कागदोपत्री माणूस सी.व्ही.वारद गेले
सुन्न झालो. चार ओळींची बातमी होती.फारशी कुणी दखल घेतली नव्हती.काळाच्या ओघात विसरला गेलेला एक माणूस. बातमी वाचली नसती तर कदाचित कळलंही नसतं. आहेत की नाहीत.
काहीच आगापिछा नसलेला हा मनस्वी माणूस दोन-तीन वर्षं सेंट जॉर्जेस इस्पितळात वास्तव्य करून होता.आपल्या विकलांग देहातील व्याधींशी निकराने झुंजत होता.धुगधुगी अजून कायम होती. त्या अंधार्या खोलीतील त्यांच्या कॉटखाली पत्र्याच्या जाडजूड दोन-तीन ट्रंका होत्या.तीच त्यांची संपत्ती.काय होतं त्यात ? एकदा मला त्यांनी ती ट्रंक उघडून दाखवली. जुनी कागदपत्रे ,बाँबे रिजनल काँग्रेस समितीने केले ठराव, बापूजी, जवाहरलाल, ईंदिराजी यांच्याबरोबर काढलेले फोटो ,वर्तमानप्त्राची कात्रणं, लोकसभेतील कामकाजाचे अधिकृत वृतांत ,लिहिलेली पत्र ,आलेली उत्तरं.
तसं पाहिलं तर त्या कागदपत्रात काय अर्थ होता. आजच्या हिशेबात तो माणूस , त्याच्या निष्ठा , त्याची कार्यपध्दती जशी काळाच्या ओघात निष्प्रभ झाली होती तसंच त्या कागदपत्रांचं.त्यांची कुणाला कधी गरज पडणार नव्हती.ती कागदपत्रं फक्त वारद या व्यक्तीसंबंधी नव्हती.तो एका व्यक्तीच्या कर्तृत्वाचा आलेख कागदपत्रांद्वारे उभा राहत होता.त्याचं महत्व मानलं तर खूप होतं. नाही तर काहीच नव्हतं. वारद यांनी ना वारस ना रुढ अर्थाने काही संस्था उभ्या करून ठेवल्या.एक वादळी व्यक्तिमत्व स्वतःच संस्था बनलं. मुंबईचं जीवन व्यापून राहीलं. ज्या गोष्टी त्यांना महत्वाच्या वाटल्या त्यासाठी त्यांनी आकाश पाताळ एक केलं.मोठमोठ्या गर्विष्ठ , उर्मट लोकांना नमवलं आणि स्वतःबरोबरच आपलं संस्थान बरखास्त केलं.
कॉग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांनी महात्मा गांधींची सेवा केली. जवाहरलाल नेहरूंना मुंबईत असताना कधी सोडलं नाही.राजीव गांधींचा जन्म झाला त्यावेळी ते हॉस्पिटलात उपस्थित होते. इंदिराजी जेव्हा मुंबईत येत तेव्हा त्यांना ते भेटत. हातात आपला कागद कोंबत. त्यात स्वतःसाठी कधीही काही त्यांनी मागितलं नाही.राष्ट्रध्वजाचा अभिमान अतिशय जाज्वल्य. त्यासाठीच त्यांनी आयुष्य वाहिलं. अनेक खटले भरले.अनेक अधिकारी , पुढारी यांचा पाठपुरावा केला. राष्ट्रध्वज कसा वापरावा याची आचार संहिता तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा.तशी लोकसभेच्या इतिवृत्तात कायमची नोंद आहे.
दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचं राष्ट्राला उद्देशून भाषण होतं. ती एक प्रथाच नेहरूंच्या काळात सुरु झाली होती .पुढेही चालू राहील. पण मूळ कल्पना वारद यांची.तसा ठराव त्यांनी स.का. पाटील बीआरसीसीचे अध्यक्ष असताना संमत करवला.त्याची प्रत नेहरू यांना पाठवली आणि सातत्याने पाठपुरावा केला.
राज्यातील राज्यपालांचे राजभवनावर स्वतंत्र ध्वज असत.राष्ट्रध्वजाशिवाय कुठलाही ध्वज असू नये अशी चळवळ त्यांनी उभी केली आणि राज्यपालांचे मानमरातब कायम राहिले तरी त्यांचा ध्वज मात्र खाली उतरला.
पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी म्हणजे वारद यांच्या दृष्टीस दसरा-दिवाळी. सकाळी पांढरा कुडता आणि पायजमा घालून ते हातात काठी घेऊन मुंबईत फेरफटका मारायला बाहेर निघत. मग कुणी उलटा ध्वज लावला, कुणी चुकीची सलामी दिली याची पध्दतशिर नोंद त्यांच्या वहीत व्हायची आणि संध्याकाळी मुंबई पोलीस कमिशनरांना अहवाल जायचा .त्याच्यावर कारवाई व्हायची.त्यांनी केलेल्या केसेस या देशात सर्वत्र प्रमाण मानल्या जायच्या.राष्ट्रध्वजासाठी इतकं काम वर्षानुवर्षं न थकता करणारे वारद एकमेवच.
त्यांच्या तडाख्यातून आएस अधिकारी, मंत्री ,आमदार सुध्दा सुटले नाहीत.एका अधिकार्याने आपल्या व्हिजीटींग कार्डावर तीन सिंहाची राजमुद्रा छापली.तडक त्यांच्या विरुध्द वारद कोर्टात गेले आणि अशा राजमुद्रेचा वापर करता येणार नाही असा कोर्टाचा निकाल आला.मोटारीवर कोणता ध्वज लावावा, कोणता दिवा लावावा याबाबतही त्यांनी नियम करायला लावले.राष्ट्रध्वज हा सर्वात उंचावर लावला पाहीजे असा त्यांचा आग्रह असायचा.
विविध व्यापारी कंपन्या राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रध्वज यांचा खाजगी उद्योगासाठी गैरवापर करीत.त्याविरुध्द त्यांनी प्रथम आवाज उठवला.एका थर्मास कंपनीने जवाहर थर्मास काढला आणि त्यावर नेहरूंचं चित्र छापलं .वारस यांनी हजारो थर्मास रद्द करायला लावले आणि राष्ट्रपुरुषांचा व्यापारी कामासाठी उपयोग होउ नये म्हणून कायदा झाला.
वारदांचं आवडतं लक्ष्य होतं बेस्ट बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर.टोपी घालून काम करावं असा नियम. तो बहुतेक पाळत नाहीत.वारद बसमध्ये शिरून नाव लिहून घेत आणि तक्रार करीत.वारद लांबून दिसले की कंडक्टर, ड्रायव्हर, पोलीस आपली खिशातली टोपी काढून डोक्यावर चढवत.
आता वारद यांच्यासारखी धाक वाटावी अशी निस्पृह माणसं फारशी राहिली नाहीत पण त्यांनी घालून दिलेले नियम ते नसतानासुध्दा किमान मुंबई शहरात पडलेली सवय म्हणून का होईना पाळले जातील असं वाटतं.
त्यांच्या अमूल्य कागदपत्रांचं काय झालं असेल असा विचार मनात घेऊन अस्वस्थता येते.
(आज दिनांक १० फेब्रुवारी ९४ )
कॉग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांनी महात्मा गांधींची सेवा केली. जवाहरलाल नेहरूंना मुंबईत असताना कधी सोडलं नाही.राजीव गांधींचा जन्म झाला त्यावेळी ते हॉस्पिटलात उपस्थित होते. इंदिराजी जेव्हा मुंबईत येत तेव्हा त्यांना ते भेटत. हातात आपला कागद कोंबत. त्यात स्वतःसाठी कधीही काही त्यांनी मागितलं नाही.राष्ट्रध्वजाचा अभिमान अतिशय जाज्वल्य. त्यासाठीच त्यांनी आयुष्य वाहिलं. अनेक खटले भरले.अनेक अधिकारी , पुढारी यांचा पाठपुरावा केला. राष्ट्रध्वज कसा वापरावा याची आचार संहिता तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा.तशी लोकसभेच्या इतिवृत्तात कायमची नोंद आहे.
दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचं राष्ट्राला उद्देशून भाषण होतं. ती एक प्रथाच नेहरूंच्या काळात सुरु झाली होती .पुढेही चालू राहील. पण मूळ कल्पना वारद यांची.तसा ठराव त्यांनी स.का. पाटील बीआरसीसीचे अध्यक्ष असताना संमत करवला.त्याची प्रत नेहरू यांना पाठवली आणि सातत्याने पाठपुरावा केला.
राज्यातील राज्यपालांचे राजभवनावर स्वतंत्र ध्वज असत.राष्ट्रध्वजाशिवाय कुठलाही ध्वज असू नये अशी चळवळ त्यांनी उभी केली आणि राज्यपालांचे मानमरातब कायम राहिले तरी त्यांचा ध्वज मात्र खाली उतरला.
पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी म्हणजे वारद यांच्या दृष्टीस दसरा-दिवाळी. सकाळी पांढरा कुडता आणि पायजमा घालून ते हातात काठी घेऊन मुंबईत फेरफटका मारायला बाहेर निघत. मग कुणी उलटा ध्वज लावला, कुणी चुकीची सलामी दिली याची पध्दतशिर नोंद त्यांच्या वहीत व्हायची आणि संध्याकाळी मुंबई पोलीस कमिशनरांना अहवाल जायचा .त्याच्यावर कारवाई व्हायची.त्यांनी केलेल्या केसेस या देशात सर्वत्र प्रमाण मानल्या जायच्या.राष्ट्रध्वजासाठी इतकं काम वर्षानुवर्षं न थकता करणारे वारद एकमेवच.
त्यांच्या तडाख्यातून आएस अधिकारी, मंत्री ,आमदार सुध्दा सुटले नाहीत.एका अधिकार्याने आपल्या व्हिजीटींग कार्डावर तीन सिंहाची राजमुद्रा छापली.तडक त्यांच्या विरुध्द वारद कोर्टात गेले आणि अशा राजमुद्रेचा वापर करता येणार नाही असा कोर्टाचा निकाल आला.मोटारीवर कोणता ध्वज लावावा, कोणता दिवा लावावा याबाबतही त्यांनी नियम करायला लावले.राष्ट्रध्वज हा सर्वात उंचावर लावला पाहीजे असा त्यांचा आग्रह असायचा.
विविध व्यापारी कंपन्या राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रध्वज यांचा खाजगी उद्योगासाठी गैरवापर करीत.त्याविरुध्द त्यांनी प्रथम आवाज उठवला.एका थर्मास कंपनीने जवाहर थर्मास काढला आणि त्यावर नेहरूंचं चित्र छापलं .वारस यांनी हजारो थर्मास रद्द करायला लावले आणि राष्ट्रपुरुषांचा व्यापारी कामासाठी उपयोग होउ नये म्हणून कायदा झाला.
वारदांचं आवडतं लक्ष्य होतं बेस्ट बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर.टोपी घालून काम करावं असा नियम. तो बहुतेक पाळत नाहीत.वारद बसमध्ये शिरून नाव लिहून घेत आणि तक्रार करीत.वारद लांबून दिसले की कंडक्टर, ड्रायव्हर, पोलीस आपली खिशातली टोपी काढून डोक्यावर चढवत.
आता वारद यांच्यासारखी धाक वाटावी अशी निस्पृह माणसं फारशी राहिली नाहीत पण त्यांनी घालून दिलेले नियम ते नसतानासुध्दा किमान मुंबई शहरात पडलेली सवय म्हणून का होईना पाळले जातील असं वाटतं.
त्यांच्या अमूल्य कागदपत्रांचं काय झालं असेल असा विचार मनात घेऊन अस्वस्थता येते.
(आज दिनांक १० फेब्रुवारी ९४ )
याद्या
3865
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
नाही चीरा नाही पणती
तंतोतंत..
In reply to नाही चीरा नाही पणती by विकास
मनस्वी
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला .............
+१
In reply to स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ............. by बहुगुणी
+२
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+३
In reply to +२ by शुचि
प्रकाश बाळ जोशी -- आभार
अगदी असेच म्हणेन.
In reply to प्रकाश बाळ जोशी -- आभार by चिंतामणी
एका महान व्यक्तिमत्वाचे कार्य
सी. व्ही. वारद
असेच
आम्हांला सी व्ही वारद हे
धन्यवाद !
एका वेगळ्या व्यक्तीमत्वाचा
खुप माहिती मिळाली. आमच्या
जोशीसाहेब, ओळख आवडली. एक
अवांतर पृच्छा
In reply to जोशीसाहेब, ओळख आवडली. एक by बिपिन कार्यकर्ते
नक्कीच. सवडीने टंकतो.
In reply to अवांतर पृच्छा by पंगा
धन्यवाद
In reply to नक्कीच. सवडीने टंकतो. by बिपिन कार्यकर्ते
* दुवा वाचण्यापूर्वीची माझी नेट माहिती, म्हणजे बुजुर्गांकडून उडतउडत ऐकलेले होते, ते असे: १. हे गृहस्थ 'थत्ते' आडनावाचे एक मराठीभाषक गृहस्थ होते. २. यांनी एक तर शीख धर्म स्वीकारला तरी होता किंवा स्वतःला शीख समजत असत / म्हणवून घेत असत / शीख असल्यासारखे वावरत असत. (माहिती ऐकीव आणि अर्धवट असल्यामुळे यांपैकी नेमके कोणते याबद्दल खात्री नाही. पण यदाकदाचित शीख धर्म स्वीकारला असल्यास, बिगरशीख मराठीभाषक माणसाने शीख धर्म स्वीकारण्याचे हे एकमेव उदाहरण असावे काय, याबद्दल कुतूहल आहे.) ३. वरील २. मधील कारणास्तव त्यांनी आपल्या मूळच्या नावाऐवजी 'कर्तारसिंह' हे नाव वापरावयास सुरुवात केली होती. ४. राजकारणाशी संबंधित होते. (याहून अधिक तपशील मला तेव्हा उपलब्ध होऊ शकला नाही आणि अजूनही मला माहीत नाही.) ५. अतिशय चक्रम मनुष्य! ** दुवा वाचून मला नव्याने उपलब्ध झालेली माहिती पुढीलप्रमाणे: ६. यांचा सावरकरांशी काहीतरी संबंध असावा. किमानपक्षी, सावरकर.ऑर्गवरील 'सावरकरांचे सहचारी' (येथे 'सहचारी' हा शब्द मी associates अशा अर्थी वापरलेला आहे - चूभूद्याघ्या.) अशा अर्थीचे इंग्रजीतील शीर्षक असलेल्या एका छायाचित्रात यांचा समावेश आहे. ७. 'घाशीराम कोतवाल' हे नाटक लिहिल्याबद्दल या गृहस्थांनी श्री. विजय तेंडुलकर यांना काठीने बदडून काढले होते. ८. प्रखर हिंदुत्वाभिमानी. हिंदुस्थानात हिंदूंचे समृद्ध आणि प्रबळ राज्य प्रस्थापित करण्याच्या कल्पनेस वाहून घेतलेला माणूस. 'इतरां'ना आणि हिंदुत्वविरोधी फितुरांना (यात मोहन आगाशे, विजय तेंडुलकर आणि जब्बार पटेल हेही आले.) मारून टाकले पाहिजे, दुसरा पर्याय नाही, नव्हे असे होईल हे पाहणे हे आपले (श्री. कर्तारसिंह थत्ते यांचे) व्यक्तिगत कर्तव्य आहे, हे मत. (संदर्भ. कितपत विश्वसनीय आहे, कल्पना नाही.) अर्थात, आपण दिलेल्या गूगलशोधाच्या दुव्याच्या फलितातील दुव्यांवरील माहिती ही त्रोटक आहे, तिचे स्रोत पूर्णपणे विश्वसनीय नाहीत, आणि ती तोलूनमापून ('बॅलन्स्ड'ला समर्पक मराठी शब्द मला येथे आठवला नाही.) नाही, 'रिलाएबल' (मराठी?) असे चित्र ती उभे करत नाही, हे उघड आहे. आणि म्हणूनच, विस्तृत माहिती देण्याचे आपण लवकरात लवकर मनावर घ्यावे, ही कळकळीची विनंती. अन्यथा, श्री. कर्तारसिंह थत्ते यांबाबत वाटणार्या जबरदस्त कुतूहलाच्या जोडीला, श्री. सी. व्ही. वारद आणि श्री. कर्तारसिंह थत्ते यांच्या तुलनेबद्दलचे कुतूहलही मनात घर करू लागेल. श्री. (जयवंत?) दळवी यांनी श्री. कर्तारसिंह थत्ते यांच्या संदर्भात नेमके काय म्हटले असावे, याबद्दलही कुतूहल निर्माण होऊ लागले आहे.
१. हे गृहस्थ 'थत्ते' आडनावाचे
In reply to धन्यवाद by पंगा
धन्यवाद
In reply to १. हे गृहस्थ 'थत्ते' आडनावाचे by चिंतामणी
वेगळेच व्यक्तिमत्त्व
या असामान्य वल्लीची या
बापरे!! केवढं मोठं