मगाशी विविध वाहीन्यांवर मा. कपील सिब्बल (मा. चा योग्य अर्थ घेणे) यांचे आकांडतांडव चालु होते.
केंद्र सरकारने गुगल, याहू, मायक्रोसॉफ्टसारख्या इंटरनेट कंपन्या, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरून मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंधित सर्व आक्षेपार्ह गोष्टी हटविण्यास सांगितले आहे. तसेच सरकारने या सर्व साईट्सवर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी एखादी यंत्रणा विकसित करण्यास सांगितले आहे.
थोडक्यात सेन्सॉरशीप येणार आहे. आत्ता या साईटसवर "सिब्बल" हा "मोस्ट हॅपनींग" विषय झाला आहे.
या साईटसवर फक्त "मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंधित सर्व आक्षेपार्ह गोष्टी" असतात का?
इतर वेळी सोशल पोलिसिंग च्या नावाने गळे काढणा-यांना सेन्सॉरशीपची गरज का भासावी??
वाचून हसावं की रडावं...?
केंद्र सरकारनं इंटरनेट कंपन्या आणि सोशल नेटवर्किंग वेबसाईटसवर 'सेन्सॉरशीप' आणायचं ठरवलंय. कोणताही कन्टेन्ट प्रसिद्ध करण्यापूर्वी 'प्री स्क्रिनिंग' व्हावा आणि 'चुकीचा' कन्टेन्ट काढून टाकावा, असा फतवा काढण्याची पावलं केंद्र सरकार टाकतेय...!!!
फेसबुक, गुगल, याहूला सरकारकडून ताकीद
http://www.esakal.com/esakal/20111206/5411406916295255938.htm
सरकारची सोशल नेटवर्किंग कंपन्यांना धमकी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11003772.cms
वाचने
13298
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
अण्णांचे भ्रष्टाचार विरोधी
अपेक्षित
ही घ्या बातमी. सुरवात झाली आहे काटाकाटीला.
ओ मालक
In reply to ही घ्या बातमी. सुरवात झाली आहे काटाकाटीला. by चिंतामणी
कदाची काटाकाटी करून पुन्हा उघडले असेल.
पाकीस्तानबद्दलच्या वाईट कॉमेंट उडवल्या असतील