Skip to main content

शैक्षणिक वर्षातील अंतर् असलेल्यांनी/एक वर्ष नापास असलेल्यांनी कधीच सरकारी नोकरी करायची नाही?

लेखक pramanik यांनी बुधवार, 14/09/2011 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
जवळजवळ सर्वच सरकारी नोकरीच्या भरतीच्यावेळी 'शैक्षणिक वर्षातील अंतर् असलेल्या/एक वर्ष नापास झालेल्या' विद्यार्थ्यांना डावलले जाते.मी कीत्येक उदाहरणे बघितलेत ज्यांमधे विद्यर्थ्यांनी बारावी कींवा डीग्रीच्या एखाद्या वर्षात नापास व्हावे लागले/त्यांनी एकतर काही अटळ कारणास्तव परीक्षाच दीली नाही कींवा परीक्षा देउन नापास झाले.त्याच विद्यार्थांनी नंतरच्या परीक्षेत ८०-८५% टक्के काढले. पण सरकारी नोकरीत ते परीक्षा पास होतात व ईंटरव्ह्युला नाकारले जातात. हे कीतपत बरोबर आहे? अशा विद्यार्थांनी कधीच सरकारी नोकरी करु नये का, की हे विद्यार्थी फक्त एका अपयशामुळे अपात्र ठरवले जातात? ह्या अशा अटी ठेवण्यामागचे नक्की कारण काय? व अशा अटीला आव्हान देता येईल का?

वाचने 3081
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मुद्दा पटला नाही महाशय.... इस्कटुन सांगा..... हे आपल्या किंवा आपल्या आप्तेष्टांच्या बाबतीत घडलेले आहे का? खुलासेवार चर्चा होण्याची अपेक्षा आहे....

आम्ही तर सरकारी नोकरीची अपेक्षाच सोडली आहे.

In reply to by आदिजोशी

खरं आहे. मी तर त्या नोकरीसाठी अ‍ॅप्लायपण केले नाहीत कधी. उगाच कोणी "कोल्ह्याला द्राक्ष आंबट" म्हणायचा.

नापास होणे हा गुन्हा ठरतो आपल्याकडे! आणि लोकसंख्याही इतकी आहे ना की चांगले गुण मिळवणारेही अनेकजण असतात. सरकारी नोकरीचे तर जाऊ देत प्रामाणिकपंत, २० २० वर्षं नोकर्‍या झाल्यावरही बर्‍याच खासगी नोकरीत (देश विचारू नका) अजूनही शिनियर पदासाठी आधीच्या कामाच्या अनुभवाबरोबरच १२ चे मार्क धरतात (उदा, ९०% किंवा जास्त असणार्‍यांनीच अप्लाय करावे). आता २० वर्षापूर्वीची १०वी किंवा १२वी ची परिक्षा यामध्ये मला कमी गुण असले पण माझ्या आवडीच्या क्षेत्रात चांगले गुण आणि दणकट अनुभव असला तरी मी घोळक्यात मागेच पडणार. नोकरी मिळते, नाही असे नाही पण एवढ्यात काही विनोदी अनुभव आले म्हणून सांगितले.

In reply to by रेवती

आणि आमच्यासारख्या बारावी पण न केलेल्या लोकांना कुठली फूटपट्टी लावणार... - (दहावी पास) पिंगू

काय सांगता? माझे पुढचे अनेक "जन्म" सरकारी नोकरीविनाच जाणार की काय! :(

सरकारी नोकरीच्या भरतीच्यावेळी 'शैक्षणिक वर्षातील अंतर् असलेल्या/एक वर्ष नापास झालेल्या' विद्यार्थ्यांना डावलले जाते याबद्दल साशंक आहे. 'अंतर असलेल्या लोकांनी येउ नये' असा क्रायटेरिया खाजगी आस्थापनांमध्ये असतो. असा क्रायटेरिया असलेल्या आस्थापनांना अलीकडे लोकच फाट्यावर मारतात ही बाब निराळी. सरकारी नोकरीत सहसा अमुक इतक्या सालापर्यंत जन्म झालेल्या व्यक्ती असा क्रायटेरिया असतो. आणि संबंधित पदासाठी ज्या वयाच्या लोकांची नोकरभरती करायची आहे त्यांच्या वयाचा विचार करुन साधारण दोनएक वर्षे गॅप पडली असेल तरीदेखील अप्लाय करता येईल असे मार्जिन ठेवलेले असते. - नापास शिरोमणी

अरे ते अण्णा हजारे मागं एवढं मोठं लचांड लावुन देत आहेत कशाला जाता त्या सरकारी नोकरीच्या वाटेला, त्यापेक्षा प्रायव्हेट नोकरी बरि की राव, कशाला उगा नसता फुकाचा बडेजाव पाहिजे. आज सरकारी नोकरांना बाजारात पत आहे ती हातात असलेल्या अधिकारांकडे आणि ते वापरण्यासाठी असलेल्या मोकळेपणामुळे, उद्या ते त्यांचे अधिकार नसुन सामान्य जनतेच्या अधिकारांना प्रत्यक्ष उपयोगात आणण्यासाठी असलेला मार्ग आहे हे कळाल्यावर काहि उपयोग नाहि. आणि आर्थिक बाबतित म्हणाल तर जाउदे, कितीवेळा तो विषय बोलावा.

In reply to by ५० फक्त

>>अरे ते अण्णा हजारे मागं एवढं मोठं लचांड लावुन देत आहेत कशाला जाता त्या सरकारी नोकरीच्या वाटेला, त्यापेक्षा प्रायव्हेट नोकरी बरि की राव, कशाला उगा नसता फुकाचा बडेजाव पाहिजे. =)) =)) बाडिस आहे.

ज्यांमधे विद्यर्थ्यांनी बारावी कींवा डीग्रीच्या एखाद्या वर्षात नापास व्हावे लागले
नापास व्हावे लागणे म्हणजे काय हो मालक? :~ एक मात्र मान्य आहे की नोकरी भरती/ पदोन्नती अश्या प्रसंगी फक्त शिक्षणाला (अवास्तव) महत्व देउ नये. उमेदवाराच्या व्यक्तीमत्वाचा, विचारसरणीचा, अनुभवाचा ई.ई. सर्वांगीण विचार व्हावा.