.................आपली लोक बघा कुठ फिरायला गेले नाहीत ना युध्द करायला. उगीच बाकीच्या लोकांचा इतिहास कशाला वाढवून ठेवा.....................
:-):-):-):-):-)
बाबा अभि, वेळ न पाळणं हा माझा आणि बायकोच्या (माझ्या) भांड्णाचा ९५% मुद्दा असतो. घड्याळ हे फक्त त्यातील सेल बदलण्यासाठी घरात आणलेले आहे असा काही लोकांचा समज असतो.
बाकी जे शालजोडीतुन मारले आहेत ना ते लई जबरा आहेत.
हर्षद.
लेख खरेच छान लिहिलाय
अगदि बरोबर निरीक्षन नोंदवलीत
मला तर कुठेही वेळेवर जाउन लोकांची वाट बघायची इतकि सवय लागलिये कि बस्स्स
आता त्यांचे उशिरा येने पन एन्जॉय करते
माझी १ मैत्रिन आहे ती तर मल संडेला २ वाजता येनार मह्न्ते आनि येते ४.४० नन्तर आनि सगळा प्लअॅन चा बोर्या वाजवते
आता अशा लोकाना मात्र मी मनावर घेने सोडलेय
एकदम मस्त..माझे काही उशीर करणारे मित्र/नातेवाईक आहेत..त्यांना पाठवतो हा लेख..
बर्याच वेळेला या लोकांच्या उशिर करण्याच्या सवयीमुळे संताप संताप होतो. त्यात राग अशा गोष्टीचा येतो की लोकं असे म्हणतात.. " ११ चा कार्यक्रम आहेना ...म्हणजे १२ पर्यंत लोकं येतील..मग लगेच सुरू करू..". किंवा " ११ चा कार्यक्रम आहेना ...म्हणजे १२ पर्यंत जाऊया..."
सध्या मी परदेशात आहे. येथील बरेचसे भारतीय हमखास उशीर करणारे आहेत. त्यांना त्याची लाज ही वाटत नाही. ज्या कार्यक्रमास परदेशी आणि भारतीय लोंकांना बोलावले असेल तेथे फक्त परदेशी लोंक आणि काही तुरळक प्रमाणात भारतीय बरोबर वेळेला हजर असतात. कार्यक्रम सुरू होऊन १ तास झाला तरी आपले लोक येतच असतात. फार राग येतो..
एकदोनदा तर असे झाले होते की कोणीमला कोठेतरी भेटायला बोलावले होते. ठरल्यावेळेला मी तेथे हजर आणि ते महाशय मात्र घरातच...फोन केला तर..."अरे तू पोचलास काय..इतक्या लवकर?" हे पुन्हावर .. अरे भा*खाऊ तुच तर वेळ ठरवली होतीस ना?
मी एकदोन वेळेला अशा लेट लतिफ लोकांना हिसका दाखवला आहे. त्यांनी समजा ११ वा. कोठे भेटायचे ठरवले आणि जर ते १५ मि. उशिरापर्यंत आले नाहीत तर सरळ मी त्यांना डावलून माझा ठरलेला कार्यक्रम सुरू केला किंवा सरळ त्याठिकाणाहून निघून गेलो होतो. नंतर त्यांच्यात थोड्याफार सुधारणा दिसल्या होत्या.
आणखी एक गोष्ट..कोठेही पिकनिकला अशा उशीर करण्यार्या लोंकाबरोबर गेलो की ही लेट लतिफ लोकं डो़क्याचा पार भुगा करतात. उठणार उशिरा, आरामात (घरी असल्यासारखे) आवरणार..अशा लोकांमुळे माझे देशात आणि परदेशात बरेचसे स्पॉट पहायचे राहून गेलेत..
तुच तर वेळ ठरवली होतीस
नुकतेच असे झाले. मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला दुपारी ३.०० ची वेळ दिली.
वाढदिवस कराटेक्लासच्या पार्टीहॉलमध्ये होता. बरेचदा मी वेळेवर जाते (पण अपवाद आहेतच;)).
सगळे अमेरिकन मित्र आणि मी एकटी भारतीय असे हजर होतो. बर्थडेबॉयशिवायच खेळ सुरु झाले.
साडेतीनला यजमान हजर झाले. आम्हालाच विचारले कि वेळ तीनची दिली होती का?
आपण पाहुण्यांना 'हॅलो' म्हणायला वेळेवर हजर नसल्याचा कोणताही अपराधी भाव नव्हता कि एकदाही 'सॉरी' नव्हते.
एका उशीरा आलेल्या मैत्रिणीने सरळ सांगितले कि आमचे असेच आहे. पटले तर बोलवा. आम्ही वेळेवर येणार नाही.
वर दिलेली अनेक कारणे आहेतच. एकदा बाहेर वेळ दिलेली असल्याने मी घर लॉक करत होते व प्रेग्नंट मैत्रिण अचानक आली. तिला शॉपिंगला गेल्यावर त्रास सुरु झाला. अश्यावेळी मदत करण्यावाचून पर्याय नव्हता. उशीर झाल्याने यजमानिणीला माफीसह स्पष्टीकरण दिले तर तिला पटले नाही. मी थापा मारते आहे असे वाटले.
Reaching early has a major disadvantage... there is no one to welcome you!
हे कुण्यातरी मोठ्या माणसाने म्हटलेलं नि आमच्या स्वानुभवातून पटलेलं. आमचे सारे दोस्तच असले.
एक प्रातिनिधिक संध्याकाळः
पहिला फोन येतो.
'किती वाजता भेटायचे?' -मित्रवर्य
'मी मोकळाच आहे, तू सांगशील तेव्हा येतो.'-आम्ही.
'मी ही मोकळाच आहे, तू सांग.' -मित्रवर्य.
'ठीक आहे पाचला भेटू." -आम्ही.
'नको, साडेपाच ठीक आहे' -मित्रवर्य (च्यामारी मग आधीच सांगायला काय झाले होते.)
सव्वापाच पाच-वीसला दुसरा फोन 'पावणेसहा होतील रे'. तोवर आम्ही निघायच्या तयारीत, जागच्याजागी चडफडतो.
आम्ही बरोबर पावणेसहाला पोचतो. सहा पर्यंत महाराज गायब. आम्हीच फोन करतो. 'कुठे आहेस रे xxx'. आता वर उल्लेख केलेल्या असंख्य कारणांपैकी रँडमली एक-दोन कारणे ऐकून घेतो. मग सुमारे सव्वा-सहा साडे-सहा पर्यंत महाराज पोचतात, ते ही आमचे भाग्य थोर असेल तर. साडेपाच ते सहा पर्यंत इथे घालवून साडेसहाला काही आणखी काही करू असा प्लान केला असेल तर गेला बोंबलत. जय हो!
एवढे असून आम्ही अजून शहाणे होत नाही. साडेपाच ठरले तर साडेसहाला पोचायचे असते हे अजून टाळक्यात शिरत नाही. काय करणार, म्हणतात ना जित्याची खोड...
(त्रस्त) बैठाराम
मला इथे यायला जरा उशीर झाला वाटतं! काय करणार, कीबोर्ड झोपला होता ना!
आणखी एक फायदा विसरला बरं का! पिच्चरात पोलीस उशीरा येतात म्हणूनच हीरोला हिरोगिरी करायला मिळते नाय का?
प्रतिक्रिया
पहीला प्रतिसाद ही २० मिनिटे उशिरा
हाण तिच्या आयला !!
आपली लोक बघा ...
लेख जरा लवकरंच टाकलाय
हा... अगदि पाचच मिनिटात
मस्त मस्त
बाबा अभि, वेळ न पाळणं हा माझा
लेख खरेच छान लिहिलाय अगदि
११ व्या शतकात पुणे अस्तित्वात
आणि तेव्हा पुण्यात उशीर
घड्याळ...
आभिजीत... ह्या आधीचे लिखाण-
वाह अरुण ...!!! फारच बारीक
मस्त विषयाला सुरूवात केलीत..
तुच तर वेळ ठरवली होतीस
हम्म
अरेच्चा!
सर्वांनाच असे अनुभव आले हे