दिलीपराव पावसाची मनधरणी आवडली. पावसाच्या कविताही आवडल्या. हा सर्व गोफ तुम्ही अतिशय प्रभावीपणाने गुंफलाय. आता इतके होऊनही पाऊस नाहीच आला तर त्याच्यासारखा करंटा तोच ...अजून दुसरे काय म्हणू!
ह्याच पावसाचा पत्ता शोधताहेत आमचे एक मित्र जयंतराव कुलकर्णी!
मीही त्या पावसाला आवाहन करतो
येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठ्ठा!!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
बिरूटेशेठ, सुरेख!!
देवा, पाऊस पाऊस
तुझ्या डोयातले आंस
दैवा, तुझा रे हारास
जीवा, तुझी रे मिरास.
बहिणाबाईंचा तर जबाबच नाही.....
ढगांचा पांगण्यामुळे धरित्रीचे दु:ख पेटले आहे, आणि ते दुखः केवळ पावसानेच विझणार आहे. पावासाच्या शोधात असलेला शेतक-याला वेड लागण्याची वेळ आली आहे. बेभानपणे पडणारा पाऊस दूर कुठेतरी गेलेला आहे. आणि त्याची परिणीती दु;खात होते. दिवसभर लागणारी झड, दिवस-दिवस चालत असायची, 'आता थांब रे बाबा, अशी विनवणी करण्याची वेळ आणणारा पाऊस हरवला आहे. डोहांच्या काठावर नाचणारा मोर, मना-मनातून वाहणारे पावसाचे झरे, झाडांनी अलगद टिपून घेतलेले पावसाचे थेंब, मोहरुन लाजणारे वृक्ष, काळेभोर झालेले आकाश....हे सारं स्वप्नवत वाटत आहे.
आणि तुमचाही जबाब नाही.....
लगे रहो....
-डांबिसकाका
ढग पांगले पांगले, हाक पावसाला द्या रे
दु:ख पेटले भुईचे, कुणी विझवाया या रे
वा! सुरेख...!
आता भरपूर पाऊस होऊ दे !!! अजून दोन महिने शिल्लक आहेत. चांगला गडगडात होऊ दे, जोरदार पावसाच्या वर्षावात भरपूर पावसाची गाणी येऊ दे, पावसाबरोबर रेंगाळणा-या आठवणी येऊ दे. तिच्या आठवणी चिंब होउन लगडत आहेत. काळ्याभोर ढगांच्या प्रवासात माझाही निरोप तिच्यापर्यंत जाऊ दे......मस्त पैकी कांदे भजे, वडे, वाफाळलेला चहा, असा बेत होऊ दे,
नक्की होणार! :)
बिरुटेशेठ, पावसाचे वर्णन, त्याची आळवणी, त्याचा विरह हा निरनिराळ्या काव्यपंक्तिंच्या आधारे आपण अगदी सुरेख टिपला आहे! सुंदर लेख, क्या बात है...!
एरवी, आमच्या मुंबईची त्रेधातिरपीट उडवणारा पाऊस सध्या मुंबईकरांवरही रुसला आहे! :(
आपला,
(पावसाचा विरह सहन न होणारा) तात्या.
डॉ.दिलीपजी,
सुरवाती पासून शेवट पर्यंत वाचत गेलो आपला लेख.
खूप संदर लेख आहे.पाऊस नाही ह्याचं दुःख खरंच डोळ्यात मात्र पाणी आणतं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
वा वा क्या बात है सर !!!
मस्त जमले आहे मनोगत.... आवडले !
आभाळ भरुन येते पुष्कळ
पहिल्यासारखी बरसात नाही.
नक्षत्रामागून नक्षत्र सरतात
तरीही मृदगंध दरवळत नाही.
गावाकडला गलबला पुसट
ऐकायला येतो डोंगराकडून
अंधार्या रात्री प्राण कासावीस होतो.
जुन्या आठवणी स्मरून.
मनातल्या ओळी !
राज जैन
प्रत्येक क्षण शेवटचा !!!....
सगळे पावसात अडकून पडलो तरी चालेल पण पाऊस येऊदेत.....
दुष्काळाच्या भितीने कासावीस झालेली
वरदा
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
खूप छान लिहिले आहे. वेगवेगळ्या कवींच्या ओळी मस्त गुंफल्या आहेत एका धाग्यात.
झाडाच्या हिरव्या गाई तहानलेल्या
पहिल्या पावसात पानांनी शहारत
उचलतात डो़ई वर, झेलतात सरी.
सुंदर कल्पना.
बिपिन.
सुंदर लेख!!!
पावसाशी संबंधित काव्यपंक्ति अगदी चपखल बसवल्या आहेत. हे "३६" चं गणित खरं ठरतं की काय अशी भिती वाटायला लागली आहे.
"दूर दूर नभपार....... डोंगराच्या माथ्यावर......"
"निळे निळे गार गार..... पावसाचे घरदार!!!"
ह्या संदिप खरेच्या कवितेत सांगितलेल्या पावसाच्या पत्त्यावर जाऊन त्याला ओढुन घेऊन यावसं वाटतयं.....
http://sucheltas.blogspot.com
फारच सुंदर लिहिले आहे.
घाईने एकदा वाचून असा नेहमीसारखा साचेबंद प्रतिसाद देतो आहे, याबद्दल मलाच काहीतरी वाटते आहे. पण पुन्हा-पुन्हा वाचल्याशिवाय समाधान होणारच नाही, आणि प्रतिसाद द्यायचे मागेच राहील.
मला तर माझ्या भावना आवरत नाहीत. जर पाउस पडला नाही तर, ह्या कल्पनेच रडायला येते.
दुष्काळात होणारे गुरांचे आणि माणसांचे हाल पाहीलेत मी.
बरस रे वरुणराजा !
पडु दे तुझी क्रुपादुष्टी आम्हा लेकरावर !!
भाकतो करुणा तुझी !
सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
यंदा महाराष्ट्रात पावसाने तोंडाला फेस आणला आहे असं कळतं. पावसामुळे आठवणींचे अनेक ढग दाटून आले ते या स्फुटाच्या रूपाने बरसले आहेत. स्फुट आवडले.
पावसाच्या एखाद्या कार्यक्रमाचे निवेदन केल्यासारखे वाटले.
पाऊस न येणं हे शेतकर्यासाठी किती हलाखीचं असतं याची वेदना पोहोचवलीत!
उन्हाच्या तलखीनं अंगाची काहिली होत असताना पावसाचा शिडकावा काय जीवनदाता असतो हे सांगणारा हा गद्य-पद्याचा गोफ आपण अत्यंत उत्कटतेने विणलाय.
भुईच्या कुशीतून रोपांची जपणूक करणार्या ह्या पर्जन्याला आता तरी पान्हा फुटू दे, तुमची प्रार्थना सफल होऊ दे!!
चतुरंग
प्रतिक्रिया
अप्रतिम!
सुरेख!
ढग पांगले
सुंदर लेख
वा..
पाउस
संवेदना
वा वा क्या
खरच
खूप छान...
उत्तम काव्यात्म चिंतन
असेच म्हणतो
सुंदर
सुंदर कवितांच्या आठवणी
मला तर
वाहवा!
+१
वा वा बिरुटेशेठ!
असेच
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
लेख
आभार !!!
खुपच सुंदर लेख.