सगळेच निर्णय आता दैवाच्या हवाली करणे चालले होते. मनाची घालमेल संपता संपत नव्हती. त्यात रोज एक वाईट बातमी कानावर पडत होती. रोज कुणीतरी देवघराच्या वाटेवरचा वाटसरू बनत होते. ना त्यांचे वय झाले होते, ना आजारपण त्यांच्या आसपासही पूर्वी फिरकले होते; तरीदेखील ह्या घटना घडत होत्या. त्यांच्या आप्तेष्टांचे काय हाल होत असतील, हा विचार करून मेंदूचा भूगा होत होता. शेवटी स्वतःच मनाला समजावून दैनंदिन कामे उरकली जात होती.
शिवाय माझ्या आयुष्यात अनपेक्षित घडामोडी घडणार होत्या. त्याची चाहूल खूप तीव्रतेने व्हायला लागली होती. माझा मात्र खूपच वेगळ्या पातळीवर विचार चालू होता. मी स्वतःच माझ्या आयुष्याची दिशा बदलणे, हा माझ्यासाठी एक फार मोठा आणि फार कठीण निर्णय होणार होता.
"कर्तुत्व कि कुटुंब" या फार सामान्य पण तेवढ्याच निर्णायक पेचात मी अडकले होते. एक मन सांगत होते कि कुटुंब नेहमीच तुझ्यासोबत असणार आहे. मग तुझ्या कर्तुत्वासाठी थोडे दिवस त्यांनी हाल अपेष्टात काढले तर कुठे बिघडते. पुन्हा पुन्हा तुला हि संधी मिळणार नाही. संधी म्हण किंवा दैव, नेहमी एकदाच दार ठोठावते. ते जर तुम्हाला नाही कळले तर आयुष्य आहे तिथेच राहते. शिवाय होणारा मनःस्ताप सतत तुमचा पिच्छा पुरवत राहतो. आणि दुसरे मन म्हणत होते, असेल नशिबात तर पुन्हा संधी मिळेल. पुन्हा तुला तुझे कर्तुत्व दाखवता येईल, पण जर कुटुंब दुरावले तर तुझ्या कौतुकासाठी तरी, तुझे असे तुझ्याजवळ कुणी असेल का ? तुझी गगनभरारी पाहून तुझी पाठ थोपटेल का ? का विषाची परीक्षा घ्यायचा विचार करत आहेस ? विषच शेवटी ते .. अंगात भिनल्याशिवाय, जीव घेतल्याशिवाय थोडीच राहणार आहे ?
वाचने
2299
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
थोड अजुन लिहायला हव होत ,
संदर्भ लावता लावता जिवाची लय
In reply to थोड अजुन लिहायला हव होत , by पियुशा
पहील्या परीच्छेदाचा शेवटच्या
बहुतेक 'टु बी ऑर नॉट टु बी'
तुमचा सगळाच लिखाण असच असता
काही गाळलेल्या जागा भरल्या तर
आपल्या " घालमेल " भाग