चेतन, तुझं म्हणणं पटलं. त्यानंतरचा लगेच लक्षात येणारा मुद्दा म्हणजे व्हिडियो - ऑडियो पायरसीचा. माझ्या माहितीप्रमाणे बॉलिवुडपटांची पहिली सीडी / डीव्हीडी पाकिस्तानात करोडो रुपयांना विकली जाते. पुढे त्याच्या डुप्लिकेट्स निघून त्यांचं काय होत असेल ह्याची आपल्याला कल्पना येईलच. त्यामुळे आपण पायरेटेड सीडी / डीव्हीडी घेऊ नयेत.
परदेशी चलन बदलून घेताना आपण बर्याचदा बँकांकडे न जाता २ रुपये जास्त देणार्या "ओळखीच्या" लोकांकडे जातो. त्यांच्याही कळत नकळत त्यांचे लागेबांधे दुबईतल्या दहशतवाद-पुरस्कारकर्त्यांपर्यंत असतात. वरील मुद्द्याव्यतिरिक्त ह्या दोन मुद्द्यांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं तर आपण गुन्हेगारीला काही प्रमाणात तरी आळा नक्कीच घालू शकू !
आपण कोणी प्रत्यक्ष काहीच करू शकत नाही. परंतू आपल्या रोजच्या जीवनात कायदे पाळून सारे व्यवहार करावे. वर दिल्याप्रमाणे पायरेटेड सीडी विकत घेणे, बेकादेशीर व्यक्तीं बरोबर परकीय चलनाचे व्यवहार करणे, टॅक्स चुकवून ऑक्ट्रॉय चुकवून वस्तू विकत घेणे वा आणणे, बिला शिवाय खरेदी करणे इ. गोष्टी करू नयेत. मुळात पैसा निर्माण कोण करतो सामान्य माणूस त्याने तो पैसा शक्यतो कायदेशीर व्यवहारात खर्च करावा. आपण एवढेच करू शकतो. गुन्हेगारी नष्ट करायला हवेत लेनिन, टिटो, माओ किंवा कॅस्ट्रो यांसारखी बलदंड माणसे.
"आणखी एक ..१० % भिकारी टिपर असतात .."
हे सुहासचे मत एकदम मान्य. पण मग गुन्हेगारांमध्येदेखील काही टक्के पोलिसांचे खबरी असतात, पोलिसांमध्येही काही टक्के गुन्हेगारांचे हस्तक असतात, राजकीय नेत्यांमध्ये देखील काही टक्के देशद्रोही असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एखाद्या लेखावर अभ्यासू प्रतिक्रिया देणार्या माणसांबरोबरच टारगट लि़खाण करणारे 'टारझन'ही असतात.
'काही टक्के' भेसळ सर्वच ठिकाणी आढळते.
मलाही हे पटलं..तसेच पासपोर्ट्/रेशनकार्ड/ ट्रॅफिक पोलिस या लोकांना चिरीमिरी न देता आपले काम करून घेणं..
माझा अनुभव असा की जर आपण चिरीमिरी दिली नाही तरी आपले काम होते. फक्त थोडा जास्त वेळ लागतो.
खादाडमाऊ
खादाडमाऊंशी एकदम सहमत. माझा अनुभवही असाच आहे.
बहुतेक लोक सुचना पाट्या नीट वाचत नाहीत म्हणुन त्यांना त्रास होतो.
साधं उदा.
१. रेल्वे पास / तिकीट काढताना लाइनीत उभे राहते वेळी कीती जणं कामकाजाची वेळ वाचतात? कितीतरी वेळा भोजन/हीसाब का समय होउन गेल्यावरही खिड्कीबंदच असते. अश्या वेळी खिड्की का बंद आहे? हे विचारण्या पेक्षा लोकं चालु असलेल्या खिड्की समोर उभे राह्तात.( मी खड्सावुन वीचारतो आणि खिड्की उघड्ते मग मी पहीला आणि माझ्या मागे मेढरांची रांग)
२. रेशन कार्ड कामाकाजाविषयी सुस्पष्ट सुचना आहेत. चौकशी खिड्की वर तुमचे कामचे स्वरुप सांगा. त्यानुसार आपणास कोणता अर्ज करायला हवा ते सांगुन अल्प दरात अर्ज दिला जातो.(अशीक्षित वर्गासाठि मोफत अर्ज भरुन देखिल दिला जातो.)
३.रेल्वे तक्रारी साठी स्टेशन मास्तरांना भेटुन तक्रार पुस्तक मागुन पहा. (complaint book) आपल्याला सौजन्यपुर्ण व्यवहाराचा अनुभव येइल अशी मला खात्री आहे.(आपले काम देखिल होइलच)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
गुन्हेगारी न करणे जनतेच्या हातात अहे..
पण रोखणे हे पोलिचाचे कायद्याचे काम आहे..
त्यांना ८ व्या वेतन आयोगा प्रमाणे भरपुर तनखा मिळतो...
ह्यांचे व राजकारणी लोकांचे साटेलोटे आहे हि गोष्ट लपुन राहिली नाहि..
इतर देशात गुन्हेगारी का कमी आहे?
आमचे अकुकाका काळाच्या फारच पुढे ब्वा! अर्थात त्याचे कौतुक आहेच हो सर्वांना.
आम्ही अजुन ६ वा वेतन आयोग आल्यामुळे स्टायपेंड वाढेल का हो आमचा? अशी चौकशी करतोय, तिथे काकांनी पोलिसांना ८वा वेतन आयोग देऊनही टाकला.
रा.रा. चेसुगु, आपले विचार खरोखरच चांगले आहेत. मीही कधी कुणा भिकार्याला भीक देत नाही. आणि एजंटना सुद्धा माझा विरोध असतो.
१. मी गाडीचा परवाना स्वतः काढणार,एजन्तकडे जाणार नाही असे जवळ जवळ ४ वर्षे आई-बाबांना सांगत होते.लर्निंग परवान्याची मुदत संपली कि नवीन काढत होते.आई वडील दोघेही मला अजंत शिवाय काम होणार नाही असे सांगत होते आणि झालेही तसेच.एजान्तामार्फात गेल्यावर मी गाडीमध्ये बसून पाहिया गियर टाकला, बास एवढीच माझी परीक्षा! परवाना मला अगदी घरपोच मिळाला!
२. पासपोर्ट काढताना मात्र मी सगळी कमी स्वतःची स्वतः केली. अजन्त्ला मध्ये घेलते नाही.मी सादर केलेल्या एका कागदपत्राची मुल प्रत जवळ नसल्याने मला दुसर्यादिवशी परत यावे लागले.तेव्हा बाहेरचा एजंट 'माझ्याकडून करून घेतलं असत तर झाल असत' अस बोलला.पण मी दुर्लश केल. स्वतःचा पास्स्पोर्त स्वतः काढला याचे समाधान लाभले.
३.मला शोप अक्ट चा परवाना काढायचा आहे.पण कसा काढायचा याची काहीही माहिती नसल्यामुळे एजंटला पर्याय नाही! :(
४. काही दिवसांपूर्वी एके ठिकाणी गाडीवर सामोसे खाताना २ लहन मुले आली आणि भिक मागू लागली.त्यांना पैसे देणे योग्य वाटेना म्हणून आम्ही त्यांना आम्ही दोघात मिळून एक असा सामोसा दिला.सोमोसेवाला त्यांना सामोसा देऊ नका अस सांगत होता,पण आम्ही दिला.थोड्यावेळाने तीच मुले परत आली.तेव्हा सामोसावाल्याने संगीन्तले ह्यांना हा शेंगदाण्याचा लाडू द्या.आम्ही लाडू दिल्यावर ती मुले थोड्या अंतरावर असलेल्या एका बाईकडे लाडू देऊन परत दुसर्यांकडे पैसे मागू लागली.
मध्ये आण्णा फार जोरात चालले होते.पण आता परत पहिले पाध्ये पंचावन्न.त्यांना सपोर्ट करणारी मीच आणि भ्रष्टाचाराला खात पाणी घाल्नारीही मीच! ;(
प्रतिक्रिया
बेगर्स
व्हिडियो पायरसी आणि परकीय चलन
"धन्यवाद"
गुन्हेगारी रोखणे
आणखी एक ..१० % भिकारी टिपर असतात ..
व्यवहार्य प्रतिक्रिया पटल्या
खरोखर पटलं
पासपोर्ट्/रेशनकार्ड/ ट्रॅफिक.चिरीमिरी न देता आपले काम करून घेणे
गुन्हेगारी न करणे जनतेच्या
८ वा वेतन आयोग????
आत्महत्या?
मीच जबाबदार!
आपला जीमेल दिसत