मराठीतील पहिली गझल
मराठीतली पहिली गझल
डॉ. बिरुटेसरांनी सांगितले म्हणून मध्वमुनिश्वर व अमृतराय यांची एकदमच ओळख करून देण्याचा विचार होता. पण त्या आधी अमृतराय यांचा एक विशेष नमुद करावासा वाटतो. हा मराठीतला पहिला गझलकार. इतके दिवस हा मान मोरोपंत पंडितांना दिला जात होता. त्यांची " रसने न राघवाच्या थोडी यशात गोडी " ही पहिली गझल मानली जात होती. त्यावरून छंद-- रसना जाती असे नावही पडले. पण अमृतराय (१६५८-१७५३) हा मोरोपंतांना (१७२९-१७९४) ज्येष्ठ असल्याने त्याची " जगव्यापका हरीला नाहीं कसें म्हणावे " हीच मराठीतली पहिली ज्ञात गझल म्हणावयास पाहिजे.
मला स्वत:ला या छंद, जातीत काही फारसा रस नाही. " मारावा समरा जनास समरा ताराप ताराप गा " शाळेत शिकलो तेवढे बास या मताचा मी. त्यामुळे या गझला किती शास्त्रशुद्ध आहेत ते मी तपासले नाही, नव्हे तो माझा अधिकारच नव्हे. तज्ञ त्या बद्दलची मते देतीलच. या काळी दक्षिणेत गझल हा काव्यप्रकार होता. या दोघांचा त्याच्याशी संबंध होता की नव्हता तेही कळण्यासारखे नाही. बहुधा नसावा. शिवाय या दोनही गझलांत विषय आहे " भक्तीभाव ". आपण आज पहातो त्या गझलांतील भावापेक्षा निराळाच. तेव्हा दोनही रचना देऊन मोकळे व्हावे हे बरे.
जगव्यापका हरीला
जगव्यापका हरीला नाहीं कसें म्हणावें !!धृ !!
तंतू पटी मिळाले भूमी नभापरी हो
घट-मृत्तिका निराळी ऐसें कसें म्हणावें !!
मुक्ता सतेज पाणी पुष्पीं सुगंध तो हा
मैलागिरी सुवासा नाहीं कसें म्हणावें !!
गौडी ती साखरेची पाखडितां नये वां
भिन्नत्व हेम-वस्तू ऐसें कसें म्हणावें !!
मी मानतो तुम्हांला तुम्हि ध्या श्रीपांडुरंगा
अमृतेश्वराचे भजनीं द्वैत कसें म्हणावें !! अमृतराय
(मैलागिरी--मलय पर्वत, पाखडिता नये -- साखर आणि गोडी निराळी करता येत नाही. हेम-वस्तू --सोने आणि अलंकार )
रसने न राघवाच्या थोडी यशांत गोडी !!धृ!!
निंदास्तुती जनांच्या, वार्ता वधूजनांच्या,
खोट्या व्यथा मनाच्या,काही न यांत जोडी !!
साधूंचिया सदातें, सुख देतसे सदा तें,
श्रवणीं सुधा, मदातें सोडूनि हात जोडी !!
विनवी मयूर भावें, सखि हेंचि नित्य गावें
मजला द्रवोनि पावें,दुसरे न बंध तोडी !! मोरोपंत
शरद
याद्या
3640
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
वाचनखूण
शरदराव,
गझल
अप्रतिम
वा
वा..
धन्यवाद!
वाह!
धन्स.....क्या बात है..
धन्स.....क्या बात है..
'तंतू पटी मिळाले' ही द्विपदी
धन्यवाद शरदराव !!
मराठीतील -
मस्तच!