रंगपंचमी तील अनिष्ट प्रकार
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
रंगपंचमीचा अंगावर काटा आणणारा अनुभव लिहीते आहे.
खूप वर्षे झाली त्या गोष्टीला. नवरा जहाजावर होता आणि आमचा फक्त साखरपुडा झालेला होता. मी मुंबईच्या एका महाविद्यालयात शिकत होते आणि हॉस्टेलवर रहात होते. दर शनिवारी, रवीवारी मी सासरी जाऊन रहायचे कारण नवरा एवीतेवी नव्हताच त्यामुळे आईबाबानी परवानगी दिली होती. त्यायोगे सासरच्या लोकांशी ओळख होत असे, रीतीभाती समजत असत.
एका रवीवारी नेमकी रंगपंचमी आली. आणि मी परत हॉस्टेलवर निघाले. मला सासूबाईंनी जाऊ दिले. त्यांच्या लक्षात आले नसावे की या दिवशी स्त्रियांनी मुंबईत बाहेर पडणे किती धोक्याचे असते. झाले मी रेल्वे स्टेशनवर गेले, सामसूम होती. वय लहान असल्याने, अननुभवी असल्याने माझ्यालक्षात आले नाही की हा या दिवसाचा प्रभाव आहे. मी लेडीज डब्यात शिरले, अक्षरक्षः कोणीही नव्हते. पण एक भिकारीसदृष मनुष्य येऊन उभा राहीला. आणि मग मी विचार केला "अरे मी कदाचित दुसर्याच डब्यात शिरले असेन. कदाचित हा स्त्रियाकरता राखीव डबा नसेलच." आणि मी काहीही कृती न करता तशीच आपल्या विचारात मग्न उभी राहीले.
.
.
.
पण केवळ देवाच्या कृपेने गाडी सुटण्याच्या २ मिनिटे अगोदर एक हवालदार तेथे आला आणि त्याने त्या भिकार्याला बखोटीला धरून खाली उतरविले. आणि मग मात्र माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आणि अंगावर सरसरून काटा आला. नशीबाने मला विद्याविहार ते कांजूरमार्ग दोनच स्टेशने प्रवास करायचा होता पण ती दोन स्टेशनेही खूप तणावात गेली पुढे हॉस्टेलवर जाईजाईपर्यंत जीवात जीव नव्हता.
म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती तशातला प्रकार.
प्रतिक्रिया
चित्राशी सहमत
पण घटना घडून गेल्यावर ही
शुची -फार प्रामणिक अनुभव
Pagination