिकेशन वाटले तरच तो खर्च करेल का? २) वरील प्रश्नाचे उत्तर जर 'नाही. तो न विचारता खर्च करेल असे असेल तर' तसेच त्याच्या बायकोने केले तर चालेल का?

In reply to by Pearl

लग्नानंतर कुठलीही गोष्ट एकमेकांना विचारूनच किंवा सांगुनच केली पाहिजे असा लिखित कायदा अथवा नियम नसला तरी तसेच वागणे अपेक्षित आहे... दोघांकडून. नाहीतर लग्न, संसार, घर या स्गळ्यांना काहीच अर्थ रहात नाही. आणि प्रत्येकवेळी तुझं - माझं करणं अजिबात योग्य नाही, त्यामुळे सुसंवाद रहात नाही. वर एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे जिथे जशी गरज असेल त्या प्रमाणे वागावे.

In reply to by Pearl

लग्नानंतर परिस्थिती वेगळी असेल. पण अगदी कशातच काही नसताना असल्या रि़जीड अटी घातल्यावर नाती कशी जुळतील? वरती मनीषाने म्हणल्या सारखं लग्नानंतर लिखीत कायदे वगैरे करता येतच नाहीत. काही प्रश्न विचार विनिमय, चर्चा, सामजस्य वगैरेंनीच सोडवायला हवेत. पण त्यासाठी आधी नाती जुळायला हवीत!

आपल्या गरजा व इतरांकडून काही मिळण्याच्या अपेक्षा कमी ठेवल्यास असे अनेक प्रश्न सुट्तील असे वाटते.....

मुलीने तिच्या पगाराचे काय करावे हे सर्वस्वी ठरवण्याचा हक्क तिचाच आहे. तिने वडिलांची जबाबदारी घेतली यात चूक काहीच नाही. तिने तिचा सर्वच्या सर्व पगार वडिलांना दिलातरी ते योग्यच आहे. सासर कडच्यानी सून म्हणजे हक्काची पगार कमवून आणणारी स्वैपाकीण असे समजणे हा अप्पलपोटेप्णा आहे

In reply to by विजुभाऊ

सासर कडच्यानी सून म्हणजे हक्काची पगार कमवून आणणारी स्वैपाकीण असे समजणे हा अप्पलपोटेप्णा आहे..
पाशवी शक्त्तंची त्रिवार माफी मागुन.... विजुभौ... ह्या वाक्यावर लैच घाण हसलो मी...काफीचा कप चक्क फुटता फुटता वाचला... अन काफीचे डाग माझ्या पांढर्‍या शर्टावर पडलेत... एवढं होउनही मला ही प्रतिक्रिया टंकावी वाटली यातच सर्व आले... पुन्हा एकदा माफी मागतो... अन चर्चेचा आणंड लुटतो...

प्रत्येकाचे विचार.. वागणे... कर्तव्य विभागणी, वेगवेगळी असतात .. म्हणुन लग्न करताना आपल्या विचारांसारखेच मिळालेल्या व्यक्तीशी शक्यतो लग्न करावे ... मग ते पैसे देण्याबद्दल असुद्या.. सामाजिकतेच्या भावनेने असु द्या नाहि तर आणखिन काही.. बाकी अजुन तरी आमच्या येथे, मुलीकडुन पैसे घेत नाहीत.. आणि घेतले तरी ते तसेच किंवा त्या पेक्षा जास्त परत दिले जातात .. आता ही परंपरा चुकीची आहे की बरोबर ह्यात वाद घालण्याचे कारण नाहीच.. सुनेकडुन ही गरज नसताना पैसे घेतले जात नाहित जर मुलगा गरज भागवण्यास समर्थ असेन तर.. पण त्यांच्या संसारास गरज असेन तर त्यासाठी ते दोघे भागिदारी करतात. वयक्तीक विचारायचे झाले तर, दोघांचे पैसे दोघांनी योग्य पद्धतीने वापरावे.. मुलीला घरी द्यावे लागत असतील पैसे तर देवु द्यावे .. त्यात विशेष काही नाही. पण गरज नसताना उगाच कर्तव्याच्या नावाखाली जर कोणी देत असेल तर ते योग्य नाही.. जेथे गरज तेथे कर्तव्य

+१ - माझ्या मते सासर्-माहेर ह्या पेक्षा गरज जिथे आहे तिथे व गरज जेवढी आहे तेवढा पैसा द्यावा...

मूळ लेखातल्या एक दोन मुद्द्यांकडे माझं जरा जास्त लक्ष गेलं, एक तर घराचं कर्ज कमीत कमी १५ वर्षं तर वाहनाचं ७ वर्षं असतं. त्यामुळे १/२ वर्षं थांबावं की कर्ज फिटेपर्यंत थांबावं हे क्लिअर असलं पाहिजे. नंतर कुरबुरी होता नये. दुसरं म्हणजे लेखातल्या उदाहरणात लग्न ठरण्यापूर्वी मोडलं हे चांगलं झालं कारण दोघांच्या विचारात खूप तफावत दिसते आहे. अशा परिस्थितीत हे लग्न यशस्वी झालं नसतं. जेव्हा ज्याना गरज असेल, तेव्हा आपल्या माणसानी उपयोगी पडावं नाहीतर त्या नात्याला काय अर्थ आहे? मग ते नातेवाईक नवर्‍याचे असोत, किंवा बायकोचे. अनेकदा आईवडील मुलाला किंवा मुलीला घर विकत घेण्यासाठी आर्थिक मदत करतातच. ते जर आपल्याला चूक वाटत नसेल तर मुलीने आईवडिलांना मदत करण्यातही चूक वाटू नये. शेवटी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि सामंजस्याने निर्णय व्हायला हवा. कोणीच कोणाला गृहीत धरू नये. मानवी नात्यांमधे अनेकदा पैसे हे फक्त निमित्त असतं आणि दुसरे परक्या माणसाला लक्षात न येण्यासारखे बारीक कंगोरे असतात. वर्चस्व कोणाचं याच्याशी गाडी येऊन थांबते. प्रत्येकाने त्या परिस्थितीत आपण किंवा आपले आईवडील असतील तर आपल्याला कसं वाटेल याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा.

दादा कोंडकेजी तुमचा मित्र म्हणजे पुरुषी मनोवृत्तीचा उत्तम उदाहरण आहे...त्याच्या भावी पत्नीने २ वर्षासाठी माहेरी पैसे देण्यामध्ये त्याला काही आक्षेप घेण्याचे कारण नव्हते...मुलगी लग्न करून घर सोडून आली म्हणजे तिला आई-वडील नाहीत असे नाही...तिने जर २ वर्षे सोडा पण आयुष्यभर जरी स्वत:च्या पैश्याने पालकांना पोसण्याचे ठरवले तरी कुणाला काय प्रॉब्लेम असावा? तेवढ्यावरून लग्न मोडणे म्हणजे कहर आहे...पत्निने कमावलेल्या पैशांचा विनियोग कसा करावा हे तिलाच ठरवू द्यावे...

खरंतर हा खर्च घरासाठी कमी अन त्यातल्या माणसांसाठी जास्त असतो, अपवाद, माहेरच्या घराच्या कर्जाचे हफ्ते भरत असाल तर, पण मग त्या घरात राहतं कोण हा प्रश्न येतोच ? प्रत्येकानं ' आपलं' घर कुठलं ते ठरवावं अन त्या घरासाठी खर्च करावा आणि मग संकट समयी त्याच घराकडं धावत जावं, किंबहुना जे घर आणि त्यातली माणसं आपल्याला आपल्या चुकांसहित आत घेईल, आपण आपल्या चुकांनी ओढवुन घेतलेल्या संकटात सुद्धा आपल्या मागं ठाम उभी राहतील त्याच घरासाठी अन त्याच माणसांसाठी खर्च करावा. नव-याला त्याचं घर असतंच आणि एकच असतं, त्याला त्याच्यासाठी खर्च करणं भागच आहे किंवा त्याचं ते कर्तव्यच आहे. पण बायकोला मात्र पर्याय आहे, एक माहेरचं घर अन एक सासरचं घर, यातल्या एका घरामधला हक्क /हिस्सा सोडुन ती लग्नानंतर दुस-या घरी येते, जे तिचं असतं किंवा तिचं आहे असं तिला वाटतं, कारण या घरात तिला सत्ता मिळण्याचा चान्स जास्त असतो, माहेरी भाउ असल्यास तिथं सत्ता मिळण्याची शक्यता कमीच. आता या वेळी तिच्या माहेरच्या घरावर तिच्यासाठी खर्च करण्याची / तिला संरक्षण देण्याची किंवा तिची काळजी घेण्याची जी संपुर्ण आर्थिक/ सामाजिक/ वैद्यकीय जबाबदारी लग्नापुर्वी असते ती नसते किंवा कमी झालेली असते. आता ही किती कमी होते , केली जाते किंवा झटकली जाते हे प्रत्येक केसमध्ये वेगळं असतं. म्हणजे या जबाबदारीची किंमत ती मुलगी आपल्या पगारातुन / किंवा घरकाम करुन (नोकरी करत नसेल तर) माहेरच्या घराला देत असते, मग लग्नानंतर ह्या जबाबदा-या जे घर घेतं त्या घरासाठी खर्च केला पाहिजे किंवा त्या घरासाठी घरकाम केलं पाहिजे, मग ते माहेरचं असो वा सासरचं. हा शुद्ध व्यवहाराचा ' एक हात दो एक हात लो ' असा भाग आहे. एकुणच लग्न हा दोघांनाही एकत्र जगण्यासाठी किंवा राहण्यासाठी कराव्या लागणा-या रुक्ष व्यवहाराचा भाग आधी आणि कोमल भावनांचा खेळ नंतर आहे हे क्रुर वास्तव समजुन घेतलं तर हे असे भावनांमधुन निर्माण होउन सरळ सोप्या व्यवहाराला गुंतागुंतीचे बनवणारे प्रश्न उभेच राहात नाहीत.

In reply to by ५० फक्त

>> प्रत्येकानं ' आपलं' घर कुठलं ते ठरवावं अन त्या घरासाठी खर्च करावा आणि मग संकट समयी त्याच घराकडं धावत जावं, >> बरर... हा नवीन फंडा आहे माझ्यासाठी.. म्हणजे लग्न झाल्यावर ज्या आई-वडिलांनी लहानपणापासून सांभाळल, वाढवलं, शिकवलं, जपलं त्यांना, ज्या घरात आपण वाढलो ते फक्त लग्न झालं म्हणून परकं मानायचं. केवळ आपल्याला त्यांची (आर्थिक/वैद्यकीय) गरज/उपयोग नाही म्हणून. आणि त्यांना आपली गरज वाटतं असेल त्याचं काय. आणि हो आणि आपल्याला त्यांची (आणि आपली त्यांना) इमोशनल गरज नेहमीच जाणवणार त्याचं काय भाउ. आणि जगात सर्व दाम्पत्यांना १ तरी मुलगा असतोच, हा थंब रूल मानून चालला आहात भाउ आपण. जगात अशीही कुटूंब असंख्य आहेत ज्यांना फक्त १ मुलगी किंवा फक्त मुलीच आहेत. १) मूलीला भाउ नसेल आणि ती एकूलती एक असेल तर, तिचे घर कोणते. तिने आईवडिलांना भावनिक आधार द्यावा की नाही. त्यांना गरज पडेल तेव्हा धावून जावे की नाही. त्यांच्या घराला आपले घर मानून (?) त्यांचे वय जास्त असल्याने घराच्या कामांना (काही मेंटेनन्स असेल किंवा अन्य काही [धावपळीची] कामे ज्यामध्ये त्यांना मदत लागेल) मदतीला जावे की नाही. नोटः तुर्तास या उदाहरणात असे समजू की money-power आईवडिल पूरवतील. पण man-power तर लागतेच ना. २) मूलीला भाउ नसेल आणि बहीणीच असतील ज्या अजून शिकताहेत आणि समजा मुलगी नोकरी करत आहे तर तिने माहेरच्याना आर्थिक मदत करावी की नाही. ३) आणि समजा एखाद्या मुलीने सासरचेच घर आपले मानून तिथे आपल्या नोकरीतले पैसे खर्च केले (वस्तू, फर्निचर, टीवी, फ्रीज, बाजारहाट ... etc etc) ... आणि हे घर सासर्‍यांच्या नावावर आहे. तर असा कायदा का आहे की सासर्‍यांच्या घरावर सुनेचा काही अधिकार नाही. म्हणजे जे घर आपले मानून त्याला तन मन धन दिले त्यावर शेवटी सूनेचा काहीच हक्क नाही, असे कसे बुवा.

In reply to by Pearl

तर असा कायदा का आहे की सासर्‍यांच्या घरावर सुनेचा काही अधिकार नाही.
नवर्‍याचा हक्क असेल तर तिचाही चान्स आहे... कमीत कमी सासरी ही आशा तरी आहे की काहीतरी पतिच्या नावावर होइल, त्याअर्थी पत्निच्या (सुनेच्या)... पण लग्न झाल्या झाल्याच माहेरच्या सर्व बंधनातुन मुक्त झाल्या कारणाने तिकडच्या प्रॉपर्टीवर (सेवा करा न करा) हक्कदेखील दाखवता येत नाही... अनलेस ती प्रॉपर्टी तिच्या स्वत:च्या मालकीची आहे... (लग्नाआधी जर तिने घेतली असेल तर, कारण सहसा बाप आपली प्रॉपर्टी पोरीच्या नव्हे तर बायकोच्या नावे करतो.) फारच गंभीर विषय आहे... कॉलिंग युयुत्सु... -वपुत्सु