उन्मन क्षण
मुलाचा तमीळ सहकारी रुपेश आणि इतर मित्रही घरी आले होता गप्पा मारायला, क्रिकेट वर्ल्ड कपचा जल्लोष संपला तरी चर्चा चालूच होत्या.
For a change, मी सीएनएन लावलं. Anderson Cooper चं AC 360 चालू होतं, जपान मधल्या हाहा:काराचं वर्णन संपून सुरु झालं ते मध्य-पूर्वेत आणि इतरत्र पसरतच चाललेल्या अशांततेचं सविस्तर कव्हरेज. ट्युनिशिया आणि इजिप्त पासून सुरु झालेली जन-क्रांतीची लाट पसरत चालली आहे.... सिरीया, बहारीन, जॉर्डन तसंच लिबिया आणि येमेन - वडवानलासारखा जनेच्छेचा रेटा प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देतोय, कुठे तरी एखादा ओळखीचा नेता, पण बराचसा निर्नायकीच संग्राम.
बराच वेळ टी व्ही कडे लक्ष देऊन ऐकत असलेला रुपेश एकदम म्हणाला, "अंकल, आप को क्या लगता है? With all the corruption scandals going on, will India be the next one for such things?"
माझ्या मनात बरेच दिवस सुप्तावस्थेत असलेला प्रश्न असा एकदम माझा गळा धरेल असं वाटलं नव्हतं.. मी एकदम चाचरलो, थोडं सावरून म्हणालो, "India does need a change, but I am not sure these countries with non-democratic traditions would be the model for a change in India. I think Indians are not this unhappy with our form of government. I hope they will bring about a change, but it will perhaps be gradual. Unlikely to be so drastic, or violent."
रूपेशने मान हलवली. क्षणभर थांबून म्हणाला, "I guess that's right. But do we have time to make a gradual change? I am twenty five, and I would like to see the change sooner rather than later." इतर मित्रांकडे वळून तो म्हणाला, "What do you guys think?"
पुढची चर्चा घरातल्या तरूणाईने हातात घेतली आणि बराच वेळ हिरीरीने अभ्यासपूर्ण वाद-विवाद रंगले, जेवणाची वेळ होईपर्यंत.
पण माझं मन केंव्हाच खूप वर्षं मागे गेलं होतं, सायमन-गारफंकेल या दुकलीच्या Sound of Silence या गाण्यात रंगलं होतं.
रात्री वेळ मिळाला तेंव्हा मी यू ट्यूब वरून ते व्हिडिओ शोधून काढले. सर्व झोपल्यानंतर झपाटल्यासारखं मनात आलेलं स्वैर रुपांतर टंकलिखित करून ठेवलं.
काल दिवसभराच्या कामात ती चर्चा, ते लिखाण, विसरून जायला झालं होतं, पण मग नाना पाटेकरचं महाराष्ट्र टाइम्स मधलं लिखाण वाचण्यात आलं आणि पुन्हा खपली निघाली.
भारतीय संघाचं विश्वचषक जिंकल्याबद्दल कौतुक करणाऱ्या लेखात अखेरीला नाना म्हणतो, ..."रस्त्यावर मैदानातल्या गवतासारखी माणसं उगवली होती. ब्रिटीशांनंतर मुंबई पहिल्यांदाच एवढी घनदाट वाटली. मुंबईच का; सारा भारतच. स्वातंत्र्याचा लढा पुन्हा सुरू झाल्यासारखं वाटलं. आपण विश्वचषक जिंकला. तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन.
एकच गोष्ट मनात आली की अत्याचार, भ्रष्टाचाराविरुद्ध आमची लोकं रस्त्यावर अशी कधी उतरतील?
ज्या दिवशी उतरतील, त्या दिवशी आम्ही सारंच जिंकलेलं असेल. ..."
तर सुहृदहो, हे आहेत मला पूर्वी कधी-काळी स्वातंत्र्याची आगळीच जाणीव करून देणार्या आणि तितक्याच भेदकपणे आजही उन्मन करणार्या २ व्हिडिओंचे दुवे:
एक आहे पॉल सायमन आणि आर्ट गारफंकेल यांचा खूप सुरुवातीचा, तर दुसरा त्यांचाच पण ते २५ वर्षांनी पुन्हा त्याच गाण्यासाठी एकत्र आले तेंव्हाचा.
आणि खाली आहेत ते माझे वेडे-वाकुडे शब्द, त्या गाण्याच्या रुपांतराचे...(मूळ गीत रचना इथे मिळेल)
अरे काळोखा रे, जुन्या जिवलगा रे
परतुनी आलो तुला भेटण्या रे
दृश्य एक हळू हळू थोडे ओसरले
माझ्या झोपल्या मनात त्याचे बीज पसरले
लपेटून शांततेच्या स्पंदनात न्हाले
निघालो एकला स्वप्नाच्या लाटेने
इवल्याश्या फरशीच्या निमुळत्या वाटेने
झोत मंदसा टाकीत दिवे रस्त्याचे
थंड हवेत शहारे तन माझे हे साचे
आणि अचानक डोळा खुपले ते भाले
रात्र चिरत प्रकाशाचे कवडसे आले
लपेटून शांततेच्या स्पंदनात न्हाले
त्या नग्न प्रकाशात दृश्य पाहिले एवढे
दहा हजार असावे, लोक अधिकही थोडे
नुसतेच उच्चारती, परि बोलती ना कुणी
कान उघडे परंतु ऐकती ना कुणी
नसे गात कुणी तरी गाणी लिहित राहिले
शांततेच्या स्पंदनांच्या कुणी वाटेला न गेले
'अरे, मुर्खांनो' म्हणालो, 'नाही ठाऊक एवढे?
अशी शांतता भयाण जसा कर्करोग वाढे
शब्द माझे घ्या मुखात, उठवा ती राने
हात माझे घ्या हातात, उभे रहा आधाराने'
पण शब्द माझे ते गळाले जसे थेंब ओघळावे
खोलवर विहिरीत पुन्हा शांतता डोकावे
लोक झुकले, वाकले, हात जोडीते ते झाले
चिरणाऱ्या प्रकाशाला त्यांनी देवत्व दिधले
आकाशातून जाहली मग प्रेषीतांची वाणी
शांततेच्या स्पंदनांनी केले तांडव तयांनी
................
रूपेशच्या प्रश्नाचं उत्तर अजून तरी माहीत नाही: .."do we have time to make a gradual change?"
माझ्या जाणीवेच्या कालावधीतच ते मिळेल अशी आशा आहे!
प्रतिक्रिया
मस्त. वाचनखूण साठवली.
"do we have time to make a
छान लिहिलेत विचार करायला
सुंदर!
विचार..
एकच गोष्ट मनात आली की
सुंदर लेख!
आवडला
लेख
सुरेख!! खरंच.. रोज प्रश्न
विचारमग्न करणारे लेखन. अतिशय आवडले.
change
सहमत
थत्ते काकांशी या मुद्द्यावर
लेख अतिशय आवडला !!
एग्झॅक्टली !!! हेच म्हणायचे