Skip to main content

दुर्दैव कि निश्काळजिपणा?

लेखक स्वप्नांची राणी यांनी मंगळवार, 19/07/2011 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
मन सुन्न करणारि बातमि काल पाहिलि..एका धबधब्या मधे पिकनिक साठि एक कुटुम्ब गेले अणि अचानक आलेल्या पाण्या च्या लोण्ध्यात सगळे वाहुन गेले. खर तर त्या धबधब्या च्या काठावर सगळिकडे वार्निन्ग च्या पाट्या लावलेल्या आहेत्.... ह्या घटनेला दुर्दैवि म्हणावे कि त्यान्चा निष्काळजि पणा? आपण सगळेच अति उत्साहात कधि कधि अश्या चुका करुन जातो का? मला आठवतय जेव्हा मि ट्रेक्किन्ग ला जायचे तेव्हा 'अनोळखि' पाण्याच्या जागि पाणि प्यायला किन्वा पोहायला उतरायचे नाहि अश्या स्पश्ट सुचना दिल्या जायच्या अणि त्यान्चे पालनहि केले जायचे. आमचे सेनिओर्स हि अश्या बाबतित हयगय खपवुन घ्यायचे नहित आणि नवख्यान्च्या अति उत्साहाला आवर घालायचे, त्यामुळेच कधि अशि काहि दुर्घटना घडलि नाहि. स्वयंशिस्तिचा अभाव हे अश्या घटनान्च्या मागचे कारन असावे का? http://youtu.be/DjzBANSTFto

वाचने 4040
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

हि क्लिप पाहुन सुन्न झाले पण त्यापेक्षा आजुबाजुच्या लोकानी त्याना वाचविन्यासाथी काहीच प्रयत्न केले नाही याचा जास्ती राग आला

In reply to by पियुशा

हनुमान, सुपर्मान, स्पायडर्मान, ब्याट्मान हे फक्त कहान्यात असतात म्याडम.... ४५ सेकंदात कुणीच "माइका लाल" तिथे पोचुन वाचवु शकत नाही...

ऑफिस मध्ये लिंक ओपन होत नाहि तरी बातमी इंदुर जवळच्या धबधब्याची आहे असे बातम्या पाहिल्याने वाटते. त्यानुसार उत्तर द्यायचे झाले तर यास दुर्दैव असेच म्हणता येइन. कारण २ मिनिट आधी तेथे काहीच पाणी नव्हते .. आणि ते लोक येव्हड्या काठावर ही नव्हते . बाजुला पाट्या असल्या तरी ते पाणी असताना उतरु नये असेच आहे. आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण कस करणार कारण हे सगळॅ काही मिनिटाच्या आत झाले. ( तरी २ जनांना नंतर वाचवण्यात यश आले आहेच)

In reply to by स्वप्नांची राणी

शेवटचे वाक्य तुमची सही आहे काय?? नसेल तर वरील प्रतिसाद प्रचंड विनोदी आहे. (जमले तर सहीच्या आधी separator टाका काहीतरी )

In reply to by स्वप्नांची राणी

मला नाही वाटत स्वाक्षरी आहे... हा स्त्रीसुलभ आश्चर्य व्यक्त करणारा प्रतिसाद आहे............

एका धबधब्या मधे पिकनिक साठि एक कुटुम्ब गेले अणि अचानक आलेल्या पाण्या च्या लोण्ध्यात सगळे वाहुन गेले.
खर तर त्या धबधब्या च्या काठावर सगळिकडे वार्निन्ग च्या पाट्या लावलेल्या आहेत्....
ह्या घटनेला दुर्दैवि म्हणावे कि त्यान्चा निष्काळजि पणा?
उत्तर तुम्हीच दिले आहेत.

आम्ही लहानपणी या पाताळपाण्याच्या धबधब्याखाली अनेकदा तासन तास डुंबत पडलो आहोत, पण एवढे पाणी अचानक आल्याचे कधी बघितले नव्हते... ही घटना दुर्दैवी खरीच, परन्तु लहानपणाच्या अनेक रम्य आठवणी 'पाताळपाणी' या नावाने जाग्या झाल्या....

जेव्हा शासनाने पाट्या लावलेल्या असतात तेव्हा त्याचे पालन केलेलेच चांगले. flash flood नावाप्रमाणेच काहीही सूचना न देवा अचानक प्रचंड प्रमाणात येतो हे त्या video त दिसतेच आहे. उगाचच पिकनिक च्या नावाखाली स्वतःचा अन दुस्र्यांचाही जीव धोक्यात घालण्यात काहीच शहाणपणा नाही. अनोळखी पाण्यात कधीही कधीही उतरू नये, भले तुम्ही कितीही पट्टीचे पोहणारे असोत.

हा मुन्नारच्या अनेक धबधब्यांपैकी एक. फोटोत दिसतेय त्याप्रमाणे जर का मजबूत लोखंडी खांब उभे केले तर कितीही अचानकपणे मोठा लोंढा आला तरी आधार मिळेल. इथली खांबांची उतरंड आणि दोन खांबांमधलं अंतरही किती ठेवलंय हे पाहिल्यानंतर मला खरंच कौतुक वाटलं होतं. फोटोत न दिसणार्‍या भागात हे पाणी एका पुलाखाली जाते अन् त्या पुलाच्या अलिकडेही अशाच खांबांच्या दोन रांगा होत्या.

लोकांनी सावधानता बाळगलीच पाहिजे.परंतू, एक प्रश्नः पाट्या लावल्याने जबाबदारी संपते का? दुर्घटना झाल्यानंतर ती पुन्हा होऊ नये म्हणून काय केलं गेलं? फक्त जिथे दुर्घटना झाली तिथेच नाही तर अशा इतर ठिकाणी सुद्धा.

खरे तर याला निश्काल्जीपानाच म्हणावा लागेल कारण सर्वत्र पाट्या लावलेल्या आहेत आणि मुळात एवढ्या पुढे जाण्याची गरजच काय? तुम्ही सहलीला चाललात न मग तिचा पुरेपूर अन्नंद ध्या. हेच जर ती मंडळी थोडी सावधगिरीने वागली असती तर आज हा दिवस आलाच नसता. असो पण जे काही झाले ते खूपच वाएट झले. या घटने वरून तरी बाकी लोकांनी काही बोध घ्यावा हीच सहलीला जाणार्या मंडळींना आग्रहाची विनंती

ह्म्म्म... दूरचित्रवाणी संचावर हा प्रकार पाहिला होता... फार वाईट वाटले ! :( निष्काळजीपणामुळे प्राण गेले... बाकी यमाचा रेडा तुम्हाला न्यायला रेडी असेल तर, कितीही काळजी घ्या वरचे तिकीट कटतेच.