✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

क्या पांचवी पास `इतने' तेज है?

द
दिनेश५७ यांनी
Wed, 07/09/2008 - 01:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3671 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

स
संदीप चित्रे Wed, 07/09/2008 - 02:50 नवीन

भीषण !!!

दिनेश... हे भीषण आहे... अमेरिकेचं लोण भारतात पोचू नये ही मनापासून तीव्र इच्छा !! -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 07/09/2008 - 06:45 नवीन

तेज की सुस्त?

>>>तेरा ते अठरा वरषाच्या मुलींमध्ये `प्रेग्नन्सी'चं प्रमाण वाढतंय, टीनएजर्स तेज आहेतच. जोडीला काही आईवडील आपल्या मुलांकडे लक्ष पुरवण्यात सुस्त किंवा उदासीन असतात. काही आपापले करीयर यशस्वी करण्यात मग्न. काहींना वाटते आम्हाला जे मिळाले नाही ते स्वातंत्र्य आमच्या मुलांना मिळू दे. हीच प्रगती आहे अशी समजूत!
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 07/09/2008 - 07:02 नवीन

खर्॑च

हे वाचुन मन सुन्न झाले खरे, पण आपणच आपल्या मुला॑ना ह्या गोष्टी पासुन परावृत्त करू शकतो काही प्रमाणात. पण लहान वयातच जे रेकॉर्ड करायची रेस सुरू आहे त्यात ही गोष्ट तरी कशी मागे राहिल.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Wed, 07/09/2008 - 13:40 नवीन

मोठं होण्याची घाई

खरं तर गेले कित्येक दिवस हा विषय मनात घर करून आहे. आजकाल सर्वांना मोठं व्हायची फार घाई झालेली आहे. आजची मुले आणि त्यांच्यासाठी असलेली अखंड ज्ञानाची उघडी दारे यामुळे त्यांना खुपश्या गोष्टींची फार लवकर जाण येते. चेहर्‍यावरची एकमेवाद्वितीय अबोधपणाची झाक जेव्हा मेकअप खाली दडपण्याची धडपडसुरू झालेली दिसली की आत खोलवर वाईट वाटतं. आता आताश्या चालायला लागलेल्या मुली जेव्हा ऊंच टाचांचा सराव करतांना दिसतात तेव्हा असं म्हणावसं वाटतं की अरे निदान शरीराचा विकास तरी होऊ द्या त्या आधीच का असले प्रकार करताय? खरं तर बालपण म्हटलं की कसं सगळंच अमर्याद असतं. कल्पनाशक्ती ते आपला संचार सुध्दा. कुठेही जावं भटकावं. सारं जग आपलं. पायी भटकावं, सायकलींवर भटकावं. कुणी आपला नाही कुणी परका नाही. कुणी आपलं म्हणलं की तो दयाळू साधू आणि कुणी रागवलं की तो किल्ल्यातला राक्षस. अशी साधी वाटणी असते. मात्र पुण्यात फिरतांना मात्र आता जाणवतं की प्रत्येकाला मोठं होण्याची घाई झालेली आहे. अर्थात पुण्यात म्हणजे काही विशिष्ट ठिकाणीच जसे कॅम्प आदी भाग. काही वेळा तर लहाण मुलींचा अवतार पाहून याला नक्कीच त्यांच्या घरच्यांची अनुमती असेल का? असा प्रश्न पडतो. असो.... मला काय वाटतेय याने या कुणाला कसला फरक पडतोय? एक मात्र वाटतंय की बालपण ही आपल्याला देवाणे दिलेली अनमोल भेट आहे. ती जाणते - अजाणते पण हिराऊन घेणे चुकच. मग ते उच्चभ्रु समाजात वावरण्यासाठी असेल किंवा घरच्या जवाबदारीसाठी मजूरी करण्यासाठी. आपला. ( लहानपणी भरपूर मस्ती केलेला, चिंचा -बोरं चोरल्यामुळे शाळेत मार खाणारा, सायकलवर मनसोकत हुंदडलेला, मारामारी... लहाणशी खुन्नस... खुपशी मैत्री यात मनसोक्त डुंबलेला... जरा उशीराच मोठा(?) झालेला...) नीलकांत
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 07/12/2008 - 19:40 नवीन

चांगला विषय आणि उत्तम प्रतिसाद!

खरं तर बालपण म्हटलं की कसं सगळंच अमर्याद असतं. कल्पनाशक्ती ते आपला संचार सुध्दा. कुठेही जावं भटकावं. सारं जग आपलं. पायी भटकावं, सायकलींवर भटकावं. कुणी आपला नाही कुणी परका नाही. कुणी आपलं म्हणलं की तो दयाळू साधू आणि कुणी रागवलं की तो किल्ल्यातला राक्षस. अशी साधी वाटणी असते
वा काय बोललात नीलकांत!! झक्कास! जपुन ठेवावा असा प्रतिसाद! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 07/13/2008 - 19:10 नवीन

+१ प्रतिसाद आणि उत्तम विषय

उत्तम विषय आहे त्याचबरोबर नीलकांताचा प्रतिसाद पण उत्तमच आहे. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
न
नीलकांत Wed, 07/09/2008 - 13:56 नवीन

इंडीया टिव्ही आणि इतर मिडीया.

येथे एक बाजू लक्षात घ्यावी लागेल की इंडीया टिव्ही आणि इतर २४*७ वाले कुठल्याही गोष्टीची हॉट न्युज करण्यासाठी टपलेले असतात. विशेषतः ती बातमी जर खून, बलात्कार किंवा सेक्स संदर्भात असेल तर हे लागलीच आपल्या तज्ज्ञांचे(?) मत घेत "वहां क्या हो रहा है?" चा घोष चालवत असतात. त्यामुळे हे सांगतात तशीच परिस्थिती सगळीकडे आहे असं नाही. मी वर नोंदवलेलं मत एका विशिष्ट भागतलं आहे. तो भाग पुण्यात आहे एवढं मात्र खरं. बाकी एवढ्यावरून मी जर का पुण्यातील बालपण नासले अशी बातमी दिल्यास ती जेवढी खरी असेल तेवढीच वरची बातमी खरी असेल असं वाटतं. सोबत एक दूवा देत आहे त्यात याच इंडीया टिव्हीची एक ब्रेकींग न्युज देत आहे. येथे न देण्याचे कारण म्हणजे विषयांतर टाळने हे आहे. दूवा नीलकांत
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी Wed, 07/09/2008 - 17:06 नवीन

खरं सांगू ???

नमस्कार, तुम्ही जे लिहीले आहे ते अतिशय भयानक सत्य आहे पण खरं सांगू... आता आपण हे बदलू शकत नाही हे सुद्धा तेव्हढंच विदारक सत्य आहे. परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेली आहे . पाच वर्षापूर्वी ' लोकप्रभा ' मधे आलेला सर्व्हे : लक्षात घ्या पाच वर्षापूर्वी मुंबई च्या नरिमन पॉइंट ; मरिन लाईन्स ; वाळकेश्वर आणि दादर च्या उच्चभ्रू वस्त्यांमधे गणेशोत्सव आणि नवरात्र या सणांनंतर गर्भपाताचं प्रमाण नेहेमीपेक्षा ४५ % नी वाढतं. आज काय परिस्थिती असेल याचा विचार करण्याची सुद्धा हिम्मत होत नाही. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 07/12/2008 - 17:28 नवीन

हेच म्हणतो..

मुंबई च्या नरिमन पॉइंट ; मरिन लाईन्स ; वाळकेश्वर आणि दादर च्या उच्चभ्रू वस्त्यांमधे गणेशोत्सव आणि नवरात्र या सणांनंतर गर्भपाताचं प्रमाण नेहेमीपेक्षा ४५ % नी वाढतं. अगदी हेच आठवलं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीयुत संतोष जोशी
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/10/2008 - 09:13 नवीन

कालाय तस्मै...

कालाय तस्मै नम: ! दुसरं काय?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा