कोणताही प्रकल्प एखाद्या ठिकाणचे लोक सहजासहजी स्वीकारत नाहीत. स्थानिक लोकांचे त्यांच्या राहत्या ठिकाणशी एवढे जवळचे संबंध व नाती निर्माण झाली की, सहजासहजी स्थनिक रहीवाशी आपली जमिन व घरेदारे आणि शेतीवाडी देण्यास तयार होत नाहीत. यामुळेच महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी एखाद्या प्रकल्पाबाबत लोकांनी विरोध केला नाही, असे घडलेले नाही. सेझ विरोधात रायगडमध्ये शेतक-यांनी लढा दिला आणि जमिन संपादन करणे अशक्य केले. यामुळेच सरकारला सेझची योजना गुंडाळून ठेवावी लागली. प्रकल्पामुळे जनता विस्थापीत होते आणि एकदा विस्थापीत झाली की, मग या प्रकल्पग्रस्तांना किंवा धरणग्रस्तांचा वाली कुणीच रहात नाही. आधी गोडगोड बोलणारे, नोकरी, पैसे व विकसीत जागा देण्याची प्रलोभने दाखवणारे सरकार प्रकल्प सुरु झाला की, या विस्थापीतांकडे ढंकूनही पहात नाही. वेगवेगळ्या ठिकाणी सरकारने वेगवेगळे प्रकल्प सुरु केले पण तेथील प्रकल्पग्रस्त जनतेला सरकारचे काम झाले की, सरकारनेच वा-यावर सोडालेले आहे. प्रत्येक ठिकाणी सरकारचा हाच अनुभव जनतेला आलेला आहे.
सध्या मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, आणि तो म्हणजे जैतापुर येथील अणुऊर्जा प्रकल्पाचा होय. हा अणुविद्युत प्रकल्प सरकार उभारत आहे. चार हजार मेगावॅट पेक्षाही जास्त वीज या प्रकल्पामुळे निर्माण होणार आहे. महाराष्ट्रात वेज टंचाईचे संकट दूर होईल असे राजकारणी सांगत आहेत. याऊलट हा अणुप्रकल्प असल्याने तो मोठा धोकादायक आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. कोणत्याही परिस्थित आपली जमिन प्रकल्पासाठी द्यायची नाही, अशी ठाम भुमिका स्थानिकांनी घेतलेली आहे. कुठेही कोणतीही चळवळ सुरु झाली की, राजकारणी मंडळी आणि तथाकथित पुढारी तेथे आपोआप येतातच. जैतापुरच्या विरोधकांचे नेतृत्व करायला, प्रसिद्धीला हपापलेले व जैतापुरच्या वा-याशीही संबंध नसणारे नेते कोकणची काळजी घेण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. कॉंग्रेसच्या विरोधात हवा वाहते आहे. अनेक घोटाळ्यांमुळे आधीच बदनाम झालेले कॉंग्रेस हा प्रकल्प उभा करायचाच या जिद्दीने पुढे सरसावलेली आहे. नारायणराव राणे तर या प्रकल्पाची त्यांनी सुपारी घेतलेली आहे अशा भुमिकेत वावरत आहेत. हे सारे त्यांचे विरोधकच म्हणत आहेत. आता तर या प्रकल्पाविरोधात शिवसेनाही कोकणात येत आहे. राणेसाहेब कॉंग्रेसमध्ये आले पण तेथील जुने नेते त्यांना योग्य तो मान देत नाहीत. त्यांना मुख्यमंत्री होण्याची मोठी आकांक्षा आहे. जैतापुर प्रकल्प आपण यशस्वी केला तर पक्षातील आपले वजन वाढेल व हाय कमांडला आपली दखल घ्यावी लागेल. असे गणित करुन राणेंनी जणू सरकारचे वकीलपत्र्च घेतलेले आहे. या आंदोलनास विरोध करुन हे आंदोलन मोडून काढण्यासाठी तेथील जनतेला वेगवेगळी आमिषे व सवलतींची खैरात करत आहेत. कोकणात फक्त माझाच शब्द चालतो, हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. विजय कोणाचा? राणेंचा की विरोधकांचा हाच मोठा प्रश्न आहे.
वाचने
2291
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
हात तिच्या मारी ह्यात नवीन असे काहीच नाही.
चूक
In reply to हात तिच्या मारी ह्यात नवीन असे काहीच नाही. by वेताळ
विजय कोणाचा? राणेंचा की
मोठा अणुप्रकल्प
+१.
In reply to मोठा अणुप्रकल्प by लॉरी टांगटूंगकर
लोकसंख्या
हा प्रकल्प करावा की नाही
In reply to लोकसंख्या by तिमा
लोकसंख्या
लोकसंख्या
सुरक्षा हा विषय आपल्याकडे