लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
दुसरी नि तिसरीची परीक्षा देऊन मी एकदम चौथीत गेलो . जामखेड सारख्या छोट्या गावातून हे सहज जमून गेले . बाबांची बदली झाली... .थेट पुण्याला..!!
काय करावे समजत नव्हते.पुणे तसे मोठे शहर होते.जागा मिळेल की नाही हे देखील माहित नव्हते.
शेवटी निर्णय झाला : नाशिकला जाऊन राहण्याचा.
नाशिक म्हणजे आईचे माहेर
मामा तेथेच रहात. होते
दहीपूल . !!
आम्ही नासिकला आलो. सहा मामा आजी आजोबा नि त्यात दोघा मामांचे लग्न झालेले .
आणि रहायला फक्त दोन खोल्या
एकत्र राहणे शक्य नव्हते.
आई म्हणाली मी माहेरी राहणार नाही.आपण भाड्याचे घर घेऊ.
भाड्याचे घर घेतले. मामा आधाराला होतेच.
बाबांनी शुक्ल वाड्यात भाड्याने घर घेतले . जागा माडीवर होती.दोन खोल्या होत्या .पण बर्यापैकी मोठ्या होत्या.
नगरपालिकेचा भोंगा ,घड्याळ गल्लीच्या टोकावर होते.नगरपालिकेच्या जागेत मस्त उंच असे टॉवर होते .त्यात मोठ्च्या मोठे घड्याळ रात्री साडेआठला भोंगा होई.
मला तर त्या भोंग्याची भीतीच वाटत असे. नि खूप उदास वाटत असे.
दिवस उन्हाळ्याचे तरी हवा थंड होती नाशिकची
भद्र्कालीवर आंब्याची रासची रास असायची.त्या गावठी आंब्याचा सुगंध मस्त झिरपत असायचा.
भद्रकालीची कधीतरी आठवण आली की मला आंब्याचा सुगंधच येत असतो .
दादाची तब्येत जरा अशक्त होती .वैद्यांनी त्याला रोज आंबा द्या असे सुचवले होते.
आई रोज त्याला आंबा खावयास द्यायची.हे छान स्मरतेय.
आम्हाला घराजवळ नगरपालिकेची शाळा होती.शाळा नंबर अकरा.
त्याला जळका वाडा देखील म्हणत. .मोठीच्या मोठी शाळा. खरे म्हणजे प्रचंड वाडाच .
त्यावेळी चौथी म्हणजे बोर्डाची परीक्षा. एकदम अवघड. तेथे बोरूने लिहिणे पण होते.खर्डा वही होती.
धोतर घातलेले गुरुजी होते. अगदी धड्यातले पंतोजी वाटत .
धोतर
शर्ट
त्यावर काळा कोट
डोक्यावर काळी पुठ्याची टोपी.
भरघोस मिशा. बोडी-लाईन बॉलींग तशी नजर.
एकदम मारकुटे.
खेड्यातले शाळेचे दिवस मोठे मजेत गेले होते. मास्तर मोठे मायाळू नि माझ्यावर प्रेम करणारे होते .
माझा एक मामा त्याच शाळेत सातवीला होता.
शप्पत त्याचा आधार वाटत होता.
एकदा सहज त्याच्याशी बोलत होतो.
मास्तरने बघितले नि मला दबदबा पाठीत धपाटे मारले.
का मारले हे अजूनही मला समजले नाही.
शुक्ल वाडा छान होता.त्यांच्याही घरात सात -आठ मुले असावीत.त्या वाड्याला छान पडवी होती.नि त्या पडवीत झोपाळा होता.
त्या झोपाळ्यावर बसून संध्याकाळी मुले परवचा म्हणत असत.
पावकी
निमकी
पाऊनकी
मी कधी जिना चढता चढता हे सर्व कानी पडायचे नि माझ्या पोटात गोळाच उठायचा. ..!
वाटायचे किती ही पोरे हुशार...!!
कसे सगळे पाढे छान लयीत म्हणतात ही ..?
कसे होणार आपले. ..??
नि चौथी म्हणजे बोर्डाची परीक्षा ..
मला चांगले आठवतेय .आईने तेथे कोकिळा व्रत केले होते. गावाच्या बाहेर जाऊन कोकिळेचे दर्शन घ्यायचे .मगच जेवावयाचे.
त्यावेळी नाशिकचे सी.बी.एस. किंवा कोर्टाजवळ गच्च झाडी नि जंगलच होते. कोर्टाजवळ कोठेतरी आईची एक मैत्रीण राहत होती.
आई त्यानिमित्ताने तिच्याघरी जाई.
नासिक म्हटले की मला आईचे कोकिळा व्रत आठवते.
नि मला खूप सुख देऊन जाते.
एकदा मी नि मामा कोठून तरी येत होतो. रस्त्याने म्हणजे आड्ग्ल्लीने आम्ही येत होतो.
एक मुलगा म्हणजे मला वाटतेय १०.१२ वर्षाचा असावा.हातात दोन टिनचे टिफिन नि तोंडात बिडी .बिडीचे झुरके घेत मस्त चालला होता.
मी मामाला म्हणालो -कारे ,बिडी ओढणारे पोरे मवाली असतात ना ..?
मामाने माझ्याकडे डोळे वटारून बघितले.
पण माझे बोलणे त्याला ऐकू गेले असावे.
त्याने ते डबे खाली ठेवले.
अगदी अभिताभ बच्चन स्टाईलने .तोंडातली बिडी फेकली.
हलकेच जवळ आला.
त्याने मामाच्या कमरेला मिठी मारली.नि डोके नको तेथे लावून पाय ओढले. मामा खाली पडला .
नासिक म्हंजे मवाल्यांचे गाव .असेच माझ्या डोक्यात घट्ट बसले.
शुक्ल वाडा सुटला.कसा सुटला.? का सुटला ..?काहीच आठवत नाही.
मग कोठावर घर मिळाले. गायधन्यांचा वाडा. वाड्याच्या बाजूलाच सरदारजींची धर्मशाळा.
कोठ छान दोन मजली उंच होता.जवळूनच गोदावरी नदी वाहत होती.अतिशय सुंदर बांधलेली नदी म्हणजे नाशिकची चौपाटी होती.
दुपारी दुपारी बायका धुणे धुण्यास नदीवर येत. धुणे धूत असताना ते बघणे म्हणजे मोठी मौज वाटे. साबणाचा फेस सापासारखा पाण्यावर तरंगत असे .
नदी म्हणजे चौपाटीच होती.मे मध्ये पाणीपुरीचे स्टोल मकाजी कोंडाजिचा चिवडा भेळ असे छान मिळत असे.
एक शेर चिवड्यावर एक शेर चिवडा फुकट अश्या कुणा चिवडेवाल्याच्या पाट्या लागलेल्या आठवणीत आहेत .
नदीकिनारीच मोठमोठ्या पत्र्यांचे दुकाने लागत. तेथे आईस्क्रिम मिळत असे. पॉटमधले आईस्क्रिम बनविताना बघण्याची मौज काही निराळीच वाटे.
जवळच काळाराम मंदिर तसे नारो शकराचे देऊळ होते.सीता गुंफा होती.
पंचवटी होती. सगळेच वातावरण कुंभमेळ्यांसारखे भरलेले नि भारलेले होते.
सितागुम्फेत शिरायचे म्हणजे मलातर मोठीच भीती वाटे. कोणी पाप केलेतर तो गुंफेत अडकून जातो असे म्हणत.
हट्टीपणा म्हणजे पाप असेल तर आम्ही पक्के हट्टी होतो. आणि अडकून पडू असे खूप वाटत होते.
नाशिकला पाऊस तर कहर पडायचा. मोठा पूर नदीला यायचा.एकदा तर कोठाच्या खाली तीन-चार फुटापर्यंत पाणी चढले होते.नि आता महाप्रलय होतो की काय असे वाटून गेले होते.
नासिकला पूर बघणे हे अतिशय थ्रील होते.माणसे खास पूर बघण्यास येत सरकारवाड्याच्या सात पायर्याला पाणी लागले की आख्खे नासिक बुडणार असे सगळे म्हणत .
मामा बरोबर आम्ही नदीवर जात असू. ते व्हिक्टोरिया ब्रिजखाली पोहत नि आम्ही त्यांचे कपडे सांभाळीत बसत असू.
एके दिवशी आम्ही असेच नदीवर गेलेलो. कोणीतरी पुलावरून उडी मारीत होते.एका बाजूला खूप खोल पाणी आहे.पट्टीचे पोहणारे बरोबर तेथे उडी मारीत .एकाने अशीच उडी मारली.
नि बराच वेळ झाला तरी तो वर येत नाही म्हणून खूप गर्दी झाली. ज्याने उडी मारली तो पाण्यात हरवून गेला होता. अशाही घटना घडत.
नाशिकचे दिवस म्हणजे दररोजची दिवाळीच वाटे.
अभ्यासाची मात्र मला सतत कटकटच वाटत असे.
दररोज कोणी ना कोणी मामा आमच्या घरी झोपायला येत असत. त्यामुळे हसणे खिदळणे
नुसती मौज असे.
मग हलकेच नाशिकचे दिवस संपून गेले. चौथीची बोरडाची परीक्षा पास झालो .
नाशिक सुटले . बाबांची बदली मनमाडला झाली होती.
एक दिवशी आम्ही मिरजेला निघून गेलो.
आजीतर खूप रडली .आजोबांचे डोळेपण भरून आले.
.आमचे सुखाचे दिवस संपून गेलेत असेच वाटू लागले
माहेर सुटल्याचे दुख मी आईच्या डोळ्यात बघत होतो . ..!
प्रतिक्रिया
छान स्मरणरंजन. हा साधारण
मस्त आठवणी
भव्य दिव्य व्यक्तीमत्त्वाचे रहस्य कळाले
:)
अगदी समोरच आहे
आठवणी चांगल्या असतात,पण हा
नाशिक (नासिक नव्हे) योग्य
प्रतिक्रिया वाचली. ह्या आठवणी
नासिकपण माझे आजोळ.नेहमीच
छान आठवणी, एवढ्या जवळच्या
मस्त आठवणी ,लिहीत रहा वाचत
भावपूर्ण लेख
नाशिक म्हणजे दिवाळी.... अगदी
तिवंध्या पर्यंत जाउन तोंड गोड
कसं विसरेन, अत्ता परवाच -
ओ ते मकाजी, माधवजी, कोंडाजीचा
सेक्सी ड्राइव्ह..
एका महत्वाच्या जागेचा उल्लेख
शंका
सर्वांचे अगदी अगदी मनापासून
काका .. तुमची ही स्मरण