गांधी पुण्यतिथीनिमित्ताने...
आज महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त गांधीजींच्या स्मृतीस अभिवादन.
गांधीजी, अहींसा आणि त्याला अनुलक्षून स्वातंत्र्य म्हणल्यावर निघणारे वाद (आणि तेच इतर देशभक्त, स्वातंत्र्य सैनीक/सेनानींच्या बाबतीत) चावून चावून चोथा झालेले आहेत. त्यामुळे कृपया करून या धाग्याचा उपयोग त्यासाठी करू नये ही विनंती.
वास्तवीक "गंगेमधे गगन वितळले" हे अंबरीश मिश्र यांचे गांधीजींवरील पुस्तक वाचून अनेक वर्षे झाली. (त्या संदर्भात शोधताना माझी आणि भोचक यांचा येथील हा संवाद देखील मिळाला...)
मात्र त्या पुस्तकातील एक मुद्दा माझ्या कायम डोक्यात घोळत राहीला. तो म्हणजे आत्ताच्या भाषेत जर बोलायचे झाले तर गांधीजींनी, "जस्ट डू इट" असे म्हणत अंग झोकून दिले. तत्कालीन काँग्रेस चळवळ* आणि काँग्रेस नेतृत्वाला ते मान्य होते अशातला भाग नाही पण नंतर एकदा का सगळी जनता मागे जात आहे, हे लक्षात आले, तेंव्हा पर्यायच राहीला नाही आणि काँग्रेस चळवळ देखील गांधीजींच्या मागे गेली.
आता हा श्री. मिश्र यांचा मुद्दा बरोबर का चू़क ह्यावर चर्चा होऊ शकते. पण त्याहूनही अधिक चर्चा मला या संबंधात "नेतृत्व" तयार कसे होते यावर कराविशी वाटत आहे. गांधीजींच्या आधी एक टिळक होते ज्यांना "असंतोषाचे जनक" हे चिरोलने एखाद्या शिवीसारखे म्हणले पण ती त्यांची जनतेच्या दृष्टीने मानाची उपाधीच झाली.
टिळक ज्या काळात आले त्या काळात काँग्रेसचे नेतृत्व हे एका विशिष्ठ अंगाने देशभक्ती करत होते. त्या मवाळगिरीस टिळकांच्या जहाल विचार पद्धतीने एका अर्थी "आउट ऑफ बॉक्स" असा विचार दिला आणि कधी अध्यक्ष नसताना देखील जनतेचे नेतृत्व केले. गांधीजी आले तेंव्हा देखील टिळक गेल्याने "जहाल मतवादी राजकारणी नेतॄत्व" उरले नव्हते आणि काँग्रेस नेतृत्व हे परत त्यांच्या "टेक इट इझी" पद्धतीने इंग्रजांविरुद्ध लढा देत होते. यात या काँग्रेसी नेतृत्वास कमी करायचा प्रश्न नाही आणि उद्देशही नाही... मात्र गांधीजी आले परत एकदा "आउट ऑफ बॉक्स" विचार करत केवळ काँग्रेस चळवळीसच नाही तर सार्या जनतेस हलवले आणि शस्त्र हातात धरता आले नाही तरी लढा देता येऊ शकतो असे दाखवत नेतृत्व दिले.
अशी अनेक नेतृत्वाची उदाहरणे देता येतील. पण राजकीय नेतृत्वाची उदाहरणे त्यामानाने कमीच मिळतील...
तात्पर्य, "आउट ऑफ बॉक्स" विचार हा केवळ उद्योगधंद्यातच लागत नाही तर मरगळलेल्या समाजमनास परत जागे करण्यासाठी आणि जनतेला या ना त्या रूपाने भरडवणार्या राजकारण्यांना खर्या अर्थाने विरोध करण्यसाठी म्हणून देखील करावा लागतो. तो करणारे आणि "जस्ट डू इट" म्हणत पुढे नेणारे नेतॄत्व जनतेला मिळाले तर त्यातून ती चळवळ, त्यातील गुणदोषांसकट यशस्वी होण्याची शक्यता असते. तेच मार्टीन ल्यूथर किंगने केले आणि मंडेलांनी केले.
मात्र जर हेच नेतृत्वहीन पद्धतीने झाले तर एखादी उल्का तात्पुरती आकाशात चमकून लक्ष वेधते, तितकेच काहीसे दुर्दैवाने अशा अपयशी चळवळींचे भाग्य ठरते. तिआनमेन च्या बाबतीत हेच झाले. अफगाणिस्तानात /इराकमधे चळवळ ही बाहेरच्यांच्या स्पूनफिडींगने झाली तर ते शक्य होऊ शकत नाही... आत इजिप्तच्या बाबतीत काय होईल ते समजेलच.
बाकी अजून एक प्रश्न आज सतत भेडसावत आहे, जर आज गांधीजी असते तर त्यांनी नक्की आजच्या राज्यकर्त्यांच्या विरुद्ध आवाज उठवताना, कशा प्रकारे, "आउट ऑफ बॉक्स" विचार केला असता? आवाज उठवला असता हे देखील नक्की, अहींसात्मकच राहीले असते हे देखील नक्की, पण गांधींजींच्या व्यक्तीमत्वाचा विचार केल्यास त्यांनी वापर करताना वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले असते असेच वाटत राहते. पण कसे याचे उत्तर मला मिळत नाही आहे, तुम्हाला ते उत्तर माहीत आहे का अथवा ते उत्तर वापरणारा गांधी कुठे आहे ते माहीत आहे का?
-----------------------------
* काँग्रेस हा राजकीय पक्ष म्हणून नंतर त्यातूनच जरी उदयास आला असला तरी, काँग्रेस चळवळ म्हणूनच स्वातंत्र्याच्या पहाटे पर्यंत अस्तित्वात होती. थोडक्यात नंतरच्या काँग्रेसींवर शक्यतो चर्चा नसावी असे वाटते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गांधीजीना अभिवादन!
यानिमित्ताने गांधीवादी यांची
अफाट लोकसंग्रह आणि कार्य
आज सुका दिवसकितीतरी
समयोचित लेख
गांधीजींच्या स्मृतीस सादर प्रणाम
ताकद एकाची!
खूपच छान लिहिले आहे.
टिळक-गांधी आणि नेतृत्व गुण...!!
धन्यवाद...
इन्द्र्राज पवार
तुलना....!!
इंद्रराज पवार यांचा प्रतिसाद आवडला...
लोकमान्य आणि महात्मा....!!
सनदशीर मार्गाखेरीज...
उत्तम धागा
छान.
गांधी एक विचार ...
?
आम्हाला टिळकांचा आणि
संदर्भ...