अतिशय लगबगीने मी घर आवरत होते. आलेल्या माणसाला उगाच नस्ता पसारा दिसायला नको. सगळ्या घरात व्यक्ती फिरणार तर उगाच कुठली बाहेर पडलेली वस्तू दिसायला नको. पटपटा आवरून मग माझं आवरून तयार रहायचं होतं. सगळीकडचं जागच्याजागी करून अगदीच दिसत होती तिथली सगळी धूळ पुसून मी हुश्श केलं. घाईने अंघोळीला पळाले. सांगितल्या वेळेच्या १५ मिनिटं अगोदर माझ्यासकट माझं घर तीटपावडर लावून तयार होतं.
आता सुरू झाली प्रतिक्षा. हॉलमधे बाकी भारतीय बैठक आहे आणि एखादीच खुर्ची. भारतीय बैठकीवर बसले असते तर परत चादर उस्कडली असती. मी खुर्चीवरच बसून रहायचं ठरवलं. सांगितल्या वेळेला अगदी आतूरतेने मी बेल वाजण्याची वाट बघत होते. नाही वाजली. भारतीय प्रमाण वेळेनुसार अजून अर्धा तास शिल्लक होताच म्हणा. पण एव्हाना सगळं आवरण्यात ब्रेकफास्टला फाटा मारल्यामुळे पोटात कावळे कोकलायला लागले होते. आता किचनमधे जाऊन काहीतरी करून घ्यायचं म्हणजे परत पसारा. परत तो आवरा आणि तेवढ्यात बेल वाजली म्हणजे? असा विचार करत मी चुळबुळत खुर्चीवर बसून होते.
खूप वाजून गेले आणि बेल वाजलीच नाही. भुकेने आणि वाट बघण्याने डोकं तडकलंच होतं. पोटातल्या कावळ्यांना न्याय द्यायचं ठरवलं शेवटी. त्या आणि बाकी कामांना लागले. हे असं सलग आठवडाभर चाललं. आता माझा संताप आणि वैताग उतू जाऊन जाऊन संपायला आला होता. फोनवर फोन करणे, संताप व्यक्त करणे याचाही कंटाळा आला होता. पण अडला हरी.... करणार काय.
असेच सीन्स आयुष्यात वारंवार घडत होते. घडतायत. बेल वाजवणारा माणूस वेगळा एवढाच काय तो फरक. गैरसमज करून घेऊ नका हो एवढी लफडी नाही करत मी. केलीच तर त्या लोकांची एवढी वाट नाही बघणार. मी त्यांची वाट बघावी हे भाग्य ज्यांच्या नशिबी ते म्हणजे विविध फिटिंग्ज करणारे लोक. केबल, गॅस, फोन इत्यादी. दर वेळेला मी घर बदलल्यावर या लोकांच्या नशिबात मी त्यांची वाट बघणं असतं. फोनवर अमुक दिवशी येतो, अर्ध्या तासात येतोच असं सांगून हे कधीच येत नाहीत. आपल्याला कुठलीतरी सर्व्हिस हवीये आणि ती जोडून देऊन हे आपल्यावर डोंगराएवढे उपकार करणारेत हे त्यांचं ठरलेलं असतं. सर्व्हिस चार्ज आणि बक्षिस असं दोन्ही आपल्याकडून उपटूनही उपकारच असतात ते. त्यामुळे त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसणं हे आपलं जिवितकार्यच आहे असं हे लोक समजतात. आपल्याला बाकीची कामे, पोटापाण्याचे व्यवसाय काहीही असत नाहीत (तरीही आपण सर्व्हिस जोडून घेणार असतो आणि बिलंही भरणार असतो ते राहूद्या).
आठवडाभर तंगवल्यावर यांची हृदये द्रवतात. मग अचानक एक दिवस आपलं घर तिटपावडरविरहित असताना, आपण बाहेर निघालो असताना हे उगवतात. ते आल्या वेळेला काम करून घेतलं नाही तर आपलाच गुन्हा असतो. मग आपली अतिप्रचंड महत्वाची मिटींग का असेना. या लोकांच्यापुढे ते झ्याडम्याडच ना हे त्यांचं पक्कं ठरलेलं असतं.
तर असं सध्या चालू आहे माझ्या आयुष्यात. कधी चुकून फोन करून वेळच्या वेळेला एखादा माणूस आलाच तर धक्का बसेल मला.
आपल्याला गरज असते त्यामुळे आपल्याकडे हे झेलण्याशिवाय पर्याय नसतोच पण कधी कधी समोरच्याची गरज असूनही समोरचा असंच वागतो ते मात्र मला आश्चर्याचं वाटतं. नवर्याला दहादा फोन करून असिस्ट करायला येऊ पाहणारे स्ट्रग्लर्स, मला असिस्ट करायला इच्छुक असलेले माझेच काही विद्यार्थी, मला या क्षेत्रात काही करायचंय तर मदत कराल का अश्या आर्जवासकट फोन करणारे ओळखीपाळखीचे लोक हे पण जेव्हा भेटायची वेळ ठरवून त्या वेळेला गायब असतात, येत नाहीये/ उशीरा येतोय असं काही कळवण्याची जरूरही समजत नाहीत तेव्हा अश्यांना कोणी का काम द्यावे हा विचार अर्थातच केला जातोच. त्या माणसावर फुली मारली जाते. आणि आपला खलनायक होतो ते वेगळंच.
दिलेली वेळ न पाळणे, येऊ शकत नसू तर कळवायचेही कष्ट न घेणे, कामासाठी फोन न करताच टपकणे ही सगळी वृत्ती नक्की काय दाखवते? समोरच्याचा/ त्याच्या वेळेचा अनादर? की स्वतःच्याच कामाबद्दल अनादर? की अजून काही?
हे संस्कार उत्तम असण्यातलं हे एक कलम नसावं का?
-------------------------
संस्कार हा शब्द इतक्या सहजपणे वापरतो आपण. त्याची नक्की व्याख्या काय करायची? काय काय असतं या संस्कारांच्यात? इत्यादीचा शोध घ्यायचा प्रयत्न. सध्यातरी केवळ माझ्या अनुभवातून.
- नीरजा पटवर्धन
वाचने
4509
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला आणि माझ्या मनातला
दिलेली वेळ न पाळणे, येऊ शकत
नीधप
+१
:)
In reply to +१ by नितिन थत्ते
खरंय... माझ्या मते हा अनादरच.
इतकीच गोष्ट खरी आहे.
अहो काका, आपल्या घरातल्या
त्यापेक्षा...
In reply to अहो काका, आपल्या घरातल्या by नीधप
सेम टू सेम बोल्तो
In reply to त्यापेक्षा... by पंगा
हो उचलू नयेत म्हणूनही. पण
?
In reply to हो उचलू नयेत म्हणूनही. पण by नीधप
इथे मुद्दा मी घर का आवरते हा
In reply to हो उचलू नयेत म्हणूनही. पण by नीधप
मी घर आवरलं म्हणून लोकांनी
In reply to इथे मुद्दा मी घर का आवरते हा by गवि
कायमच घर चकाचक ठेवणे आणि
In reply to मी घर आवरलं म्हणून लोकांनी by नीधप
लेखाचा जो विषयच नाही त्यावरून
In reply to कायमच घर चकाचक ठेवणे आणि by गवि
ओसीडी
In reply to लेखाचा जो विषयच नाही त्यावरून by नीधप
@नी ताई मी इतकं स्पष्ट
In reply to ओसीडी by विनायक प्रभू
आयला गवि, तुम्ही जामच
In reply to @नी ताई मी इतकं स्पष्ट by गवि
तशी वेळ येऊ नये, पण आलीच तर...
In reply to मी घर आवरलं म्हणून लोकांनी by नीधप
आपण काय करू शकतो?
:)
तुम्हीच प्लंबिंग वगेरे शिकून
-१
In reply to तुम्हीच प्लंबिंग वगेरे शिकून by कालिन्दि मुधोळ्कर
शक्यता
In reply to तुम्हीच प्लंबिंग वगेरे शिकून by कालिन्दि मुधोळ्कर
नी, कदाचित हा वक्तशीरपणा
- सामाजिक मुल्यांना महत्व ने देणार्या शिक्षणपद्धतीचा
- सामाजिक मुल्यांना फाट्यावर मारणार्या पालकांचा/समाजाचा
- एकंदरीत "चलता है" हा ऍटीट्युड असणार्या भारतीय मनोवृत्तीचा
पण हे बदलायचे असेल तर आपल्याला बदलले पाहिजे. कठिण आहे पण अशक्य नाही. मला स्वतःला वेळ पाळणे फार महत्वाचे वाटते आणि कोणाचे वाट बघायल लागणे ह्याचा तर भय़ंकर तिटकारा आहे :( ह्या सवयीमुळे जपानमधे क्लायंटच्या आणि एकंदरीत जपानी लोक़ांच्या अंतर्गत गोटात जाउ शकलो (फार कठीण काम आहे हे). जनरली जपान्यांचे भारतीयांबद्दलचे मत 'वेळ न पाळण्याच्या वाइट सवइमुळे' फार चांगले नाही. तर तुझ्या मुळ प्रश्नाला (हे संस्कार उत्तम असण्यातलं हे एक कलम नसावं का?) माझे उत्तर: जरूर असावे. - (वक्तशीरपणा हा डीसऑर्डर असलेला) सोकाजी अवांतर: (>>गैरसमज करून घेऊ नका हो एवढी लफडी नाही करत मी बरे झाले हे स्पष्ट केलेस नाहीतर गैरसमज होउ लागलाच होता) ;)