लोकशाही कडून राजेशाही
उत्तर प्रदेशात मायावती, मुलायम, बिहार मध्ये लालू, रबडी, गुजराथ मध्ये मोदी, आंध्र प्रदेशात नायडू, रेड्डी, कर्नाटकात येदुइरपपा, तमिलनाडूत करुणानिधी, जयललिता आणि महाराष्ट्रात 'जाणता राजा' आणि इतर.
गेल्या काही वर्षात या मंडळींचं त्या त्या राज्यात वर्चस्व आहे. त्यांनी (काही अपवाद सोडून) जणू काही राजेशाहीच चालवली आहे असे दिसते. लोकशाही पासून आपण दूर जात आहोत का?
यातील कित्येकांनी आपल्या "मनगटाच्या" जोरावर आपआपला प्रांत आपलाच (आपल्याच बापाच राज्य) असल्यासारखा चालवलेला दिसतो. सत्ता राबवण्यासाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता. असं भयानक चित्र आपल्याला दिसतं. आपली सत्ता पुढच्या पिढीच्या हाती देण्याचाही प्रयत्न कसोशीने केलेला दिसतो. म्हणजेच घराणेशाही आणि राजेशाही दोन्ही चालू राहील व त्या दृष्टीने पुढील पावलं ही मंडळी टाकताना दिसतात. मग त्यांच्या पुढे कोणीही आला तर "सरळ कापून काढू" असं जाणवतं.
नुसतं महाराष्ट्रा बद्दल बोलायचं झालं तर कोकणचा राजा राणे, मराठवाड्यात देशमुख, पश्चिम महाराष्ट्रात पवार, मुंबईत ठाकरे ही आपापली छोटी सत्ता (आपलं वर्चस्व) कायम ठेवताना दिसतात.
या सर्व राजांना अमाप पैसा लागतो, आणि त्यासाठी आत्ता भूखंड, उद्या कदाचित पाणी किंवा काही वर्षात पैशासाठी आणि सत्तेसाठी हे राजे आप आपलं सैन्य तयार करतील व दुसर्याच्या राज्यावर आपलं सैन्य घेवून हल्ला करतील. आपआपसात लढायाही होतील.
याचाच अर्थ आपण ब्रिटीश पूर्वकाळात हळू हळू जात आहोत का? लोकशाही पासून दूर जावून लोक आपला अधिकार गमावतील आणि जुलमी राजा खाली बिचारी प्रजा असं होईल का?
भूषण
याद्या
1744
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
थोडा वेळ लागेल, पण... !!!
+१
बीहारच्या,गूजरातच्या जनतेने नीवडणूकीत दाखवलेली प्रगल्भता
आपला आशावाद प्रत्यक्षात येवो अशी परमेश्वराला प्रार्थना.
ओबामा ला पाकिस्तान बद्द्ल