एका पाणीपुरीवाल्याची (ना)पाकक्रिया!
http://www.esakal.com/esakal/20110415/5193351932521427606.htm
ठाण्यातील एका परप्रांतीय पाणीपुरीविक्रेत्याने आपण कसे बारा गावचे पाणी प्यायलो आहोत हे एका अनोख्या पद्धतीने समजावयाचा प्रयत्न केला! पाणीपुरीत मानवनिर्मित पाणी घालायची नापाक पाकक्रिया (बहुधा) पहिल्यांदाच ऐकली. आशा आहे की ही शेवटचीच असेल.
त्याची ही "शूक्रिया" अदा करण्याची कृती एका जागरूक मुलीने कॅमेर्यात बंदिस्त केली आणि चव्हाट्यावर आणली. त्यामुळे मोठीच खळबळ उडाली.
रस्त्यावरील पाणीपुरी खाणे काही दिवस तरी अवघड होणार बहुधा. ह्याचा फायदा घेऊन मनसेने आपल्या आवडत्या लोकांना (पक्षी भय्ये) धुवून काढले. तमाम फेरीवाल्यांना गाशा गुंडाळून पळून जावे लागले. नुकतीच ही घटना घडलेली असल्यामुळे ह्या ठेलेवाल्यांना लगेचच सहानुभूती मिळण्याची शक्यता नाही.
असले गलिच्छ कृत्य करणार्याला जन्माची शिक्षा झाली पाहिजे म्हणजे पुन्हा कुणाला तसे करावेसे वाटू नये. पण हातावर पोट असणार्या सगळ्या लोकांना मारहाण करून त्यांना परागंदा करून काय होणार? बहुधा ते लोक गुन्हेगारी, चोरीमारी वगैरे उद्योग करू लागतील नाहीतर भीक मागतील. त्यांना त्यांच्या प्रांतात परत पाठवता येत नसेल तर निदान काही उद्योग करू द्या. फक्त आरोग्यखात्याने आपले काम करावे. हप्ते घेऊन उरले उपकारापुरते असे होऊ देऊ नये असे वाटते.
तुमचे काय म्हणणे?
प्रतिक्रिया
पुन्हा
आमच्या लहानपणी मित्र मित्र
>>बुद्धीवादाच्या नावाखाली
आमच्या लहानपणी मित्र मित्र
वुई आर लाईक दॅट ओन्ली...
किळसवाणा प्रकार
इच्छा मेली
या वरून मागे कुठे तरी
त्या भैयाला
पाणीपुरीचं ठिक हाये. ती
तुम्ही
बडव्यांना पलवून लावता आलं असतं.
मराठी तरूणांसाठी नवा रोजगार
हे भय्ये स्वतःच्या राज्यात
मुंबई कोणालाही उपाशी मारत
Pagination