गणपती विसर्जन आणि प्रदूषण
आज गणपती विसर्जनाला दरवर्षीप्रमाणे नदीवर गेलो तर तिथे पोलिस आणि नगरपालिकेचे कर्मचारी उभे होते. त्यानी मूर्ती विसर्जनास प्रतिबंध केला. त्याऐवजी जवळच्या एका हिरवेगार घाण पाणी असलेल्या खंदकाचा पर्याय दिला किंवा नदीजवळ एक छोटी काहिल होती त्यात गणपती सोडायला सांगितला. निर्माल्य टाकायला वेगळी ट्रॉली होती.
हरताळका विसर्जनाच्या वेळी नदीकाठी भात, निर्माल्य, फुले आणि मूर्ती यांचा राडा-चिखल झालेला होता, म्हणून असे केले असे साम्गण्यात आले.
१. घरगुती गणपती आणि निर्माल्य विसर्जनाने फार मोठे प्रदूष्ण खरेच होते का?
२. हेच शासन कारखान्यांची प्रदूषिते नदीत जाऊ नये म्हणून काय उपाय करते?
३. हे शासनाने लोकांच्या धार्मिक प्रथेवर केलेले आक्रमण नाही काय?
४. याबाबत इतर शहरे/ गावे यात आपला काय अनुभव आहे?
५. याबाबत अनिस वाल्याना मूर्ती दान करणे योग्य होईल का?
६. याबाबतचे आणखी काही विचार असल्यास इथे मांडावेत
प्रतिक्रिया
कुठल्या नदीवर गेला होतात
आमच्या गावाजवळ कृष्णा आणि
च्यायला !
@-ह्यातले काही नको असेल तर
आपण फक्त धागा टाकण्यापुर्ते
+१
ह्या मुद्द्याचा गणपती विसर्जन
धर्म आणि प्रदुषण
बहुतेक साखर कारखाने, कागद व रासायनिक कंपन्या