Skip to main content

वृद्ध मातापित्यांची समस्या

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 17/08/2011 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकत्र कुटुंबपद्धतीच्या घरांमधे वृद्धांचा प्रश्न फारसा त्रासदायक नव्हता. पणज्या, आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू, मुलं, नातवंडं सगळीच मंडळी एका घरात रहायची. घरात अनेक माणसं असल्यामुळे वृद्धांना एकटेपणा काय ते माहित नव्हतं, घरातले कर्ते पुरूष पैसा कमावण्यासाठी घराबाहेर असायचे, स्त्रिया घर चालवण्याच्या (ज्याला आपण आता बॅकएंड किंवा पडद्याआडची कामं म्हणू शकतो) कामात गर्क असल्या तरी पोरांकडे लक्ष द्यायला आजी-आजोबा होतेच, अतिवृद्धांची काळजीही घरात घेतली जायची. औद्योगिकीकरणानंतर ही परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. आपल्या मूळ गावात नोकरी-धंदा नसल्यामुळे किंवा त्यात आवड नसल्यामुळे अनेक मुलं आणि कालांतराने मुलीही तालुका, शहरांच्या ठिकाणी येऊन राहू लागल्या. मुलं जगण्याची शक्यता खूपच वाढली, त्याचबरोबर घरांच्या, स्थावर मालमत्तांच्या किंमतीही वाढल्या, विशेषतः शहर आणि आजूबाजूच्या भागात. आता एकत्र कुटुंब असणं जागा कमी असणे, जीवनपद्धतीमधला फरक यामुळे थोडं कठीण होतं आहे. पण त्याच्याच जोडीला इतर अनेक घटकांच्या बरोबरीनेच आधुनिक औषधांच्या मदतीने जीवनमान उंचावत आहे. एकेकाळी माणसांची साठी आली की उत्सव असायचा, आता आपल्या आजूबाजूला ऐशी वर्ष जगणारे अनेक वृद्ध दिसतात. पण अनेक कारणांमुळे मुलग्यांबरोबर रहाणं वृद्ध मातापित्यांना शक्य नसतं. एकच अपत्य आणि ती मुलगी असणं, पुरूष अपत्य नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मूळ गावापासून फार लांब किंवा परदेशात असणं आणि परगावी, परदेशात अजिबातच न करमणं, व्यक्तीस्वातंत्र्याच्या पुरूष अपत्यांच्या कल्पना इत्यादी अनेक कारणांमुळे वृद्ध पालकांवर आपल्या लग्न झालेल्या मुलीकडे रहाण्याची वेळ येऊ शकते. तसंही मुलीचं बाळंतपण माहेरी करण्याची पद्धत आहे. जेव्हा मुलीला काही कारणांमुळे माहेरी येऊन रहाणं शक्य नसतं तेव्हा तिचे पालक तिच्याकडे जाऊन रहातात आणि कौतुकाने मुलगी आणि नातवंडांची देखभाल करतात. जर हे शक्य आहे तर म्हातारपणाची काठी म्हणून मुलीकडे का पाहू नये? मुलगी-जावयानेही (मुलीच्या) वृद्ध पालकांची देखभाल का करू नये?
-------
जाता जाता: (घरच्या घरी केलेलं एक निरीक्षण. या निरीक्षणात आई-मुलींच्या साधारण दहा जोड्याच अंतर्भूत आहेत, पण सगळीकडे एकसारखंच निरीक्षण आढळलं म्हणून नोंदवावसं वाटलं.) विभक्त कुटुंबात, जिथे नवरा-बायको एकत्र रहात आहेत आणि पुढे मुलं झाल्यानंतर ती, तिथे घरातल्या पद्धती या मुलीच्या घरासारख्या होतात. उदा: घरचं जेवण बनवण्याची पद्धत; आई भाजीत गूळ घालत नसेल तर मुलगीही घालत नाही. मुलीचा नवरा घरी स्वयंपाक करत असेल तरीही मुलगी त्याला तिच्या आवडीप्रमाणेच जेवण बनवायला शिकवते/सांगते. पुरूषप्रधान व्यवस्थेत घर पुरूषाचं असतं पण आतला बहुतांश किंवा सर्व कारभार मुलीच्या घरासारखा असतो. तर मग मुलाने सासर्‍याकडेच रहाण्यास काय हरकत आहे? तिथे सासर्‍याची सहानुभूतीही मिळेल आणि सासू कौतुकही करेल. ;-)

वाचने 36232
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

In reply to by पंगा

गट अ आणि ब हे साहजिकच वेगळे आहेत. पण काय आहे ना, मुली आजूबाजूला काय घडतय याकडेही बघत असतात, घरात चाललेल्या चर्चा (उदा. मुच्या लग्नाची, खर्चाची चिंता इ.) ऐकत असतात. त्याबद्दल म्हणतिये.

In reply to by रेवती

पण मग याचा गर्भलिंगनिदान, स्त्रीभ्रूणहत्या वगैरेंशी संबंध काय? उगाच 'कोठेतरी कुणीतरी आपल्या मुलींना मारून टाकते (अगदी 'खचाखच' वगैरे), आता फारच झाले हं, म्हणून मुली सरसकट मुलांशी लग्नाच्या बाबतीत आडमुठेपणा करतात' वगैरे म्हणण्यात काय अर्थ आहे?

In reply to by पंगा

आजूबाजूला 'असले'* अनेक MCPs बघूनही मुली असा आडमुठेपणा करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. *असले म्हणजे पंगाशेटसारखे नव्हे, पंगाशेटना MCP ठरवण्याचा क्षीण प्रयत्न कृपया करू नये.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असले म्हणजे पंगाशेटसारखे नव्हे
ठीक. 'असले' म्हणजे नेमके कसले?
पंगाशेटना MCP ठरवण्याचा क्षीण प्रयत्न कृपया करू नये.
जोरदार प्रयत्न करावा काय?

In reply to by पंगा

ठीक. 'असले' म्हणजे नेमके कसले?
अहो म्हणजे आजूबाजूला, इतस्ततः प्रतिसादांमधे पसरलेले हो.
जोरदार प्रयत्न करावा काय?
तो तुमचा व्यक्तीगत प्रश्न आहे. :p

In reply to by प्रियाली

गोरी आणि सुंदर बायको हवी. आश्चर्य आहे.आमच्याकडे गोरी आणि सुंदर मुलगी हवी असे असते.बायको म्हणून . कोण आपली गोरी आणि सुंदर बायको देईल.

माझ्या एका चुलतमामाकडे त्याचे सासू-सासरे राहायचे. त्यांना दोन मुलीच. आता सासरे नाहीत परंतु सासूबाई आहेत. मलातरी त्यांच्या वावरण्यात कधी अवघडलेपण जाणवलं नाही. तसंच मामीच्याही वागण्यात 'आता काय बाई करु, माझे आईवडील येऊन राहिलेत!' असंही कधी जाणवलं नाही. त्या त्या परिस्थितीत योग्य तो उपाय काढणे हे सगळ्यात महत्त्वाचे. किंचित अवांतर - वपुंच्या एका कथेतलं वाक्य इथे चपखल लागू होतं - लोक काय म्हणतील ह्या कल्पनेनीच आपण आपलं जगणं मुश्किल करुन घेतो! (सुटसुटीत)रंगा

एका भरटण्याची शक्यता असलेल्या चांगल्या विषयावर संयत चर्चा काढली हे बरे आहे. वपुंच्या एका कथेतलं वाक्य इथे चपखल लागू होतं - लोक काय म्हणतील ह्या कल्पनेनीच आपण आपलं जगणं मुश्किल करुन घेतो हे मात्र एकदम बरोबर. मुलाबरोबर राहीले तरी पंचाईत / मुलीकडे राहीले तरी पंचाईत / स्वतन्त्र राहीले तरी पंचाईत

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ, तीनाच्या अपूर्णांकातले लोकं असेच असतात. तुम्हीही नाही का बळी पडलात! ;-)